Thursday, January 26, 2017

हमारे गांधी तुम्हारे सवरकर

पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सावरकर, नेहरु व पटेल या तीन नेत्यांचे लोकांना उद्देशुन आलेले संदेश केसरी वृत्तपत्राने १७ जाने १९५० एकाच पृष्ठावर शेजारी शेजारी छापले, त्यांचा भावार्थ असा होता,
१. ज्या देशवीरांच्या नि धर्मविरांच्या कृतकृत्य पिढीने आज स्वदेश स्वतंत्र केला आहे त्याच पिढीचे तुम्ही पुत्र अथवा पौत्र आहात! त्या देशस्वातंत्र्याच्या संरक्षणार्थ हातावर शीर घेऊन राष्ट्रिय सैन्यात शिरुन आपल्या मातृभूमिकडे कोणीही शत्रूत्वाने पाहण्यास धजुच नये इतके तिचे शस्त्रबळ नि सैन्यबळ प्रबळ कराल तरच त्या पिढीच्या पोटी तुम्ही जन्मल्याचे सार्थक होईल- स्वातंत्र्यवीर सावरकर.
***
२. वीस वर्शांपुर्वी मी स्वातंत्र्याची शपथ घेतली या काळात आपण जय आणि पराजय पाहिले. ज्या व्यक्तीने आपणाला विजयाकडे नेले ते गांधीजी आपल्यात नाहित. गांधीजींनी आपल्या सर्वच आयुष्यात उच्च प्रतिची नितीमत्ता, प्रामाणिक पणा सहिष्णुता आणि कष्ट या गुणांना महत्व दिले. आपल्या मनातुन भिती व द्वेष काढून टाका. आपला मार्ग चुकल्यास हे स्वातंत्र्य हातून निसटण्याचा संभव आहे. - जवाहरलाल नेहरु
***
३.गांधीजींच्या प्रयत्नाने हे स्वातंत्र्य आपणस मिळाले, पण आज ते आपल्यात नाहित. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण कष्ट व मेहनत घेतली ते टिकवण्यास पण घेतली पाहिजे - सरदार पटेल
***
२० वर्षांपुर्वी शपथ घेतलेले नेहेरु पंतप्रधान होते तर ६० वर्षांपुर्वी शपथ घेतलेल्या सावरकरांना कार्यक्रमाचे साधे सरकारी आमंत्रण पण नव्हते. सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्व पिढीला श्रेय दिले, तर पटेल नेहरुंनी मुख्यत: गांधींना दिले. त्यांनी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी कष्ट मेहेनत करण्यास सांगितले. सावरकरांनी शस्त्र, अस्त्र, सैन्य यांचा पुरस्कार केला. तर पटेल-नेहरुंनी सीमा संरक्षण सैन्य यांचा उच्चारही केला नाही.
विचारसरणीतला फरक लक्षात घेण्यासारखा आहे.
-संदर्भ पृ. क्र. ८४ सांगता पर्व. लेखक बाळाराव सावरकर
फक्त आणि फक्त गांधी व कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवले आणि तेही बिव्ना खड्ग बिना ढाल असा प्रचार केला, त्यांनी श्रेय घेण्यात आणि त्याचय जोरावर सत्ता संपादन करण्यात एवढा गफला केलाय की पुढची अनेक वर्षे त्यांना सत्तेत येण्याचा अधिकार आहे का नाही हा एक महत्वाचा , जेव्हा पणतु खापर पणतु पणत्या वगैरे कहा थे आप लोग आजादी की लढाई में म्हणून विचारतात तेव्हा तर किळस येते .

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...