Sunday, April 9, 2017

सावरकर कॉंग्रेसमध्ये का गेले नाहीत?

स्वातंत्र्य पुर्व काळात लंडनमध्ये असलेल्या भारतीयांमध्ये दोन तट पडले होते. यांच्यात वादविवाद होत असत. एका गटाचे नेते होते गांधी तर दुसऱ्याचे सावरकर. वादात ज्याची बाजू पटत असे त्याच्या बाजूने जमलेले तरुण जाऊन बसत. हे सर्व तरुण म्हणजे हिंदुस्थानातून उच्च शिक्षणासाठी आलेला बुध्दीमान तरुण वर्ग होता. त्यांच्या समोर बुवाबाजी व महात्मेगिरीची लटपटपंची चालणेच शक्य नव्हते. हळु हळु सावरकरांच्या बाजूला बसणाऱ्यांची संख्या वाढु लागली व एक दिवस असा आला की एका बाजूला गांधी एकटे व दुसऱ्या बाजूला सावरकर आणि त्यांच्या प्रभावळीतले तरुण. त्यानंतर गांधींनी इंडीया हाऊस मध्ये जाणे सोडले व "मारो काटो का पंथ" या नावे क्रांतीकारकांवर टिका करणारे एक राजनिष्ठ पुस्तक लिहिले. त्याच्या प्रस्तावनेत गांधी लिहितात, लंडनमधले इंडीया हाऊस मधले ब्रिटीशांविरुध्द पसरलेले विषारी वातावरण पाहुन मी दचकलो आणि तेथुन मागे फिरलो.
दुर्दैवाने पुढे सावरकर पकडले गेले आणि अभिनव भारत संस्था उध्द्वस्त झाली. सावरकरांना कठोरातली कठोर अशी काळ्या पाण्याची दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावली गेली.
अंदमानात ११ वर्षे व रत्नागिरीत तीन वर्षे असा तुरुंगवास सावरकरांना घडला.
नंतर सावरकर व ब्रिटीश सरकार यंच्यातील तहाद्वारे सावरकरांची पाच वर्षे राजकारणात भाग न घेण्याच्या व रत्नागिरी न सोडण्याच्या अटींवर त्यांना तुरुंगातुन मुक्त केले गेले. १९२४ ते १९३७ असा दिर्घ काळ रत्नागिरीत स्थानबध्द असा काळ व्यतित झाला. गुप्तहेर हे आयुष्यभर सावलीसारखे मागे होतेच.
रत्नगिरीतून सावरकरांची संपुर्ण मुक्तता झाल्यानंतर प्रथम लोकशाही स्वराज्य पक्षात व नंतर हिंदुमहासभेत गेले. त्यापुर्वी त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे असा आग्रह करणारे नेते होते सुभाषचंद्र बोस, वीर नरिमन, डॉ.ना.भा.खरे, सर मानवेंद्रनाथ रॉय इ.इ.
गांधीजींच्या नेतृत्वाखालील चाललेल्या गांधी गोंधळात सावरकरांनी दुरदृष्टीने न जाणेच पसंत केले.
यानंतर लवकरच हे सर्व वर उल्लेख केलेले व सावरकरांना कॉंग्रेस मध्ये या असा आग्रह करणारे हे नेते म्हणजे बोस, डॉ.खरे, रॉय व वीर नरिमन या सर्वांना शिस्तभंगाच्या नावे कॉंग्रेस मधुन निष्कासित केले गेले.
आपल्या आधी १९२० ते १९३७ अशी सतरा वर्षे प्रस्थापित झालेल्या गांधींच्या नेतृत्खावाली सावरकर रहाणे म्हणजे एका म्यानात दोन तलवारी सारखेच होऊन वरील नेत्यांप्रमाणेच सावरकरांचीही गत झाली असती हे उघड आहे.
कॉंग्रेस जर निर्भेळ राष्ट्रवादी असती तर मी कॉंग्रेस मध्येच गेलो असतो, पण ती तशी राहिली नाही व एक व्यक्ती एक मत या लोकशाही तत्ववार चालत नाही या कारणा मुळेच सावरकरांनी कायम कॉंग्रेसचा विरोध केला.

© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...