Wednesday, April 12, 2017

सावरकर आणि राजकिय पक्ष

हिंदुमहासभा प्रवेश हा सावरकरांच्या चरित्रातला केवळ एक टप्पा होता. केवळ अन्य चांगला पर्याय नसल्याने ते निरुपायाने हिंदुमहासभेत गेले, आणि तीवर आपला इतका मोठा ठसा उमटवला की सावरकर आणि हिंदुमहासभा हे अद्वैत वाटु लागले. सन १९३८ ते सन १९४३ अशा केवळ सहा वर्षांच्या कारकिर्दित एका लहानशा मृतप्राय पक्षाला अत्यंत बलाढ्य अशा आणि १८८५ ते १९३८ अशा साठ वर्षे आधीच तळागाळात पोचलेल्या कॉंग्रेसारख्या, सर्व प्रकारची साधनसामुग्री व संपत्ती असलेल्या राजकिय पक्षाला, तो पर्यंतच्या आयुष्यात जी काय लोकप्रियता मिळाली ती पणाला लावुन आव्हान देण्याचा प्रयत्न करणे हाच मोठा भीमपराक्रम होता. सावरकरांच्या जागी सर्वसामान्य खचलेला नेता असता तर कॉंग्रेस ला आणि गांधी-नेहरु जोडगोळीला शरण जाऊन कॉंग्रेसमध्ये जाऊन लोकप्रियतेचा स्वस्त मार्ग निवडुन, स्वत:च्या तत्वांशी तडजोड करुन पैसा, मानमरातब व सत्ता मिळवता झाला असता. पण लोकहितासाठी लोकप्रियतेचा मी बळी देतोय अस स्पष्ट सांगुनच त्यांनी आपले मार्ग निवडले.
सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे अशी अपेक्षा सुभाषचंद्र बोस यांच्या सह अनेकांनी जाहिर पणे व्यक्त केली. परंतु कॉंग्रेस हि निर्भेळ राष्ट्रवादी नसल्याने, हिंदुत्व या मुद्द्यावर कॉंग्रेसशी मतभेद असल्याने व गांधींच्या अहिंसा , ब्रह्मचर्य , मुस्लिम तुष्टीकरण या गांधीगोंधळात फसलेल्या कॉंग्रेसमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही हे सावरकरांनी स्पष्ट केले. 
Image may contain: text
आधी लोकशाही स्वराज्य पक्षात व नंतर हिंदुमहासभा या पक्षात सावरकरांनी प्रवेश केला. सावरकर  कॉंग्रेसमध्ये येतील हि अपेक्षा ठेऊन सुरुवातीला त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करणारी कॉंग्रेस सावरकर कॉंग्रेस मध्ये येत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर त्यांचा निषेध करु लागली. केवळ सत्कारावर बहिष्कार एवढेच स्वरुप न राहता सत्कार सभा उधळुन लावणे, सभांवर चिखलफेक करणे, दगडफेक करणे इ. प्रकार त्यांनी सुरु केले.
No automatic alt text available.
सोलापुरात तर याचा कडेलोट होऊन सावरकरांचा सत्कार करणाऱ्यांवर हल्ले केले गेले , काहींची डोकी फुटली सुमारे १८-२० कॉंंग्रेसी अहिंसक (!) गुंडांना अटक होऊन शिक्षा झाल्या.












पुढे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर लखनौ येथे सावरकर त्यांच्याबरोबर अंदमानात असलेल्या काकोरी कटातले प्रमुख क्रांतीकारक श्री. शचिंद्रनाथ संन्याल यांना भेटले. त्यावेळी समाजवादी गटाचे नेते आचार्य नरेंद्र देव हे सुध्दा सावरकरांना भेटण्यास आले. त्यांनी सवरकरांना प्रश्न केला कि आज हिंदुसभेत तालुकदार, धनिक हे प्रामुख्याने असताना महासभेला प्रगतीकारक संस्था बनवण्याचा तुमचा हेतु कसा साध्य होणार? यास सावरकरांनी उत्तर दिले, "मी नुकताच हिंदुसभेत आलो आहे.येताक्षणीच महासभेचे ध्येय बदलुन पुर्ण स्वातंत्र्याचे ध्येय करवले. पुढे मी काय करतो ते आपण धीर धरा आणि पहा. महासभा पुर्ण पालटुन तिला प्रगत आणि जिवंत करण्याचा माझा संकल्प आहे."
याच महासभेत पुढे बॅ. निर्मलचंद्र चटर्जी व श्यामाप्रसाद मुखर्जी यांना सामिल करुन घेण्यात सावरकरांना यश आले. आशुतोष लाहिरी, भाई परमानंद, राशबेहारी बोस या क्रांतीकारकांना सुध्दा हिंदुमहासभेत आवरकरांनी आणले. एका मृतप्राय अशा राजकिय संस्थेला केवळ सहा वर्षात , अपुरी साधनांनिशी एक लहानसा का होईना पण हिंदुंहिताचा दबावगट म्हणून उभे करण्यात सावरकरांना यश आले. 
सावरकर १९३८ ते १९४३ अध्यक्ष राहून दैनंदिन सक्रिय राजकारणातून प्रकृतीच्या कारणाने निवृत्त झाले. स्वातंत्र्यानंतर मात्र हिंदुत्व, हिंदुहित वा हिंदु हा शब्दच नको इ. प्रकारच्या सावरकरांबरोबरच्या मतभेदातून हिंदुमहासभेचे अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी गोळवलकरांबरोबर हातमिळवणी करुन १९५१ साली हिंदुमहासभेतून फुटुन बाहेर पडुन जनसंघ हा स्वतंत्र पक्ष सुरु केला. हा पक्ष १९७७ पर्यंत अस्तित्वात राहिला तो फारसा मोठा झाला नाही पण संघाचा सक्रिय पाठिंबा असल्याने क्रमाक्रमाने कॉंग्रेस ऐवजी फक्त हिंदुमहासभेचीच जागा व्यापत गेला. १९५१ च्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत हिंदुमहासभेचे चार , जनसंघाचे तीन आणि रामराज्यपरिषद या अन्य एका हिंदुत्ववादी पक्षाचे तीन असे एकुण दहा खासदार हिंदु पक्षाचे होते. तर कॉंग्रेसचे तीनशे चौसष्ट खासदार होते.
१९७१ सालापर्यंत हिंदुमहासभेची जागा संपुर्णपणे व्यापुन व अन्य काही हिंदुत्ववादी नसलेल्या पक्षांशी आघाडी करुन जनसंघाची खासदार संख्या बावीस या अंकापर्यंत पोचु शकले होते.तर कॉंग्रेस खासदारांची संख्या तीनशे बावन्न होती. हिंदुमहासभेचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले.
१९७७ साली जनसंघ जनता पक्षात विलिन झाला. १९८४ ला भारतीय जनसंघाने गांधीवादी समाजवाद या नावाने दोन खासदार या संख्येवर नव्याने सुरुवात केली.एकुण हिंदुमहासभा नष्ट झाल्याचा आनंद जर संघपरिवाराला मिळत असेल ती १९८९ पर्यंत संघाने राजकारणात फार काही प्रगती केली अस मानता येत नाही. हिंदु शब्दाचा त्याग करुन मुसलमानांची मते मिळवण्यासाठी हिंदुसभा मोडीत काढून जनसंघ स्थापन करुन राजकारण करणाऱ्या संघपरिवाराला आधी गंगाजल आणि नंतर रामजन्मभूमि आंदोलनाचाच आधार घ्यावा लागला हा इतिहास आहे. गांधीवादी समाजवाद व नंतर एकात्मिक मानवतावाद हे भाजपाचे मधले दोन टप्पे.
१९२५ पासुन एवढी मोठी संघटना असलेल्या रा.स्व. संघाला १९५१ ते १९९१ अशा चाळीस वर्षात मिळालेले हे प्रचंड (?) यश आणि केवळ सहा वर्ष निव्वळ स्वत:च्या वैयक्तिक करिष्म्यावर मृतवत हिंदुसभेला उभे करण्यातले सावरकरांचे अपयश (?) यात कोणाला आनंद वाटत असेल तर ते तसा मानण्यास स्वतंत्र आहेत.
© चंद्रशेखर साने
Image may contain: textNo automatic alt text available.

No automatic alt text available.

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...