Wednesday, November 30, 2016

आंबेडकरांचे नेतृत्व दलितात सर्वमान्य होते का?

आंबेडकरांची राजकिय चळवळ नंतरच्या काळात केवळ विशिष्ट समाजाच्या हक्कांपुरती मर्यादीत झाली , तर सावरकर समस्त हिंदु समाजाच्या हिताचा विचार करत होते, दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने ते एकमेकांचे राजकिय विरोधक होते त्यामुळे आंबेडकरांनी जे लिहिले तेच प्रमाण मानायची गरज नाही. आंबेडकरांना सावरकरांच्या राजकारणावर टिका करणे गरजेचे होते कारण ते त्यांचे समाजकारणात पण प्रतिस्पर्धी होते, मूलत: आंबेडकरांची जात सोडता अन्य अस्पृश्य समाजात सावरकरांना मान होता तो आंबेडकरांना डाचत असे त्यामुळे त्यांनी सावरकरांविषयी काही वेळा पक्षपाती लिहिले आहे.
विशेषत: मालवण ला १९२९ ला जी फार मोठी पुर्वास्पृश्य परिषद झाली, त्यात अध्यक्षपदासाठी आंबेडकर व सावरकर अशी दोन नावे पुढे आली. परंतु अन्य पुर्वास्पृश्य, विशेषत: चर्मकार समाजाचा आंबेडकरांच्या नावाला प्रखर विरोध होता , सावरकरांचे नाव मात्र सर्वच दलित मंडळींना पसंत होते, व शेवटी सावरकरांचीच अध्यक्ष म्हणुन निवड झाली.
सावरकरांचे समाजकार्य पाहुन बहुजन मंडळी प्रभावित झाली होती. शाहु महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्र गुरु शंकराचार्य यांनी सावरकरांची थोरवी या समारंभात व रत्नागिरीत पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून मान्य केली. महर्षी वि.रा. शिंदे यांच्यासारख्या समाजसुधारकाने तर ईश्वराने आपलेही आयुष्य सावरकरांना द्यावे एवढे त्यांचे समाजकार्य महान आहे असे म्हटले.
मानवी स्वभाव लक्षात घेता या घटनांनंतर आंबेडकरांना व आंबेडकरी समाजाला सावरकर हे शत्रु वाटु लागले असण्याची शक्यता आहे. खरतर सावरकरांनी रत्नागिरीला आंबेडकरांना आमंत्रण देऊन आपण केलेल्या सुधारण व कार्य प्रत्यक्ष पहाण्यास व अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत करण्यासंबंधी पत्रही लिहिले. पण आंबेडकरांनी बहुदा हे आमंत्रण हेतुत: चुकवले व केवळ ऐकिव माहितीवर सावरकरांवर समता पत्रातुन टिका करणे चालु ठेवले. सावरकरांसोबत असलेले दलित नेते परोपरीने आंबेडकरांना सावरकरांशी युती करण्यासंबंधी सुचवत राहिले पण आंबेडकरांनी राजकीय नफ्या-तोट्याचा विचार करुन त्यांची उपेक्षा केली कारण त्यांन राजकारणात आत्मप्रस्थानाची गरज होती. (गांधीजी मात्र सावरकरांना भेटुन गेले कारण त्यांची राजकीय प्रस्थापना आधीच झाली होती.) तसच सावरकरांना भेटण म्हणजे त्यांच्या तेजस्वी व्यक्तीमत्वा समोर झाकोळून जाणे.( आपल्या जातीसंस्थेचे वास्तव शेवटी असे आहे की ज्याच्यासाठी लढले गेले ती जात दुसऱ्या जातीचा नेता असला तरी संशयानेच पहाते त्यात सावरकर तर ब्राह्मण, त्यामुळे आंबेडकर व त्यांची विशिष्ट जात यांनी सावरकरांकडे एक राजकीय स्पर्धक असेच पाहिले, याउलट इतर वंचित जातींना आंबेडकरांच्या तोडीचा नेता न मिळाल्याने म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा, सावरकरांचा तितकासा द्वेष वाटत नाही व ते सावरकरांचा पण कृतज्ञता बुद्धीने आदर करतात, निदान गलिच्छ पध्दतीने लिहित तरी नाहीत.) आंबेडकरी समाज मात्र काही सन्माननीय लेखकांच अपवाद वगळता सावरकरांनी दलितांसाठी इतके मोठे समाजकार्य करत असूनही सावरकरांचा तिटकारा करताना दिसतो, याचे मुख्य कारण इतर समाज सतत हिंदुत्वाच्या प्रवाहातच राहिले. आंबेडकरांनी मात्र सावरकरी व्याख्या नाकारत हिंदु म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा करत मुळातच भारतात जवळपास तृणवत जालेला बौध्द धम्म हिंदुत्वाच्या कक्षेतुन बाहेर काढला.
पुढे राजकीय अपरिहार्यता म्हणून कॉंग्रेस विरुद्ध काही काही निवडणुकांत आंबेडकरांनी सावरकरांशी हात मिळवणी केली.
जर अवतार आणि दैवत या कल्पना सोडून अभ्यास केला तर सर्व थोर थोर व्यक्तींचे मानवी पातळीवर मुल्यमापन करणे शक्य आहे. अन्यथा नुसत्याच आरत्या ओवाळत रहाणे सहज शक्य आहे, ज्यला तसे करायचे त्याने तसे खुशाल करावे, माझा तो मार्ग नाही. मी कोणत्याच महापुरुषाला नुसते "अवतार" मानत नाही. ते खूप मोठे असले तरी त्यांचा अभ्यास करताना आपण तटस्थ असावे अशी माझी भूमिका आहे.

Saturday, April 2, 2016

सावरकर: अंदमानपुर्वीचे व अंदमाननंतर


सावरकरांना अंदमानातच जिहादाचे खरे रुप समजून आले. अंदमानात त्यांना मुस्लीम अधिकाऱ्यांच्या जिहादि वृत्तीचा अर्थ कळला. अंदमानतच सावरकरांनी कुराणाचा अभ्यास केला. केवळ इंग्लिश भाषांतरावर विसंबुन न राहता , इतरही पुस्तके अभ्यासली. तसेच एका मुस्लीम कैद्याकडून सश्रद्ध मनाने गेय स्वरुपातले, आवाजातील चढ उतार असलेले मूळ अरबी कुराणही ऐकले. अभिनव भारतात मुस्लीम सदस्य होतेच त्यांच्यातील काहिंशी सावरकरांची खूप मैत्री जमली होती असे सेनापती बापट यांनी नमूद केले आहे. मदनलाल धिंग्रा मात्र "इन लोगोंपर ज्यादा भरोसा मत करो" असे सावरकरांना म्हणत असत. सावरकरांची इस्लाम विषयी सर्व मते नंतर बदलली. हिंदुमहासभेत मुस्लीमांना घेऊ नये यावर ते ठाम होते. हिंदुमहासभा फुटुन जनसंघाची स्थापना याचे मुख्य कारण श्यामाप्रसाद मुखर्जी व संघाला सत्तेत यायचे असेल तर मुसलमानांची मते मिळाल्याशिवाय ते शक्य नाही असे वाटत होते, सावरकरांना सत्तेच्या राजकारणासाठी जनसंघ स्थापन झाला तेव्हा तो हिंदुहित पहाणारा पक्ष न उरता त्याची दुसरी कॉंग्रेसच होईल अशी भीती वाटत होती. सत्ताकारण करणाऱ्याला या ना त्या स्वरुपात मुस्लीम लोकानुनय करावा लागतो. सावरकरांना निर्भेळ हिंदुहित जपणारा पक्ष अस्तित्वात हवा होता, ज्याचे आज अस्तित्व उरलेले नाही.

१८५७ चे समर हे हिंदुंसाठी स्वातंत्र्य युद्ध तर मुसलमानांसाठी जिहादच होता. या संघर्षाचे हे दोन पैलु आहेत.

या ग्रंथाने सावरकरांना फार मोठी प्रसिद्धी व स्वातंत्र्याची प्रेरक शक्ती म्हणून स्थान मिळाले. या पुस्तकाचे योगदान फार मोठे आहे. आम्हाला १९३७ चे सावरकर नकोत १९०८ चे हवेत असे म्हणणाऱ्यांना सावरकरांची १८५७ संबंधातली मुसलमानांसंबंधी घेतलेलि भूमिका परत घ्यावी असे वाटत होते, पण सावरकरांना स्वत:ची चूकिची भूमिका समजली होती. त्यांनी यानंतर एका भाषणात गोंधळ घालणाऱ्या समाजवादी/साम्यवादी तरुणांना उद्देशून १९०८ चे सावरकर पटायला ३० वर्षे लागली तसे १९३८ चे हिंदुत्ववादी सावरकर समजायला अजून ५० वर्षे असे उद्‌गार काढले. तथापि ज्यांना आज १९०८ चे सावरकर पटत आहेत त्यांनी तसे कार्य करण्यासाठी हात वर करावेत असे आवाहन केल्यावर मात्र सर्व अतिउत्साही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची दातखीळ बसली व आमची कोणाचीही हात वर करायची हिंमत झाली नाही, असे तेथे उपस्थित असलेल्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

Monday, March 14, 2016

महाकाव्यातल्या नीतीकल्पना



रावणाला धर्म समजवणाऱ्या बिभिषणाला रावण संतापुन म्हणाला "राक्षसाणां परोधर्मा परदारा विघर्षण्म्‌ " धर्म - अधर्म कसला सांगतोस, परस्त्रियांना पळवणे हाच राक्षसांचा परमधर्म. झाडाच्या आड दडुन बाण सोडणाऱ्या रामाला वाली म्हणतो, मी पशु आहे, भावाला युद्धात पराभूत करुन त्याच्या पत्नीवर हक्क प्रस्थापित करणे हाच आमचा धर्म. मात्र त्यावर रामाने तु पशु आहेस म्हणून झाडामागून लपुन बाण मारुन मी मृगया केली हा युक्तीवाद त्याला मान्य नाही , त्यावेळी त्यास मानवी नीतीनियम स्वत:ला लागु करायचे आहेत. राम-वाली संवादात रामाने केलेल्या नीतीवादाच्या युक्तीवादात वाली निरुत्तर झाला आणि डोळ्यात अश्रु आणुन त्याने प्राण सोडले.  रामाने स्वत: राज्य घेतले नाही सुग्रीवाला राज्य परत दिले आणि वालीच्या पुत्राला अंगदाला युवराज्याभिषेक करवला. सोन्याच्या लंकेचा मोह धरला नाही, "प्रासाद इथे भव्य परि भारी आईची झोपडी प्यारी" असे म्हणत अयोध्येस परतला. हनुमंताला भक्तीशिवाय काहीच दिले नाही, सीतेने अर्पण केलेला रत्नहार एक एक रत्न फोडून राम आहे का शोधत मारुतीने फेकुन दिला. लक्ष्मण व सितेने रामासोबत वनवास पत्करला. आयुष्यभर साथ देणाऱ्या सीतेचा (स्त्री-पत्नी)लोकांच्या शब्दासाठी आणि कालपुरुषाला दिलेल्या शब्दासाठी लक्ष्मणाचा (पुरुष-बंधु) रामाने त्याग केला आणि स्वत: व्रतस्थ जीवन जगुन शरयुत आत्मसमर्पण केले.


दुर्योधन म्हणतो धर्म काय आणि अधर्म काय हे मला चांगल कळत पण मला धर्म धरवत नाही आणि अधर्म सोडवत नाही.

शरण आलेल्या शत्रूला मारायचे नाही, धर्मयुद्ध, हातात सापडलेल्या शत्रुला बावळट कल्पनांच्या आहारी जाऊन सोडून द्यायचे इ . नीतीकल्पनांनी भारतीय इतिहासात पराभवांचे इतिहास गेले. श्रीकृष्ण हा उपयुक्ततावादाचा पहिला आचार्य. वेळ पडली तर कालयवनासमोरुन भरधाव पळ काढून झोपलेल्या मुचुकुंदाच्या गुहेत लपणारा, जरासंधाच्या द्वारकेवरच्या स्वाऱ्यांपासून पळुन जाऊन रणछोड हि उपाधी पत्करणारा, भीष्माला त्याच्याच कडे जाऊन त्यास मारण्याचा उपाय विचारण्याचा सल्ला देणारा, शंभर अपराध सहन करुन शेवटी यज्ञभूमिवर शिशुपाला चा वध करणारा, युद्धाचा बोल पांडवांवर येऊ नये म्हणून केवळ पाच गावे द्या म्हणून चलाख शिष्टाई करणारा, कंसमामाचा वध करुन भावंडांच्या हत्येचा सूड घेणारा, न धरि शस्त्र करी ची प्रतिज्ञा मोडून रथाचे निखळलेले चाक हातात घेऊन अनावर झालेल्या भीष्मावर चालुन जाणारा श्रीकृष्ण, गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाची मांडी फोडवणारा भगवान श्रीकृष्ण हिच आपली राजनीती असली पाहिजे. पण अहिंसा आणि सद्‌गुण विकृतीला बळी पडून आपण आपले स्वातंत्र्य गमावले आणि ८०० वर्षे पारतंत्र्यात गेलो.

रामायण महाभारतात अनेक नीती कल्पनांची उकल आहे. वरवरची घटना पाहुन , एक एक घटना स्वतंत्र करुन महाकाव्याची संगती लावता येत नाही, संपुर्ण काळाच्या परिघात प्रदक्षिणा घालून त्यांची संगती लावावी लागते.
 अन्याय करणारे स्वत:च्या सोयीचे तत्वज्ञान निर्माण करुन स्वत:च्या अन्यायांचे समर्थन करत असतात. आणि अशा तत्वज्ञानाला कोत्या बुद्धीने विचार करणारे बळी पडत असतात आणि रावण-वाली--शूर्पणखा-दुर्योधन-कर्ण-कैकेयी- महिषासूर हे सर्व त्यांच्या दृष्टीने शोषित ठरतात व हेतुत: लोकांचा बुद्धीभेद करत६ असतात. न बुद्धीभेदं जनयेद !




Sunday, March 13, 2016

आझादीचे स्त्रोत आणि स्तोत्रकार

मोक्ष मुक्ती हि तुझीच रुपे तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती ।।

स्वातंत्र्याच , मुक्तीच आणि उर्दुतल्या "आजादी" शब्दाच स्तोत्र लिहिणारे आणि गाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आज मरु घातलेली कॉंग्रेस आणि मेलेल्या लाल बावटयांचे मुख्य शत्रु झाले आहेत. सर्व पातळी सोडुन ते सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, वर्तमानकाळात सावरकर हे त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे शत्रु ठरलेत हि मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्या सावरकर द्वेषाला वैचारिक प्रत्युत्तर देण्यास महाराष्ट्रातले व बाहेरचे अभ्यासक समर्थ आहेत, कारण हे सर्व आरोप मुख्यत: वस्तुस्थितीपेक्षा द्वेषावर आधारित आहेत. असे आरोप खोडणे फार सोपे असते. मग हे विरोधक असे का करत आहेत? त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडॆ हिंदुत्ववादी अथवा भाजपा अथवा मोदी सरकार विरुद्ध फारसे विरोध करण्यास हातात काही उरलेले नाही. काही घटना वा कमी वकुबाच्या व्यक्तींचा वापर करुन अकांडतांडव करुन मोदी व भाजपा यांची लोकप्रियता घटल्याचे भ्रामक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करुन स्वत:च निर्माण केलेल्या आनंदवनभुवनी गुंगीत रहाणे हेच त्यांना सध्या शक्य आहे व तेच ते करत आहेत. मुख्य विषयांकडचे लक्ष भलतीकडे वळवणे हे खरतर सत्ताधारी पक्षाच्या फायद्याचे असते त्या ऐवजी हे काम विरोधक करत आहेत हि आश्चर्याचीच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या कही अंशी असलेल्या यशाची पावती आहे.

सावरकरांची प्रतिमा मलिन करुन त्यांना काहीही हातात लागणार नाही, सावरकरांवर आचरट आरोप करुन मोदी वा भाजपा चिडेल, हिंदुत्ववाद्यांना चिडवुन त्यांच्या कडून काही आततायी कृत्य घडेल असे त्यांना वाटत असेल तो शुद्ध राजकिय़ मुर्खपणा आहे. कारण कॉंग्रेसने जसे ५०-६० वर्षे गांधीजींचे नाव वापरुन त्यांच्या महात्मेपणाचा सत्ता मिळवण्यासाठी दुरुपयोग केला तसा सावरकरांच्या नावावर अथवा विचारांवर मोदी वा भाजपा सत्तेवर आलेलीच नाही. त्यांना सावरकर हे गांधीजीं इतपतच आदरणीय आहेत, अनुसरणीय आहेतच असे नाही. त्यामुळे सावरकरांची प्रतिमा मलिन करुन उद्रेक वगैरे काही होण्याची शक्यता नाही. मागच्या वेळी कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने अंदमानात सावरकरांचे स्मृतिचिन्हाबाबत तालिबानी वृत्तीचे प्रदर्शन घडवले होते तेव्हा अगदी पुण्यात कै.श्रीमती हिमानी सावरकर लोकसभा निवडणुक लढवली होती, त्यांनाही साधारण दोन वेगवेगळ्या आकड्यांनुसार १००० किंवा ५००० इतकीच मते मिळली होती. त्यावेळी कै.प्रमोद महाजनांनी स्पष्टपणे सांगितले होते की सावरकरांचे नाव वापरुन मते मिळत नाहीत त्यामुळे त्यांच्या नावावर मते मागण्याचा प्रश्नच येत नाही किंवा सावरकर कुटुंबातल्या व्यक्तीला ही पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही.
तरिही हा सावरकर द्वेष का होत आहे? तर याचे एकमेव कारण कॉंग्रेस व साम्यवादी सटपटले आहेत हे एकमेव कारण आहे. सावरकरांवर पातळी सोडून आणि खोटी व वाह्यात टिका करणे हे त्यांचे नैराश्य आणि दिवाळखोरी या व्यतिरिक्त काही नाही. महाराष्ट्रात तर या यामुळे यांना मतांसाठी फायदा न होता उलट लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा जास्त मलिन होत आहे. कारण गांधीजींवर हिन पातळीवर टिका करुन नथुरामवाद्यांचे जे नुकसान झाले तेच सावरकरांवर हिन पातळीवर टिका करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
सावरकरांना भारतरत्न देणे न देणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. शिवसेनेची मागणी या व्यतिरिक्त तसा कोणताही प्रकारे या गोष्टीचा मागमुसही प्रत्यक्षात दिसत नाही. अंदमानातले सावरकरांचे माजी उद्धट पेट्रोलियम मंत्र्याने उखडलेले स्मरणपट्टीका दोन वर्षे झाली तरी निर्माणाचे काम आरामात चालु आहे. भारतात स्वच्छता अभियान ते अमेरिकेत ओबामांना गांधीगीता देण्यापर्यंत मोदी सर्वत्र गांधीनामच जपत आहेत. अशावेळी सावरकरांविषयी द्वेष या तथाकथित पुरोगामी व धर्मनिरपेक्षतेचे नाव घेणाऱ्यांच्या मनात उफाळुन येणे हे अतिशय केविलवाणे चित्र आहे. ज्या पातळीचे पोरकट आणि उडाणटप्पु नेतृत्व त्यांना लाभले आहे त्याचा हा दृष्य परीणाम आहे.

सावरकरांची केली जाणारी बदनामी आणि आक्षेप यांना वेळोवेळी अभ्यासु व तथ्यांवर आधारीत उत्तरे सावरकरांच्या चाहत्यांनी वेळोवेळी दिली आहेत व पुढेही देत रहातील. शत्रू याबाबत अत्यंत कमकुवत असल्याने हे फारच सोपे काम आहे. प्रश्न फक्त प्रचारतंत्राचा आहे. त्यात मोदी वाकबगार आहेत. असल्या घटनांचे संधीत रुपांतर कसे करायचे ते त्यांना चांगले माहित आहे. गांधी, पटेलांच्या प्रतिमेचे त्यांनी कॉंग्रेसकडून स्वत:कडे हस्तांतरण करुन घेतलेच आहे, पण ज्या सावरकरांच्या नावावर मत मिळत नाहीत त्यांच्या बदनामीचा एक अदृष्य फायदाच त्यांना मिळणार आहे. सावरकर हे भारतीय राजकारणात रसायनशास्त्रातल्या उत्प्रेरकासारखे (Catalyst) आहेत. उत्प्रेरकाचा रासायनिक प्रक्रियेत सहभाग नसतो तसाच रासायनिक घडामोडींचा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही, पण प्रक्रीया घडवुन आणण्यात मात्र तो सहाय्यकारी होतो. उत्प्रेरक एकतर रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवतो अथवा कमी करतो पण स्वत: मात्र निर्लेप रहातो. सावरकरांचे विचार हे प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होताना दिसत नाहीत, त्यांचे नावही देशात सरसकट माहित नाही , १०० हून जास्त वर्षे त्यांच्या नावाचा व विचारसरणीचा विरोध , द्वेष आणि गैरसमज करुन देणे चालु आहे पण तरिही सावरकरांचे नाव मिटवणे विरोधकांना शक्य झाले नाही. उत्प्रेरक (Catalyst) म्हणून भारतीय राजकारणात सावरकरांचे असलेले अस्तित्व अढळ आहे.

- लेखक चंद्रशेखर साने
.......................xxx..........................

माझी वाचनयात्रा

वयाच्या साधारण ८ व्या वर्षापसून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग.शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण तो फारसा टिकला नाही. दहावीच्घ्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच.समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. केतकर आल्यावर मटा चा सोटा म्हनजे सोनिया टाईम्स झाला होता. मग आपोआप मटा सुटला.
मराठिची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी दहा पुस्तके :
.
१. कर्मयोग - स्वामी विवेकानंद
२. सावरकरांचा बुद्धीवाद एक चिकित्सक अभ्यास- शेषराव मोरे
३. समग्र सावरकर
४. भ्रम आणि निरास- डॉ. नरेंद्र दाभोळकर
५. सावरकरांचे समाजकारण- सत्य आणि विपर्यास- शेषराव मोरे
६. शोध भानामतीचा- शाम मानव
७. स्वामी विज्ञानानंद यांची साहित्यसंपदा
८. वीरधवल- नाथमाधव
९. उष:काल- ह.ना.आपटे
१०. योगवासिष्ठ (३ खंड )
-चंद्रशेखर साने

लोकशाही, पक्षिय राजकारण आणि सावरकर

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्‌घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949

Wednesday, March 2, 2016

टाळ्या दिल्यात मत नाही दिलित

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्‌घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949

गांधी हत्येनंतरही हिंदुमहासभेचे चार खासदार लोकसभेत गेले होते. जानेवारी १९५२ मध्ये झालेल्या या निवडणुकितले हिंदुमहासभेचे खासदार होते प्रा. विघ देशपांडे (गुणा व ग्वाल्हेर दोन्ही तून विजयी झाल्याने यातल्या ग्वाल्हेरच्या जागेचे त्यागपत्र दिल्यावर तेथुन परत हिंदुमहासभेचेच डॉ. ना.भा.खरे निवडुन गेले. तिसरे खासदार निर्मलचंद्र चट्टोपाध्याय. ( कम्युनिस्ट लिडर सोमनाथ चटर्जी यांचे वडील.) उत्तरप्रदेशातून राखीव मतदारसंघात हिंदुमहासभेचे कॅ. राम गरिबा व पाचव्या सौ. शकुंतला नय्यर अशी यांची नावे.
ग्वाल्हेर मधुन नंतर लेखादेवी उर्फ राजमाता विजयाराजे शिंदे यांना नंतर कॉंग्रेसने फोडुन मध्यप्रांतात हिंदुमहासभेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. पुढे त्या जनसंघात आल्या.
हिंदुमहासभेला नथुरामाच्या कृत्यामुळे काही अंशी नुकसान झाले तरी त्यापेक्षा इतर काही जास्त कारणे होती. जर संघ आणि जनसंघियांनी सुचवल्याप्रमाणे जनसंघ, रामराज्यपरिषद व हिंदुमहासभा हे तीन पक्ष एकाच नव्या पक्षात विलीन झाले असते तर जास्त फ़ायदा लवकर झाला असता.
नविन पक्षातल्या नावात हिंदू शब्द असू नये व इतर धर्मियांनाही नव्या पक्षात स्थान असावे या प्रस्तावास सावरकर अनुकूल नव्हते.
पुढे पुढे जनसंघाने राजकारण करावे आणि हिंदुमहासभेने धार्मिक व सामाजिक कार्य पहावे हा गोळवलकरांचा प्रस्तावही हिंदुसभेला मान्य झाला नाही.
नेहरू पटेलांनी या राजकीय वादाचा फ़ायदा घेतला याविषयी त्यांना दोष देता येत नाही . विरोधी पक्ष रक्तपात न करता नष्ट करता यावा म्हणुन त्यात फाटाफुट घडवणे वा तिला प्रोत्साहन देणे हा लोकशाही मार्ग होता, राजकीय चातुर्य होते, आर्थिक बळही होते.
संघाचा विस्तार गुरुजींच्या काळात कित्येक पटींनी वाढला. ताकद वाढलेल्या गुरुजींनी हिंदुमहासभेचा नाद सोडून १९७१ साली धार्मिक कार्यासाठी विश्व हिन्दू परिषदेची स्थापना केली. भारतिय मजदुर संग , वनवासी कल्याण आश्रम , सामाजिक समरसता मंच अशा कितीतरी प्रकारे संघ विस्तारत गेला.

तात्पर्य :- सावरकर लोकशाही वादी होते यात शंका नाही पण त्यांना लोकशाहीतले राजकारण, जनमताची मानसिकता व निवडणुका जिंकन्याचे तंत्र अजिबात कळत नव्हते. किंवा कसही करून निवडणुका जिकणे हे त्यांचे ध्येय नव्हते, प्रकृति व वयही नव्हते.

Saturday, February 27, 2016

माझी वाचनयात्रा

माझी वाचनयात्रा
वयाच्या साधारण ८ व्या वर्षापासून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग. पारायण करुन मनमुराद हसत असे. शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण कविता करण्याचा नाद फारसा टिकला नाही. मात्र दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते उदाहरणे म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच. समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि कुसुम अभ्यंकर, कुमिदिनी रांगणेकर, मंगला गोडबोले, शांता शेळके अशा अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. श्री. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. कुमार केतकर आल्यावर त्यांनी मटा चा सोटा म्हणजे सोनिया टाईम्स केला होता. मग आपोआप म.टा. हातातून सुटला.
मराठीची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी भाषा संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
-चंद्रशेखर साने

Monday, September 14, 2015

कपुर आयोग आणि सावरकर

कायदेशीर दृष्ट्या कपुर आयोग उच्च न्यायालयात टिकणार नाही याची कल्पना आल्याने स्युडो सेक्युलरांनी, त्यांच्यातल्या काही मुखवट्यांना आता एकदम पलटी मारुन सावरकर कायदेशीर दृष्ट्या गांधीहत्येला जबाबदार नसले तरी नैतिक दृष्ट्या मात्र गांधीहत्येला जबाबदार आहेत असा स्वत:चाच मुद्दा खोडणारे मत मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रथम नैतिक दृष्ट्या सावरकर गांधीहत्येला जबाबदार होते या आरोपाला मी प्रथम उत्तर देतो.


नैतिक दृष्ट्या गुन्हेगार हे कायद्याच्या कक्षेत येत नाहित. ज्या लोकांची ठाम समजूत असते की अमुक-तमुक व्यक्ती एका विशिष्ट घटनेला जबाबदार आहे पण न्यायालयात निर्दोष सुटला आहे वा प्रबळ पुराव्या अभावी सुटला आहे त्याच्या बाबत ते अशी संज्ञा वापरतात. हिच संज्ञा नथुरामला गांधीजींबाबत वापरायची होती. सुमारे दोन लक्ष लोकांचे फाळणीमुळे प्राण गेले, हजारो स्त्रियांची अब्रु गेली , कित्येक सक्तीने धर्मांतरीत झाले , आणि सुमारे २ कोटी लोक निर्वासित झाले, वर ५५ कोटी रु. गांधीजींच्या हट्टामुळे पाकिस्तानला देण्यास भारत सरकारकारला भाग पडले, या सर्वाला नथुरामने नैतिकदृष्ट्या गांधीजींना जबाबदार धरले आणि हत्यार उचलले. सावरकरांनी केवळ आपल्या लेखनातून गांधीनीतीचे आणि गांधीकृतीचे टिकात्मक वाभाडे काढले ते सर्व गांधी गोंधळ मध्ये मुख्यत: समाविष्ट आहेत. अशी टिका करणे हा विरोधी पक्ष म्हणून राजकिय हक्क आहे, या टिकेमुळे ते नैतिकदृष्ट्या जबाबदार ठरु शकत नाहीत, अन्यथा कोणावरही राजकिय वा अन्य प्रकारची टिका करायायचीच सोय लोकशाहीत रहाणार नाही.

आता गांधीजींच्याच बाबतीतले दोन प्रसंग पाहु. असहकार आंदोलनात त्यांच्या अनुयायांनी चौरीचौरा येथे पोलिस चौकी जाळली व २२ पोलिस जळून मेले. त्यामुळे गाधीजींनी भरात आलेले आंदोलन मागे घेतले. पण तरिही ब्रिटीशांनी याचा खटला चालवला आणि सुमारे १६२ लोकांना फाशी सुनावली. यात गांधीजींना नैतिक दृष्ट्या जबाबदार धरुन फाशी दिले नाही. १९४२ च्या आंदोलनात गांधीजींचे नाव घेत प्रचंड हिंसा झाली ब्रिटिश सरकारने यात गांधीजींना नैतिक दृष्ट्या जबाबदार धरले नाही आणि शिक्षाही सुनावली नाही. तेव्हा नैतिक काय आणि अनैतिक काय या पायावर सावरकरांना गांधीहत्येत दोषी धरणे केवळ राजकीय आकस, जातीय मनोवृत्ती आहे, त्यास कसलाही अर्थ नाही. इस कोर्टसे उपर और एक भगवान का कोर्ट है । असा फिल्मी डायलॉग असण्याशिवाय या आरोपास अन्य किंमत नाही.

आता कायदेशीर मुद्द्याकडे वळु. कपुर आयोगाच्या उताऱ्याचा मुख्य रोख आहे की कासार आणि दामले यांच्या साक्षी कोर्टापुढे आल्या असत्या तर बडगे या माफीच्या साक्षीदाराला पाठबळ मिळून निकाल वेगळा लागला. याबाबत महत्वाची वस्तुस्थिती व तथ्ये पुढिलप्रमाणे १. श्री. अप्पाजी कासार व दामले यांच्या कथित साक्षी या पोलिसांपुढे दिलेल्या जबान्या होत्या, आयोगापुढच्या नाहीत. कपुर आयोगाला त्या फक्त त्या वाचण्यास मिळाल्या. २. कपुर आयोगाचा प्रश्न: पोलिसांनी त्या न्यायालयापुढे का ठेवल्या नाहीत? उत्तर अ. पोलिसांपुढे दिलेल्य साक्षी या तोंडी असतात, ब. त्या साक्षीदारांच्या हस्ताक्षरात नसतात तर पोलिस कर्मचारी त्या लिहून घेतात. क. त्यावर साक्षिदारांच्या स्वाक्षऱ्या पण नसतात. ड. अशा साक्षी कोर्टात टिकत नाहीत कारण साक्षीदार तशीच साक्ष कोर्टात देईल याची खात्री सरकारी पक्षाला नसते. याचे प्रमुख कारण म्हणजे या साक्षी पोलिसांनी छळ करुन व दबाव आणुन घेतल्या असा पवित्रा साक्षीदार कोर्टात घेऊ शकतात. सावरकरांच्या बाबत शासनाने सर्व शक्ती पणाला लावली होती व कासारांचा अनन्वित छळ केला होता. इ. या सर्व कारणांनी पोलिसांनी कासार व दामले यांच्या साक्षी कोर्टापुढे नेल्याच नाहीत हे स्पष्ट व उघड उत्तर आहे. अशा पोलिसांपुढे दिलेल्या साक्षी कपुर आयोगाने वाचून सावरकरांच्या बाबत वेगळा निरिक्षण नोंदवणे हा त्यांच्या राजकिय अजेंड्याचा विषय तर होताच पण त्यांना नेमुन दिलेल्या ३ प्रकारच्या चौकशीच्या अधिकाराचे उल्लंघन होते. ४. बडगेने जी मूळ साक्ष दिली ती पण निरर्थक आहे. दोन व्यक्तींच्या संभाषणातले तिसऱ्याच व्यक्तीचे नाव न्यायालयात पुरावा होत नाही.

आता शेवटचा मुद्दा स्युडो-पुरोगामी इतके अस्वस्थ का झालेत? शेषराव मोरे यांनी केवळ उच्च न्यायालयात जाऊन अपिल करुन कपुर आयोगाने अधिकार क्षेत्राबाहेर जाउन आगाऊ पणे सावरकरांना गोवणारा परिच्छेदाला आव्हान दिले पाहिजे व त्यांचा एक वकिल या नात्याने कायद्याचा अभ्यास असल्याने हा खटला सावरकर पक्षाला सहज जिंकता येईल असे वाटते. अजून कोणी कोर्टातही न जाता पण स्युडो-पुरोगामी काव काव करत आहेत. जर त्यांचा कपुर आयोगावर एवढा विश्वास असेल तर त्यांनी हे आव्हान स्वीकारुन , चला जाऊ उच्च न्यायालयात , पाहु काय होते ते असे म्हणायला हवे होते. पण त्यांचा स्वत:चाच कपुर आयोगावर विश्वास नसल्याने उच्च न्यायालयात अपिल झाल्यावर सावरकरांवरचा कलंक धुतला जाणार याने या बौद्धीक दहशतवाद्यांच्या पोटात गोळा उठला आहे.

कपुर आयोगाचा अहवाल समोर धरुन सावरकरांची प्रथम बदनामी करणारे नुराणी हे एक पाकिस्तानवादी होते. भारत - पाक युद्धाच्या वेळी ते भारत सरकारच्या नजरकैदेत होते. मुस्लीम आणि सच्चे पुरोगामी हमीद दलवाई यांनी या नुराणींना धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घातलेला कट्टर धर्मांध जातीयवादी असे विशेषण लावले आहे. सावरकरांची बदनामी करणारे पुरोगामी अशा माणसाचे लेखन व डावपेच वापरुन सावरकरांसारख्या एका सच्च्या देशभक्ताची बदनामि करत आहेत तेव्हा त्यांना पुरोगाम्यांचा दहशतवाद किंवा स्युडो सेक्युलर म्हणण्यात काय चूक आहे?

विशिष्ट अजेंडा घेऊन उभा असलेला फेसबुकी स्युडो-पुरोगामी वर्ग व त्यांचा कंपु यांच्या कडून हे सर्व लिहूनही कसलेहि मतपरिवर्तन होणार नाहि याची मला जाणीव आहे. पण फेसबुकवर काही विचारी लोक सुद्धा असतात त्यांना डोळ्यापुढे ठेऊन मी हे सर्व लिहिण्याचा उपक्रम केला आहे.

- चंद्रशेखर साने


Friday, May 24, 2013

शिवाजी हिंदुत्ववादी का धर्मनिरपेक्ष?

काही दिवसांपूर्वी आजचा सवाल मध्ये प्रश्न होता प्रश्न होता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर होतो आहे का?
आणि चर्चा मात्र केली गेली शिवाजी हिंदुत्ववादी होते का धर्मनिरपेक्ष... निमित्त होते एका नविन नाटकाचे !

वास्तविक पाहता राजकिय हिंदूत्ववाद काय किंवा धर्मनिरपेक्षता / सर्वधर्मसमभाव या संकल्पनाची मांडणी १९-२० व्या शतकातल्या आहेत. मुळात यांच्या डोक्यात जो गोंधळ आहे त्यातून असला चुकीचा प्रश्न निर्माण केला गेला आहे. धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्ववाद या दोन भिन्न गोष्टी आहेत हाच मुळात एक गैरसमज आहे. ज्यावर आरोप करायला हवा तो कदाचित हिंदुधर्मवादावर करत येईल पण प्रत्यक्षात बदनाम केले जाते ते हिंदुराष्ट्रवादाला! हिंदुधर्मवाद किंवा हिंदू जमातवाद म्हणजे हिंदूराष्ट्रवाद नाहि, त्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. राजकिय हिंदुत्ववादाला पार्श्वभूमि होती पारतंत्र्याची, फाळणीच्या संकटाची आणि इस्लाम स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानतो त्याची. जर मुसलमान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानत असतील तर या देशात अन्य कोणी "राष्ट्र" या संकल्पनेला पात्र आहे का याचा शोध घेताना या देशात "हिंदू" हेच स्वयंमेव एकराष्ट्र आहेत असा सिद्धांत सावरकरांनी मांडला. २० % मुसलमान समाज आणि हिंदूंमधील ५-१० % ब्राह्मण ,२ % शीख ,८ % अमुक ५ % तमुक अशी जर विभागणी झाली तर मुसलमान या लोकशाहीत बहुसंख्य ठरतील आणि त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतील हे जाणूनसुद्धा फाटाफूटीने त्रस्त झालेल्या, एकराष्ट्र असलेल्या पण एकजिनसी नसलेल्या, हिंदू समाजाची एकजूट घडवणे आवश्यक होते.

तेव्हा हिंदुत्ववादाला धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध मांडून त्याची तुलना मुस्लीम जमातवादाशी करणे हा सर्व तथाकथित पुरोगाम्यांचा १०० वर्षांपासूनचा खेळ चालला आहे.हिंदुत्ववादाचा दुसरा अर्थ धर्मनिरपेक्षतेला विरोध नसून विकृत धर्मनिरपेक्षतेला विरोध असा आहे.

आजच्या संकल्पनांच्या चष्म्यातून पहायचेच ठरवले तर ऐतिहासिक वास्तव असे आहे कि शिवाजी धर्मनिरपेक्ष होते पण विकृत धर्मनिरपेक्ष नव्हते. त्यांच्या सैन्यात मुसलमान होते म्हणून ते धर्मनिरपेक्ष होते अशी उथळ मांडणी करणे हे औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते म्हणून औरंगजेब हिंदुत्ववादी होता अशी उथळ मांडणी करण्यासारखेच आहे.

शिवाजी महाराज खरे धर्मनिरपेक्ष होते म्हणून त्यांनी कुराणाचा सन्मान केला, त्याचबरोबर मुसलमानांना मुसलमान म्हणून सैन्यात प्रवेश नाकारणे असे कधी केले नाही. त्यांच्या सैन्यात मुसलमान नोकरीला होते. पण ते मुसलमान होते त्यांची मते मिळवायची होती म्हणून त्यांनी त्यांचा समावेश करुन घेतला नव्हता. तर आरमार त्यावेळी मुख्यत: मुसलमानांच्या हाती होते म्हणून त्यांना त्यांनी चाकरीत घेतले ,लढणे हा अशा लोकांचा व्यवसाय होता व ते विविध राजांच्या पदरी असत. दोन्ही धर्मांतील लोकांनी स्वराज्याशी एकनिष्ठा बाळगली आणि काहिंनी स्वराज्य द्रोह सुद्धा केला. स्वराज्य द्रोह करणार्‍या हिंदूंमध्ये अनेक अब्राह्मण सुद्धा होते, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते, फार काय पण ज्यांना महाराजांनी शुद्ध करुन घेतले ते त्यांचे व्याही निंबाळकर आणि ज्यास शुद्ध करुन घेतले ते त्यांचे जामात हे दोघेही शुद्धीकरणानंतरच्या काळात पैशाच्या लोभाने शिवाजी महाराजांवर उलटले आणि स्वराज्यद्रोही झाले. नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी शुद्ध करुन घेतले पण परत सैन्यात घेतले नाही. खरा जाणता राजा.

मशिदी व कुराण यांचा सन्मान करणार्‍या शिवाजी महाराजांनी मतांची लाचारी होती म्हणून कधी वेळ पडल्यास मशिदींची गय केली नाही आणि हिंदूंची मंदिरे आपली सत्ता प्रस्थापित होताच पुन: जीर्णोद्धर करण्यास मागेपुढे पाहिले नाही. सक्तीची धर्मांतरे केली म्हणून ४ पाद्रि मिशनर्‍यांची डोकी धडावेगळी करताना शिवाजी महाराजांच्या खर्‍या खुर्‍या धर्मनिरपेक्षतेच्या आड आले नाही. अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री संपूर्णपणे शुद्धीकरणाची बाजू संभाळण्यासाठी होते ,त्यात शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्षता आड आली नाही. मुसलमानी शब्दांचा मराठी भाषेत भरणा दूर करण्यासाठी राज्यव्यवहार कोश निर्माण करुन भाषाशुद्धीला प्राधान्य देताना "तत्कालिन पुरोगामी" (?) लोकांची काय बिशाद होती शिवाजी महाराजांना नावे ठेवण्याची?

शिवाजी महारजांच्या सैन्यात मुसलमान होते , बाबा याकुत सारख्या मुसलमान संतावरही त्यांनी भक्तीभाव बाळगला आणि कोणाही ब्राह्मण इतिहासकाराने हि गोष्ट लपवून ठेवलेली नाही. शिवाजी महाराज श्रद्धाळू होते पण अंधश्रद्ध नव्हते. प्राचीन देवल स्मृतीचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आणि शुद्धीकार्य सुरु केले ते कार्य पुढे अगदी पेशव्यांच्या काळातही चालु होते.पेशव्यांच्या काळात सुद्धा मशिदींना इनामे दिली जात असत. हिंदुत्ववाद हा हिंदुधर्मवाद नाही तर हिंदुराष्ट्रवाद आहे त्यामुळे हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपेक्षता यात अद्वैत आहे. हिंदुत्ववादाची संकल्पनाच मुलत: विकृत धर्मनिरपेक्षतेचा प्रखर विरोध करण्यासाठी संस्थापित झालेली आहे.हिंदुत्वचाद हा हिंदु जमातवाद नाही...

शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता....

१.
" Sewajee and Portuguese dailly quarrel; the chiefest cause of his hatred to them being for forcing orphans of his cast to turn Roman catholicks. There has also of late happened same disputes among them in the same account. The captain General of Busseen taking the part of same orphans against the Jesuits and forcing the said Jesuits to restore the said orphans to a considerable estate, which they had been possessed of many years which they highly resented." ( English Records vol. II P. 74)

२.
" Sewajee deeply resenting this regiour invaded the pre­cincts of Bardese not farre distant from Goa and there cutt cff heads of four padrees that refused to turn Moreitoes (Marrathas-Hindu) of his own persuasion, they having councelled the destruction of all that were not opinionated as themselves, which terrifyed the Vice Roy that he was forced ;to revoke his fierce and severe edict. He (Shivaji) burnt and destroyed all the country and carried away 150 Lack of pagodaes."
- (English Records, vol  I. No. 138, P. 119)

3.शिवाजी महाराजांनी शुद्धीकरणे आणि मूळ मंदिरे असलेल्या पण नंतर मधिदी वा चर्च मध्ये रुपांतरण झालेल्या वास्तुंचे रुपांतर पुन: हिंदू मंदिरांमध्ये केल्याची पंचवीस - तीस तरी उदाहरणे आहेत तशा ऐतिहासिक नोंदी-शिलालेख इ. आहेत. इतकेच काय पण संभाजी महाराजांनी शुद्धीचे धोरण चालु ठेवले याची सुद्धा इतिहासात नोंद आहे. गंगाधर रंगनाथ कुळकरणी यास संभाजीमहाराजांनी पुढाकार घेऊन आणि ब्राह्मण शास्त्रींशी चर्चा करुन, शास्त्रानुसार कुळकरणीस प्रायश्चित देऊन पंक्तीपावन करुन घेतले व त्यास शुद्धीपत्र देवविले. संदर्भ : सावरकर स्मृती साहसदिन स्मरणिका - ले. पांडुरंग बलकवडे (शके चैत्र शुद्ध २- राजवाडे खंड  ८ ,लेख ४०)

४. संभाजी राजे जे संस्कृत पंडीत होते व त्यांचा बुधभूषण हा ग्रंथ बहुत्कांना माहित असे. शिवाजी राजांना गोब्राह्मण प्रतिपालक अशी म्हणण्याचे मागे मागे गेले असता मूळ इथे सापडते.

धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या बुधभूषण ग्रंथाच्या दहाव्या श्लोकात शिवरायांनी गायी व ब्राम्हणांचे रक्षण केले असे म्हटले आहे.

"येन क्षितितले कलावविकलं बुद्धावतारं गते
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छै: समादिते
भूयस्तत्परिपालनाय सकलज्वित्वा सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: कमात्‌ //१०//"
.
अर्थ:- पृथ्वीवर हाहा:कार माजला असता बुद्धावतार झाला.तद्वत छ्त्रपती शिवरायांनी म्लेंच्छांनी सर्व वर्णांची पायमल्ली केली असता गायी व ब्राह्मणादि वर्णाचे देवद्वेष्ट्याकडून रक्षण करून रूढ धर्माचा मार्ग दाखवला. (विप्र म्हणजे ब्राह्मण)

शिवाजी महाराजांचे हिंदुत्व ....

१.
 He attacked the caravans which came from distant parts, and appropriated to himself the goods and women. But he made it a rule that whenever his followers went plundering, they should do no harm to mosques, the book of God or any one's women, Whenever a copy of the holy Koran cime into his hands, he treated it with respect and gave it to some one ,of his Mahomedan followers. When the women of any Hindu or Mahomedan were made prisoners by his men, and they had no friend to protect them, lie watched over them till their relations came to buy their liberty "

Elliot and Dawson VII page 260 Kafikhan

२.
 " On comparing Shivaji with the Asiatic conquerors, it will be seen that the latter fully indulged in plunder, rapine, oppression, tyrannies, slavery, forcible conversions. All of these came to put the yoke of foreign rule on this country. They were not only slave making and fanatic Ghazies for converting Hindus into Muslims, but were the destroyers of liberty and autonomy of the Indian people. On the other hand, Shivaji stood forth as the patriotic champion of freedom and independence of his people. He proved himself their liberator from the centuries of foreign rule. There can be no comparison between a patriotic liberator of his mother-land and a destroyer of the liberties of men, between a slave-driver and a slave-liberator, between a fanatic Ghazi and an ardent and respectful admirer of all religions. Comparisons are said to be odious, but the study of history will be fruitess, if readers are not to have a comparative insight into the deeds of great men.
— [Shivaji the great Vol. 2, Part 2, Page 22.)

३.
" Neotagy (Netaji Palkar) offered no insult to the women, for their sex was venerated in Hindustan and they observed that customs better than the Europeans. These soldiers had special reason for this, as it was the order of Sevagy who, while he lived, was both obeyed and loved. And if anybody ever violated any of his orders, the punish­ment was such that there was no second instance ( of the offence ).

-Foreign Biographies on Shivaji

आयुष्यभर शिव इतिहासाचा व्यासंग करणारे शिवचरित्रकार प्रा. गजानन मेहेंदळे यांचे समकालिन पुराव्यांसह केलेले भाषण

https://www.youtube.com/watch?v=5CDMcBZNNd4


Wednesday, February 1, 2012

सावरकरांची धोरणे आणि आझाद हिंद सेना-लेखांक दोन

मागील लेखातून सिद्ध होते कि सावरकरांचे व सुभाषचंद्र बोस यांची सैनिकीकरण , सशस्त्र क्रांती व परराष्ट्र धोरण या विषयात परतंत्र भारतचे धोरण काय असावे यात सहमती होती. इतकेच नव्हे तर आझाद हिंद सेनेचे मूळ संस्थापक "रासबेहारी बोस" हे सावरकरांच्या बर्‍याचशा धोरणांना अनुकूल होते. जपानमध्ये हिंदु महासभा सुद्धा त्यांनी स्थापन केली होती व सावरकरांची हिंदू व हिंदुत्वाची व्याख्याही त्यांनी मान्य केली असावी असा सहज निष्कर्ष निघतो.सुभाषांबद्दल मात्र ती परिस्थिती नाही

नेताजी बोस : सन १९०८ चे सावरकर ?

"राजनीतीचे हिंदूकरण व हिंदूंचे सैनिकीकरण " हे सावरकरांनी युद्धकालातील महत्वाचे धोरण हिंदूमहासभेला दिले. ब्रिटीशांच्या अडचणीचा फायदा घेणे ,शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मानणे , प्रत्येक राष्ट्राला आपल्या हिताचे काय ते ठरवण्याचा अधिकार असून कोणत्या धोरणाचा स्वीकार राष्ट्राने करावा हे सापेक्ष असते. जर्मनीला नाझीवाद योग्य असला किंबा रशिया बोल्शेव्हिक असला तर तो त्यांचा प्रश्न असून आपले हित आपण साधले पाहिजे हि परराष्ट्रनीती सावरकरांनी - स्थूलमानाने- हिंदुमहासभेला दिली.

नेताजी बोस व गांधी प्रणित कॉंग्रेस यांच्यात मुख्तत: याच मुद्द्यांवर मतभेद होते व सुभाषचंद्र बोस यांना बाहेत्र पडावे लागले होते. सावरकर-बोस यांच्या दोन दिवसात मिळून सहा तास झालेल्या गुप्त भेटीत या मुद्द्यांपुरती सहमती झाली असावी. मात्र हिंदु-मुस्लीम प्रश्नावर र्त्यांची सहमती झाली नसावी.बंगाल हिंदूमहासभेचे व सुभाषचंद्रांचे त्यावेळी पटत नव्हते. सावरकर-बोस भेटीच्या वार्ता ऐकून बंगालचे नेते अस्वस्थ झाले. त्यांनी सावरकरांकडे यासंबंधी विचारणा केली असता ,सावरकांनी आपण कोणताही धोरणात्मक बदल केलेला नसून आपली धोरणे तशीच राबवावीत अशी सूचना दिली. मात्र बोस सीमेवर आले की बंगाल हिंदूसभेने अखिल भारतीय हिंदूसभेशी फारकत घेऊन बोसांना मिळावे असे धोरण हिंदूमहासभेच्या पुढील गुप्त बैठकीत ठरवले गेले होते.

सावरकर सन १९३८ मध्ये बिनशर्त मुक्त होऊन राजकारणात आले तेव्हा त्यांच्या हिंदू-मुस्लीम धोरणाबद्दल बहुतेक राजकिय नेत्यांमधे नाराजी होती.आम्हाला १९०८ चे सावरकर मान्य आहेत १९३८ चे मान्य नाहित असे बोलले जाई. यामागे सन १९०८ च्या सावरकरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार केला होता, सन १८५७ च्या लढाईत मुसलमान देशभक्तांची मुक्त कंठाने त्यांनी प्रशंसा केली होती, त्यांच्या क्रांतीकार्यात सिकंदर हयातखान सारखे मुसलमानही सहभागी होते हि सर्व कारणे या मागणीमागे होती. सन १९३८ ला हिंदुराष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे सावरकर अंदमानातून आल्यावर बदलले आहेत व संकुचित भूमिका घेत आहेत असा समज पसरला होता. यातच सुभाषचंद्र बोस यांचाही समावेश होता. सावरकर व जीना यांना बोस सारखेच जातीयवादी मानत होते. सैनिकीकरण,सशस्त्र क्रांती यात बाबत सावरकरांसारखेच विचार असणारे बोस सन १९०८ च्या सावरकरांसारखेच होते मात्र तेवढेच नव्हते तर ते मुस्लीम प्रश्न उदारपणे पहाण्यात महात्मा गांधींचाही पेक्षा दहा पावले जास्त पुढे गेले होते. बंगालमध्ये विधीमंडळ व नोकर्‍या यात मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जास्त प्रमाणात वाटा मान्य करणार्‍या चित्तरंजन दास यांचे ते शिष्य होते. खरेतर त्याहीपुढे जाऊन हिंदु-मुस्लीम अशी काही समस्याच अस्तित्वात नसून इंग्रज जाताच हिंदु-मुस्लीम प्रश्न सहजी सुटेल असे त्यांना वाटत होते. हिंदु-मुस्लीम हे एकजीव राष्ट्र झालेच आहेत असे त्यांना सन १९४४ ला सुद्धा वाटत होते.

सावरकरांना अंदमानात मुसलमानी आकांक्षांचा , त्यांच्या धार्मिक मानसिकतेचा परिचय झाला. अंदमानात इतर अनेक ग्रंथांबरोबर कुराणही त्यांनी नीट अभ्यासले. अशिक्षीतातही अशिक्षीत अशा मुस्लीम धर्मातील अपराध्यांचाही राजकिय व धार्मिक दृष्टीकोन त्यांअन अंदमानातच कळला. तो पर्यंत सन १८५७ मधील हिंदु-मुस्लीम ऐक्याचे गोडवे गाणारे सावरकर फार मोठ्या प्रमाणात बदलले. सन १९२४ सालापर्यंत त्यांची या संबंधातील एकही मत शिल्लक राहिले नाही.

याउलट सन १९४० पर्यंत नेताजी बोस यांना खर्‍या अर्थाने मुस्लीम मनच समजले नव्हते. आझाद हिंद सेना स्थापन झाली व तिचे नेतृत्व रासबेहारींकडून त्यांच्याकडे गेले. सावरकरांचे "राजनीतीचे हिंदुकरण व हिंदूंचे सैनिकीकरण " या धोरणाला काही प्रमाणात यश मिळून सैन्यातील हिंदूंची संख्या वाढली असली तरी मुसलमानांचा भरणा होताच. निदान ४० ते ५० % मुसलमान त्यावेळी सैन्यात असावेत असा

कयास केला जातो. त्यामुळे आझाद हिंद सेनेचे सैन्य हे निर्भेळ, सैनिकीकरण झालेल्या हिंदूंचे, नव्हते. सन १८५७ च्या संघर्षाला सावरकरांनी स्वातंत्र्यसमर म्हणून गौरवले असले तरी त्यातील मुस्लीमांचा सहभाग जिहादी स्वरुपाचाच होता हे अनेक उदाहरणांवरुन दिसून येते. हिंदू नेते या धार्मिक आक्रमणांपुढे अनेकदा हतबल होत.नेताजींच्या मते देशात मुस्लीम समस्याच अस्तित्वात नव्हती तर मग आझाद हिंद सेनेत संपूर्ण पणे हिंदु-मुस्लीम ऐक्य झाले होते असे समजायचे का?

हिंदुमहासभा व फॉरवर्ड ब्लॉक

ज्या ज्या कारणांसाठी गांधीजींवर मुस्लीम अनुनयाचा आरोप होतो ती सर्व कारणे नेताजींनाही लागू होतात. किंबहुना नेताजी मुस्लीमांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेले हिंदू नेते होते. ज्या वंदे मातरम्‌ ला हिंदु राष्ट्रवादी आग्रही असतात ते गीत नेताजींना पसंत नव्हते कारण मुसलमानांना ते आवडत नव्हते.म्हणून जन-गण-मन हेच त्यांनी अधिक स्वीकारले होते असे कॅप्टन लक्ष्मी म्हणतात.

सावरकर बंधमुक्त झाले तेव्हा नेहरु, मानवेंद्र रॉय, राजगोपालाचारी आदी इतर नेत्यांप्रमाणे नेताजींनीही त्यांना कॉंग्रेसमध्ये यायचे आमंत्रण दिले. आपले विचार गांधीप्रणित कॉंग्रेसशी जमणार नाहीत हे ओळखून सावरकरांनी तेथे न जाणेच पत्करले.

बोस कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा अकोल्याचे एक कार्यकर्ते श्री. चितळे यांनी सावरकरांना पत्र लिहून बोसांची भेट घेण्यास सुचवले. तर हिमालय प्रदेश हिंदुसभेचे कार्यवाह स्वामी सच्चिदानंद यांनी बोसांना पत्र लिहून कळवले की कॉंग्रेस जिनांच्या मागण्या मान्य करणार असे दिसते. आपण तसे न करता हिंदूंचे विशेषत: पंजाब व बंगाल मधील हिंदूंचे अधिकार सुरक्षिउत ठेवण्याकडे लक्ष द्यावे. तसेच आपण हिंदूसभा अध्यक्ष वीर सावरकर यांना भेटावे अन्यथा हिंदूंची सहानुभूती आपण गमावून बसाल. याच सुमारास सेनापती बापट आपण व सावरकर दोघेही कॉंग्रेसमधे जाणार आहोत व सावरकरांचे मन वळवणार यासाठी प्रयत्न करत आहोत असे एक समारंभात म्हणाले.

त्यावेळी सावरकर बोसांना उद्देशून म्हणाले की जातीय संस्थेच्या सभासदाला कॉंग्रेसमधील कोणत्याही पदावर बसण्याची बंदी केली असल्याने कॉंग्रेसमध्ये जाऊन मतप्रचार करणे अवघडाहे. कँग्रेसमधे शिरतानाच हि बंदी असल्याने मतप्रचाराची संधीच उरलेली नाही.

याला सुभष बोस यांनी उत्तर दिले की असा निर्बंध व्यक्तीशा मला पसंत नाही. यानंतर बापट यांना एक सविस्तर पत्र पाठवून आपण कॉंग्रेसमधे प्रवेश का करत नाही याची कारण मिमांसा दिली आहे. ती सविस्तर वाचण्यासारखी आहे. (यात त्यांनी जी कारणे दिली त्यातील आंदोलनाचे मार्ग, परराष्ट्रनीती याच मुद्द्यांवर नेताजींनाही पुढे कॉंग्रेस सोडावी लागली व स्वतंत्र पक्ष काढावा लागला.)

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षिय भाषणात सावरकरांनी भाषा व भाषाशुद्धी या वर नेताजी बोस यांच्यावर टिका करताना म्हणाले, ..मागची दोन वर्ष्रे पं.नेहरु कॉंग्रेद्सचे अध्यक्ष होते. हिंदु-मुस्लीम ऐक्यास्तव त्यांनी हिंदूंना आज्ञा सोडली की उर्दुच राष्ट्रभाषा करा. आता सुभाषबाबू सवाई अध्यक्ष झाले. त्यांनी नेहरुंवर कडी करण्यासाठी सांगितले की आपली लिपी सोडून रोमन लिपी स्वीकारा ! याच्या उलट आयर्लंड चा डी व्हॅलेरा ,जर्मनीचा हिटलर ,इटालीचा मुसोलिनी आणि तुर्कस्थानचा केमाल पाशा यांनी आपली राष्ट्रभाषा आपली राष्ट्रलिपी प्रगत कशी होईल याचा प्रयत्न केला म्हणून ते देश स्वतंत्र आहेत. आणि हिंदूस्थान ,पाकिस्तान व आंग्लदेश होऊ घातला आहे.

दि. २० नोव्हे. १९३८ ला बोस यांच्या नावे सावरकरांनी एक पत्रक काढले त्याचा भावार्थ असा की सध्याच्या परिस्थितीत एखादी वर्तुळ परिषद (Round Table conference ) भरण्याची शक्यता असून हिंदुस्थानच्या वतीने केवळ कॉंग्रेसलाच बोलवावे हि आपली मागणी अयोग्य आहे. एकतर जिना कॉंग्रेसला मुस्लीम लीग चे प्रतिनिधित्व करु देणार नाही व दुसरे म्हणजे कॉंग्रेस जरी हिंदू मतांवर निवडून येत असली तरी ती हिंदूहितरक्षण करण्याची हमी घेत नाही. उलट मुसलमानांच्या अनेक अन्यायी मागणुआ मान्य करणारी कॉंग्रेस हिंदूंची एकही न्याय्य मागणी मान्य करत नाही.म्हणून आपणास स्पष्ट पणे सांगतो ब्रिटीश ,मुस्लीम लीग व कॉंग्रेस हे मिळून जे करार करतील ते हिंदूंना बंधनकारक नाहीत.म्हणून हिंदुमहासभेला परिषदेला बोलावले जावे व ती मान्य करेल तेवढेच ठराव हिंदूंना बंधनकारक असतील.

याचवेळी म्हणजे सन १९३८ साली हिंदुमहासभेने निजामाच्या हद्दीतील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी एक नि:शस्त्र प्रतिकाराचा लढा उभारला होता. त्याच्या अधिवेशनात सावरकर म्हणाले, कॉंग्रेस त्यागाच्या गप्पा मारते पण तसा गर्व त्यांनी करु नये. हिंदूमहासभेच्या या अधिवेशनात उपस्थितात पंचवीस एक जण तरी अंदमानात १०-१०, २०-२० शिक्षा भोगून आलेले आहेत.त्यापैकी एकाचा त्याग एका बाजूला व गांधी,नेहरु,सुभाष व कार्यकारी मंडळाचा त्याग एकत्रित केला तरी अंदमानात कष्ट भोगलेल्या क्रांतीकारकाची ते बरोबरी करु शकणार नाहीत.

सुभाषांचे क्रांतीकार्य त्यांना कॉंग्रेस बाहेरुनच करावे लागले. सावरकरांना कॉंग्रेसमध्ये बोलावणार्‍या बहुतेकांना कॉंग्रेसमधून बाहेर पडावे लागले. त्यात नेताजींबरोबरच वीर नरिमन,डॉ.ना.भा.खरे,रॉय, द्वारकाप्रसाद मिश्रा ,प्र.के.अत्रे यांचाही समावेश होता.

कॉंग्रेसमध्ये गांधी-सुभाष वाद रंगत असतानाच सावरकरांनी अमेरिकेचे प्रेसिडेंट रुझवेल्ट यांना तार पाठवली. दि. २३ एप्रिल १९३९ ला पाठवलेली तार अशी: आपण हिटलरला पाठविलेल्या पत्रांमागे सैनिकी आक्रमणापासून स्वातंत्र्य नि लोकशाही यांचे संरक्षण करण्याची खरी निरपेक्ष्मानवतेच्या चिंतेची प्रेरणा असेल तर कृपया ब्रिटनलाही आपली हिंदुस्थानावरील सत्ता संपुष्टात आणण्यास सांगा आणि हिंदुस्थानला घटना बनवण्याचे स्वातंत्र्य द्या. हिंदुस्थानसारख्या महान राष्ट्राला लहान राष्ट्राइतका तरी आंतरराष्ट्रिय न्याय मागण्याचा अधिकार निश्चितपणे असावा."

सावरकरांची हि सूचना अमेरिकन वृत्तपत्रातून छापून आली. सावरकरांना या संबंधात काही अमेरिकन नागरीकांची शुभेच्छा पत्रेहि आली. राशबेहारींप्रमाणेच कॅलिफोर्नियात रहाणारे खैरातीराम समरस यांनीही एक पत्र पाठवून लिहिले, "...बॅ.सावरकरांचे चरित्र वाचून हृदय भरुन आले. गेल्या वर्षी मी पहिल्या महायुद्धातील हिंदु-जर्मनी यासंबंधी तीनशे पृष्ठांचे पुस्तक लिहिले आहे. त्यावरुन पुढील पिढीला स्फुर्ती मिळेल अशी आशा आहे." या प्रकारे सावरकर अमेरिकेपासून जपान पर्यंत संबंध जोडत होते व भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रचार कार्य करीत होते.

१ ऑगस्ट १९३९ ला सवरकरांचे एक महत्वाचे भाषण झाले. त्यात त्यांनी युद्ध परिस्थिती विस्ताराने वर्णन केली आहे.या भाषणात मुख्यत: शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हि नीती विशद केली. या नंतर सायंकाळी सावरकरांचे भाषण झाले त्यात त्यांनी गांधीवाद, सुभाषचंद्र बोस यांचा पुरोगामी वाद (फॉरवर्ड ब्लॉक) व मानवेंद्र रॉय यांचा नवसमाजवाद या तिन्ही तील साम्य व भेद सांगून आपल्या हिंदूत्ववादाची वैषिष्ट्ये कोणती ते ही श्रोत्यांच्या मनावर ठसवले.

बोसांच्या पक्षाविषयी सावरकर म्हणाले," दुसरा पक्ष सुभाषचंद्र बोस यांचा "फॉर्वर्ड ब्लॉक". या पक्षाची काही तत्वे व कार्यपद्धती आमच्या कार्यपद्धतीशी जुळण्यासारखी आहेत आणि तेवढयापुरते त्यांच्याशी सहकार्य करावयास देखिल आमची सिद्धता आहे. परंतु कॉंग्रेसमधील हिंदू-मुसलमानांच्या एकीचे वेड त्यांच्याही डोक्यातून निघालेले दिसत नाही. सुभाषबाबू गांधीजींप्रमाणेच जिनांच्य भेटिला जाऊन आले व गांधींपेक्षा अधिक गोष्टी त्यांनीही मुसलमानांना देऊ केल्या असतील. तथापि मुसलमानांचे समाधान गांधीजींना जसे करता आले नाही, तसेच ते सुभाषबाबूंनाही करता येणे शक्य नाही.

आम्हाला "फॉर्वर्ड ब्लॉक" वावडा का ? सुभाषबाबूंच्या पक्षासंबंधाने माझे त्यांच्याशी बरेच बोलणे झाले आहे. त्यांच्या कर्यक्रमातील बर्‍याचशा गोष्टी आम्हाला मान्य आहेत. तथापि फॉर्वर्ड ब्लॉकचा सभासद होणारा, कॉंग्रेसचा सभासद असलाच पाहिजे ही जी त्यांची अट आहे ती आम्हाला मुळीच मान्य नाही. कारण कॉंग्रेसचा सभासद होणार्‍यास हिंदुसभा सोडावी लागेल. हिंदुसभावाले लोक हिंदूंकरता म्हणून कोणत्याही सवलती मागत नाहीत. तथापि आपले योग्य अधिकार सोडण्यास किंवा कमी करण्यास कधीही तयार होणार नाहीत. फॉरवर्ड ब्लॉकला हेही तत्व मान्य होण्यासारखे नाही. त्यामुळे हिंदुत्वाभिमानी माणसाला फॉर्वर्ड ब्लॉकमध्ये सामिल होता येणे शक्य नाही कारण याच सुभाषबाबूंनी कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना हिंदुसभेला जातीय ठरवली होती."

गांधीजी व नेताजी वाद विकोपाला गेला असतानाच वीर सावरकरांचा प्रभावही सर्वत्र वाढत चालला होता. बंगालमधील क्रांतीकारक व अंदमानचे सावरकरांचे सहयोगी आशुतोष बानर्जी हे आधीपासूनच हिंदुसभेत होते त्यांनी सर मन्मथनाथ मुखर्जी व बॅ. निर्मलचंद्र चटर्जी ( भुतपूर्व लोकसभा अध्यक्ष व कम्युनिस्ट नेते सोमनाथ चटर्जी यांचे वडील) यांना बंगाल हिंदुमहासभेत आणण्यात यश मिळवले. तसेच हिंदुमहासभेतील दोन गटांनी सावरकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काम करायचा निर्णय घेतला.

निर्मलकुमार चटर्जींनी सावरकरांना पत्र लिहिले त्यात बोस यांच्यासंबंधाने कॉंग्रेसने जी हुकूमशाही दाखवली त्याचा धिक्कर करत आहोत असे लिहून यापुढे बंगालने कोणत्याही अखिल भारतीय पक्षात आंधळे पणे भाग घेऊ नये अशा विचाराने डळमळीत झाल्याने हिंदुसभेत येण्यास मागेपुढे पहात असल्याचे लिहिले. पुढे चटर्जी लिहितात," परंतु या सर्व पुढार्‍यांचा तुमच्यावर व तुमच्या कर्तुत्वावर विश्वास असल्याने बंगाली हिंदूंची एकजूट शक्य झाली आहे."

या प्रमाणे सुभाषबाबूंच्या बंगाल मध्येच हिंदूमहासभेची पाळेमुळे खोलवर जात चालली. पण या संबंधीचा सर्व इतिहास देणे हा या लेखाचा विषय नाही.

पुढे सेलम च्या दौर्‍यात मद्रासच्या "हिंदू" या प्रख्यात पत्राच्या पत्रकाराने सावरकरांना प्रश्न केला की जर कॉंग्रेसने जर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली तर आपला पाठिंबा असेल का? सावरकर उत्तरात म्हणाले ,जर हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हाच हेतू ठेऊन चळवळ असेल तर अवश्य पाठिंबा असेल पण हिंदूहिताचा बळी पडेल अशी शंका आली तर आमचा पाठींबा असणार नाही. मागे जसे मुसलमानांना कोरे चेक दिले तसच आत्मघातकीपणा असेल तर आमचा कधीही पाठींबा असणार नाही. सुभाषचंद्र बोस यांनी एखादी चळवळ सुरु केली तरी आमचे धोरण तेच राहील.

याप्रमाणे सुभाषचंद्र व सावरकर यांच्यातील सहकार्य व मतभेद नेमके कुठे होते ते लक्षात येईल.

आझाद हिंद सेनेत निर्भेळ रष्ट्रियत्व (हिंदू-मुस्लीम ऐक्य) झाले होते का?

महानायक हि कादंबरी विश्वास पाटलांनी खूप मेहनत करुन लिहीली आहे त्यांनी नेताजींच्या या चरित्रात्मक कादंबरी लेखनात ५ हस्तलिखिते २७ जपानी पुस्तके, २३ बंगाली पुस्तके ३ जर्मन , १५ मराठी ,८ हिंदी तर २११ इंग्लिश पुस्तकांचा आधार घेतला आहे. एवढा प्रचंड व्यासंग करुन लिहिलेली हि कादंबरी असली तरी यातील काही प्रसंगांचा थोडक्यात आढावा घेतला तर वावगे होणार नाही.

प्रसंग एक महानायक पृ. ६६०

आझाद हिंद सेनेतील कॅप्टन महंमद दुराणी हे फार मोठे देशभक्त होते.महानायक च्या पृ. ६६० वर त्यांचा एक संवाद असा आला आहे.

"माझ्या हिंदुस्तानला आझादी मिळाल्याशिवाय मला शांत झोप मिळण शक्य नाही नेताजी." कॅप्टन दुराणींचे डोळे ओलावले.प्राचार्य कोयामा म्हणाले," आमचाही एकदा कॅप्टनबाबत गैरसमज झाला होता. हे पक्के ब्रिटीश एजंट आहेत अस समजून यांना आम्ही अंधारकोठडीत फेकल,....."

"शेवटी आली ना प्रचिती?" कॅ.दुराणी.

"मातृभूमिच्या सेवेसाठी तुमच्यासारखे इमानी आणि सच्चे सेवक क्वचितच मिळतात कॅप्टन" कर्नल भोसले बोलले.

"बॅ.जिनांसारखा दगाबाज मनुष्य आम दुनियेत नाही.ही तर ब्रिटीशांची विषपेरणी ! जातीय तेढ्याच किती विदारक चित्र उभ राहत आहे! माझा निश्चयच समजा. हिंदू-मुस्लीम जर एकमेकांपासून दूर होणार असतील, तर मी जिवाच बरवाईट करुन घेईन! मला जगायचा कसा हक्क उरेल,नेताजी?" कॅप्टन महंमद दुराणी गहिवरुन विचारु लागले.

प्रसंग दोन महानायक पृ.८३९

तितक्यात नेताजींचा व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी कुंदनसिंग पुढे होऊन अडखळत बोलला; नेताजी आपल्या आझाद हिंद फौजेतच कोणीतरी फूटनीतीचा डाव खेळतो आहे. पाकिस्तानचा प्रचार करतो आहे."

"कशावरुन"

हि पत्रके पहा-"

कुंदनसिंगने पत्राची प्रत नेताजींच्या हतात दिली. नेताजी मोठम्मोठयाने वाचू लागले; "आःआद हिंद फौजेतील मुस्लीम अधिकार्‍यांनो,वरिष्ठ पदे भोगण्याच्या पापी लालसेने तुम्ही आपली जात-धर्म विसरुन गेला आहात.....तो ढोंगी गांधी आणि हा सुभाष दोघेही संधिसाधू असून हिंदू जातीचे पक्के नेते आहेत.गांधीप्रमाणे सुभाषलाही हिंदूंचेच राज्य हवे आहे.हिंदूंचे दास बनु नका.पाकिस्तानचा ध्यास घ्या. जिनासाहेबासाठी आपले प्राण अर्पण करा"

" थांबा नेताजी .त्या पत्रकातला एकही विषारी शब्द ऐकून घ्यायची माझ्या मनची तयारी नाही" ताडताड महंमद दुराणी धाडकन जागेवर उभे राहीले....पाकिस्तान हा शब्दोच्चार सहन करण्याऐवजी मरण पत्करले....."

महानायक पृ. ९१९

नेताजींनी दार उघडले.तोच कुंदनसिंग उद्‌गारला,

’खालच्या दालनात आपल्याला भेटायला खुद्द राशबेहारी आलेत"

"राशबेहारी ? एवढ्या रात्री ? शुद्धीत आहेस का?"

....

तोच नेताजींच्या दिशेने सूंSS सूं SS करत पिस्तुलातून चार गोळ्या सुटल्या. अचानक हमल्याने नेताजी बावरले पण लगेच सावरले.

....

नेताजी पुढे धावले...

आश्चर्याने म्हणाले "शत्रूने अगदी हुबेहुब राशबेहारी उभे केले होते म्हणायचे.

...

पृ. ९२० वर पुढे...

नेताजी ,मला चांगल आठवल ह्या मारेकर्य़ाला प्रथम कुठे पाहिले...कॅप्टन दुराणींच्या खास सेवेतला इसम आहे तो.

...

रंगुनहून सर्वत्र संदेश गेले "पकडा. गद्दार कॅप्टन दुराणीला पकडा. त्याच्या मुसक्या बांधा" आझाद हिंद च्या मुसलमानात फुटीरतेचे विष दुराणीच कालवत होता.

मेजर सखर, मेजर डे,मेजर मुहंमद बक्ष ,मेजर रियाझ व मेजर मदान हे ऐनवेळी दगा करुन ब्रिटीशांना मिळाले. महानायक पृ. ९०७ वर नेताजींना या फुटिरता वृत्तीने भयंकर धक्का बसला.

नेताजी जर्मनीला पोचण्यापूर्वीच भारतीय मुसलमानांचा एक छोटा जिहादी गट कार्यरत होता. याचा नेता मुहंमद इक्बाल शेदाई हा भारताला दार-उल-हर्ब म्हणजे इस्लामची शत्रूभूमि मानत होता.याला मुसोलिनीचे समर्थन असून नेताजींना या पॅन इस्लामीझम मानणार्‍या जिहादी माणसाच्याच मदतीने आझाद हिंद रेडीओ ची स्थापना करावी लागली होती.त्यामुळे "मुस्लीम आझाद हिंद रेडीओ" सुद्धा चालवणे त्यांना क्रमप्राप्तच होते.या शेदाईंनी आझाद हिंद चे मुख्य कार्यालय रोमला हलवावे असा नेताजींकडे आग्रह धरला. नंतर हे शेदाई अलग होऊन मुस्लीम आझाद हिंद फौजेची स्थापना करते झाले.मुस्लीम अलगता वाल्यांच्या प्रभावातील नेताजी बर्लिन रेडीओ वरुन ही हिंदुमहासभा व अकाली शीखांची निर्भत्सना करीत असत.

एका भाषणात ते म्हणतात,

“Speaking over the Radio on Monday, the noted Indian Leader in Berlin, Subhas Chandra Bose … pointed out that the majority of the Muslims, except those in the Muslim League, had joined the Congress and fighting side by side their Hindu brethren for the emancipation of India. He condemned the Hindu Mahasabha and the Akali Sikh leaders for their selfish policy of ignoring the national cause and for trying to secure power and influence for themselves. He assured Mr. Jinnah that his Pakistan scheme will never materialize so long as the British were in India. He emphasized that Pakistan could be created only under a national government.”

(Berlin Radio, October 7, 1942, “Testament of Subhas Bose, 1946”)

या भाषणाचे दोन अर्थ निघतात. एक तर जीना यांनी पाकीस्तानची कल्पना ब्रिटीश जाईपर्यंत स्थगित ठेवावी व नंतर तिला नेताजींची सहमती असणार होती किंवा दुसरा अर्थ हिंदु-मुस्लीम समस्याच नाही असे मानणारे नेताजी एक राज्य व दोन राष्ट्रे या प्रकारच्या तोडग्यावर आले असावेत.

क्रमश:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...