Skip to main content

Posts

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...
Recent posts

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...

सावरकर आणि राजकिय पक्ष

हिंदुमहासभा प्रवेश हा सावरकरांच्या चरित्रातला केवळ एक टप्पा होता. केवळ अन्य चांगला पर्याय नसल्याने ते निरुपायाने हिंदुमहासभेत गेले, आणि तीवर आपला इतका मोठा ठसा उमटवला की सावरकर आणि हिंदुमहासभा हे अद्वैत वाटु लागले. सन १९३८ ते सन १९४३ अशा केवळ सहा वर्षांच्या कारकिर्दित एका लहानशा मृतप्राय पक्षाला अत्यंत बलाढ्य अशा आणि १८८५ ते १९३८ अशा साठ वर्षे आधीच तळागाळात पोचलेल्या कॉंग्रेसारख्या, सर्व प्रकारची साधनसामुग्री व संपत्ती असलेल्या राजकिय पक्षाला, तो पर्यंतच्या आयुष्यात जी काय लोकप्रियता मिळाली ती पणाला लावुन आव्हान देण्याचा प्रयत्न करणे हाच मोठा भीमपराक्रम होता. सावरकरांच्या जागी सर्वसामान्य खचलेला नेता असता तर कॉंग्रेस ला आणि गांधी-नेहरु जोडगोळीला शरण जाऊन कॉंग्रेसमध्ये जाऊन लोकप्रियतेचा स्वस्त मार्ग निवडुन, स्वत:च्या तत्वांशी तडजोड करुन पैसा, मानमरातब व सत्ता मिळवता झाला असता. पण लोकहितासाठी लोकप्रियतेचा मी बळी देतोय अस स्पष्ट सांगुनच त्यांनी आपले मार्ग निवडले. सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे अशी अपेक्षा सुभाषचंद्...

हिंदुत्ववाद आणि हिंदुधर्मवाद

हिंदुत्व हि राजकीय आणि इहवादी संकल्पना आहे. हिंदुत्व आणि हिंदुधर्म अथवा हिंदुइझम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोहत्याबंदी हिंदुधर्माचा भाग असू शकेल मात्र हिंदुत्वाचा तो भाग नाही. हिंदुधर्माच्या अभिमानात कदाचीत गोहत्या, मुर्तीपुजा, आरती, जन्म पुनर्जन्म, उपासना येत असेल, हिंदुत्वाच्या अभिमानासाठी मात्र या गोष्टी पाळण्याची अट लागु नाही. एखादा बुध्दीवादी किंवा नास्तिक सुध्दा हिंदुत्वाचा अभिमानी असू शकतो. हिंदु समाजाचे न्याय्य हक्क जोपासणे आणि ऐहिक हित जपण हाच हिंदुत्वाचा अर्थ आहे. पारलौकिक बाबींसाठी हिंदुत्व नाही. हिंदुधर्मातील मूल्यांची चिंता हिंदुत्व करत नाही, पण ज्या हिंदुंना हिंदुधर्मातील मूल्ये पाळायची इच्छा असेल आणि जर अन्य लोकांकडून त्यावर आक्रमण होत असेल आणि ते नैसर्गिक हक्कांवर आक्रमण असेल तर तिथे हिंदुत्व नक्कीच दखल घेते. हिंदु धर्म व हिंदुत्व यातील शब्दसाधर्म्यामुळे खूप घोळ झालेत. अगदी न रुचणार सांगायचे तर संघ व गांधी यांच्यात समानता आहे तिचे नाव हिंदु धर्माचा अभिमान हे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हा हिंदुसमाजाचा स्वाभिमान व इहवादी दृष्टीकोन आहे. संघाला गांधींचे हिंदुपण साव...

सावरकरांचे अन्य क्रांतीकारकांशी संबंध व उत्तर प्रदेश दौरा

सावरकर ब्रिटीशांबरोबर झालेल्या तहातील सर्व अटींतुन मुक्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. राजकारणात त्यांच्या समवेत अंदमानातच जमठेपीची शिक्षा भगणारे भाई परमानंद व आशुतोष लाहीरी हिंदुमहासभेचेच राजकारण करण्यात सामिल झाले. सेनापती बापट हे सुध्दा पुन: सावरकरांसमवेत काही सार्वजनिक कामात भाग घेत. त्यांनी हिंदुसभेत प्रत्यक्ष प्रवेश केला नाही तरी हिंदुसभेच्या लढ्यात ते भाग घेत असत. राशबेहारी बोस यांनी सावरकरांशी पत्रव्यवहार सुरु ठेवला व त्यांच्या सुचनेवरुन जपान मध्ये हिंदुमहासभेची शाखा सुरु केली. सावरकरांची मुक्तता झाल्यावर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. यावेळी सावरकर १८५७ च्या उठावातील क्रांतीकारकांपासून भगतसिंगा पर्यंत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व क्रांतीकारकांच्या नावाचा प्रकट उच्चार करुन लोकांना त्यांचा जयजयकार करन्यास उद्युक्त करत. आपल्या सहकारी, अनुयायी व अन्य क्रांतीकारकांवर सावरकर लेख लिहित व त्यांचा गौरव करीत. त्यातील काही लेखांचा संग्रह पुस्तक तेजस्वी तारे नावे प्रकशित आहे. थोडक्यात सावरकरांनी अन्य क्रांतीकारकांशी नंतर संबंध ठेवले नाहित वा अन्य क्रांतीकारकांनी सावर...

सावरकर कॉंग्रेसमध्ये का गेले नाहीत?

स्वातंत्र्य पुर्व काळात लंडनमध्ये असलेल्या भारतीयांमध्ये दोन तट पडले होते. यांच्यात वादविवाद होत असत. एका गटाचे नेते होते गांधी तर दुसऱ्याचे सावरकर. वादात ज्याची बाजू पटत असे त्याच्या बाजूने जमलेले तरुण जाऊन बसत. हे सर्व तरुण म्हणजे हिंदुस्थानातून उच्च शिक्षणासाठी आलेला बुध्दीमान तरुण वर्ग होता. त्यांच्या समोर बुवाबाजी व महात्मेगिरीची लटपटपंची चालणेच शक्य नव्हते. हळु हळु सावरकरांच्या बाजूला बसणाऱ्यांची संख्या वाढु लागली व एक दिवस असा आला की एका बाजूला गांधी एकटे व दुसऱ्या बाजूला सावरकर आणि त्यांच्या प्रभावळीतले तरुण. त्यानंतर गांधींनी इंडीया हाऊस मध्ये जाणे सोडले व "मारो काटो का पंथ" या नावे क्रांतीकारकांवर टिका करणारे एक राजनिष्ठ पुस्तक लिहिले. त्याच्या प्रस्तावनेत गांधी लिहितात, लंडनमधले इंडीया हाऊस मधले ब्रिटीशांविरुध्द पसरलेले विषारी वातावरण पाहुन मी दचकलो आणि तेथुन मागे फिरलो. दुर्दैवाने पुढे सावरकर पकडले गेले आणि अभिनव भारत संस्था उध्द्वस्त झाली. सावरकरांना कठोरातली कठोर अशी काळ्या पाण्याची दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावली गेली. अंदमानात ११ वर्षे व रत्नागिरीत तीन वर...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सचिव बाळाराव

कै. बाळाराव उर्फ शांताराम शिवराम सावरकर हे १९५० ते १९६६ अशी सोळा वर्षे सावरकरांचे स्वीय सचिव ( Personal secretary) म्हणून काम पहात असत. बाळाराव सावरकर हे सावरकरांचे नात्यातले नव्हेत तर केवळ आडनाव बंधु, त्यांचे नाते गुरु शिष्याचे. बाळाराव हे चित्पावन नसून कऱ्हाडे ब्राह्मण होते. स्वातंत्र्य वीर सावरकरांचे धाकटे बंधु बाळाराव उर्फ डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्याशी त्यांच्या नामसाधर्म्याची गल्लत करु नये. बाळारावांची आणि माझी ओळख खूप पुर्वीपासुनची. सुमारे दहा वर्षे म्हणजे सन १९८६-८७ ते पुढे बाळाराव जाईपर्यंत ती टिकली. मी पुण्यात आल्यानंतर माझ्या कडे आल्याशिवाय बाळाराव पुण्यातून कधीच परस्पर परत गेले नाहीत. सावरकर साहित्याच्या निमित्ताने आमची गाढ ओळख व वयाने ते माझ्याहून खूपच मोठे असले तरी आमची मैत्रीही झाली. त्यांच्या सावरकरांच्या सहवासातल्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळत. बऱ्याचशा त्यांनी पुस्तकात लिहुन ठेवल्याच आहेत. बाळाराव सावरकरांचे काम करत मात्र त्या बदल्यात सावरकर बाळारावांना काहीही वेतन देत नसत. सावरकरांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी लोकांकडुन त्यांना काही रुपये कृत...