स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन दिला.
लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे.
पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले.
आपल्या घरात एका पुर्वास्पृश्य मुलीला स्वातंत्र्यवीरांनी स्वत:च्या मुलीप्रमाणे संगोपन करुन तिचे पालन पोषण केले. रत्नागिरीतल्या शाळांत अचानक पणे जाऊन सर्व स्पृष्यास्पृश्य मुलांना सरमिसळ बसवले का नही ते पहात. व त्यात कुचराई करणाऱ्या सवर्ण शिक्षकांविरुध्द तक्रार करुन त्यांच्यावर कारवाई करवुन आणत. लहानपणापासुन असे सरमिसळ बसवले नाही तर नव्या पिढ्यांच्या मनातली अस्पृश्यतेची भावना कदापि जाणार नाही असे सांगुन त्यांनी हे घडते का नाही यावर खूप कटाक्ष ठेवला. पुर्वास्पृश्यांना स्तोत्रे शिकवणे, जानवी देणे हे तर या कार्यक्रमाचा भाग होतेच. रत्नागिरीत मंदिरे सर्व हिंदुंना उघडुन देण्यात त्यांचा भर होताच. या शिवाय सर्व हिंदुंना अगदी गाभाऱ्यापर्यंत प्रवेश असेल असे पतितपावन मंदिरही त्यांनी बांधवले.
अस्पृश्य वस्तीत जाऊन चहा फराळ चे कार्यक्रम, हळदिकुंकुवाला पुर्वास्पृष्य वस्तीतील स्त्रियांना घरी बोलावुन आपल्या पत्नीच्या हस्ते सौभाग्यवाण देण हि कार्ये सावरकर करत, समस्त सनातनी मंडळी अगदी संतापुन गेली होती, अनेक खेकटी ते उभी करुन शासनाकडे तक्रारी करत. पण स्वातंत्र्यवीर डगमगणाऱ्यातले नव्हते. त्यांच्या स्थानबध्दतेच्या काळात रत्नागिरीत जी क्रांतीकारी समाजसुधारणा झाली त्याने अनेक पुढारी विस्मय चकित झाले. थक्क होऊन गेले. त्यांच्या कार्याचे महत्व जाणणाऱ्यात महर्षी वि.रा.शिंदे, कोल्हापुरचे क्षात्र जगत गुरु , शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच जण होते.
हे सर्व वचुन जितक्या पटकन संपते त्याच्या कित्येक पट जिकिरीचे आणि कटकटीचे काम होते. प्रचंड विरोध सोसत , नेटाने हे काम सावरकर करत असत. सावरकरांचे समाजकार्य म्हणजे वातानुकुल खोलित बसून केलेले लिखाण नसून गोरगरिब पुर्वास्पृश्य बांधवात प्रत्यक्ष मिसळुन त्यांच्या पाठिवर मायेचा हात फिरवत केलेल काम होते. यास म्हणतात कर्ते सुधारक, आधी केले मग सांगितले.
हे सर्व वचुन जितक्या पटकन संपते त्याच्या कित्येक पट जिकिरीचे आणि कटकटीचे काम होते. प्रचंड विरोध सोसत , नेटाने हे काम सावरकर करत असत. सावरकरांचे समाजकार्य म्हणजे वातानुकुल खोलित बसून केलेले लिखाण नसून गोरगरिब पुर्वास्पृश्य बांधवात प्रत्यक्ष मिसळुन त्यांच्या पाठिवर मायेचा हात फिरवत केलेल काम होते. यास म्हणतात कर्ते सुधारक, आधी केले मग सांगितले.
या आणि अशा अजुन अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आणि आदर्श ठेवण्यासारख्या व कालानुरुप आचरणात आणण्यासारख्या आहेत. समाजसुधारणेचे हे व्रत अखंड तेरा वर्षे रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात सुरु होते.
![]() |
Kirtan by person from पतितपावन मंदिर ,ex-untouchable community, a milestone in social reform, Patitpavan Mandir, Ratnagiri, 1932 — at Patitpavan Mandir, Ratnagiri, 1932. |
![]() |
मालवणची पूर्वास्पृश्य परिषद इ.स.१९२९ अध्यक्ष स्वा.वीर सावरकर :- पूर्वास्पृश्यांना यज्ञोपवित धारण विधी, मागे सावरकरांच्या कल्पनेतून साकारलेला कुंडलिनी कृपाणांकित हिंदूध्वज |
1 comment:
खूप छान लेख सर with reference.sawarkaranchya संताजी कार्याविषयी अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तके उपयुक्त ठरतील ??????
Post a Comment