Tuesday, August 23, 2011

"स्वा.सावरकर- डॉ.आंबेडकर सहकार्य व मतभेद" टिपणे

१.१९२४ ला रत्नागिरीला स्थानबद्ध झाल्यावर स्वा.सावरकरांचे अस्पृश्यतानिवारणाचे कार्य सुरु.

२.श्रद्धानंद मध्ये महाडला अस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरु देण्याला मान्यता द्यावी या साठी लेख. सावरकरांनी यात पूर्वास्पृश्यांना पाणी भरु देण्यास विरोध करु नका असे स्पृश्यांआ उद्देशुन लिहिले तर पूर्वास्पृश्यांना लिहिले, स्पृश्यांनी तुम्हाला पाणी भर्य दिले नाही तर तुम्ही हिंदुधर्म सोडून जाल ही धमकी देऊ नका.कारण हिंदुइधर्म हा काही एकट्या स्पृश्यांचा नाही.त्यावर तुमचाही तेवढाच हक्क आहे.हि तुमची सामाईक मत्ता आहे.त्यासाठी लढा द्या. हिंदुधर्मावरिल अस्पृश्यतेचा कलंक वेळ पडली तर आम्ही रक्ताने धुवुन काढू ही डॉ.आंबेडकरांची प्रतिज्ञा खर्‍या हिंदुस शोभणारी आहे.म्हणूनच त्यांचा सत्याग्रह आम्ही न्याय्य समजतो.

३.सावरकरंचे अनुयायी व हिंदुमहासभेचे कार्यकर्ते नवी मौज चे संपादक श्री.अनंत गद्रे यांनी डॉ.आंबेडकरांची भेट घेतली व त्यांना डॉ.मुंजे,डॉ.कुर्तकोटी व बॅ.सावरकर यांना भेटण्याचा आग्रह केला. गद्रे यांनी पुढे लिहिले की या भेटीमुळे आंबेडकरांविषयी चे बरेच गैरसमज दूर झाले.

४.समता पत्राचे मात्र सावरकरांवर टिकेचे लेख चालुच. संपादक लिहितात, सावरकर हे फार मोठे शूरवीर आहेत.मोठे हुतात्मे आहेत .पण जोपर्यंत ते ब्राह्मणी धर्माचे पक्षपाती आहेत तोपर्यंत त्यांच्यावर टिका करणार.

५.समता पत्राची सर्व टिका सावरकर जपून ठेवत. १४-८-१९२८ ला सावरकरांनी समता संघास पत्रास पत्र लिहून खुलासे केले. त्यात मुख्यत्वे लिहिले, आपल्या प्रत्यक्ष भेटित मी माझी मते आपणास संगितली असता व त्याप्रमाणे वागत असता माझ्या नावचा उल्लेख करुन मी त्याविरुद्ध आहे असे भासवता त्याअर्थी आपली टिका प्रामाणिक नसून तिचा हेतु काही दुसराच असला पाहिजे. हिंदुसमाजात प्रांतिक वा जातीपातीचे भेद न मानता पंक्तीव्यवहार व विवाह व्यवहार चालु झाले पाहिजेत. मात्र अजून काही काळ हिंदुंनी अहिंदुंना मुली देऊ नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. जेव्हा आपल्यातले जातीभेद नष्ट होऊन अहिंदु त्यांचे अहिंदुत्व विसरुन मानवतेने वागु लागतील तेव्हा हिंदुत्वही मानवतेत विलिन होईल. तेव्हा मी हिंदुत्व राखु इच्छीतो -त्यातील जातीभेद नव्हेत- सध्या राखु इच्छीतो. हे मत ज्याला मान्य नसेल त्याने त्यापुरती टिका करावी. श्रद्धानंदात माझ्या नावाने आलेल्या लेखांपुरताच मी जबाबदार आहे हे ही ध्यानात ठेवावे.

६.१९२८ ला मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवात वाद माजून आंबेडकर,सी.के.बोले ,प्रबोधनकार व स्पृश्यांचे वतीने जावळे,पुरंदरे बावडेकर गंगाधर जोशी यांच्यात तडजोड होऊन अस्पृश्यांना स्पृश्यांइतकाच अधिकार.

७.१९ मे १९२९ ला सावरकर मालवण येथे भरलेल्युआ पूर्वास्पृश्य परिषदेसाठी गेले. अध्यक्षपदी डॉ.आंबेडकरांची निवड झाली होती. पण चर्मकार मंडळींना त्यांचे नाव फारसे पसंत नव्हते. त्याचवेळी मुंबईला गिरणी कामगारांच्या संपामुळे आंबेडकर येऊ शकले नाहीत. स्वा.सावरकरांचे नाव पूर्वास्पृश्यांमधील दोन्ही जातींना मान्य असल्याने अध्यक्षपदी सावरकरांची निवड. सावरकरांचे व त्यांच्या अनुयायांचे परिषदेतील वर्तन पाहून पुण्याचे चर्मकार पुढारी श्री.राजभोज म्हणाले, बॅ.सावरकरांचे निष्कपट व प्रेमळ वर्तन पाहून माझ्या मनातील हिंदूसंघटनाविषयीच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत.या परिषदेत सावरकरांनी पूर्वास्पृश्यांना आपले अधिकार मिळवण्यासाठी निर्भय ल्होऊन लढा देण्याचा उपदेश केला.

याच परिषदेत सर्वांना सावरकरांच्या हस्ते जानवी देण्यात आली. वेदांचाही सर्वांना समान अधिकार असल्याचे सावरकरांनी सांगितले. पूर्वास्पृश्य पुढारी सुभेदार घाटगे म्हणाले आम्ही महार -चांभार केव्हाही हिंदुधर्म सोडणार नाही. श्री, सुभेदार हे पुणे हिंदुमहासभेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते.

८.ऑगस्ट १९२९ मधे डॉ.आंबेडकर एका न्यायालयीन कामासाठी रत्नागिरीला येणार होते.विठठलमंदिरात सावरकरांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे भाषण करायचे ठरले. ही कल्पना त्याकाळात राबवणे अत्यंत कठीण होती. सावरकर अनुयायांनी यासाठी शेकडॊ सश्या जमवल्या. त्यावर सर्व जातीच्या लोकांच्या सह्या व अंगठे !मात्र आंबेडकरांना तातडिने मुंबईला जावे लागल्याने हे भाषण झाले नाही. मात्र त्या ठिकाणी दोघांची अर्धा तास भेट झाली. विरोधकांनी सावरकरांना तुम्ही आंबेडकरांना भाषण करु देण्यासाठी ५०० सह्या गोळा केल्यात आम्ही ५००० सह्या विरोधात गोळा करु असे सांगितले. अस्पृश्यता निवरणाचे काम त्यावेळी किती दुर्घट होते ते लक्षात येते.

९.सावरकरांनी केलेले जातीभेद निर्मुलनाचे काम पाहून कर्मवीर वि.रा.शिदे (डिप्रेस्ड क्लास मिशन) यांनी सावरकर म्हणजे चालतेबोलते पतितपावन असून आम्ही जे ठरावात मागतो ते इथे रत्नागित्रीत प्रत्यक्षात आलेले दिसते.

१०.सावरकरांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या पतितपावन मंदिरात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवंशी महार परिषद.यात सावरकरांचे अभिनंदन,मास-मद्य न पिण्याची प्रतिज्ञा,हिंदुधर्म न सोडण्याचे आश्वासन इ.अनेक ठराव.

११.सावरकरांची भूमिका आंबेडकरांना मान्य पण ते म्हणत, हिंदुसमाज अद्याप सावरकर व मुंजे यांच्या मागे नाही.त्यामुळे त्यांच्या सहानुभूतीला व्यवहारात मूल्य नाही. (दलितबंधु २३-४-१९३२)

१२.हिंदुधर्म सोडण्याच्या आंबेडकरांच्या धमक्यांना अन्य पूर्वास्पृश्यांचा तीव्र विरोध व आंबेडकरांवर राउंडटेबल मधे प्रवेश करुन घेण्यासाठीचे व जागा कायम राखण्यासाठीचे डावपेच आखत असल्याची कडक टिका. श्री.राजा, श्री.राजभोज मुंबईचे देवरुखकर हिंदुमहासभेचे समर्थक

१३.एप्रिल मध्ये डॉ.आंबेडकर पंजाबात गेले असता तेथील हिंदुमहासभेने व सावरकरांचे लंडनचे सहकारी डॉ.गोकुळचंद नारंग यांनी आंबेडकरांना सांगितले कि आंबेडकरी कुटुंबात रोटी बेटी व्यवहार करण्यास पंजाबी हिंदु सज्ज आहेत. पण हिंदुधर्मातच ठेवण्याचे हे प्रयत्न आंबेडकरांचे समाधान करु शकले नाहीत.

१४.६.-९.१९३२ ला गणेशोत्सव. समारंभात तिसर्‍या दिवशी चर्मकार समाजातील L.L.B.चे विद्यार्थी श्री.सोनावणे यांचे सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भाषण.पतितपावन मध्ये पूर्वास्पृश्य किर्तनकारांचे किर्तन. चौथ्या दिवशी अस्पृश्यता नि जातीबेद यावर सत्यशोधक समाजाचे पुढारी श्री.माधव्राव बागल यांचे सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भाषण. सत्यशोधक बागल म्हणाले सावरकरांचे हे कार्य पाहून असे वाटते की असा प्रभावशाली पुरुष जर आम्हाला देशावर मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो.त्याच रात्री क्षात्र जगद्‌गुरुंचे भाषण.सावरकर म्हणाले की शाहू महाराजांनी क्षात्जगद्‌गुरु पीठ स्थापन केले.आम्ही आमच्या आजच्या यज्ञाने घोषणा करतो की वेद व धर्मासंबंधी सर्व अधिकार अखिल हिंदूंना प्राप्त होऊ शकतात. श्री. क्षात्र जगद्‌गुरु म्हणाले की वीर पुरुष परिस्थिती निर्माण करतो हे कार्क्लाईल चे मत मला पटत नसे पण स्वा.सावरकरांनी गेल्या ५ वर्षात जे सामाजिक बदल घडवून आणले ते पाहता हे मत खरे असल्याचे मला दिसून आले.

रत्नागिरी कार्यासाठी सावरकरांना आंबेडकरांचे एक पत्र," I however wish to take this opportunity of conveying to you my appreciation of the work you are doing in the field of social reform. If the untouchables are to be part and parcel of the Hindu society, then it is not enough to remove unaccountability; for that matter you must destory chaturvarnya. I am glad that you are one of the very few who have realised this."

१५.वारंवार झालेल्या अपमानांनी व सत्याग्रह निष्फळ ठरल्याने चिडलेल्या आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा. याने सावरकरांना अत्यंत दु:ख झाले. याविषयी लेखात त्यांनी लिहिले, आंबेडकर हिंदु धर्म सोडणार याचे मला जेवढे आश्चर्य वाटले नाही एवढे ते अन्य चांगला र्म शोधून काढत आहेत या बातमीने वाटले. हिंदु धर्म बुद्धीवादी नाही म्हणून ते सोडत असले तर त्यात आश्चर्य नाही पण त्या कसोटीने जगात आजचा एकही धर्म ग्राह्य ठरणार नाही.

१६.धर्मांतराच्या घोषणेनंतर अनेल धर्म-पंथ आंबेडकरांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करु लागले. शीखही त्याला अपवाद नव्हते. १९३६ ला शिरोमणी शीखप्रचार समितीने त्यासाठी परिषद घ्यायचे ठरवले व त्या परिषदेला सावरकरांना आमंत्रण दिले. सावरकरांनी उत्तर दिले माझ्यावरील स्थानबद्धतेमुळे मी येऊ शकणार नाही,तरी या परिषदेला मी प्रकटपणे सहानुभूती व्यक्त करतो कारण शीख हेही हिंदुच आहेत.

१७.हिंदूंचा इतिहास पराभवाचा आहे या डॉ.आंबेडत्रांच्या विधानाला सावरकरांचे "हिंदूंचा विजयशीळ इतिहास" या लेखाद्वारे उत्तर.

१८.प्रांतिक विधानसभांच्या निवडणुकीत डॉ.आंबेडकरांचा श्री.ल.ब.भोपटकरांना पाठींबा तर आंबेडकरांना भोपटकर, केळकर जम्नादास मेहता यांचा पाठिंबा. आंबेडकर व जम्नादास विजयी मात्र भोपटकरांचा पराभव.

१९.सावरकरांची संपूर्ण मुक्तता. जुलै १९३७ मधील एका सत्कारास उत्तर देताना सावरकर म्हणाले,मनुष्याची योग्यता कोणत्या जातीत तो जन्माला आला त्यावरुन ठरण्याची रुढ्गी बंद झाली व गुणावरुन तिची योग्यता ठरू लागली म्हणजे हिंदुंमधील विषमता नष्ट होईल. डॉ.आंबेडकरांसारखा विद्वान तुमच्या जातीत जन्मला हे तुमचे भाग्य आहे. त्यांच्यामुळे महार जातीतील माणसे किती ऊंच जाऊ शकतात ते सिद्ध झाले.त्यांची धर्मांतराची घोषणा पारलौकिक नसून व्यावहारीक असामानतेविषयी आहे. व्यावसायिक विषाता नष्ट झाली की धर्मांतर झाल्यासारखेच आहे.

२०. जून १९३८ ला सावरकरांनी ग.वि.केतकर यांना पत्र पाठवले की डॉ.आंबेडकर हे हिंदुसभेच्या हिंदुसंघटनास अनुकूलता दर्शवत आहेत तरी त्यांची त्वरीत भेट घ्यावी.

२१.सैनिकीकरण याचे परिपत्रक सावरकरांनी आंबेडकरांना पाठवून त्यांच्या पक्षाने सैनिकि महाविद्यालय सुरु करण्याच्या विधेयकास पाठिंबा देण्याची विनंती केली.शस्त्रनिर्बंध दूर करण्याचा सावरकरांचा प्रयत्न.

२२.२८ जाने १९३९ ला दादर येथे निवडणुक सभेत सावरकरांनी श्री. रामभाऊ तटणीस यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत मते द्या असे भाषण केले. अध्यक्ष बॅ.जम्नादास मेहता असून याच वेळी आंबेडकरांचेही याच सभेत तटणीसांसाठी भाषण.

२३. दि.५ मे १९३९ साध्यानुकूल सहकार (Responsive Co-Operation) या धोरणाप्रमाणे भारत्मंत्र्यांचे समादेशक डॉ.राघवेंद्र राव यांच्या सन्मानार्थ उपहार दिला. या समारंभाला पालिका आयुक्त श्री. भट व हिंदुसभेच्या इतर नेत्यांबरोबर डॉ.आंबेडकर व स्वा. सावरकरांची उपस्थिती.या प्रसंगी सावरकर म्हणाले, संघराज्य,महायुद्ध आदी महत्वाचे प्रश्न उपस्थित होणार आहेत .त्या प्रसंगी डॉ.राव हिंदुहिताच्या दृष्टीने मत देतील असा विश्वास वाततो.

२४.भागानगरच लढा सुरु. काही स्वयंसेवकांचा पुण्यात सत्कार. त्याप्रसंगी बोलताना पूर्वास्पृश्य समाजाचे श्री.कृष्णराव गांगुर्डे म्हणाले, "आज काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाविरोधात असलेले कळवणकर शास्त्रींसारखे अनेक लोक व मी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभ आहोत. हे सावरकरांनी केलेले कार्य आहे. आता डॉ.आंबेडकरांनीही याच हिंदुधजाखाली एकत्र यावे."

२५.सोमवार दि. ९ ऑक्टोबर १९३९ ला सकाळी ११ ते १२ एक तास सावरकर व व्हाईसरॉय यांची भेट. भेटीहून बाहेर आल्यावर भेटिसाठी आलेल्या डॉ.आंबेडकरांशी त्यांची भेट. तिथेच अर्धा तास सावरकर व आंबेडकर यांच्यात गप्पागोष्टी झाल्या. या भेटीत व्हाईसरॉयने कॉंग्रेस व मुस्लीम लिग प्रमाणेच हिंदुमहासभेलाही वाटघाटींसाठी निमंत्रण देण्याचे मान्य केले.

२६.हिंदुंवर सीमाप्रांतात होणार्‍या आक्रमणांचा प्रतिकार. सावरकरांनी प्रकृती अस्वास्थ्य बाजूला ठेऊन ९ जाने १९४० ला रामभाऊ तटणीस यांच्यशी चर्चा केली. १३ जाने. ला डॉ.आंबेडकर व आचार्य दोंदे यांच्याशी सावरकरांची चर्चा.हे दोघेही सावरकर सदनात सावरकरांची विचारपूस करण्यासाठी आले होते. या भेटीनंतर जीना-सावरकर भेटीची चर्चा सुरु झाली पण या वार्तेत तथ्य नसल्याचे "केसरी" ने प्रसिद्ध केले.

२७.जानेवारी १९४० लाच सावरकर-आंबेडकर व जीना एकत्र येणार अशा वार्ता वृत्तपत्रातून येत होत्या. त्याला उद्देशून दैनिक सकाळ ने लिहिले," बॅ.जिना, बॅ.सावरकर व डॉ.आंबेडकर या तीघांची प्रकृती भिन्न असली तरी त्यांच्या राष्ट्रीय विचारांची विकृती एकच असल्याने तिघांचा दृष्टीकोन व तो मांडण्याची पद्धत अखेर एकच आहे."

२८.६ फेब्रुवारी १९४० ला पारशी समाजच्या सभेला इतरांबरोबर सावरकर, डॉ.आंबेडकर व डॉ.नारायणराव सावरकर उपस्थित. यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, कोणत्याही राष्ट्रीय कार्यात नि राज्यकारभारात अल्पसंख्य जमातींना योग्य तो वाटा देण्यास हिंदुमहासभा सिद्ध आहे. इतर अल्पसंख्यांकांनी हिंदुस्तान तोडयाच्या मुसलमानांच्या मागणीशी गट्टी करु नये. याच सभेत डॉ.आंबेडकरांनीही भाषन केले. (टाईम्स ऑफ इंडिया ६-२-१९४०)यापूर्वी २२ जने ला सावरकरांनी पारशी समाजाच्या नेत्यांशि स्वतंत्र चर्चा केली होती.

२९.यानंतर नवयुग मध्ये आंबेडकर व सावरकरांच्यात फूट पाडण्यासाठीचे लेख .

३०.त्या वर्षातील निवडणुकात हिंदुसभा,सनातनी,आर्यसमाजी व आंबेडकरांच्या स्वतंत्र श्रमिकक्ष व Liberal पक्ष सर्वांनी एकमेकांना जमेल तेवढे सहकार्य करुन निवडणुका लढवल्या व बहुतांशी ठिकाणी त्यांच विजय होऊन कॉंग्रेसचा पाडाव झाला.सावरकरांनी हिंदुविघातक कॉंग्रेसचा पाडाव शक्य आहे हे या निवडणुकांनी दाखवून दिले असे म्हटले.

३१.एप्रिल १९४० च्या सुमारास चुनीलाल मेहता यांच्या घरी कॉंग्रेसेतर पक्षांच्या सभेला स्वा.सावरकर ,डॉ.आंबेडकर तसेच र.पु.परांजपे उपस्थित. या सभेत एक आघाडी करण्याचा प्रयत्न झाला.

३२.दि.१४-१५ मार्चला मुंबईत ताजमहाल हॉटेल मध्ये कॉंग्रेस व मुस्लीम लीग वघळून अन्य पक्षांची बैठक भरली. त्यात सुमारे चाळीस नेते उपस्थित. सावरकर व आंबेडकरही या बैठकीला उपस्थित्य होते. या बैठकीला विशेष मार्गदर्शन सावरकरांनी केलुयाने त्यांचा आभाराचा विशेष उल्लेख अध्यक्ष बॅ.सप्रू यांनी केला.क्रांतीकारी म्हणजे केवळ आक्रस्ताळी असा बर्‍याच जणांचा समज होता. पण यावेळी सावरकरांना जवळून पाहिल्याने बहुतेकांचा हा गैरसमज दूर झाला. सावरकरांचे तर्कशुद्ध व निर्भिड विचार ऐकल्याने ते मोठे विचारवंत व बुद्धीमान असल्याचा बहुतेकांनी उल्लेख केला( "उदय" अमरावती दि.२८ मार्च) या परिषदेला हिंदुमहासभेचे पुढारी प्रामुख्याने उपस्थित होते. टाईम्स ने लिहिले," The acceptance of resolution will be tantamount to setting up Hindu Raj at the center supported with British Bayonets.( Times of India,26 March 1941)

33.जीना सावरकरांना भेटण्यास उत्सुक असल्याचे सिंध चे हिंगोरानी यांनी कळवले. चिमणलाल सेटलवाड व डॉ.आंबेडकरही सावरकर-जीना भेट व्हावी म्हणून प्रयत्नशील होते.

३४.आंबेडकरांच्या "पाकिस्तान" या पुस्तकाविषयी सावरकरांना पत्रकारांनी विचारले असता सावरकर महणाले, आंबेडकरांनी हे पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यासंबंधी आपणाशी चर्चा केली होती. सैन्यात मुसलमानांचे आधिक्य झाले तर पाकिस्तान निर्माण होईल हे विधान परिस्थितीचे थन आहे पाकीस्य्तानचा पाठपुरावा नव्हे.उलट हिंदूंनी अधिकाधीक संख्येने सैन्यात जावे या माझ्या प्रयत्नांना ते पुष्टी देणारेच आहे.

३५.दि.१५ एप्रिलला सावरकरांनी आंबेडकरांचे सुवर्णमहोत्सवाचे वेळी अभिष्टचिंतन केले. आंबेडकरांना अपृश्यतानिवारण कार्य केल्यासाठी शुभेच्छा देतानाच सावरकर म्हणाले आंबेड्शकरांचे हिंदुविरोधी विचार व कृती हिसुद्धा माझ्या लक्षात आहे. तीही हिंदुसंघटनाला सहाय्यक होईल अशी आशा धरुन मी त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

३६.दि.२६ जुलै १९४१ ला ७५ पुढार्‍यांची पुण्यात बैठक झाली त्यात सावरकर व आंबेडकर सहभागी. या परिषदेत सावरकरांचे वैशिष्ट्य्पूर्ण भाषण. अखंड व अविभाज्य हिंदुस्थानाचा ठराव . परिषदेत उपस्थित असलेल्या तात्यराव केळकर ,पं.नथुराम गोडसे व अ.स.भिडे गुरुजी यांच्या सह सावरकर त्याच दिवशी अन्य सभा व राजकिय कामांसाठी सांगलीला रवाना.

३७.व्हाईसरॉयने वाढवलेल्या कार्यकारीणीत मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व न मिळाल्याने डॉ.आंबेडकरांनी तिचा निषेध केला. दि,८ ऑगस्ट ला सावरकरंनी पत्रक काढून आंबेडकरांना पाठींबा दिला. पत्रकातच या वर्गाचे प्रतिनिधी आंबेडकरांवाचून दुसरा योग्य मनुष्य नसल्याने त्यांचीच निवड करावी असी मागणी सावरकरांनी केली.

३८.दि.११ एप्रिल १९४३ ला दिल्लीत हिंदुसभाभवनात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर डॉ.आंबेडकरांशी एक तास विचारविनिमय.

३९. ६ जून १९४३ ला मुंबईत "सावरकर सप्ताह" गवालिया टॅंक (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) येथे सावरकरांचा भव्य सत्कार र.पु.परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या भाषणात सावरकर म्हणाले सर्व अल्पसंख्यांकांचे आपण प्रतिनिधी असल्याचे जीना भासवतात पण मुसलमान सोडून अन्य पारई,ख्रिश्चन देश खंडित करण्याच्या बाजूने नाहीत. सर्व मुसलमानही जीनांच्या बाजूने नाहीत. अस्पृश्य जरी वेगळी जागा मागत असले तरी घाबरुन जायचे कारण नाही. डॉ.आंबेडकरांशी माझे याविषयी बोलणे झाले आहे त्या आधारे मी सांगतो ते फक्त वसतीसाठी ओसाड जागा मागत आहे, तेव्हा त्यांच्यापासून भय बाळगण्याचे कारण नाही. या कार्यक्रमाचे "इंडिया मुव्हीटोन" ने चित्रीकरण केले असून त्या NEWS REELS मिळवण्याचे प्रयत्न चालु आहेत. यथावकाश त्या www.savarkar.org वरुन प्रसिद्ध केल्या जातील.

४०.दि.२० जून १९४३ ला सावरकरांचा रोहिदास सुधारक मंडळ व विविध चर्मकार समाज संस्थांच्या वतीने सावरकरांचा दादर येथे सत्कार करण्यात आला.त्यावेळी सावरकर म्हणाले," हिंदूसमाजाने तुमच्यावर ज्काही अन्याय केले तरी तुम्ही हिंदूधर्म सोडू नका. आपापसातील जातीभेद गाडून टाका .मी त्यासाठी प्रयत्न केले समाजाने माझ्यावरही बहिष्ख्कार टाकला टिका केली. पण मी समाजहिताचे काम सोडले नाही. एकनाथ अस्पृश्याच्या घरी जेवले म्हणून त्यांच्यावरही बहिष्कार पडला. प्सण शेवटी तेच संत मानले गेले. डॉ.आंबेडकर आता व्हाइसराय च्या कार्यकारीणीवर सदस्य झाले आहेत .माझा त्यांना पाठिंबा आहे. तुम्हीही तसेच प्रयत्न सुरु ठेवा. मिळतील ती अधिकार स्थाने घ्या. अशी अधिकारपदे घेणार्‍या हिंदूंना माझा पाठिंबा राहील. तसेच आपण सैनिकी शिक्षणही घ्यावे.

४१. सन १९४६ घटनासमितीसाठी हिंदुसभेतर्फे डॉ.मुखर्जी तर मुस्लीम लिग व युरोपिअन गटांच्या पाठींब्याने आंबेडकर घटना समितीवर निवडून गेले. मुखर्जींणा कॉंग्रेसचा पाठींबा.

यावेळी अग्रणीच्या लेखानुसार सावरकर घटना समितीत जाण्यास उत्सुक नव्हते असे दिसते. मंत्री,राष्ट्रपती होण्यापेक्षा किंवा भारतररत्न पेक्षा स्वातंत्र्यवीर हिच उपाधी त्यांना अधिक प्रिय असावी.

क्रमश:

Short Report of HINDU MAHASABHA RELIEF ACTIVITIES DURING "Calcutta killing" AND "Noakhali Carnage"

नौखालीतील अत्याचारांच्या वार्ता अतिशय भीषण होत्या. बंगाल हिंदुसभेने या संबधात एक पुस्तिका (श्वेतपत्रिका) प्रसिद्ध केली. गांधीजींनीही नौखालीत लश्कराच्या संरक्षणात भेट दिली. हिंदुसभेचे अनेक कार्यकर्ते नोखाली , बंगाल मधे गेले व त्यांनी मदतकेंद्रे सुरु केली. हिंदुसभेचे कार्यवाह व सावरकरांबरोबर अंदमानात असलेले क्रांतीकारी आशुतोष लाहिरी व डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मदत कार्य सुरु केले व हिंदूंसाठी सहाय्य निधीची मागणी केली. नगर हून हिंदुसभेचे एक कार्यकर्ते श्री.विष्णु रामकृष्ण करकरे यांनी महाराष्ट्रातून निधी गोळा करुन सोबत चार कार्यकर्ते घेऊन पूर्व बंगाल मधे गेले.

गांधीजींना तेथील सर्वधर्मिय प्रार्थनेत रामनाम सुरु झाले की मुसलमान उठून निघून जात हे पाहून खूप दु:ख झाले. हिंदुंची सक्तीची धर्मांतरे खून .बलात्कार ,मंदिरे-राजवाडे यांची नासधूस याची दखल स्वत: गांधीजींनीच आपल्या भाषणात घेतली.(दि.१५-११-१९४६ अ.प्रे.हिंद या वार्ता संस्थेचे वृत्त.) गांधीजींना हिंदु-मुस्लीम एकता धोरणाचे धोरणाचे "हेचि काय फल मम तपाला" असे झाले असावे.

गांधीजींच्या खूनात सहभागी असलेले विष्णु करकरे हे सुद्धा ५ नोव्हेंबर १९४६ ला बंगालकडे रवाना झाले होते. नागपुरला त्यांना श्री.द.मा.देशमुख व श्री. चांदे येऊन मिळाले. मध्यप्रदेश चे त्यावेळचे गृहमंत्रींनी या हिंदुत्वनिष्ठांना नौखाली च्या हिंदूंसाठी मदत निधी दिला. करकरे रायपुर ला पोचताच चंद्राबाई नावाच्या तरुणीला शेरखां अब्दुल हुसेन नावाचा गुंड नेत असल्यचे लक्षात येताच त्यांनी तिची सुटका करवुन हिंदु पुढारी लाला गुरुदत्त मल्ल यांच्या कडे पोचवले तिची शुद्धी करवून ,तिच्या चरितार्थाची सोय करण्यात आली.

हिंदुसभेचे हे पथक कलकत्याला पोचले. हिंदुसभेने तेथे निर्वासित आश्रय केंद्र व हॉस्पिटल उघडले होते. करकरे यांनी पुढे वेगवेगळी मदत केंद्रे सुरु केली. कपडे व अन्न यांचे वाटप सुरु झाले. चांदपुर ला एक पत्रकार करकरे यांना भेटला तेथे त्याचे हिंदूंच्यावर झालेल्या अत्याचारांचे टिपण करकरेंना पहावयास मिळाले. चांदपुर हून करकरे व हिंदुसभेचे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या.

दौलतगंज,विपुला.सोनाइमुरी इ.हिंदु वस्ती च्या गावांना भेटी दिल्या असता एकही हिंदु तिथे शिल्लक राहिला नव्हता. तेथुन जवळच करकरे दलाल बाजार येथे रॉय या संपन्न कुटुंबाकडे गेले. त्यांची तिजोरी मुसलमानांना फोडता न आल्याने त्या गुंडांनी क्रेन आणून ती नेली व पेट्रोल ने वाडा जाळला होता. तेथून नंदिग्राम,हाजीगंज,श्रीपुर,बादलपुर अशा अनेक गावांना नथुराम गोडसे यांचे सहकारी करकरे यांनी भेटी दिल्या व मदत कार्य केले. नौखाली चे हिंदुसभा अध्यक्ष त्यावेळी राजेंद्रलाल राय हे होते. हिंदुंना मुसलमानांपासून वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी लढता लढता प्राणार्पण केले.

करकरेंनी या दौर्‍याचे वृत्त वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केले. या दौर्‍याचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. पुढे गांधी वधाच्या खटल्यात त्यांनाही शिक्षा झाली. हिंदुमहासभा निवडणुकात पराभूत झाल्याने त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही.त्यामुळे काही जणांना हिंदु पक्ष महात्मा गांधी व कॉंग्रेसविरुद्ध फक्त आरडाओरडा करत राहिले त्यांनी प्रत्यक्ष असे कार्य काहिच केले नाही असा समज करुन घेतात. शालेय इतिहासात तर हिंदुमहसभा-जनसंघ इ. नावेच नाहीत.इतिहास विजेत्यांचा पक्षपाती असला तरी त्यांना इतिहास सहजासहजी पुसता येत नाही. तो कुठे ना कुठे तरी अस्तित्वात असतोच.

आंतरजालावर हिंदुमहासभेच्या कार्याविषयक रिपोर्ट - श्वेतपत्रिका उपलब्ध आहे , सत्यशोधक मंडळींसाठी त्याचे अनुसंधान (लिंक) याप्रमाणे,

http://ia600208.us.archive.org/23/items/shortreportofhin00slsn/shortreportofhin00slsn.pdf

वाल्मिकी रामायणाचे आकलन

रामायण हा एक इतिहास आहे. तो काव्यात्मक इतिहास आहे. यात वेगवेगळी अनेक प्रकारची भर पडलेली असून ते इतिहास नसून केवळ त्याचे आपल्या राजकीय ,जातीय, मानसिक गुलामगिरी यांचे प्रदर्शन आहे. काहिच भाग हे नव्या वाटा शोधतात. आपल्या पूर्वजांनी हे जे इतिहास लिहिले त्याचे स्वरुप सांस्कृतिक इतिहासाचे असून घटनात्मक पद्धतीने लिहिलेले नाहित. सांस्कृतिक इतिहासाचे आधुनिक पद्धतीने परिक्षण करणे मूळातच चूक आहे. जीवशास्तरातले प्रश्न पदार्थविज्ञानाने सोडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे हे आहे.एखाद्या पुस्तकात अभावाचा मुद्दा आला की लगेच घटनात्मक चिकित्सा करणारे संशोधक ती गोष्ट त्याकाळि अस्तित्वातच नसल्याचा शोध लावतात.उदा. पाणीनीच्या व्याकरणात स्त्रियांच्या नाकातील दागिन्यांचा उल्लेख नसला तर त्याकाळी नाकात दागिने घालण्याची प्रथाच नव्हती असे विचित्र अनुमान हे लोक काढतात. त्यांची बुद्धी भारतीय संस्कृती हिन ठरवण्यासाठी इतकी व्याकुळ असते की मुळात पाणीनी चा हा ग्रंथ दागिने किंवा अलंकार या विषयावर नसून व्याकरणावर आहे याचाही त्यांना विसर पडतो.रुपक कथा उलगडताना त्याचे तारतम्य ठेवावे लागते.परंपरांचा विचार करावा लागतो.

..............

रामायण हा इतिहास आहे असे वाल्मिकी रामायणच सांगते.

"पूजयंश्च पठंश्चैनमितिहासं पुरातनम्‌" वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग १२८

महाभारत व अन्य साहित्य यात रामायणातील अनेक उल्लेख आले असून महाभारतात रामानंतरचा ३६ वा राजा मारला गेल्याचाही उल्लेख आहे.

ज्याप्रमाणे रामाच्याच वंशातील एका राजपुत्राचा राजकर्तव्याखातर राजाला त्याग करावा लागला तसाच रामाला केवळ सीतेचाच नव्हे तर लक्ष्मणाचाही त्याग करावा लागला. त्याची कथा अशा प्रकारची. एकदा कालपुरुष रामाशी चर्चेसाठी आला असता त्याने त्यास आपल्या एकांतात जर कोणी आला तर मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे सांगितले. रामाने लक्ष्मणालाच कोणी आत येऊ नये म्हणून राखण करायला सांगितले. थोड्याच वेळात संतापी ॠषी दुर्वास तेथे आले असता त्याम्णि मला आताच्या आता रामाला भेटायचे आहे व अवज्ञ केल्यास अयोध्या भस्मसात करेन असा धाक घातला. लक्ष्मणाने नाईलाजाने आत प्रवेश केला. राजधर्माप्रमाणे रामाने सीतेप्रमाणेच दंड म्हणून अमात्य व मंत्री मंडळाच्या सल्ल्याप्रमाणे लक्षमणाचा त्याग केला. रामावाचून लक्ष्मण म्हणजे त्याचा मृत्युच. लक्ष्मणाने शरयु त प्राणांचा अवरोध करुन जलसमाधी घेतली.

हि कथा येथे थोडक्यात देण्याचे कारण की सीता त्याग हा लिंगभेदाचा प्रश्न नसून राजधर्माचा विषय होता हे या लक्ष्मण त्यागाच्या प्रसंगावरुन स्पष्ट होत आहे. सीतेला ,एका स्त्रीला वेगळा न्याय व लक्ष्मणाला .एका पुरुषाला वेगळा न्याय असा प्रकार नव्हता.

पुढे इतर विषय हाताळण्याआधी एक स्पष्ट करावेसे वाटते. आर्य - अनार्य हि थेअरी टाकाऊ असून भारतात भेदनीती रुजवण्यासाठी हि घाणेरडी गोष्ट युरोपिअन संशोधकांनी माथी मारली आहे हे स्पष्ट केले पाहिजे.आर्य हा शब्द वंश या अर्थी भारतीय साहित्यात आलेला नाही. हे वैचारिक बलात्कार करुन युरोपिअन लोकांनी आपल्या राजकिय-आर्थिक आक्रमणासोबत सांस्कृतिक आक्रमकतेचे धोरण राबवले असून त्यात ते कमालीचे यशस्वी ठरले यात संशय नाही. साम्यवादी इतिहासकार किंवा अन्य विषिष्ट हेतुने केलेया इतिहासावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्याला संस्कृत येत नाही हे रड्सगाणे आळवण्यापेक्षा ते शिकावे किंवा निदान त्यांची अधिकारी अशा शास्त्री-पंडितांनी केलेली प्रामाणिक भाषांतरे तरी एकदा पहावीत. साम्यवादाचा अंतिम हेतु काय आकाशातून टपकला आहे का कि काय?

महाभारतात शांतीपर्व अध्याय ५९ मध्ये पुढिळ श्लोक आलेला आहे,

न वै राज्यं न राजाSसीत्त्‌ न दण्डो न च दाण्डिक: ।

धर्मेणैव प्रजा: सर्वा रक्षन्ति स्म परस्परम्‌ ॥ १४॥

भावार्थ: - "तेथे राज्य नाही,राजा नाही,दण्ड करणारी शासनयंत्रणा नाही व जिला दण्ड करायचा असा अपराधीही नाही.कर्तव्यासाठीच कर्यव्य या जाणीवेचा पूर्ण उदय होऊन लोक तेे परस्परांचे रक्षण करतात.

मार्कस च्या " Withering away of the State" हि कल्पना कृतयुगातील वरिल श्लोकातून केलेली उसनवारी आहे हे स्पष्ट च आजे. पण निवाळ जडवादाचा विचार करुन जाणीव व मन यांचे स्वातंत्र्य ल्कक्षात न घेता हि सर्व मांडणी झाल्याने ती आता केवळ एक कल्पनासृष्टी म्हणून राहिली आहे.

या कृतयुगातील या विकसित अवस्तेला उतरती कळा त्रेतायुगात लागून समाजात काही अपराधी बीजे उत्पन्न होतात व दण्डशक्तीची गरज उत्पन्न होते व सामाजिक जीवनाची पातळी त्रेतायुगात टिकून रहाते. भगवान श्रीराम हे या दंडशक्तीचे आदर्श प्रतिक. द्वापारयुगात हा राजदंडही अपकृष्ट रुप धारण करतो तेव्हा संस्कृतीलाही ती नष्ट करावी लागते. भगवान श्रीकृष्ण या द्वापारयुगाचे आदर्श होत. सार्वत्रिक अध:पतन होते, लोकांची मती भ्रष्ट होते ते हे कलियुग. कलियुगात मुख्य मंत्र असतो तो स्वत:च्या हक्कांचा , पण त्याचबरोबर कर्तव्यांची जाणीव सर्व समाजाला करुन देण्यात समाजधुरीण कमी पडतात. "हक्क" या एकाच शब्दाभोवती फेर धरुन समाज मने प्राचीन ग्रंथांची चिरफाड करतात , " कर्तव्य" या शब्दाची मातब्बरी संपते.

रामायण कालात राजसत्ता असली तर लोकेच्छा हिच प्रमाण

रामायणात राजसत्ता असली व राजा हा विशिष्ट वंण्शातून निवडला जात असला तरी लोकेच्छा हिच प्रमाण रामायण काळात होती ,निदान रामायणात तरी तसे उल्लेख आहेत. आपला राजा व राणी कोण हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला होता. स्वत: रामाच्या इक्ष्वाकु वंशातल्याच एका राजाला लोकेच्छेखातर त्याग करावा लागला होता. भारतीय शासनसंस्था कधिही अनियंत्रित नव्हती.

रामायण, अयोध्याकांड,सर्ग १ म्हणते,

" याप्रमाणे ज्याच्या पराक्रमाला तोड नाही अशा शीलचारित्र्य संपन्न समर्थ अशा रामाने आपला "राजा" व्हावे अशी प्रजेची इच्छा झाली. राम प्रजेला अत्यंत प्रिय आहे हे दशरथाने ओळखले.

रामायण, अयोध्याकंड सर्ग २ मधे दशरथाने रामयुवराज्याभिशेकाचा हा निर्णय लोकांवर सोपवला. या श्लोकात तो म्हणतो ," मी जे ठरवेले आहे ते विचारपूर्वकच अशी आपली खात्री असेल तरच मला संमती द्यावी किंवा मी दुसरे काय करावे ते सांगावे.जर मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला हिताची वाटत नसेल तर स्वहिताचा निर्णय प्रजेने स्वतंत्र पणे घ्यावा. "

यानंतर सभेत "राम ,राम " अशा घोषणा झाल्या यावर पुढील श्लोकात दशरथ विनोदाने पण गांभीर्याचा आव आणून म्हणतो,

"काय हो !मी धर्माने तुम्हा लोकांचे आजवर पालन पोषण केले असूनही तुम्ही माझ्या युवराज का करु पहाता?(माझ्याहून तो तुम्हाला अधिक प्रिय कसा?)

अराजकता प्रजेला कधीच मान्य नसल्याने राम-लक्ष्मण वनवासाला गेल्यावर व भरत ,शत्रुघ्न उपस्थित नसल्याने ताबडतोब वसिष्ठांच्या अध्यक्षतेखाली सभा भरुन अन्य योग्य पुरुषाची निवड करण्याची प्रक्रीया सुरु झाली,

इक्ष्वाकूणामिहाद्यैव कश्चिद्राजा विधीयताम्‌ ।

अराजकं हि नो राष्ट्रं विनाशं सम वाप्नुयात्‌ ॥८॥

आपले हे राष्ट्र अराजकामुळे विनाश पावु नये म्हणून इक्ष्वाकु कुळातीलच कोणाला तरी त्वरीत राजा करावे"

निष्कलंक सीता दहा महिने रावणाच्या कैदेत राहिल्यावर राणी म्हणून सिंहासनावर असावी का नाही याची कुजबुज नसून खूप मोठी चर्चा अयोध्येत सुरु झाली. कोण कोणाची बायको असावी एवढ्यापुरता हा प्रश्न मर्यादित राहिला नसून आपली राणी म्हणून कोण असावे हा प्रश्न होता.

युरोपिअन संशोधकांचे हेतु

भारतीय संस्कृती हिन दर्जाची ठरवणे , जे चांगले असेल ते त्यांनी आपल्याकडून घेतले व हिण असेल ते मात्र स्वत: भारतीयांचेच असा नीच हेतु मनात ठेवूनच बहुतांशी युरोपिअनांचे लेखन झाले आहे. त्यांचे हेतु त्यांनी लपवले सुद्धा नाहीत. मॅक्स मुल्लरनेच Chips from a German Workshop" याच्या प्रस्तावनेत आपल्या संशोधनाच्या हेतुंची कबुली दिली आहे.

http://www.gutenberg.org/files/24686/24686-0.txt

भारतवर्ष आध्यात्मिक दृष्ट्या हिन दर्जाचे व रानटी अवस्थेतील आहे असा प्रचार सुरु झाला. पराभूतांचा इतिहास कोणत्या हेतुने प्रेरित असतो त्याचे हे उदाहरण आहे. पण आपल्या थोर थोर विचारवंतांना भारतीय इतिहासात्च आर्य -अनार्य असा खोटा संघर्ष दाखवून त्यातील विजेते व पराभूत अशी विबागणी करुन इतिहास लिहऊन भेदाची मुळे अजून खोलवर नेण्याची भ्रष्ट बुद्धी होते.

जस्टीस वुड्राफने एका ठिकाणी केलेल वर्णन असे,

"It is obvious that it can be established that India, on this and over account, is not civilized but barbarous, that is an argument against her capacity for political autonomy. It is necessary, in particular, to deny the alleged Spiritual Character of Indian Civilization. It would never do to admit this, for spirituality is honoureद of all men, and where it exists, there are other excellences."

डॉ.मॅक्डोनल्ड सारख्यां अभ्यासकांनी हिंदुस्थानच्या सांस्कृतिक साहित्यात स्वच्छ पणे असा नियम बनवला,

"The sole aim here being the attainment of Truth, it is a positive advantage that the translators of ancient sacred books should be outsiders rather than the native custodians of such Writings. The latter could escape their religious bias and orthodox Brahmins could not possibly do so."

एकदा हा नियम केला की भारतीय संस्कृती बद्दल हवे ते तारे तोडावयास वाट मोकळी. परंपरा लक्षात न घेता "पतिमेकादशं कृधि" या वेदवाक्यातील अडाणी भारतीयाला मर्म लक्षात येईल ते थोर्थोर युरोपिअनाण्मा कळणे दुरापास्त होऊन "Make her husband the eleventh man" अशी दिव्य भाषांतरे जन्माला आली. वर अहंकार असा की एक संशोधक लिहितो, We do not believe Sayana understood the expressions of th Veda better than any European interpreter but we think the Veda far better and more correctly than Sayana."

पुढे पुढे हा अहंकार लोप पावून या संशोधकांना वेळोवेळी लिहावे लागले ते असे ," This stanza is difficult , I do not thoroughly understand understand it, This stanza is very obscure, I find this stanza hopelessly obscure, and I do not attempt to translate it"

यांचे सर्व संशोधन भारतीयांचा तेजोभंग व युरोपिअन सत्ता राखणे, भारतीयांना आत्मभान विसरुन आपापसात लढवणे हाच असल्याने अशा संशोधनाला मानाचे स्थान मिळाले.

रामायणाला लभलेला पहिक्ला संशोधक वेबर ,याने तर सारे रामायणच परकिय साहित्यातून उसनवारी केलेल ठरवले. या वैचारिक बलात्कारातून जन्मलेल्या पिढ्या अजून त्यांचेच कौतुक करत आहेत. स्वतंत्र बुद्धीने संशिधन करण्याची इच्छा नाही. पाय दुखतात म्हणून ज्या प्राचीन मौलिक संपत्तीवर आपण उभे आहोत ते पायच तोडून लुळेपांगळे होऊन युरोपिअनांच्या कुबड्या वापरण्यात धन्यता मानत आहेत. भारतीय सांस्कृतिक इतिहासाच्या संशोधनशास्त्राचीच या लोकांची पद्धतच मुळात चुकीची आहे. १. अभावाचा पुरावा मानणे २ .अर्धवट शब्दसाम्य वा साम्यस्थळावरुन स्थलकाल निर्णय करणे, ३. भाषाशास्त्राला कालनिर्णयाच्या दृष्टीने दिलेले फाजील महत्व, प्रक्षेपाचे नियम , विसंगती व रुपक यातून इतिहासाची फाजील मोडतोड केली गेली आहे.

फॅसिझम,साम्यवाद ,लोकशाही व रामराज्य

लोकेच्छा हि रामायणात मुख्य अंगे होते हे मागे लिहिलेच आहे. अर्थात हि लोकेच्छा राज्यसंस्थेपर्यंत पोचवण्यासाठी रामायण कालिन यंत्रणा कशी होती हे पहावे लागेल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ स्वीकारले ती रामायणातील कल्पना आहे. राजा दशरथालाही आठ अमात्य होते. त्यांचे वर्णन रामायण ,बालकांड, सर्ग ७ श्लोक १ ते १९

राजाचे हित पहाणारे, राजाचे अंतरंग ओळखणारे, राज्यकार्यात निमग्न, अति पवित्र , विद्वत्ता , विनयशील इ. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे गुणवर्णन ,त्यांच्या निवडीसाठी राजाने लावलेले निकष इ. चा उहापोस या श्लोकांत आहे.सैन्य व धन यांनी युक्त असे राज्यशकट या अमात्यांनी तयार केले.

मात्र राजा व अमात्यसंस्था एवढेच शासनयंत्रणेचे स्वरुप नसून अजून एक यंत्रणा अस्तित्वात होती ती म्हणजे मंत्रीसंस्था. हि तिसरी संस्था अशासाठी होती की राजा व अमात्य चांगले असले तर जनहित उत्तम साधले जाते. पण हि यंत्रणा स्वार्थी व संकुचित निघाली तर जनहिताचे काय?

फॅसिझम असे सांगते की आम्ही संपत्तीची व्यक्तीगत मालकी मान्य करु पण प्राप्त परिस्थितीत त्याचा वापर कोणी ,किती व कसा करायचा हे ठरवण्याचे अधिकार राजसत्तेकडे घेऊ व सामाजि८क अन्यायाच्या व संघर्षाच्या सर्व बाबी त्वरित निकालात काढू. मुसोलिनीने हे तंत्र प्रत्यक्षात आणले व त्याने सुव्यवस्था निर्माण झाली असे ब्रिटिश अर्थतज्ञांचेच मत आहे. मात्र यातही राज्यसंस्था अनियंत्रित राहीली.सत्ता व सैन्य या ताकदीचे केंद्रिकरण झाले व घात झाला. साम्यवादाला सुद्धा बेलगाम यंत्रणेला पायबंद घालण्याचा उपाय सापडला नाही. यावे मुख्य कारण सामुयवाद हा जडवादी असून जाणीव व मन हि जडापेक्षा (Matter) भिन्न वस्तुच नाही असे साम्यवादाने मानले व तो कोसळला. लोकशाहीत भ्रष्ट यंत्रणा दर ५ वर्षांनी बदलली व सत्तेचे विकेंद्रिकरण झाले तरी ते कोडगे होऊन शोषण करीतच रहातात.

रामायणाने यावर तोडगा असा काढला. तो असा,

लोकपाल विधयक व रामायण

अमात्य संस्था हि शेवटी राजाची नोकर असल्याने उदरनिर्वाहासाठी राजावर अवलंबुन असते. सर्वकाळ राजावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही व राजाची निरंकुश सत्ता स्थापन होते राजा जर अविचारी व विकारी स्वार्थी निघाला तर प्रजेचे मरण ठरलेले. तेव्हा केवळ वैराग्य व त्याग याच बाबत संपत्तीने श्रीमंत असलेले व ज्ञानमय जीवन जगणारे ,त्याचबरोबर राजाचे मिंधे नसून उपजिविकेचे स्वतंत्र साधन असलेले लोक त्यांची सत्ता राजावर नेमण्यात आली होती. हे ८ मंत्री वसिष्ठ वामदेव हे २ ॠषी व त्याव्यतिरिक्त सुयज्ञ, जाबाली,काश्यप, गौतम ,मार्कंडेय व कात्यायन अशा अन्य ६ जणाम्ची नावे महर्षी वाल्मिकि देतात. थोडक्यात ८ मंत्रीसंस्था व ८ अमात्य यांच्यामध्ये राजाचे स्थान असे. हे मंत्री राजाच्या इच्छेविरुद्धही निर्णय सुचवत असत. विश्वामित्र दशरथाची मदत मागायला आला तेव्हा पुत्रप्रेमाने व्याकुळ दशरथ आधी उतावीळ पणे वचने देऊन बसला तो माघार घेऊ लागला असता वसिष्ठांनी त्यास निर्भय सल्ला दिला. रामायण,बलकांड सर्ग ७

...........

(अवांतर:सध्या गाजत असलेल्या लोकपाल विधेयकाचे येथे सहजच आठवण येते. पंतप्रधानांनाही या कक्षेत आणुन अंकुश ठेवण्याची मागणी आहे. हि यंत्रणा जर बलवान होऊ शकली तर काही अंशी शासनयंत्रणेला अंकुश बसू शकतो. अर्थात केवळ निस्वार्थी व भ्रष्ट यंत्रणेचा भाग नसून पुरणार नाही तर हे लोकपाल विद्वान व निर्भय असावे लागतील.)

आधी लिहिल्याप्रमाणे कर्तव्यासाठी कर्तव्य हि रामराज्यात असली पाहिजे. सधय केवळ हक्क मागितले जातात. रामराज्यात परत कर्तव्यांना महत्व येईल. साम्यवाद कामगारांना हक्क शिकवतो, कामगार वर्गच सत्ताधारी होतो कर्तव्यांचे भान रहात नाही. भांडवलषाहीत केवळ स्वार्थ व नफा एवढीच उद्दिष्टे राहतात सामाजिक जाणीवा अस्तित्वात रहात नाहीत.

अलिकडे जे जे प्राचीन संस्कृतीत आदर्श सांगितले त्यांचे विकृतीकरण व खलप्रवृत्तींचे ग्लोरिफिकेशन करण्याची साठ दिवसेंदिवस वाढतच वालली आहे. त्याच प्रमाणे रावणाविषयीही त्याची प्रतिमा वाजवीपेक्षा जास्त तेच्जाळण्याचा प्रयत्न होतो.

रावण भक्तांच्या भूमिकेचे स्वरुप साधारण असे,

१.रावण हा विद्वान असून गोदावरीच्या तीरापर्यंत र्त्याचे राज्य पसरले होते.

२.सीताहरण करण्याचा प्रसंग सोडला तर पूर्वायुष्यात रावणाने कधीही कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवले किंवा बलत्कारिले असा उल्लेख रामायणात नाही.

३.रामाचे दंडकारण्यातील आगमन हे आक्रमण होते.

४.प्रथम आगळीक शूर्पणखेचे नाक कान कापून रामनेच केली.रावणाच्या राजघराण्याचा अपमान रामाने केला. व या कृत्याचा सूड घ्यायचा म्हणूनच केवळ रावणाने सीतेला पळवले.

रावणाचे वाल्मिकी रामायणात आलेले सत्य स्वरुप

रावण हा वडिल ब्राह्मण व आई राक्षस कुळातील असा आहे. बिभिषण सोडून अन्य मुलांनी आईच्या संस्कृतीचा स्वीकार केला होता.रावण अत्यंत शूर व प्रभावी व्यक्तीमत्वाचा होता. स्वत: राम च म्हणतो " हा राक्षस अधर्म व अनृत (असत्य) यांनी युक्त असला तरीतेजस्वी व बलवान आहे. याचा पराभव अद्याप कोणीही करु शकले नाही. वा.रा. युद्धकांड सर्ग १११बिभिषण म्हणतो," याने याचकांना दाने दिली.सर्व राजभोग घेतले. युद्धकांड सर्ग १०९

मात्र असे असूनही तो आपल्या क्रुर व अधर्माने युक्त होता.त्याने त्याचे सर्व गुण झाकून टाकले गेले. मुळात हे राज्य त्याचे वडील पौलस्त्य ॠषींनी त्याचा सावत्र भाऊ कुबेर यास दिले असता रावणाने बलाने ते हिरावून घेतले होते.

रावणाचा कामुकपणा व स्त्रियांवरील अत्याचार

१. कुशध्वज नावाच्या ॠषीची वेदवती नावाची लावण्यवती कन्या हिमालयाच्या अरण्यात तप:श्चर्या करित बसलेली रावणाच्या दृष्टीस पडली असता रावणाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. वेदवतीने तळतळाटाने अग्नीत प्रवेश करुन आपला जीव दिला व रावणाला शाप दिले.

रामायण उत्तरकांड सर्ग १७- "या प्रमाणे वेदवतीने त्यास स्वत:चे म्हणणे समजाउन सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग न होता त्या दुष्टाने त्या मुलीचे केस धरुन तिला ओढले. ती संतापून त्यास म्हणाली हे दुष्टा याप्रमाणे तू माझे घर्षण केल्यावर आता माझी जगणुयाची इच्छा नाही.

२.देवभूमिवर चाललेला असता त्याच्या नजरेस रंभा नावाची अप्सरा पडली. त्याबरोबर तिच्यावर बलात्काराच्या इच्छेने तो मागे लागला.

"रावणाचे म्हणणे ऐकुन रंभा रडत रडत त्याला म्हणाली कि या पद्धतीने ऊ माझ्याशी बोलु नकोस. तू माझा गुरुसमान आहेस. व धर्माने तुझी सून आहे. कारण कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी माझा संकेत ठरला आहे म्हणून मी येथे आले आहे. पण रावणाने तिचे काही न ऐकता तिला तेथील शिलाखंडावर ओढूण तिच्यावर बलात्कार केला- रामायण,उत्तर्कांड ,सर्ग २६

३.विवाहित स्त्रियांना पळवणे हास रावणाच्या आवडीचा खेळ होता.

"पुरी भोगवती गत्वा पराजित्य च वासुकिम्‌

तक्षकस्य प्रियां भार्या पराजित्य जहार य:"

भोगावती नगरीत जाऊन त्याने वासुकीचा पराभव केला व तक्षकाच्या प्रिय अशा धर्मपत्नीचे अपहरण केले.

४.सीतेशी बोलताना रावण म्हणतो,

स्वधर्मो राक्षसां भीरु सर्वदैव न संशय:

गमनं वा परस्त्रीणां हरणं संप्रमथ्य वा"

-रामायण ,सुंदरकांड, सर्ग २०

" हे भीरु, परस्त्रियंना त्यांच्या संमतीने भ्रष्ट करणे अथवा त्यांच्या बंधुजनांना ठार मारुन त्यांचे अपहरण करणे हा राक्षसांचा धर्म आहे."

रावणाने पकडून नेलेल्या स्त्रियांच्या तांड्याचे वर्णन वाल्मिकिंनी अत्यंत दारुण वर्णन केले असून २० श्लोकात ते दिले आहे. - रामायण ,उत्तरकांड,सर्ग २४

विलाप करताना या सर्व स्त्रिया रावणाला शिव्याशाप देत होत्या. तो मरेल तो सुदिन असे म्हणत होत्या. परस्त्रियाच काय पण स्वकुलातील स्त्रियांनाही तो एक मोठे संकट होता असे वाल्मिकी रामायण सांगते.

शूर्पणखा अन्यायग्रस्त अबला?

स्वत: शुर्पणखेने रावणाला आपल्यावरचा अन्याय सांगण्याऐवजी सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करुन त्याची कामुकता चाळवली.

रामायण अरण्यकांड सर्ग ३४ मधील १८ ते २३ या श्लोकात ती म्हणते त्याचे भाषांतर,

" मी देव ,गंधर्व,यक्ष्ग अथवा किन्नर यापैकी कोठेही सीतेसारखे अपूर्व लावण्य पाहिले नाही. सीता ज्याची पत्नी होईल व आनंदाने ज्याला आलिंगन देईल त्याचे जीवन इंद्रापेक्षाही अधिक भाग्याचे होईल. त्या सुंदरीला तूच योग्य पति आहेस असे माझे मत आहे. तुझ्यासाठी मी तिला पळवून आणावयास गेले असता क्रुर लक्ष्मणाने ,मला विरुप केले. सीतेचे सौंदर्य पाहिले की मदनाच्या बाणांनी तू घायाळ होशील. सीता तुला हवी असेल तर या कार्यात यश मिळावे म्हणून तू र्ताव्बडतोब आपले उजवे पाऊल उचल"

जी स्त्री आपला अपमान हि प्रेरक शक्ती न मानता सीतेचे लावण्य वर्णुन सांगते व स्वत:च्या तोंडाने कोणते सत्कर्म करण्यासाठी आपण रामच्या झोपडीत गेलो ते सांगते आहे तिचा आदर्श आजच्या स्त्रिया कसा ठेवू शकतात? बंधुच्या कामतृप्तीसाठी एखाद्या स्त्रीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या शूर्पणखेला शिक्षा करण्यात रामाने वा लक्ष्मणाने असे कोणते अपकृत्य केले?

मग रावणाने सीतेवर अत्याचार का केला नाही?

रावण जर असा होता तर त्याने सीतेला सर्व प्रकारांनी वळवत बसण्याचा प्रयत्न का केला? कधी गोड बोलून कधी धाक दाखवून ,कधी रामाचे धडावेगळे केलेले मायावी मस्तक दाखवून तिची आळवणी का करत बसला?

याचे उत्तर वाल्मिकी रामायणात आलेले आहे. रावणाल एकूण तीन वेळा शाप मिळाला होत. एका ठिआकाणी तर रावण स्वत:च आपल्याला का शाप मिळाला ते सांगतो- रामायण ,युद्धकांड,सर्ग १३

थोडक्यात भावार्थ-

"पूर्वी ब्रह्मदेवाकडे जात असताना पुंजिकास्थला नावाच्या अप्सरेवर मी बलात्कार केला. त्या वेळी ब्रह्मदेव्वाने मला असा शाप दिला कि मी जत या प्रकारचा अत्याचार केला तर माझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील.त्या शापाच्या भयाने मी सीतेवर बलात्कार करित नाही.

दुसर्‍या शापाचे वर्णन वाल्मिकी रामायण ,उत्तररकाण्ड ,सर्ग २६ मध्ये आहे ते नलकुबेराने रंभेवर अत्याचार केल्याने दिलेल्या शापाचे.

तिसरा शाप त्याने बलात्कारलेल्या सर्व स्त्रियांचा मिळून असा होता,

"तस्माद्वै स्त्रीकृतेनैव वधं प्राप्स्यपि दुर्मति:

सतीभिर्वरनारीभिरेवं वाक्येbhyudirite || 21 || - वा. रामायण ,उत्तरकांड, सर्ग २४

अर्थ:- ज्याअर्थी हा साध्वींवर बलात्कार करतो त्याअर्थी स्त्रीमुळेच त्याचा नाश होईल."

शाप इ. गोष्टी बाजूला ठेवल्या तरी यामागे अन्य राजकिय कारणे होतीच. एकतर रावणाचे सर्व सामंत हि आपत्तीऊ रावणाने ओढावून घेतल्याने रुष्ट होते. अगदी कुंभकर्णानेही त्याला याबाबत दोष दिला आहे. बिभिषणाला तर त्याचे हे कृत्य अजिबातच आवडले नसून तो त्याचा पक्ष सोडून गेला होता. महाभारतात ज्याप्रमाणे (महाभारताची मूळ प्रत भांडारकर संस्थेने संपादित केली आहे तीच प्रत महाभारताचा अभ्यास करताना सध्या प्रमाण मानावी ) दुर्योधनाचे कृत्य पसंत नसूनही त्याला द्रोण-भीशःम यांनी नाईलाजाने साथ दिली तोच प्रकार रामायणातही थोडा-फार फरक सोडता होता. सीतेवर अत्याचार करु न धजण्याचे हे एक महत्वाचे कारण होते.

समजा रामाचे आक्रमण होते पण त्यामागे हेतु कोणता?

विस्तारवाद हाच जर हेतु असता तर रामाने आपल्या राज्याला लंकेचे राज्य जोडून घेतले का? वानरांचे राज्य जोडून घेतले का? धर्मात्न्मा असे म्हणून बिभिषणाला त्याने राज्याभिशेक केला. जननी जन्मभूमिश्च सर्गाद अपि गरियसी " हा श्लोक तर प्रसिद्धच आहे. जन्मभूमि समोर स्वर्ग ही तुच्छ असता सोन्याची लंका काय कामाची? असे राम बिभिषणाला म्हणतो ( प्रासाद इथे भव्य परी,मज भारी आईची झोपडी प्यारी हि सावरकरांची कल्पना यातलीच असावी)

अन्यायाचा शेवट हाच रामाच्या कार्याचा हेतु होता. रावणी वृत्तीचे लोक हे नरमांसभक्षक असून त्याचे अनेक उल्लेख वाल्मिकी रामायणात आले आहेत. रावणाचे राज्य गोदवरी पर्यंत पसरलेले नसून चंपा सरोवर म्हणजे सुग्रीवाच्या राज्यापर्यंत पसरले होते.तिथे कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेले तपस्वी आपली नित्यकर्मे करीत त्यांच्यावर अत्याचार करणे ,त्यांना मारुन खाणे हि मानवी संस्कृतीला घातक असे रावणाचे अन्यायी राज्य संपवणे हा हेतु होता.

रावण स्वत:ही नरमांसभक्षक होता. सीतेला वळवून घेण्यासाठी धमकी देताना माझे ऐकले नाहिस तर तुझे मांस न्याहारी म्हणून उद्या माझ्यासमोर असेल असा श्लोक स्पष्ट पणे आला आहे. - वा. रामायण ,सुंदरकांड, सर्ग २२

दंडकारण्य हे नरमांसाचे चराउ कुरण म्हणून रावण प्रवृत्तीचे लोक वापरत होते.

स्वत: रामानेच सीतेजवळ या परिस्थितीचे असे वर्णन केले आहे,

ते चार्ता दण्डकारण्ये मुनय: संशितव्रता:

वसंत: कालकालेषु नवे मूलफलाशना:।

न लभंते सुखं भीरु राक्षसै: क्रूरकर्मभि" ॥५॥

भक्ष्यन्ते राक्षसैर्भीमैर्नरमांसोपजीविभि: ।

ते भक्श्यमाणा मुनयो दण्डकारण्यवासिन: ॥६॥

-रामायण ,अरण्यकांड,सर्ग १०

" हे सीते ,हे दण्डकारण्यातले व्रतधारी मुनि अत्यंत दीन झालेले आहेत. ते बिचारे समयानुरुप उत्पन्न होणार्‍या कंदमूलफलावर उपजिविका करणारे आहेत व आपल्या व्रतनियमात दंग राहून ते कोणाच्या भानगडीत पडत नाहीत. तरिही क्रुरकर्मे नरमांसभक्षक भयानक राक्षस त्यांना खाऊन फस्त करित असतात. कारण नरमांस हे तर राक्षसांच्या उपजिविकेचे साधनच होय.मानवजातीचा केवढा भयानक संहार या दुष्ट सवयींच्या लोकांनी चालवला असेल"

सीतात्याग

एका परीटाच्या म्हणण्यावरुन हे घडले असा चुकीचा समज होण्याचे कारण पद्मपुराणातील पातालखंडातील उल्लेख हा आहे. रामायणात हि कथा नसून तिथली आहे. रामायणात स्पष्टपणे पौरा: कथन्ति शुभाशुभं" , पौरापवाद: सुमहान्‌" असे स्पष्ट उल्लेख आहेत. (पौर म्हणजे लोक,प्रजा) कवी अथवा पुराणिकांनी स्वार्थाने किंवा इतिहासातील तत्कालिन समजुतींप्रमाणे विसंगती येत असेल तर ती दूर व्हावी या चांगल्या हेतुने पण स्वत:चुया बुद्धीने जी भर पडत गेली.

सारांश रामाने सीतात्यागाचे केलेले कृत्य बरोबर का चुक ते पहाण्यापूर्वी लोकेच्छा हिच रामायणात अंतिम होती हे सिद्ध होते.

रामाचे सीतेवर आत्यंतिक प्रेम होते हे रामायणावरुनच निर्विवाद सिद्ध होते. त्याने केलेले तिचे अनुरंजन,त्यांचे दांपत्यजीवन , तिचे हट्ट पुरवणे व तिच्यासाठी केलेला विलाप दोन्हीची वर्णने मूळ रामायणात आलेली आहेत. सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेल्या रामाचे वर्णन मारुतीने सीतेजवळ केलेल आहे.

सीत्यात्यागानंतर रामाने अन्य विवाह न करता तिची प्रतिमा घेऊन धर्मकृत्ये केली असून स्वत:ही सर्व सुखंचा त्याग करुन व्रतस्थ जीवन जगले. स्वत:च्या खुषीसाठी,स्वार्थासाठी अथवा वैयक्तिक कारणांनी केलेला हा त्याग नव्हता हे उघड आहे. जे कर्म स्वार्थाचा लवलेख ही नसता केले जाते ते अर्थातच दोषमुक्त ठरते. सीता त्याग करुन रामांनीही स्वत्चे उभे आयुष्य जाळून घेतले आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे त्या युगात "हक्क" पेक्षा "कर्तव्य" मोठे होते. कोणतीही नीतीमूल्ये हि सार्वकालिक नसून परिवर्तनीय असतात. आजच्या राजसत्ते कडून आपण ज्या अप०एक्षा करतो त्या जर योग्य असतील तर रामाचे वर्तनही योग्य ठरेल. राज्यकर्त्यांची (राजा व महाराणी) संशयातीतता शुद्ध असावी अशी जर तत्कालिन प्रजेची इच्छा असेल तर तामाचे ते वर्तन योग्यच ठरते. जर ते अयोग्य असेल तर आजच्या राज्यकर्त्यांकडूनही आपण अशा अपेक्षा करणे अयोग्य ठरेल. तेव्हा जे घडले तो अन्याय असेल तर तो केवळ सीतेवर नसून रामावर झालेला अन्यायही होता असे म्हणणे संयुक्तिक ठरेल ... जर आजची पत्नी हक्क लोकेच्छेपेक्षा अधिक प्रमाण मानायचा असेल तर ! आधीच म्हटल्याप्रमाणे रामाच्याचच वंशातील एका "पुरुषाचाही" त्याग केला गेला होताच.

ज्याप्रमाणे रामाच्याच वंशातील एका राजपुत्राचा राजकर्तव्याखातर राजाला त्याग करावा लागला तसाच रामाला केवळ सीतेचाच नव्हे तर लक्ष्मणाचाही त्याग करावा लागला. त्याची कथा अशा प्रकारची. एकदा कालपुरुष रामाशी चर्चेसाठी आला असता त्याने त्यास आपल्या एकांतात जर कोणी आला तर मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे सांगितले. रामाने लक्ष्मणालाच कोणी आत येऊ नये म्हणून राखण करायला सांगितले. थोड्याच वेळात संतापी ॠषी दुर्वास तेथे आले असता त्याम्णि मला आताच्या आता रामाला भेटायचे आहे व अवज्ञ केल्यास अयोध्या भस्मसात करेन असा धाक घातला. लक्ष्मणाने नाईलाजाने आत प्रवेश केला. राजधर्माप्रमाणे रामाने सीतेप्रमाणेच दंड म्हणून अमात्य व मंत्री मंडळाच्या सल्ल्याप्रमाणे लक्षमणाचा त्याग केला. रामावाचून लक्ष्मण म्हणजे त्याचा मृत्युच. लक्ष्मणाने त्यान्ट्र शरयु त प्राणांचा अवरोध करुन जलसमाधी घेतली.

हि कथा येथे थोडक्यात देण्याचे कारण की सीता त्याग हा लिंगभेदाचा प्रश्न नसून राजधर्माचा विषय होता हे या लक्ष्मण त्यागाच्या प्रसंगावरुन स्पष्ट होत आहे. सीतेला ,एका स्त्रीला वेगळा न्याय व लक्ष्मणाला .एका पुरुषाला वेगळा न्याय असा प्रकार नव्हता.

सीतात्यागासंबंधी स्वत: सीतेची भूमिका

राम-सीता यांच्यातील परस्पर स्नेह व प्रेम अत्यंत दाट असून त्यांना त्यांच्या एकमेकांची चांगलीच परिक्षा होती.

रामाला स्वत:ला आपल्या चारित्र्याविषयी संशय नाही हे तिला पूर्ण माहित होते. या बाबत रामाने राजधर्माचेच पाल्कन करावे असे तिउला वाटत होते. त्यासंबंधी रामायणात आलेले श्लोक असे,

मामिकेयं तनुर्नूनं सृष्टा दुःखाय लक्ष्मण |

धात्रा यस्यास्तथा मेऽद्य दुःखमूर्तिः प्रदृश्यते || ३||

वक्तव्यश्चैव नृपतिर्धर्मेण सुसमाहित:

यथा भ्रातृषु वर्तेथास्तथा पौरेषु नित्यदा

परमो ह्येष धर्मस्ते तस्मात्किर्तिरनुत्तमा १५

अहं तु म्नानुशोचामि स्वशरीरं नरर्षभ १६

"लक्ष्मणा, माझे हे शरिर केवळ दु:ख भोगण्यासाठिच परमेश्वराने उत्पन्न केले आहे असे दिसते. इतकी दु:खी स्त्री जगात कोणी असेल काय? राजाला तू सांग की तू आपल्या धर्माप्रमाणे वाग व जसे बंधूंशी तसेच प्रजाजनांशी वाग. हाच तुझा खरा धर्म आहे व यानेच जगात तुझी कीर्ती होईल. माझ्या स्वत:च्या शरीराची मी पर्वा करीत नाही."

शेवटी स्वत: मशर्षी वाल्मिकी रामाला सीतेचा स्वीकार कर अस सांगतात तेव्हा राम म्हणतो,

सेयं लोकभयाद्‌ब्रह्मन्नपापेत्यभिजनता ।

परित्यक्ता मया सीता तद्‌भवान्‌ क्षन्तुमर्हति

"ती निष्पाप आहे हे माहित असूनही केवळ लोकापवादाच्या भीतीनेच मी तिचा परित्याग केला आहे, आपण मला क्षमा करावी. मी तिचा स्वीकार अवश्य करेन ,पण लोकांच्या अंत:करणातील भाव शुद्ध होण्यासाठी सीतेने सर्व लोकांसमक्ष दिव्य करावे."

या प्रसंगाचे अत्यंत कारुण्यपूर्ण वर्णन वाल्मिकींनी केले आहे.

प्रसंगाच्या शेवटी सीता जमिनीत गेल्यावर पश्चाताप दग्ध पौरजन त्या भूमिला अश्रुंचे सिंचन करु लागले असे वर्णन आहे.

(अपूर्ण)

भारतातील तुर्की सत्तांतर :- खिलजी ते तुघलक मार्गे(व्हाया) फसलेली भारतीय राज्यक्रांती

इ.स.१३२० मध्ये दिल्लीचे खिलजी घराणे जाऊन तुघलक घराणे आले. या सत्तांतराच्या दरम्यान भारतीयांच्या एका गटाने परकिय आक्रमक राष्ट्राविरुद्ध केलेल्या फसलेल्या क्रांतीची घटना समाविष्ट असून फार थोडया लोकांना या इतिहासाची माहिती असते. तुगलक घराण्याचा वेडा महंमद बहुतेकांना माहिती असतो. गिरिश कर्नाड यांचे "तुघलक" हे एक प्रख्यात नाटकही आहे. "अल्लाउद्दीन खिलजी व महाराणी पद्मिनी " यातून उभ्या राहिलेल्या संघर्षाची कथा,नाटक,सिनेमा रुपी कलात्मक माहिती येऊन गेली आहे. मराठीत याच काळावर अल्लाउद्दीन खिलजी च्या दरबारातील अमीर खुस्रो व दक्षिणी गायक कलाकार गोपाळ नायक यांच्यातील गायन जुगलबंदीची मध्यवर्ति कथा कल्पून "देवगिरी बिलावल " या नावे एक कादंबरीही २०-२५ वर्षांपूर्वी वाचलेली आठवते.गोपाळ नायक या महान भारतीय गायकाने अमीर खुस्रो याला यशस्वी टक्कर दिली. अमीर खुस्रो ने गोपाळ नायकांना हरवण्याचा प्रयत्न केला पण श्रुती, ग्राम,मुर्धना ,जाति मुर्धना इ. शास्त्रीय संगीताची वैषिष्ट्ये कशाशी खातात हे त्याला शेवटपर्यंत कळले नाही.तरिही अमीत्र खुस्रोच्या नंतरच्या इराणी संगीतज्ञाने काही राग खुशाल अमीर खुस्रोच्या नावावर दडपुन दिले आहेत.

मात्र या सत्तांतराच्या काळात गुजरात च्या भारवाड या एका लढाऊ जमातीने दिल्लीचे तख्त परत ताब्यात घेतले होते व तब्बल सहा महिने भारतीय राज्याची पुनर्स्थापना केली होती या रोमहर्षक इतिहासावर फारसा कोणी प्रकाश टाकलेला नाही. केवळ स्वा.सावरकरांनी एक स्वतंत्र प्रकरणच या विषयावर लिहिलेले आहे. मात्र "सहा सोनेरी पाने " हे इतिहासलेखन किंवा नाट्य-काव्यशास्त्र विनोद याची कलाकृती नसून इतिहास समिक्षा असल्याने त्यात बरेच तपशील आलेले नाहीत.(सहा सोनेरी पाने चे इंग्लिश भाषांतर करणारे कै.श्री.श्री.त्र्यं.गोडबोले यांचे एक अप्रकाशित नाटकही याच विषयावर आहे ते "प्रज्वलंत" मासिकातून प्रसिद्ध झाल्याचे आठवते )गुजराथीत " करण घेलो" या नावाची याच काळावर एक कादंबरी आहे. मी कॉलेजमध्ये असताना यावरच एक ऐतिहासिक कादंबरी लिहिण्याचा अव्यापारेषु व्यापार केला होता.

परंतु एकंदरीत एका बाटवल्या गेलेल्या अत्याचारीत भारतीयाने गुलामीतून बाहेर पडून तब्बल सहा महिने परत स्वतंत्र भारतीय सिंहासन स्थापित केले होते या रोमहर्षक कथानकाची भुरळ अन्य कोणत्या इतिहासकार,नाटककार,कथा-कादंबरीकार यांना पडू नये याचे आश्चर्य वाटते. अर्थात यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाहिही ! कारण बहुतेक आक्रमक धर्मांध तवारिखकारांनी या भारतीय वीरांची अत्यंत तीव्र शब्दात निर्भत्सना करुन शिव्या शापांची लाखोली वाहिली असल्याने परकियांच्या ओंजळीने पाणी पिणार्‍या , अस्मिता गमावलेल्या भारतीय इतिहासकारांनी व कथा-कादंबरीकारांनी त्यांचीच रि ओढली आहे. याला काही अपवाद असले तरी ते स्वत:च्याच निष्कर्षांना भीत भित त्यांनी लेखन केलेले असे आहे.

मात्र अमीर खुस्रो चे "देवलदी-खिज्रखॉं", "नुह-सिपेहर"," तुगलकनामा " या तवारिखा, झियाउद्दीन बरनी चे तारीख-ए-फिर्रोजशाही, इब्न बतुता व फेरिश्ता यांची अरबी-पर्शियन भाषेतील प्रवासवर्णने यातून जे लिहून ठेवले आहे त्यातून योग्य तो अर्थ काढत मूळ संदर्भ देत हा इतिहास मांडायचा हा एक प्रयत्न !( Elliot & Dowson : History of India VIII volumes)

पार्श्वभूमि

खिलजी सुलतान दिल्लीवर आले त्यावेळेपर्यंत दिल्लीत इस्लामी सत्ता पाय रोवून उभी होती. दक्षिण भारतात मात्र अद्याप आक्रमणाचा धक्का पोचला नव्हता. सातव्या -आठव्या शतकात अरबांचे एक मोठे आक्रमण भारतीयांनी यशस्वीपणे परतवले होते. ते एवढे यशस्वी झाले कि काहि हजारांच्या संख्येने आलेले आक्रमकांपैकी बातमी सांगण्यापुरतेच काय पाच-दहा जण जिवंअत परतु शकले. याचा जिहादींनी एवढा धसका घेतला की पुढे १०-१२ पिढयांपर्यंत इस्लामी आक्रमकांनी भारताकडे काणाडोळा करुन पहाण्याचे धाडस केले नाही. अमेरिकेत दह वर्ष हल्ला झाला नाही तर केवढा मोठेपणा समजला जात आहे. इथे जागतिक इस्लामीकरण व आक्रमणांच्या सुवर्णकाळात २००-२५० वर्षे तब्बल ८-१० पिढ्या एकही इस्लामी आक्रमण होऊ शकले नाही हा हिंदुंचा फार मोठा पराक्रम होता. हा इतिहास सुदधा अधोएखित केला जात नाही.पुढे सिंध चा काही भाग मुसलमानांनी व्यापला व सक्तीची धर्मांतरे घडवली. पुन: विजय मिळाल्यावर सिंधु च्या काठावर देवल महर्षींनी त्यांची प्रख्यात देवलस्मृती रचली व सर्व बाटवल्या गेलेल्या भारतीयांची शुद्धी करुन टाकली. ( नंतरच्या काळात अगदी शिवकाल व पेशवाईच्या काळातही व आजच्या काळातही याच देवलस्मृतीच्य आधारावर शुद्धी केली जाते. प्रत्येक स्मृती हि एक समाजसुधारणा होती.घटनादुरुस्तीच म्हणा ना. स्मृतींना कमी लेखण्याचे कारण नाही. संपूर्ण देवलस्मृती भाषांतरासह येथे पहा-> http://www.orkut.com/CommMsgs?cmm=26107071&tid=5521474067325686353)

परंतु पुढे हे धोरण राहिले नाही व ब्राह्मणवर्गाचा शुद्धीविरुद्ध कल होऊ लागला(दक्षिणा मिळत असली तरी विरुद्ध होता,पावित्याच्या अंध कल्पनांमुळे). ब्राह्मणेतर समाज शुद्धीच्या बाजूने होता. जसजसा हिंदूंचा सामरिक पराभव होऊन सत्ता आक्रमकांच्या हाती गेली तसतशी शुद्धी मागे पडली इतकेच नव्हे तर बाटवलेल्यांवर लक्ष ठेवण्याचीही इस्लामच्या पाईकांना गरज भासेनाशी झाली कारण बाटलेल्यांना समाज बहिष्कृत करुन स्वत:चेच कट्टर शत्रू निर्माण करत होता. तरिही कुराणाच्या आज्ञेप्रमाणे काफिरांशी वर्तणुक करणे व्यावहारिक दृष्ट्या दिल्लीच्या सत्ताधार्‍यांना शक्य नव्हते. यावर दिल्ली दरबारात एक मोठी चर्चा घडली व सर्वानुमते इस्लामचे भारतात काय धोरण असावे यासंबंधी एक व्यापक धोरण (Policy) ठरवले गेली. मुस्लीम अलिगढ विद्यापीठाने काही तवारिखांचे हिंदी अनुवादही केले आहेत त्यातील तारीख-ए-फिरोजशाही मधला संबंधित उतारा जसाच्या तसा,

"निजामुद्दीन जैनुदी (वझीर) ने उन उलेमाओंसे हो उपस्थित थे सुलतान के सम्मुख कहा, कि’ इसमें कोई संदेह नही या शक नही की आलिमोंने जो कुछ कहा वह ठिक है ।हिंदुओंके विषय में यही होना चाहिये कि या तो उनका वध किया जाए या उन्हे इस्लाम स्वीकार करने पर विवश किया जाए । (किंतु) हिंदू बहुत बडी संख्या में है। मुसलमान उनके मध्य में दाल में नमक के समान है। कही ऐसा न हो कि हम उपर्युक्त आदेशोंका प्रारम्भ करे और वे सुसंगठीत हो कर चारो ओर से विद्रोह तथा उपद्रव आरंभ कर दे। (इसलिए) जब कुछ वर्ष व्यतित हो जाएंगे और राजधानी के भिन्न भिन्न प्रदेश और कस्बे मुसलमानोंसे भर जायेंगे तथा बहुत बडी सेना एकत्र हो जाएगी . उस समय्हम आज्ञा दे सकेंगे की या तो हिंदुओं का कत्ल किया जाए या उन्हे इस्लाम स्वीकार करने पर विवश किया जाए।

खिलजी कालातही हिंदूंची स्थिती दारुण झाली होती. हिंदूंकडे द्रव्य साठू नये याची काळजी अल्लाउद्दीन खिलजी चे अधिकारी घेत. द्रव्य साठले तर हिंदू बंड करतील, त्यांना धर्माच्या आज्ञांप्रमाणे कठोरपणेच वागवले जावे असेच सवच मुस्लीम सत्ताधार्‍यांचे मत असे. अल्लाउद्दीनाच्या काळातील भारतीय प्रजेविषयी रियासतकार सरदेसाई लिहितात,

"हिंदूंना हत्यारे,घोडे मिळू नयेत किंवा त्यांनी ते बाळगू नयेत,उंची पोषाख करु नये,छानछोकीने राहू नये असा त्याने बंदोबस्त केला. हिंदुंना जमिनीचे अर्धे उत्पन्न कर म्हणून भरावे लागे.गाईम्हशींचासुद्धा कर द्यावा लागे.कोणाही हिंडूच्या घरात सोने,चांदी वा सुपारीसुधा उरली नाही.हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमनांच्या घरी चाकरी करावी लागे.हिंदूंना सरकारी नोकर्‍या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींणा मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे" मुसलमानी रियासत पृ. १४१

तरिही सर्व थरातले हिंदू धर्मनिष्ठच राहिले. प्रसंगी अत्याचार सोसून व संधी मिळताच उलटुन ते अन्यायाचा प्रतिकार करत.फिरोजशहा तुगलकच्या काळातली खुद्द दिल्लीतीलच एका धर्मनिष्ठ ब्राह्मणाची एक गोष्ट झियाउद्दीन बरनी ने नमूद केली आहे ती अशी,

Third Mukaddama.—Burning of a Brahman before the Royal Palace.

A report was brought to the Sultán that there was in Dehlí an old Brahman (zunár dár), who persisted in publicly performing the worship of idols in his house; and that the people of the city, both Musulmáns and Hindus, used to resort to his house to worship the idol. This Brahman had constructed a wooden tablet (muhrak), which was covered within and without with paintings of demons and other objects. On days appointed, the infidels went to his house and worshiped the idol, without the fact be­coming known to the public officers. The Sultán was informed that this Brahman had perverted Muhammadan women, and had led them to become infidels. An order was accordingly given that the Brahman, with his tablet, should be brought into the presence of the Sultán at Fírozábád. The judges and doctors and elders and lawyers were summoned, and the case of the Brahman was submitted for their opinion. Their reply was that the provisions of the Law were clear: the Brahman must either become a Musulmán or be burned. The true faith was declared to the Brahman, and the right course pointed out, but he refused to accept it. Orders were given for raising a pile of faggots before the door of the darbár. The Brahman was tied hand and foot and cast into it; the tablet was thrown on the top and the pile was lighted. The writer of this book was present at the darbár and witnessed the execution. The tablet of the Brahman was lighted in two places, at his head and at his feet; the wood was dry, and the fire first reached his feet, and drew from him a cry, but the flames quickly enveloped his head and consumed him. Behold the Sultán's strict adherence to law and rectitude, how he would not deviate in the least from its decrees.

आक्रमक ब्राह्मण वर्गाला काही वेळा जिझिया करात सवलत देत असत, काही वेळा नाकारत असत. फिरिजशह तघलक ने ब्राह्मण वर्गाला सुद्धा जिझिया देणे भाग पाडले. त्यांच्या उपोषण ,सत्याग्र्ह याकडे दुर्लक्ष केले. शेवटी थोडीशी सवलत देऊन जिझिया लावला गेला.

The Jizya, or poll tax, had never been levied from Brahmans; they had been held excused, in former reigns. But the Sultán convened a meeting of the learned men and elders, and suggested to them that an error had been committed in holding Brahmans exempt from the tax, and that the revenue officers had been remiss in their duty. The Brahmans were the very keys of the chamber of idolatry, and the infidels were de­pendent on them. They ought therefore to be taxed first.

तवारिखांचा आदर्श महमूद गझनी असे. तारिखे फिरोजशाहीत जर सुलतान महमुद परत हिंदुस्तानवर स्वारी करता तर सर्वप्रथम त्याने इस्लामला रोखणार्‍या ब्राह्मणांची प्रथम कत्तल केली असती.भारतात हिंदुंना बाटवण्यात मुख्य अडसर ब्राह्मणांचा आहे. फखरे मुदब्बीर नावाच्या तवारिखकाराने हिंदूंचा विनाश कसा करावा हेच केवळ सांगणारा आदाबुल हर्ब वश्शुजाअत नावाचा ग्रंथ लिहिला.

हसन-खुश्रुखानाची पार्श्वभूमि

अल्लाउद्दीन च्या वेगवेगळ्या स्वार्‍यांमधे पराभूत भारतीयांना गुलाम म्हणून आणले जाई. या गुलामांकडून सक्तमजुरी करुन घेणे ,त्यांना बाटवणे या सारखी कामे करुन घेतली जात. स्त्रियांना बटकी ,दासी म्हणून जननखान्यात कामे करावी लागत.

इ.स.१२९९ च्या गुजराथवरील स्वारीत अल्लाउद्दीन खिलजीच्या फौजेने केलेया गुजराथवरील हल्ल्यात गुजराथचा राजा कर्णदेव पराभूत झाला. खिलजींना अपार लूट मिळाली. त्याचबरोबर राजा कर्ण ची पत्नी कमलदेवी व कन्या देवलदेवी यांनाही पकड्ण्यात आले. त्यांच्याबरोबर सहस्त्रावधी हिंदू स्त्रिया व बालके पकडून गुलाम म्हणून दिल्लीला पाठ्वण्यात आली.शेकडो मंदिरे फोडली गेली किंवा मशिदीत रुपांतरीत केली गेली. खलजी राजवटीवर विशेष काम केलेले इतिहासतज्ञ के.एस्‌.लाल आपल्या History of the Khalajij या ग्रंथात लिहितात,

"The buildings of Allauddin outside the Capita lmentioned may be made of the mosque at Mathura and the tomb of Shaikh Farid which was probably a converted Hindu or Jain Temple. There is another Masjid built about the same time at Broach.It is also a convert Jain temple." page 332

याच स्वारीत वारंवर भ्रष्ट केले गेलेले सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन: फोडले गेले, तेथील मुर्ती दिल्लीला आणवून तख्ताची पायरी म्हणून वापरली जाऊ लागल्याची माहिती तारिख-ए-फिरोजशाही देते.

याच स्वारीत भारवाड या गुजरातमधील लढाऊ जमातीतले काही कुमार पकडून नेण्यात आले. त्यातील सर्वात जो देखणा होता त्याचे नाव "हसन" व त्याच्या भावाचे नाव हिसामुद्दीन असे ठेवले गेले.दरबारातले काही अधिकारी त्यांच्यावर समलिंगासक्त ख्झाले. पण हा हसन मनातून संतप्त होता. कमलदेवी हिला अल्लाउद्दीनाने जनानखान्यात घातले तर तिची मुलगी देवलदेवी हि अल्लाउद्दीनाचा मोठा मुलगा खिज्रखानाकडे पाठवण्यात आली. हसन वर अल्लाउद्दीनचा धाकटा मुलगा मुबारक खान याची अतोनात मर्जी झाली. खुश्रुखानाची जात काही वेळा परवार काही वेळा भारवाड अशी तवारीकातून दिली गेली आहे. या जातीविषयी माहीती अशी:- "काही मातापंथीय काही रामानंदपंथी- झाला बापजी या पुण्यवानास भजतात-नवस करतात-मृतांस जाळतात- क्रियाकर्म ब्राह्मणांकडून केली जाते-,वस्ती- गुजराथ व काही महाराष्ट्र- कृष्णाचा धर्मपिता नंद ज्या जातीचा होता त्याच मेहेर जातीचे हे लोक अशी एक कथा- काहिंचया मते वैश्य पुरुष व शूद्र स्त्री यांपासून हि जात निर्माण झाली ( शुद्र म्हणजे सवर्णच सवर्ण शब्दाची फोड ज्याला वर्ण आहे तो शूद्र हे सुद्धा स-वर्णच)-मुळचे गोकुळ ,वृंदावनातील असावेत. पुरुष कमरेभोवती,डोक्याला व खांद्यावर अशा तीन घोंगडया घेतात-गुरांचे,शेळ्यामेंढ्यांचे कळप पाळणे,दूध विकणे हे व्यवसाय- लग्नात ब्राह्मण पौरोहित्य करतो तो उपलब्ध नसल्यास मुलीकडील एखादी व्यक्ती करते- सोडचिठठीची पद्धत-विधवेस धाकट्या दिराशी लग्न करता येते. (संदर्भ भारतीय संस्कृती कोश)

परिया,परवार किंवा बरवड अशी काही असली तरी एक गोष्ट नक्की की हि एक लढाऊ जात असून त्या काळात सैन्यात नोकरीला या लोकांना बर्‍याच राजांकडून ठेवले जात असे.

विटंबित झालेला "हसन" संधीची वाट पहात होता. आपल्या पराक्रमाने तो वरच्या पदाला पोचत होता. सन १३१६ बाटलेल्या मलिक काफूर याने अल्लाउद्दीन ला ठार मारले व स्वत:च सुलतान झाला. अल्लाउद्दीनाच्या सर्व मुलांना त्याने कैदेत घातले पण हसन खुष्रुखानाच्या अंतस्थ सहायामुळे लवकरच मुबारकखानाला सुटका होऊन मलिक काफुरला ठार करता आले.मुबारकखान लगेचच तख्तावर आरुढ झाला व सुलतान कुतुब-उद-दीन नावाची द्वाही फिरवता झाला. या हसनला त्याने खुश्रुखान हि पदवी देऊन सर्व राज्यकारभार त्याच्या तंत्राने चालवू लागला.खुश्रुखानाने आपल्या गुप्त बेतांचा कोणताही सुगावा लागु दिला नाही. पण त्याच्या मनात दिल्लीला हिंदुपदपादशाही स्थापन करण्याचे विचार होते हे त्याच्या पुढच्या कृत्यांवरुन दिसून आले.मलिक काफुरप्रमाणेच खुश्रुखानानेही दक्षिणेत विजय मिळवले.पण त्याने हिंदू राजांना जिंकले तरी सुलतान दक्षिणेकडची स्वारी त्याच्या आधीन करुन दिल्लीत परतल्यावर खुश्रुने हिंदुंवर अत्याचार केल्याचे दिसत नाही. उलट

मलबार ला ताकीखान नावाच्या एका धनाढ्य मुसलमान सावकराशी त्याचे वैर उत्पन्न होऊन त्याची सर्व संपत्ती त्याने हरण केली. दक्षिणेतील हिंदु राजांबरोबर त्याने कटकारस्थाने सुरु केल्याची कागाळि सुलतान कुतुबुद्दीनाकडे होऊ लागल्याने अचानक त्याला दिल्लीला परत येण्याचा हुकून दिला गेला. काही तवारिखकार त्याला कैद करुन आनले गेले असेही लिहितात. यावेळी खुश्रुखानाच्या मनात कदाचित दिल्लीला परत न जाताच तेथील हिंदु राजांच्या मदतीने स्वतंत्र राज्य स्थापन करायचा विचार असावा.

(Mullik Khoosrow, who had gone to Malabar, stayed there about one year. He plundered the country of one hun­dred and twenty elephants, a perfect diamond, weighing one hundred and sixty-eight ruttys, with other jewels, and gold to a great amount. His ambition was increased by his wealth; and he pro­posed to establish himself in the Deccan in an in­dependent sovereignty.)

त्याआधी त्याच्या भावाला, हिसामुद्दीन याला,गुजराथचा सुभेदार म्हणून पाठवले असता तेथील हिंदू सरदारांशी कट केल्याच्या सुगावा लागल्याने पकडून दिल्लीला आणवले गेले असता शिक्षा म्हणून त्याला ४-२ थोबाडीत मारुन सुलतानाने सोडून दिल्याची तक्रार तवारिखातून दिसते.

याचप्रमाणे खुश्रुखानाचा दक्षिणेतला कट फसला असावा व त्वरित दिल्लीला परतावे लागले. दिल्लीला परतल्यावर खुश्रुखानाने आपण जिंकलेली संपत्तीची रास सुलतानापुढे ओतली. सुलतानाने त्याचा बहुमान करुन त्याच्याविरुद्ध कागाळ्या केलेया सरदारांना कडक शिक्षा केल्या. खुश्रुखानाने यापूर्वीच आपल्या बर्‍याचशा हिंदू नातेवाईकांना दिल्लीला बोलावून घेतले होते. त्यांना काही अधिकाराच्या व सैन्यातील जागाही देवविल्या होत्या. त्याच्या मामाचे नाव "रणडोल" असे अमीर खुस्रो लिहितो. इतर सहकार्‍यांची नावे कर्कमाजनाग, ब्रह्म,जहारिया अशी काही सामान्य तर काही चमत्कारीक वाटणारी दिली आहेत.झियाउद्दीनने "तोबा" नावाच्या एकाच साथिदाराचे नाव दिले आहे. हा दरबारात विदुषकी चाळे करीत असावा असे दिसते.

परंतु तवारिखांनी दिलेलि माहिती व शिव्याशाप नि:संशय एकतर्फी आहेत. अमीर खुस्रो हा "निजामुउद्दीन औलिया" याचा चाहता होता. त्याची आई हिंदू असून त्याचे बालपण आजोळी गेल्याने त्याच्यावर नि:संशय कडवे संस्कार जाले नव्हते. त्याच्या तुगलकनामात त्याने तुलनेने खुश्रुखानाविषयी झियाउद्दीन बरनी पेक्षा सौम्य भूमिका घेतली आहे.हे दोघेही या सर्व इतिहासाचे प्रत्यक्षदर्शी दरबारी असल्याने त्यांनी लिहिलेल्या माहिती ला नक्कीच मोल आहे. निजामुद्दीन औलिया हा नंतर सत्तेवर आलेल्या तुघलकांच्या विरोधी होता. "दिल्ली तो बहोत दूर है " हा इतिहासप्रसिद्ध वाक्‌प्रचार म्हणजे या अवलियाने घियासुद्दीन तुघलकाचा आदेशाला दिलेले उत्तर आहे. असो.एकंदरीत खुश्रुखानाने सुलतानाची त्याच्यावरील कामासक्ती, स्वत:चा पराक्रम व अभिनय व आपल्या भारवाडांचे सैन्य या जोरावर आपला पक्ष बळकट करत आणला होता.

रियासतकार सरदेसाई खुश्रुखानाविषयी लिहितात - "खुश्रुखानाचे आचरण चमत्कारिक आहे. त्याच्या हातून अनेक असंबद्ध कृत्ये घडली. प्रथमत: त्याने सरकारी खजिना खुला करुन फौजेस मुबलक द्रव्य देऊन तिला वश केले. त्याने आपल्या नावाचा खुत्बा वाचवला,स्वत:ची नाणी पाडली व पुढे स्वत:ला हिंदु समजून तो मुसलमानांविरुद्ध वर्तन करु लागला.त्याने देवलदेवीशि लग्न केले ( गुजरात ची अल्लाउद्दीन ने पळवलेली राजकन्या ,राजा करण घेला याची मुलगी). त्याच्या हिंदु अनुयायांनी दिल्लीतील सर्व मशिदीत मुर्ती स्थापन केल्या. .....चितोड व रणथंबोरच्या हिंदु राजांन्नी प्रयत्न केला असता तर त्यांना स्वतंत्र होण्याची संधी होती. पण त्यंनी प्रयत्न केला नाही. ... हिंदुपदपादशाही स्थापण्याची खुश्रुखानाची फार इच्छा होती. त्याच्याविषयी बखरकारांनी दिलेली माहिती नि:संशय एकतर्फी आहे. ह्यावेळी हिंदुंनी लिहिलेली माहिती सापडली तर त्यांच्या या बंडाचा चांगला उलगडा होऊ शकेल."

यानंतर प्रत्यक्ष दिल्लीच ताब्यात घेण्याची योजना खुश्रुखानाने आखली.इब्न बतुता या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार त्या काळी स्वत:हून मुसलमान होऊ इच्छीणार्‍या हिंदूंना स्वत: सुलतान भेटून सोन्याची साखळई ,थोडेफार द्रव्यादी सन्मान देत असे.

  • One day Khusrú Khán told the Sultán that several Hindus desired to become Musulmáns. It is one of the customs in this country that, when a person wishes to become a convert to Islám, he is brought before the king, who gives him a fine robe and a necklace and bracelets of gold, proportionate in value to his rank. The Sultán told Khusrú to bring the Hindus before him, but the amír replied that they were ashamed to come by day on account of their relations and co-religionists. So the Sultán told him to bring them at night.

  • वरील मजकुरात फार अर्थ भरलेला आहे. एकतर शांततेच्या काळात पैसा वापरुन आमिष दाखवून धर्मांतरे होत. ज्यांना या फायद्यांसाठी बाटायचे होते त्यांना त्याची शरम वाटे. म्हणून त्यांना बळाने रोखु शकणारा कोणीही नसला तरीही ते हे कृत्य करण्यास समाजापासून लपुन छपुन जात. सर्व जाती व वर्ग सहसा धर्म बदलण्यास अनुकूल नव्हते. बहुतेक स्वार्‍यंमधे हजारो लोक बाटवले जात. पण समाज धुरीणांच्या महामुर्ख पणा मुळे या बाटलेल्या लोकांची शुद्धी होण्याची शक्यताच उरली नव्हती व आक्रमक राष्ट्राला एकदा बाटवलेल्यांवर नजर ठेवण्याची गरज उरत नसे. युरोप व अन्य जगात मात्र अरबी राष्ट्रवाद्यांना नव्यानेच सामिल केलेल्या राष्ट्रिकांना संभाळणे हि डोकेदुखी असे कारण संधि मिळताच ते लोक इस्लाम सोडत.

रात्री मुसलमान होऊ अशा बहाण्याने आलेले सर्व हिंदूंनी अचानक दंगल माजवली. सुलताना संशय येऊन तो पळू लागला. तेवढ्यात खुश्रुखानाचा सहकारी जहारीया तिथे पोचला व सुलतानाचे डोके त्याने छाटुन टाकले.

उजाडता उजाडता सर्वत्र खुश्रुखानाच्या नावे द्वाही फिरवली जाऊन सर्व दरबारींना भारवाडांनी पकडून आणले व सर्वांची नव्या सुलतानाला मान्यता मिळाली. सुलतान नासिरुद्दीन खुश्रुशहा असे नाव घेऊन तख्तावर बसला. येथपर्यंत जे झाले ते सत्तांतरच्या इतिहासात सर्वसामान्य होते. अल्लाउद्दीन खिलजी स्वत:चा चुलता व सासरा जल्लालुद्दीन खिलजी चा खून करुन सत्तेवर आला. मलिक काफुरने खिस्रखानाचे डोळे फॊडले. तर मुबारक खान उरल्यासुरल्या अंध केलेल्या भावांचा खून करुन त्यांच्या बायका आपल्या जनानखान्यात घालून तख्तानशीन झाले होते. पण सर्वजण खलिफाचे प्रतिनिधी, इस्लामचे नेक पाईक , भारत दारुल-इस्लाम करण्याला कटीबद्ध होऊन आले होते. परंतु नव्या सुलतानाने व नविनच खेळ आरंभला. दिल्लीतील मशिदीतून मुर्तींची स्थापना केली जाऊन पूजाअर्चा होऊ लागली, कुराणाचा सन्मान राखला गेला नाही, मुसलमान स्त्रिया हिंदूंच्या आती सोपवल्या गेल्या इ. आरडाओरड व आरोप त्यांनी खुश्रुखानावर करत त्याच्यावर शिव्यांची लाखोली वहात, त्याची खालची जात काढत तवारीखांनी केली आहे. खुश्रुखानाने गोहत्याबंदी केली व जे जे हिंदूंना पवित्र त्या सर्वाचे पावित्र्य राखण्याचे हुकूम काढले गेले.

झियाउद्दीन बरनी लिहितो,"हिंदुओने कुरान का कुर्सी के स्थान पर प्रयोग करना प्रारम्भ कर दिया ।मस्जिद के ताकी में मुर्तिया रख दि गयी और वहा मूर्तीपूजा होने लगी। उस xxx का राज्याभिशेक होने से तथा हिंदुओंके अधिकारसंपन्न होने से काफिरी नियमोंको उन्नती प्राप्त होने लगी।"

इसामी हा आपल्या फुतुहत सलाटीन मध्ये लिहितो," खुसरोखॉं के शासन में मुसलमान अत्यंत निर्बल हो गये। मुसलमानोंको बडी हानी पहुंची।"

इब्न बतुता लिहितो," जब खुसरो खॉं सुलतान हुआ तो उसने हिंदुओंको विशेषरुप से सम्मानित करना प्रारम्भ कर दिया। वह खुल्लमखुला इस्लाम के विरुद्ध कार्य करने लगा । उसने काफीर हिंदुओंकी प्रथा के अनुसार गौहत्या रोक दी । हिंदू गौ का बडा सम्मन करते है । खुसरो खॉं चाहता था की मुसलमान भी ऐसाही करे।"

"This event occurred on the 25th of Rubbee-ool-Awul, in the year 721. In the morning Khoosrow, surrounded by his creatures, ascended the throne, and assumed the title of Nasir-ood-Deen. He then ordered all the slaves and servants of Moobarik, whom he thought had the least spark of honesty, to be put to death, and their wives and children to be sold as slaves. His brother was dignified with the title of Khan Kha-nan, or chief of the nobles, and married to one of the daughters of the late Alla-ood-Deen. Khoos-row took Dewul Devy, the widow of his murdered master and sovereign to himself, and disposed of the other ladies of the seraglio among his beggarly relations."

-History of the Rise of Mohammedan Power in India

तथापि मुसलमानांनाही एकदम दुखावणे बरे नाही म्हणून इमामांकडून त्याने आपल्या नावाचा खुत्बाह पढवून घेतला. खुत्बा म्हणजे सुलतानाच्या सन्मानाची प्रार्थना व घोषणा असते. त्याचबरोबर त्याने आपल्या नावाचे नाणेही पाडून घेतले. सुदैवाने ते आजही उपलब्ध असून त्याचे छायाचित्र पुढील प्रमाणे ,


Nasir al-Din Khusru (1320), Billon 2-gani Weight: 3.53 gm., Diameter: 17 mm., Die axis: 11 o'clock Legend: al-sultan al-azam nasir al-dunya wa'l din, dated 720 (= 1320 CE) / Legend, within circle: shah khusru, around: al-sultan wali amir al-muminin

यानंतर खुश्रुखानाने देवलदेवीशी विवाह केला. तिचे या कटात मोठा सहभाग असल्याचे सावरकरांनी नमूद केले असले व बरेच महत्व दिले असले तरी तसा कोणताही ऐतिहासिक पुरावा फारसा मिळत नाही.मात्र एकंदरीत गुजरातच्या या राजकन्येच्या आयुष्याची परवड झाली यात संशय नाही.

खुश्रूखानाची कारकिर्द खुश्रूखानाची सुलतान म्हणून कारकिर्द २० एप्रिल १३२० ते ६ सप्टेंबर १३२० अशी साधारण साडेचार महिन्यांची आहे. (संदर्भ Advance study in the History of India by J.L.Mehta page nos.185-86)

पहिल्या तीन महिन्यात त्याच्याविरुद्ध कोणाही मुसलमान सरदाराची ब्र ही काढण्याची छाती झाली नाही. मात्र यावेळी देशाच्या अन्य भागातील हिंदू राजांनी कोणताही उठाव केला नाही. बहुतेक स्वस्थ रहा व पहा असे धोरण त्यांनी अवलंबले. खरे तर यावेळेपर्यंत खिलजी राजवटींविरुद्ध अन्य राजे उठाव करत असत. ते शांत बसले होते असे अजिबात नसून हिंदूंचा सततचा अंतर्गत उपद्रव व सीमेवर मोगलांचे हल्ले याने ते त्रासलेले असत. हा उपद्रव एवढा होता की वेड्या महंमदाने आपली राजधानी देवगिरीला हलवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हिंदू बंडखोरांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल असा त्याचा कयास होता. पण या काळात कोणताही उठाव झाला नाही व परकिय राष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची हि एक चांगली संधी भारतीयांनी गमावली असेच म्हणावे लागते.

गियासुद्दीन तुघलक हा पंजाबचा सुभेदार असून कुशल असा सेनापती होता. मोगलांशी त्याला सतत युद्ध करावे लागल्याने लढाई करण्यात अनुभवी होता. त्याने खुश्रूखानाविरुद्ध प्रथम इस्लाम खतरेमेची घोषणा केली. प्रथम त्याने काही सरदरांना गुप्तपणे पत्रे पाठवली. पण खुश्रुखानाच्या दहशतीमुळे फारसे कोणी खुश्रुखानाच्या विरुद्ध जाण्यास धजेना. याचवेळी फक्रुद्दीन जेना हा तुघलकाचा मुलगा जो पुढे वेडा महंमद म्हणून इतिहास प्रसिद्ध झाला तो एका रात्री खुश्रूखानाच्या कैदेतून निसटण्यात यशस्वी झाला. खुश्रुखानाने संकट ओळखून ताबडतोब एक तुकडी आपल्या भावाच्या नेतृत्वाखाली तुघलकावर पाठवून दिली. यानंतर अजून काही मुसलमान सरदार तुघलकाला जाऊन मिळू लागले. तघलकाचे व खुश्रुखानाच्या सैन्याची शेवटी "इंद्रप्रस्थ" या प्राचीन नगरात गाठ पडली.

तुघलकनामामध्ये अमीर खुस्रो ने या लढाईचे वर्णन दिले आहे. तो लिहितो," खुसरो खॉं के भाई हिसामुद्दीन ,राय रायॉं रंधोल हातिम खॉं, और बहुत से नये अमीर जो गुलामी से अमीरी की श्रेणी तक पहुंचे थे अपनी अपनी सेनायें लिए साअथ थे। सेनाके आगे हाथियों की पंक्तिया थी और उन्ही के चारो ओर दस हजार ब्रादि ( अर्थात भारवाड) जाति के सवारे थे। उनके नाम अहर देव,अमर देव,नर्सिया,पर्सिया, परमार आदि थे।"

युद्ध सुरु झाले. सुरुवातीला खुश्रुखानाला यश मिळत होते. पुन: एकदा बाजी पलटली तेव्हा सर्व हिंदू सैंन्य संतापले व ग्यासुद्दीनाच्या सैंन्यावर तुटुन पडले.

अमीर खुस्रो लिहितो,"...इतने में हिंदुओंकी सेनाने आक्रमण कर दिया। मैल गाजी (तुगलक) तुरंत इस भय को भॉंप गया । हिंदुओंके "नायाsssयण" के नारे के साथ उसने "अल्ला हू अकबर का नारा लगाया । किन्तु यह आक्रमण इतनी तीव्र गतीसे किया गया था कि गाजी के सॅंभलते सॅंभलते हिंदुओंने उसकी सेना के बहुत झण्डे काट डाले ।"

याप्रमाणे हिंदूंचा विजय झाला व ग्यासुद्दीन काही अंतरापर्यंत पळून गेला. पण निकराची वेळ ओळखून त्याने फिरुन पुन: सैंन्य गोळा केले व विजयाने गाफील झालेल्या खुश्रुखानाच्या सेनेवर परत आक्रमण केले. तुगलकाचा हा हल्ला अचानक व वेगाने झाल्याने त्याच्या सैंन्यापासून वेगळा पडला. हिंदुंधे अंदाधुंदी माजली. काही जण दिल्लीकडे पळाले तर काही जण गुजरात च्या दिशेने. त्यांचा पाठलाग करुन त्यांना मारण्यात आले. काही पळाले. खुश्रुखानालाही पकडून ताबडतोब ठार मारले गेले. सक्तीने बाटवलेल्या व अन्य हिंदूचा एक उद्रेक फसला.

खुश्रुखान अपयशी ठराला. पण त्याचे महत्व कमी होत नाही. छळात पिचून जाऊनही त्याने आपल्या हिंदुत्वाची निष्ठा मनात जागरुक ठेवली होती व वेळ येताच ४-५ महिन्यांसाठी का होईना दिल्लीचा हिंदू सुलतान बनला. बाटलेल्यांनी आपल्या हिंदू नातेवाईक व मित्रांच्या मदतीने पलटुन वार केल्याची हि पहिलीच घटना होती. सन ६ सप्टेंबर १३२० ला खुश्रुखान मारला गेला. पण बाटलेल्यांनी परत हिंद् होऊन हिंदुराज्य स्थापन करण्यासंबंधीच्या त्याच्या स्मृती इतिहासाच्या गती-प्रतिगतीच्या लाटांवर तरंगत राहिली. सन १३२४ मध्ये काश्मिरच्या शेवटच्या हिंदू राणी कोटाने आपला नवरा मुस्लीम झाल्याने शस्त्र उपसले तर दक्षिणेत पुढे केवळ सोळाच वर्षांनी म्हणजे सन १३३६ मध्ये हरिहर व बुक्क या दोन बाटवल्या गेलेया तरुणांनी पुन:श्च हिंदूत्व स्वीकारून विजयानगरचे प्रबळ व वैभवशाली हिंदू साम्राज्य उभारले.

समाप्त

इतिहास लेखन, वाचन व संशोधन

बखरी,तवारिखा या खोटया असतात असे कोणताच शहाणा इतिहासकार म्हणत नाही. हि साधने दुय्यम असतात एवढेच त्यांचे म्हणणे असते. वि.का.राजवाडे हे सुद्धा बखरींना दुय्यम मानतात. एखाद्या अस्सल कागदपत्राच्या चिटोर्‍याचा पुरावा बखरीला खोटे पाडू शकतो असे ते म्हणतात. पण त्यासाठी आधी अस्सल कागदपत्राचा चिटोरा मिळावा लागतो व नंतरच बखरीतील काही भाग चुकीचा ठरु शकतो.पण त्या टाकाऊ असतात असा त्याचा अजिबात अर्थ नाही.

बखरी ,तवारिखा दुय्यम असतात याची वेगवेगळी कारणे आहेत. तो दरबारी खुषमस्कर्‍या असू शकतो, वैयक्तिक रागलोभ, विचारधारा इ.त्याच्यात असू शकतात, त्याला त्याच्या वर्तमानातील एखादा पक्ष असू शकतो, काही वेळा तो आठवणींवर लिहित असतो व त्याची स्न्मरणशक्ती त्याला दगा दिलेली असू शकते. पण याचा अर्थ असा समजता कामा नाही कि त्याचे मोलच नाही किंवा त्यातली प्रत्येक गोष्ट हेतुत: किंवा मुद्दाम खोटी लिहिलेली असते. अन्यथा सर्व इतिहास ज्यावर सजलेला असतो त्याचा आधारच नष्ट होईल. इतिहास, इतिहास म्हणून फार काही शिल्लकच रहाणार नाही. कारण अस्सल क्कागदपत्रे मिळण्याचे प्रमाण दुय्यमच असणार हे उघड आहे. आज केवळ ३५० वर्षे होऊनही शिवाजी महाराजांच्या स्वहस्ताक्षरातील अस्सल कागद सापडलेला माझ्या ऐकिवात नाही.

मात्र बखरी ,तवारीखा यांचे वास्तव तपासून घ्यावे लागते. एकमेकांशी त्या पडताळून त्यातील चुकीचा मजकुर बाजूला काढावा लागतो.बखरीतला इतिहास गाळला व केवळ समकालिन पुराव्यांवर इतिहास रचला तर किती तरी इतिहास गाळावा लागेल. म्हणून बखरी ,तवारिखात ज्या घटना उल्लेखित आहेत व त्या एकमेकांविरुद्ध जात नाहीत असे असले व अन्य एखादा अस्सल विरोधी पुरावा सापडत नाहीत तोपर्यंत तवारिखा व बखरीतील पुरावा विश्वासार्ह मानावा.

इतिहास हा २+२ = ४ असा गणितासारखा किंवा प्रयोगशाळेत प्रयोग करण्याचा नसतो. दोन ऐतिहासिक घटनांमधील संबंध इतिहासकार स्वत:च्या प्रतिभेने जोडतो व त्याला तर्कशुद्ध पुरावे(युक्तीवाद) देतो.अशी सांगड घालण्याचा अधिकार इतिहासकारांना नसेल तर तो कधीच उजेडात येणार नाही, कारण शेवटी इतिहास हा विषय कलाविभागात येतो विज्ञान विभागात नाही.ख्ररा इतिहासकार हा कित्येकदा आपल्या प्रतिभेने घटना प्रत्यक्ष पहातो जणु काही तो त्या इतिहासाचा साक्षी आहे. ती एक सूक्ष्म मानसिक प्रक्रिया असते.पण जो इतिहास तो साक्षीभावाने पाहतो त्याला ते इतरांना पुरावे व तर्क यांनी पटवुन द्यावा लागतो त्या अर्थाने ते एक विज्ञानही आहे.

अभावाचा पुरावा मानणे किंवा अपवाद हाच प्रघात समजून तो ऐतिहासिक पुरावा मानणे याने इतिहासकार खर्‍या नि:ष्कर्षांना पोचु शकत नाही.आपल्या पूर्वजांनी हे जे इतिहास लिहिले त्याचे स्वरुप सांस्कृतिक इतिहासाचे असून घटनात्मक पद्धतीने लिहिलेले नाहित. सांस्कृतिक इतिहासाचे आधुनिक पद्धतीने परिक्षण करणे मूळातच चूक आहे. जीवशास्त्रातले प्रश्न पदार्थविज्ञानाने सोडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे हे आहे.एखाद्या पुस्तकात अभावाचा मुद्दा आला की लगेच घटनात्मक चिकित्सा करणारे संशोधक ती गोष्ट त्याकाळि अस्तित्वातच नसल्याचा शोध लावतात. उदा. पाणीनीच्या व्याकरणात स्त्रियांच्या नाकातील दागिन्यांचा उल्लेख नसला तर त्याकाळी नाकात दागिने घालण्याची प्रथाच नव्हती असे विचित्र अनुमान हे लोक काढतात. त्यांची बुद्धी भारतीय संस्कृती हिन ठरवण्यासाठी इतकी व्याकुळ असते की मुळात पाणीनी चा हा ग्रंथ दागिने किंवा अलंकार या विषयावर नसून व्याकरणावर आहे याचाही त्यांना विसर पडतो.रुपक कथा उलगडताना त्याचे तारतम्य ठेवावे लागते.परंपरांचा विचार करावा लागतो.

बरेचदा इतिहासकारावर आरोप होताना दिसतात की तो विशिष्ट विचारसरणीतून इतिहास लिहितो हे काहि अंशी खरेच असते. आर्थिक पद्धतीने इतिहास मांडणे किंवा धर्म,जात,भाषा पद्धतीने इतिहासाची मांडणी केली जाते पण ते अपरिहार्यच असते. कारण अर्थ,सत्ता,धर्म,जात,भाषा व संस्कृती याशिवाय माणूस असूच शकत नाही. केवळ आहार,निद्रा,भय आणि मैथुन एवढीच मानवी प्रेरणा धरली तर ते इतिहासलेखन पशुंच्या इतिहासापेक्षा भिन्न असणार नाही. इतिहासलेखक हा १००% निष्पक्ष असायला हि अपेक्षा अवास्तव आहे. वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेशन द्यायला तो मोकळा असतो. मात्र पुराव्यांनिशी त्याची छाननी व्हायला हवी. इतिहासाच्या वाचकावर ती जबाबदारी येते. खोटे पुरावे देणे किंवा अर्धवट वाक्ये सांगून दिशाभूल करणारे लोक इतिहासकार नसून पावसाळी छत्र्या असतात. त्यांचे लेखन काळाच्या ओघात नष्ट होणारे असते. अर्थात त्यांचा हेतु तत्कालिन सामाजिक्क ,राजकिय फायदा घेणे हाच असतो. त्याला बळी पडायचे का नाही हे ठरवण्याची जबाबदारी वाचकाच्या सुसंस्कृतपणावर अवलंबुन असते.

Wednesday, May 18, 2011

अध्यात्मिक दृष्ट्या रोग म्हणजे काय?

एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राणी निर्माण होत गेले ते जास्तीत जास्त सुख मिळवण्यासाठी व त्यात वाढ करण्याच्या "हेतुने" ! निसर्गनियमाप्रमाणे आज सुख संवेदना घेतली की त्याचे मूल्य म्हणून दु:ख संवेदना येणारच आहे. ती जीवाला टाळता येत नाही पण मनुष्याला जास्तीत जास्त लांबवता मात्र येऊ लागली. त्यामुळे कर्म आणि त्याचे फळ यात वेळेचे अंतर निर्माण होऊ लागले. कर्माचे फळ जेवढे जास्त वेळ लांबवले तेवेढे चक्रवाढ व्याजाने अधिक मिळू लागले त्यातून माणसाला आपले कर्म व त्याचे फळ यातील कार्यकारणभाव समजेनासा झाला. म्हणून आपल्यावर होणार्या प्रत्येक परिणामाचे कारण आपल्या आतच आहे हे त्याला कळेनासे झाले आहे. कर्माचा परिणाम शरीरात साठून राहतो.

उदा. दारुचा परिणाम शरीरात साठून राहतो. कालांतराने त्याचे दुष्परीणाम होतात. जेव्हा माणूस संतापी असतो त्याचे परिणाम साठून राहतात ते रक्तदाब ,ह्रुदयविकाराच्या रुपाने कालांतराने दिसतात. खूप चालून आल्यावर पाय लगेच न दुखता दुसर्या दिवशी दुखु लागतात.आपल्या प्रत्येक भावभावनांचे ,विकारांचे परिणाम सूक्ष्मपणे साठत राहतात.

हि साठवण्याची क्रिया शरीरबाहेर इतरांवरही आपण घडवून ठेवतो.उदा. आपल्या चुकीच्या वागण्याने जेव्हा इतरांना दुखावतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या मनात किंवा मेंदुच्या पेशीत साठतो कालांतराने तो व्यक्त होतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की हा माणूस माझ्याशी असा का वागला मी किती चांगला आणि मला असे फळ का मिळाले?

आपले शरीर म्हणजे अनेक पेशींनी बनलेले असून त्या पेशींना स्वतंत्र अस्तित्वहि असू शकते प्रत्येक पेशीला मनही असते. स्वार्थासाठीच त्या एकत्र आलेल्या असतात. मनुष्य जेव्हा अहंकाराने सुखाच्या लालसेने अतिरेक करतात ,स्वत:च्या शरीराच्या विविध अवयवातही असमान दृष्टिने वागतात (जिभेसाठी पोटावर अन्याय) तेव्हा या पेशी दुखावल्या जातात व बंड करतात. शरीरात राहून किंवा शरीराबाहेर जाउन त्या व्यक्तीचा सूड घेतात. व्यक्ती स्वत:च्या सुखासाठी गरजेचा विचार न करता अन्न घेते तेव्हा या पेशींवर त्याचा ताण येतो मर्यादेबाहेर गेले की त्या बंड करतात संप करतात. मेडीकल सायन्स म्हणज्ते की लाखो पेशी दर सेकंदाला शरीराच्या आत येतात व बाहेर जातात. दुखावल्या गेलेल्या पेशी सूड घेतात त्या अर्थातच स्वरुप बदलून मनुष्याला हानीकारक रुप धारण करतात (जेनेटिक संरचना बदलून) व रोग जंतु म्हणून व्यक्तीच्या शरीरात रोग उत्पन्न करतात.

मंत्र म्हणजे मनाला त्राण देणारे. आपल्या चुका समजावून घेऊन त्यात बदल करण्याचे आश्वासन मनाने शरीराला देणे यात अपेक्षित आहे. आपल्या आचरणात ज्ञानपूर्ण बदल असायला हवा. औषधांचा उपयोग या शत्रू पेशींना दडपण्यासाठी नसून त्यांच्यातली आपल्याविषयी सूडाची भावना काढून टाकण्यस मदत म्हणून असायला हवी. या पेशींना औषधे म्हणजे कारवाईसाठी आलेले पोलिस किंवा शत्रु सैंन्य वाटता कामा नये. मंत्र हे मनाला त्राण देऊन संयम शिकवणारे असावेत. स्वयंसूचनेत खूप मोठी ताकद असते तीच मंत्रावरील श्रद्धेने जागृत होईल पण त्याबरोबर आचरणात बदलहि अपेक्षित असतात, नुसते मंत्र म्हणून काय होणार? व्यायाम करावा हे कळून ,नुसते ज्ञान होऊन शरीर बळकट होत नाही तर त्या ज्ञानाचे रुपांतर कर्मात म्हणजे प्रत्यक्ष व्यायाम करण्यानेच शरीर बळकट होते.

वार्धक्‍य म्हणजे जनुकांचे बंड

http://72.78.249.125/esakal/20100210/5565832334145012434.htm

The Selfish Gene

http://docs.google.com/fileview?id=0Bx8R3NkOLSmBZTQ5OWU0MGMtMTNiYy00YTNlLTlhNmMtM2I0ZmRlMmE4NWU0&hl=en

पूर्वकर्मदोष हा रोग.संकटे,अपघात यांचे एक कारण आहे. हि पूर्वकर्मे म्हणजे चालु जन्म किंवा पूर्व जन्म यातली असणार हि शक्यता तर्काने सिद्ध होते.पण केवळ पूर्वकर्म जर मानले तर माणसाच्या प्रयत्नांना खीळ बसेल. मनुष्याला इच्छास्वातंत्र्य आहे. माणसाच्या आयुष्यातील सुख-दु:खांचे अचूक मापन Quantum Mechanics प्रमाणेच अशक्य आहे कारण मन - आत्मा हे सूक्ष्म आहेत , मापनीय नाहीत. मात्र सरासरीने मापनीय होतात. कारण-परिणाम साखळी चे सूत्र मनशक्तीच्या तत्वज्ञांनी पुढील प्रमाणे मांडले आहे.

कारण ---> पूर्वकर्म + मूळ स्वभाव + इच्छा + कृती ---> परिणाम

उदा.एखाद्याची रक्त शर्करा (Blood Sugar ) हे कारण झाले व परीणामी तातडीची डॉक्टरी ट्रिटमेंट घ्यावी लागली हा परिणाम झाला तर ते वरील सूत्राने सोडवता येईल.

रक्तशर्करावाढ(कारण)----> मधुमेह(पूर्वकर्म) + ताण घेण्याचा स्वभाव (मूळ स्वभाव)+ गोड खाण्याची इच्छा + मनाला न जुमानता खाणे (कृती)-----> डॉक्टरी उपाय (परिणाम)

वरील कार्यकारण साखळीत पूर्वकर्म याचा परिणाम सध्या विचारात न घेता अन्य ३ कड्या पूर्ण पणे किंवा काही अंशी तरी दुरुस्त करता येतील. मूळ स्वभाव बदलायला थोडा कठीण असले तरी प्रयत्नांच्या कक्षेत आणता येईल. मनाला इच्छा होणे हे टाळता येणार नाही कारण भोग-उपभेगासाठीच मनाने जन्म घेतलेला असतो. पण साखरेने त्रास होतो हे ज्ञान झाल्यावर गोड न खाणे हि कृती करण्याचा अधिकार माणसाला आहे.ताण व्यवस्थापनाने (Stress Management) साखर वाढण्याला प्रतिबंध करता येइल.

आता मधुमेह हा जर जन्मत:चा नसेल तर तो याच जन्मातील पूर्व कर्माशी संबंधित असू शकेल. मूळातच इंन्शुलीन निर्मिती होत नसेल तर (A Type) तर तो बहुतांशी पूर्वजन्माशी निगडीत ठरणार.जोपर्यंत विज्ञानाने तो पूर्ण बरा करता येण्याचा शोध लागत नाही तोपर्यंत त्या परिणामाला दैवाच्या हवालीच ठेवावे लागेल.

अनेकदा "वातावरण परिणामाने सवयसहजता" (Conditional Reflex) या मुळे मनस्ताप टाळायला अवघड जाते. या क्षणी क्रोध आवरला पाहिजे, भय वाटत असेल तर निर्भयता आणली पाहिजे, हे समजत असूनही एखाद्या व्यक्ती वा घटनाविषयक Conditioning मुळे कळते पण वळत नाही अशी स्थिती होते. म्हणून अशा प्रसंगातून जाण्यापूर्वीच जी सदोष विचारसरणी निर्माण होऊन रोग-संकटे-अपघात यांना कारणीभूत झाली आहे ती सदोषता तत्वचिंतन , स्वयंसूचना इ. द्वारे बदलता येते. पूर्वीच्या कर्मातून झालेले परिणाम टाळता येत नाहीत व त्या परिणामांमुळे पुन्हा पुन्हा नविन कर्मदोष कारण-परिणामा यांची दुष्टचक्रे आहेत ती बदलण्याचे कर्मस्वातंत्र्य माणसाच्या आधिन आहे.

कारण ---> पूर्वकर्म + मूळ स्वभाव + इच्छा + कृती ---> परिणाम (Ref: मनशक्तीi-दिवाळी अंक)

वर वर पाहता सुखाला कारण मी आणि दु:खाला कारण मात्र इतर जण अशी धारणा करण्याची मनाची प्रवृत्ती असते, पण आत्मचिंतन करताना अत्यंत तटस्थ राहून ते केल्यास त्या त्या घटनांमधे आपले वागणे -बोलणे - वर्तन लक्षात घेतले. आपण जे वर्तन केले त्याऐवजी वेगळे वागलो असतो तर नकोशा असलेल्या घटना टाळू शकलो असतो हे ही ल्क्षात आले. तसे वर्तन घडले याचे कारण आपला स्वार्थ -लायकीपेक्षा जास्त मिळवण्याचा स्वार्थ- हेच असल्याचे लक्षात आले. एखादा रोग झाला तर रोगजंतु हे शरीरांतर्गत कारण आणि अपघात झाला तर बाह्य कारण , पहिली घटना हि नैसर्गिक व दुसरी हा योगायोग - अपघात - अन्याय असे मानतो. वस्तुत: रोग-संकट-अपघात यांना शरीरांतर्गत वा बाह्य घटक केवळ निमित्त मात्र असतात खरे कारण आपल्या मनातच वसलेले असते हे दिसून येते.खरे तर अपघाताची जी लक्षणे डॉ.मेनिंजर यांनी सांगीतली ती रोगालाही लागू पडतात. तरिही एखाद्याचा मृत्यु रोगाने झाला तर तो नैसर्गिक आणि मोटारीच्या टकरीने झाला तर तो अपघात-योगायोग असे म्हटले जाते.

Law of compensation

http://www.crcsite.org/karma.htm

डॉ.xxx हे अ‍ॅनॉटॉमी चे तत्ज्ञ आहेत त्यांनी माझ्या दोन प्रश्नांना पुढील उत्तरे दिली ती येथे नोंदवून ठेवत आहे.

Q.1 एखाद्या पेशीसमूहाची वारेमाप वाढ होण्याची कारणे काय असू शकतात?

"पेशीकेंद्रा मध्ये जे DNA असतं त्यामध्ये काही बदल घडून येणं" असं एका वाक्यात उत्तर देता येईल. (अर्थात हे उत्तर सुद्धा सर्वंकष किंवा समर्पक नाही, पण प्राथमिक उत्तर म्हणून चालेल).पण मग प्रश्न उद्भवतो, असं बदल घडण्याची कारणं काय? ह्या प्रश्नाचा उत्तर अतिशय व्यापक आहे. आणि असं असण्याचं कारण हे, की निरनिराळ्या कॅन्सर मागची कारणं वेगवेगळी असू शकतात. इथे केवळ काही उदाहरणं देता येतील!१. काही कॅन्सर मागे आनुवंशिक पार्श्वभूमी असू शकते. पण ह्याचा अर्थ असा नाही, की असे कॅन्सर आनुवंशिक असतात! अशी पार्श्वभूमी असल्यामुळे पेशींमध्ये घातक बदल होण्याची शक्यता जास्त एवढंच म्हणता येईल.२. काही पेशींमध्ये असे बदल पर्यावरणीय कारणांमुळे होऊ शकतात. उदाहरणार्थ, asbestos शी प्रदीर्घ संपर्क आल्यास फुफ्फुसाच्या आवरणामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते. सूर्यकिरणामधल्या अल्ट्राव्हायोलेट मुळे त्वचेच्या पेशींमध्ये असे बदल होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते.३. काही कॅन्सरच्या मागे व्हायरस असण्याची शक्यता असते.४. बऱ्याच वेळा असे बदल अचानक होणाऱ्या अपघातांमुळे (ज्याला अनुवंश शास्त्रामध्ये - genetics - mutation असं म्हणतात) घडू शकतात.

शेवटी, एक सच्चा डॉक्टर आणि शास्त्राचा (सायन्स) विद्यार्थी म्हणून मला हे मान्य करावाच लागेल, की अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मानवाला अजून समजलेली नाहीत! पुढेमागे मिळतील ह्यात शंका नाही, पण आपल्या हयातीत मिळतील की नाही हे सांगणं कठीण आहे!

Q 2.पेशींना स्वतंत्र अस्तित्व किंवा मन असू शकत् का?

Ans. from Dr. Avinash xxx to me.

पेशींना स्वतंत्र अस्तित्व ... हो आणि नाही!हो अशा अर्थाने, की प्रत्येक पेशी हे एक स्वतंत्र विश्व आहे - तिच्या केंद्राकामध्ये तिला आवश्यक ती सर्व माहिती आहे, प्रत्येल पेशी, आपली नित्याचे व्यवहार (भक्षण, उत्सर्ग, पुनरुत्पादन) स्वतंत्रपणे करते.नाही अशा अर्थाने, की बहुतेक पेशी एकमेकांशी जैविक अणूंच्या (molecules ) सहाय्याने संपर्क ठेवून असतात. शिवाय, काही बाबतीत पेशींना एकमेकांशी संपर्क ठेवणं आवश्यक असतं. बहुपेशीय प्राण्यामध्ये, ह्याची नितांत गरज असते. बहुतेक पेशींच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवावं लागतं. "The whole is more than te sum of its parts" हे बहुपेशीय जीवांबद्दल तंतोतंत खरं आहे.२अ . पेशींना 'मन' असतं की नाही हा खरं तर तात्विक प्रश्न आहे! (Philosophical ). 'मन' शब्दाच्या व्याख्येवर हे अवलंबून आहे. वर म्हटल्याप्रमाणे, पेशी एकमेकांशी संवाद साधू शकतात - एवढंच, की हा संवाद biological molecules च्या माध्यमातून होत असतो. सभोवतालच्या परिस्थितीमध्ये बदल होतात तेव्हा पेशी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात! पण ह्या प्रतिक्रिया विद्युतभाराच्या रूपाने दिसून येतात (पेशींच्या आवरणामध्ये अतिशय सूक्ष्म प्रमाणात वीज खेळत असते! - ती संवेदनशील यंत्रांच्या सहाय्याने मोजता पण येते.) तर कधी इतर मार्गाने.असं असून सुद्धा, आपल्या शरीरातल्या पेशी जर शरीराबाहेर काढल्या तर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड तंत्रज्ञानाची आवश्यकता असते! आणि एवढं करून सुद्धा, त्यांना जिवंत ठेवण्यावर मर्यादा आहेत.

...........................

लोकमान्य टिळक, छत्रपति आणि वेदोक्त प्रकरण

कोल्हापुरचे शाहूमहाराज यांच्या कारकिर्दित सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका ब्राह्मणाने (राजोपाध्ये नव्हेत)स्वत: अंघोळ न करताच मंत्र सांगण्याचे ठरवले यावरुन वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झाला. राजोपाध्याय स्वत: आजारी असल्याने ते तिथे हजर नव्हते. या ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणावयास सुरुवात केली. जाणकारांनी शाहु महाराजांच्या लक्षात हि गोष्ट आणून देताच त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या ब्राह्मणाने "छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, पण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!" असे उद्धट उत्तर दिले. पण छत्रपती शाहु महाराज हे वेदांचे प्रचंड अभिमानी होते. त्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारण करा असे सांगितल्यावरही तो ब्राह्मण ऐकेना, त्यातुन त्याने स्वत: शुचिर्भूत न होता हे मंत्र सांगितले होते. कोल्हापुरच्या ब्राह्मणांनीही या महामूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केला. मात्र हा विधी पण संस्थानचे रेव्हेन्यु अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला व वाढवला, त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे स्वरुप आले.

स्वत: शाहू राजांना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरुपाची समाजरचना मान्य होती का नाही? त्यांचे एक पत्र यावर प्रकाश टाकते. कोल्हापुरच्या विद्याविलास च्या संपादकांना लिहिलेले हे पत्र,

"माझ्या मतासंबंधि बराच गैरसमज करण्यात येत आहे म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरता पाठवत आहे.सत्यशोधक, समाजिस्टांचा हलल माझेवर का? ज्याप्रमाणे ख्रिस्त ,बुद्ध ,थिऑसफी इ. पंथांची काही तत्वे मला मान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची काही तत्वे मला मान्य आहेत. मी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो व नाही. हुबळीस ब्राह्मणेतर समाजाची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून तसा येईल असे सांगितले .मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते? मला वेद मान्य असून ,मी वेदास चिकटून रहाणारा आहे असे असता माझ्यावर हल्ला का?

कळावे,

शाहू छत्रपती

मुंबई , ता २३ मार्च १९२१

अशा विचांरांचे हे छत्रपती या वेदोक्त वादात कसे फसले वा इंग्रजांच्या राजकारणाने फसून व काही लोकांच्या सल्ल्याने का वागले, लोकमान्यांची भूमिका काय होती याचा हा इतिहास!

लोकमान्य टिळक विरुध्द चिरोल

चिरोलच्या ’दि अनरेस्ट एन इंडिया’ या लोकमान्यांवर आणि चित्पावन ब्राह्मणांवर गरळ ओकणारे पुस्तक त्याचे मराठी भाषांतर भास्करराव जाधव व अण्णासाहेब लठ्ठे व प्रो.म.गो.डोंगरे या तिघांनी केले व ते पुस्तक स्वखर्चाने छापून शाहूमहाराजांनी फुकट वाटले. महाराजांनी सर व्हलेंटाईन चिरोलच्या पुस्तकाच्या लेखनासाठी दरबारी पाहुणा म्हणून ठेऊन घेतले. कागदपत्र परवले, पैसा दिला. महाराजांचे ॠण चिरोलने स्वत: प्रस्तावनेतच मान्य केले आहे. मंडालेहून आल्यावर टिळकांनी चिरोलवर अब्रुनुकसानी चा दावा दाखल केला. या खटल्यात भास्करराव जाधव आणि डोंगरे चिरोल साहेबाचे साक्षिदार म्हणून उभे राहिले. शाहु महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात टिळकांनी विरोध केला असे चिरोलने म्हंटले होते त्यासंदर्भात टिळकांच्या वकिलांनी १९०१ ते १९०८ या काळातले केसरीचे अंक समोर ठेऊन प्रश्न केला की "टिळकांनी शाहुमहाराजांच्या वेदोक्ताच्या अधिकाराला कोठे विरोध केला ते दाखवा." कारण काहीजणांनी तसा लेखी व तोंडि प्रचार केला होता. तेव्हा या दोघांनीही टिळकांनी वेदोक्ताच्या संबंधात लोकमान्यांनी शाहूमहाराजांना कधिही विरोध केला नाही हे कबूल केले. डोंगरे म्हणाले वेदोक्त "प्रकरणात व्यक्तीश: छत्रपतिंविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखवता येणार नाही. किंबहुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहेच असे टिळक म्हणत होते असे मला वाटते."

याच केस मधे सत्यशोधक भास्कररावांची जी साक्ष झाली ती त्यांची मनोवृत्ती स्पष्ट दाखवतात. जाधव म्हणाले , "मला या वेदोक्तामधे काहिहि अर्थ दिसत नाही ब्राह्मण विरोधी जातात म्हणून आम्ही हा हक्क मागतो. हिंदुंनाच काय पण मुसलमान ख्रिस्ती यांनाहि हा अधिकार असावा असे मला वाटते!" तेव्हा वकिलांनी प्रश्न केला कि मग तुमच्या मागणीप्रमाणे मुसलमान व ख्रिश्चनांनिही वेदोक्ताची मागणी केली असेल. त्यावर जाधवांनी उत्तर दिले. अद्याप त्यांनी ती मागणी केली नाही. जाधवांनी हे प्रकरण कसे रंगवले असेल याचा अंदाज करता येईल.

भास्करराव जाधव यांची कार्यशैली

राजोपाध्ये यांची भूमिका मांडणारे पत्र पुढे देतो पण हे सविस्तर पत्र ५ मे १९०२ ला पाठवले त्यावर दुसर्‍याच दिवशी महाराजांच्या खाजगी कारभार्‍याचे उत्तर आले व त्यात राजोपाध्यांना बडतर्फ केले गेले व जप्तीचा हूकूम दिला. १३ मे ला शाहू लंडनला निघाले व १५ मे ला मुंबईला बोटित बसले. त्यांच्या पाठीमागे सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी राजोपाध्ये यांची उत्पन्ने जप्त केली पण ती केवळ उपाध्येपणाशी संबंधित न करता खाजगी मालकिची उत्पन्नेसुद्धा जप्त केली . एवढेच नव्हे तर या वादाशी संबंध नसलेल्या छोट्या गावातील शेकडो ब्राह्मणांना च्या लहानसहान जमिनी जप्त करून त्यांना देशॊधडिला लावले. हि सर्व उत्पन्ने मंदिरांची व्यवस्था लावण्यास पूर्वापार या मंडळिंना दान म्हणून मिळाली होती हि सर्व ब्राह्मण परागंदा होऊन ब्रिटिश हद्दीत निघून गेली. मूळ प्रश्न होता केवळ क्षत्रियत्वाचे संस्कार लोप पावल्याने छत्रपतींनी प्रायश्चित्त घेण्याचा होता. त्यांचे क्षत्रियत्व ब्राह्मण समाजाला मान्यच होते. जाधवांनी खुनशिपणाने राजोपाध्येंवर जप्तीचा हुकूम बजावण्याची वेळ राजोपाध्यांच्या मुलाच्या लग्नघडीलाच काढली. या सत्यशोधक जाधव यांनी ६ मे १९१९ ला एक व्याख्यान दिले त्यात कुणबई वैदिक वर्ग निर्माण करु नये असे उद्गार काढले. वेदपठ्ण करण्यातच पुरुषार्थ नाही असे म्हटलाने वेदाभिमानी असल्याने छत्रपति शाहू संतापले मग जाधवांनाच सपशेल माफी मागावी लागली.

टिळकांची भूमिका

शाहु छत्रपतीं प्रकरणाचा फायदा घेऊन सत्यशोधकांनी ब्राह्मण -क्षत्रिय समाज सोडून सर्वच हिंदु समाजाला,- परधर्मियांनाहि- वेदोक्ताचा अधिकार मिळाव म्हणून प्रचार करत होती. यासंबंधि टिळकांनी लिहिलेले शब्द, " जातिभेद हा हिंदु समाजाच्या हाडीमासी खिळलेला आहे. .... हे परंपरागत किंबहुना रचनासंगत भेदाभेद अजीबात सोडून टाकून सर्व हिंदुस्थानातील जातींचा सबगोलंकार करणे इष्ट असले तरी शेकडो वर्षे ते शक्य नाही हे कोणासहि मान्य केले पाहिजे व आम्हि आजच्या प्रश्नांचा जो विचार करणार आहोत तो याच धोरणावर करणार आहोत. समाजाच्या स्थितीत जो काही पालट कोणास करावयाचा असेल तो व्यवस्थेने बेताबेतानेच केला पाहिजे व तोही असा असला पाहिजे कि त्याची उपयुक्तता लोकांच्या चटकन लक्षात येईल. हल्ली जी वेदोक्ताची चळवळ सुरू झाली आहे ती त्या प्रकारची नाही...मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे त्यांचा हात धरणारा या काळात कोणी राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणानेच तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही.... निरनिराळ्या जातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हास पाहणे आहे व तशा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहीले आहेत."

वेदोक्ता बाबत टिळकांचे जाहिर मत

५-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात " कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."

लोकमान्य टिळक यांना विद्धंसक सुधारक होण्यापेक्षा विधायक सुधारणावादी व्हावेसे वाटत होते हे स्वच्छ दिसते. आधी राजकिय स्वातंत्र का आधी सामाजिक सुधारणा हा वाद प्रसिद्ध आहेच. पण या प्रकरणात त्यांची अकारण बदनामी केली गेली.

टिळक विधायक सुधारणावादी होते. जातीभेद मोडणे त्यांना इष्ट ही वाटत होते पण क्रमाक्रमने. खुद्द शाहु राजांनी तंजावर प्रकरणात मराठा समाजातील भोसले, घोरपडे,पवार ,जाधव आदि केवळ १२ मराठा घराण्यांतच वेदोक्ताचा अधिकार आहे असे सांगीतले. म्हणजे खुद्द छत्रपतींनीही सर्व मराठा समाज किंवा सर्व ब्राह्मणेतरांना वेदोक्ताचा अधिकार आहे किंवा हवा असे १९१७ पर्यंत म्हटले नव्हते.

टिळक हे हिंदुसंघटक असून सर्व जाती एकत्र याव्यात असेच त्यांना वाटत होते. शिवजयंती व गणेशोत्सव यांना राष्ट्रीय स्वरुप देण्याच्या त्यांच्या चळवळीमागे सर्व जातींचे एकत्रीकरण हाच उद्देश होता.शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव या आपल्या लेखात टिळक सारांशाने म्हणतात,"...राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे.एकराष्ट्रीयत्व म्हणजे काही दृष्य पदार्थ नव्हे......सर्व लोकांच्या आदरास पात्र असलेल्या जितक्या अधिकाधिक वस्तु असतात त्या मानाने एकराष्ट्रियत्वाची कल्पना अधिकाधिक दृढ होत जाते हे तत्व सर्वमान्य आहे. ... अशा गोष्टी अद्याप दुर्दैवाने आम्हास फारशा उपल्ब्ध नाहीत.गाई आणि ब्राह्मण यांचा प्रतिपाळ अशा दोन गोष्टी एकेकाळी होत्या...पण याहीपेक्षा आजचा काळात सर्वांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रपुरुषांचे स्मरण होय.त्यातूनही ज्या शूर पुरुषांनी मरठे ,ब्राह्मण ,परभू,शेणवी वगैरे कोणताही भेद मनात न आणता "गुणा: पुजस्थानं गुणिषु नच लिंगम्‌ नच वय:" या न्यायाने ज्याचा जो गुण आढळण्यात आला त्याचा सारवजनिक कार्यात उपयोग करुन सर्वांस राष्ट्रीय एकत्वाच्या जाळ्यात आणले त्याचे स्मरण सर्वांस श्रेयस्कर होईल. श्री शिवछत्रपतींचे चरित्र अशाच प्रकारचे आहे....शिव छत्रपतींचा उत्सव करणार्‍यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. या उत्सवात मराठे आणि ब्राह्मण, अगर ब्राह्मण आणि परभु अशा प्रकारचा कोणताही भेद करणे अतिशय गैरशिस्त आहे.....शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करण्यात एक प्रकारची कृतज्ञता बुद्धी आमच्या मनात आहे त्याव्यतिरिक्त अशी जयंती साजरी करण्याने एकराष्ट्रीयत्वाचा उदय होईल हा फायदा लहान सहान नाही."

सयाजी महाराजांची भूमिका

सयाजीराव महराजांनी या प्रकरणात विधायक भूमिका घेऊन हा वाद कोल्हापूरप्रमाणे बडोदे संस्थानात माजू दिला नाही. त्यांनी १८९६ ला एका पत्रात म्हंटले आहे की "मला पुराणोक्त आणि वेदोक्त यात स्वत:ला काही कमी जास्त श्रेष्ठ वाटत नाही. मात्र सामाजिक दृष्ट्या वेदोक्त श्रेष्ठ पद्धत मानली जाते. पण अशा रितीने लोक केवळ विधी आणि कर्मे यातच बुडुन धर्माची तत्वे विसरुन गेली आहेत ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून मी सुधारणा हाती घेतली आहे."

राजोपाध्यांची भूमिका

शाहु महाराजांना अंघोळ न करता पूजा सांगू पहाणार्‍या मूर्ख ब्राह्मणाला शासन केल्यावर जे मुख्य राजोपाध्ये त्यांना दरबारातर्फे काही विचारणा झाली.त्यात त्यांना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याची आपली इच्छा आहे किंवा कसे असे विचारले गेले ते पत्र किंवा यादी ७ - १० - १९०१ चे आहे.

यावर राजोपाध्ये ते मुंबईला एका परिक्षेसाठी निघाले होते त्यांनी राजांची समक्ष भेट घेऊन परत आल्यावर शास्त्राप्रमाणे विचार करण्यासाठी बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील याच्या विचारविनिमयासाठी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो असे सांगीतले . छत्रपती शाहू राजांची मान्यता मिळाल्यावर ते मुंबाईला निघून गेले. शंकराचार्य ,काशी ,वाई इ, स्वखर्चाने घेऊन येतो असे राजोपाध्ये यांनी राजांना लेखी कळवले होते. त्यास मूक संमती मिळाली. राजोपाध्ये परतल्यानंतर मधल्या ८-१० दिवसात कोणीतरी शाहू राजांचे कान भरले व राजोपाध्यांना काशी आदी हून शास्त्री लोकांना आणण्यास मनाई करण्यात आली. वर उल्लेखलेले पत्र हि राजोपाध्यांना ७-१० ऐवजी १ महिना १० दिवस एवढे उशीरा म्हणजे १८-११-१९०१ ला मिळाले.

५- मे १९०२ ला राजोपाध्ये यांनी महाराजांना पाठवलेल्या पत्राचा सारांश,

१. रा.ब.दिवाण यांस कळवले ते असे का कळवले ते समजत नाही. आपण वस्तुस्थिती सोडून कळवले हे माझे दुर्दैव आहे. ....

२.सरकरवाड्यातील हव्यकव्य कृत्ये वेदोक्त वा पुराणोक्त करायचे काम माझे नाही तर सरकारास जे विधि असतात ते सरकार नसताना मी करायचे असतात.विशेष प्रसंगी सरकार असताना मी फक्त त्यांचे सन्निध असावे एवढेच माझे काम आहे.पद्धत कोणतीही असो.

३. आजपर्यंतची वहिवाट काहीही असो, येथून पुढे सर्व धार्मिकविधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारांची इच्छा आसल्यास तसे करण्यास माझी काहीही हरकत नाही.

४.मला नेहमीच्या वहिवाटिप्रमाणे सूचना मिळाली नाही म्हणून मी हजर झालो नाही. नेहमीप्रमाणेच सूचना मिळताच मी हजर झालो हि.यावरुन असे दिसेल कि मी उपाध्यायाचे काम सोडलेले नाही.

५. काशी,नाशिक इ.क्षेत्रांकडून निर्णय आणवले पाहिजेत त्यास हुजुरांची मान्यता पाहिजे.

६.शास्त्राची अनुज्ञा आणल्याशिवाय हे काम केले( संस्कार लोप पावल्याने प्रायश्चित्त करून पुन्हा वेदोक्त पद्धत सुरू करण्यासंबंधि) तर माझेवर येथील ब्रह्मवृंदाचा बहिष्कार पडेल. मजवर बहिष्कार पडल्यास माझी हरकत नाही पण मीच बहिष्ख्रुत झालो तर धार्मिक विधी करणार कोण?

७. १५ मे ला माझ्या मुलाचे लग्न बावड्याचे जहागिरदार यांचे मुलीशी ठरले आहे. ते झाले की मी शास्त्राच्या निर्णय मिळवण्याच्या उद्योगाला लागतो, व तसा निर्णय मिळवून मी जुलै १९०२ चे आत उत्तर देतो. एखादी वहिवाट बंद पडली कि नव्याने सुरू करताना शास्त्राचा निर्णय आणवण्याव्चा पूर्वापार चालत आलेला सामान्य नियम आहे. तो या बाबत सोडून एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक कृत्ये करण्याचा प्रारंभ केला गेला यामुळे हे प्रकरण या थरावर आले हे माझे दुर्दैव आहे.

८.सरकारांच्या परंपरागत उपाध्येपणावरुन मला दूर का करण्यात येऊ नये असा प्रश्न प्रस्तुत यादित मला विचारला आहे. या प्रश्नाला सध्या एवढेच उत्तर देतो कि शास्त्राज्ञेस व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वहिवाटिस अनुसरून मी आपले काम करण्यास सिद्ध आहे तोपर्यंत हा प्रश्नच उद्भवत नाहि.

पण यावर लगेच ६ मेला तुमचे उत्तर समाधनकारक नाही असे उत्तर आले व लगेच जप्तीचा हूकुम काढला जाउन राजोपाध्येंना काढून टाकण्यात आले व जोडीला त्यांच्यावर राजद्रोह आणि क्षत्रियत्वाचा वाद उकरुन काढला असा खोटाच आरोप केला गेला. वास्तविक राजोपाध्ये यांनी उत्तर दिले त्यात हुजुरांचे घराणे क्षत्रिय का शूद्र याचा प्रश्नच उद्भवत नाही असे लिहिले होते.

मधे ३०-३५ वर्षांच्या काळात अज्ञान छत्रपतिंच्या मुंजीही झाल्या नव्हत्या. कारण सर्व कारभार इंग्रजांच्या ताब्यात होता. पण स्वत: शाहु महाराज छत्रपती झाल्यावर याच राजोपाध्यांनी शाहूंना गायत्री मंत्र दिला होता. आणि हे स्वत: महाराजांनीच एका हुकुमात मान्य केले होते. पुढे महाराज श्रावणीही करत असत. जो श्रावणी करतो त्याला वेदोक्ताचाही अधिकार असतोच असतो हे जो धर्मशास्त्र जाणतो त्यालाच कळेल. महाराजांसाठीचे सर्व श्रावणीचे विधी स्वत: राजोपाध्येच करत. या श्रावण्या जुन्या राजवाड्यात भवानी देवीसमोर होत व १६ कायदेकरी म्हणजे धर्मपंडीतहि आपल्या श्रावण्या महाराजांच्या उपस्थितीतच करत.

याचा अर्थच असा होता कि , राजोपाध्ये व अन्य पंडीतांना राजांच्या क्षत्रीयत्वाची किंवा वेदोक्ताच्या अधिकाराची कधीही शंका नव्हती. मधल्या काळात ४० वर्षे संस्कार लोप पावला होता. तो प्रायश्चित्ताशिवाय सुरू करणे हे अशास्त्रीय एवढेच राजोपाध्ये व अन्य ब्रह्मवृंदाचे म्हणणे होते. आणि शास्त्राला ते धरुनच होते.

१९१२ ला तंजावरच्या वारसा हक्काबद्दल वाद निघाला असता शाहू राजांनी अर्ज केला. एकूण २४ हक्कदार होते. या खटल्यात खालच्या कोर्टाने तंजावर वंश हा धर्मशास्त्र दृष्ट्या संस्कार न केला गेल्याने (लग्न ,मुंज सारखे) शूद्र ठरवला व धर्मशास्त्र दृष्ट्या धर्मपत्नी नसलेल्या व्यक्तीचा अधिकार मान्य केला. यावर शाहु राजांनी अपिल केले व आपल्या घरात कित्येक वर्षे वेदोक्त विधी बंद होते म्हणून आपणही शूद्र आहोत असा मुद्द्दा मांडला. मद्रास हायकोर्टातून निकाल आला. कोल्हापुरचे वेदोक्त प्रकरणही हायकोर्टात निघाले.. ब्राह्मण ज्या पद्धतीने विधी करतात तोच महाराजांना हवा होता. शककर्त्या शिवरायांचाही तसा आग्रह नव्हता. क्षत्रियांस उचित असे विधी गागाभट्टांनी ठरवले त्या प्रमाणे विधी होत. त्यास व प्रायश्चित्तास कोल्हापुरचे महाराज तयार होते तर वाद तेव्हाच मिटला असता .

"तेव्हा क्षत्रिय संभाळणे हे मुख्यत: यजमानांच्याच हाती आहे.कोल्हापुरच्या महाराजांनी त्यात चूक करून पुन्हा उपाध्यायाला आपल्या म्हणण्याप्रमाणे वाकवण्यासाठी कामावरुन काढून टाकले व जप्ती आणण्याचा अन्याय केला " असा अप्रत्यक्ष शेरा मद्रास च्या हायकोर्टाने मारला. शिवरायांप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन वेदोक्त विधी सुरू करावेत काही काळ विधी केले नाहीत म्हणून त्यांचे क्षत्रियत्व रद्द होत नाहि व ते शूद्र ही ठरत नाहीत असे कोर्टाने सूचित केले.

मद्रास हायकोर्टाचा निकाल सुमारे २२५ पानांचा असून तो इंडियन लॉ रिपोर्टरच्या मद्रासच्या १९२५ च्या vol x L VIII मधे दिलेला आहे. सर्वांत गंमत हि की क्षत्रीयत्वासाठी भांडणार्य़ा महाराजांनी ब्राह्मणांप्रमाणे वेदोक्त विधी सुरू केले. ते अद्याप तसेच चालु आहेत. हायकोर्टात मधे काही काळ मुंजी वगेरे वेदोक्त विधी झाअले नव्हते असे पुराव्यातून निष्पन्न झाले त्यामुळे कोल्हापुर घराणे क्षत्रिय का शूद्र याचा निर्णय देऊ नये अशी विनंती राजांतर्फे करण्यात आली. तशी नोंद निकालात स्पष्टपणे करण्यात आली आहे. महाराजांच्या मृत्युनंतर धर्मविधींपुरते छत्रपती ब्राह्मण पद्धतीने वेदोक्त करतात व त्यापुरते ते ब्राह्मण झालेत आणि हे त्यांनी सुरू केलेले ब्राह्मण पद्धतीचे विधी मराठा पुरोहित करतात.

१९१८ ला युवराजांचे लग्न सयाजीरावांच्या नातीशी ठरले. त्यांनी आवश्यक असलेले प्रायश्चित्त घ्यावे असे सुचवले. ७५ वर्षात कोल्हापुरच्या औरस वारसाचा विवाह होणार तेव्हा परंपरेप्रमाणे पहिले केळवण राजोपाध्ये यांचे व्हायचे. त्याप्रमाणे राजोपाध्येंना राजांचा निरोप गेला. पण राजोपाध्ये यांनी मी आता राजोपाध्ये नसल्याने ते शक्य नाही असे कळवले. तेव्हा राजे स्वत: त्यांना भेटले.शेवटि केळवण हि झाले. रितसर प्रायश्चित्त ही राजांनी घेतले. राजोपाध्येंच्या व त्यांच्या मुलाच्या देखरेखीखाली सर्व विधी कोल्हापुर व बडोदे येथे झाले. त्यावेळी १६ कायदेकरी ब्राह्मणांपैकी एकाने आपले जप्त उत्पन्न सोडावे म्हणून अर्ज केला तो मन्य झाला. सर्वांची उत्पन्ने सोडण्याचे मान्य करून छत्रपतींनी आपल्या मनाचा थोरपणा दाखवला. मात्र राजोपाध्ये आणि अन्य ब्राह्मणांनी आमची चूक नसता आम्ही अर्ज का करावा अशी भूमिका घेतली व अर्ज केले नाहीत .पुढे महाराजही हि गोष्ट विसरले व कोणाचीही उत्पन्ने सुटली नाहित.

केसरीचा राजोपाध्येंना सल्ला काय होता?

"...कोल्हापुर येथले राजोपाध्ये यांच्या मूळ सनदा कशा आहेत ते आम्हाला बरोबर माहित नाही. - राजोपाध्ये यांना आमची सूचना आहे की महाराज परत आल्यावर त्यांचे पुढे हे प्रकरण पुन्हा मांडावे व निस्पृह रितीने त्यांची समजूत घालण्याची खटपट करावी आणि ते नच जुळले तर हे प्रकरण इंग्रज सरकार कडे न्यावे. दिवाणी किंवा फौजदारि हक्क देणे ही राजांच्या खुषीतील गोष्ट आहे. पण मामुल वहिवाटीप्रमाणे उपाध्येपण करण्यास तयार असता इनाम गाव काढून घेणे महाराजांच्या खुषीतील अधिकारातील गोष्ट नाही."

राजोपाध्ये हे नामदार गोखले यांचे वर्गमित्र असून राजकिय दृष्ट्याही टिळक पक्षिय नव्हते. टिळकांचा त्यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. केवळ जी माहिती उपलब्ध होत असे त्यातून टिळकांनी भूमिका मांडली. त्यात विधायक सुधारक आणि न्यायाची बूज राखणे एवढाच आधार होता.

इंग्रजांची भूमिका

परंतु राजोपाध्यायांनी टिळकांची सूचना न मानता छत्रपती येण्याअगोदरच राजांनी लंडनला जाण्यापूर्वी नेमलेल्या संस्थानाच्या काळजीवाहू कौन्सिल कडे जप्तीच्या फेरविचारासाठी अर्ज केला. कौन्सिल ने तो फेटाळला. त्यवर राजोपध्ये यांनी तो संस्थानच्याच पोलिटिकल एजंट कडे अपिल केले. एजंट ने महाराजांच्या अखत्यारीतला विषय म्हणुन नाकारले. शेवटि राजोपाध्ये यांनी मुंबईच्या गव्हर्नर कडे अर्ज केला. त्यावेळी लॉर्ड नॉर्थकोट हा गव्हर्नर होता. त्याने प्रथम राजोपाध्ये यांच्या बाजूने निकाल दिला. तेवढ्यात शाहु राजे लंडनहून परतले व त्यांनी गव्हर्नरची भेट घेऊन हा निकाल फिरवायला लावला. हा निकाल महाराजांच्या हुषारीमुळे फिरला असे त्यांचे पहिले चरित्रकार कोल्हापुरचे दिवाण लठ्ठे यांनी शाहू मेमॉयर्स भाग १ पृ २०८ वर दिलेल्या टिपात म्हटले आहे.

यानंतर राजोपाध्ये यांनी व्हाइसरोय लॉर्ड कर्झन कडे अर्ज केला. पण २-३ वर्षे फ्रेजरने तो दाबून ठेवला. ५-०१-१९०५ ला नामदार गोखले यांच्या सांगण्यावरुन उपाध्यायंनी पुन्हा अर्ज पाठवला. तेव्हा सर्वच कागदपत्रे मागवली गेली. त्यावर फ्रेजर ने एक टिपण करून पाठवले त्यावरुन इंग्रजांनी जातीय वाद वाढवणे , कर्झन विरुद्ध फाळणीविरुद्ध टिळकपक्षीयांनी उठवलेल्य रानाला खीळ घालणे व फॊडा आणि झोड या कुटिल राजकारणाचा डाव खेळणे कसे साध्य केले ते दिसेल.

या टिपणाच्या सुरुवातीला आलेल्या वाक्यांचा भावार्थ - " मी या केसचा विचार करताना मझे एकेकाळचे पाल्य म्हणून शाहू छत्रपतींकडे ओढा असल्याने त्यांचा पक्षपती म्हणून विचार करत आहे हे कबुल करतो."

याच टिपणात फ्रेजर म्हणतो, " सनदेच्या अर्थासंबंधि शंका असेल तर मला वाटत की राजकारणाच्या दृष्टिने आपण याचा विचार केला पहिजे. जर राजोपाध्येला पूर्ण चेचला नाही तर सरकारची इभ्रत जाईल आणि महाराजांचा पराभव होईल."

अशा प्रकारे हा न्यायाचा प्रश्न न रहाता इंग्रजांची इभ्रत व राजकारण यांचा प्रश्न झाला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला खतपाणी घालून ,फोडा अणि झोडा चे तंत्र येथेही इंग्रजांनी वापरायचे ठरवले.

राजोपाध्ये कर्झनला पाठवलेल्या पत्रात म्हणतात, "वेदोक्ताची चळवळ या नावाने काही उपद्य्वापी लोक समाजात विसरल्या गेलेल्या जातीय तेढी पुन्हा पेटवून स्वत:चा फायदा होतो का ते पहत आहेत. लावालाव्या करून चुकीचे अर्थ सांगून छत्रपतींचे मन कलुषित केले गेले आहे. राजांविषयी आदर राखुन मी सांगूतो की याने अन्यायकारक सामाजिक बिघाड झाला आहे."

"राजोपाध्यायांनी महाराजांना शूद्र म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हटले " असा खोटा प्रचार जाधव व अन्य सत्यशोधकांनी केला. ब्रिटिशांनी टिळक पक्षियांवर सूड उगवण्यासाठी त्यास उचलून धरुन ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वादाला खतपाणी घातले. ब्राह्मण वर्गाला अन्य समाजापासून फोडायचे त्यांना राजकारणास फायद्याचे होते. असे असले तरी इंग्रजांना हा वाद जातीय नाही हे माहित होते. याबाबत हिंदुस्तान सरकारच्या सेक्रेटरीला मुंबई सरकारचा सेक्रेटरी सी.एच.हिल याने ३ मार्च १९०५ ला एक पत्र लिहिले त्याच भावार्थ,

"कोल्हापुरचे महाराज हे क्षत्रिय आहेत हे राजोपाध्ये पत्रातच म्हणत आहेत.आणि ते तसे म्हणत नाहित असे म्हणण्याचा काहिंचा प्रयत्न या वादाच्या मूळाशी आहे. राजोपाध्ये ४ थ्या उतार्‍यात म्हणतात, मराठी राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या वेळेपासून कोल्हापुरचे राजघराणे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार आहे , त्यात कोणताही वाद नाही."

समाजात जातीय गैरसमज पसरवण्याचे कार्य त्यांनी पद्धतशीर पणे केले. आणि शाहू महाराज आणि त्यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांनाही या वादात काहीही संबंध नसताना गोवले गेले. मूळ काय आहे हे न वाचताच अद्यापहि या प्रकरणला जातीय रंग दिला जातो..भले भले लोक याला बळी पडतात तर सामान्यांची काय होत असेल अवस्था?.

संदर्भ :- वेदोक्त ,शाहूमहाराज आणि टिळक, लेखक: कै.ग.रं.भिडे (कोशकार भिडे)


संदर्भ :- वेदोक्त ,शाहूमहाराज आणि टिळक, लेखक: कै.ग.रं.भिडे (कोशकार भिडे)


मुखपृष्ठ
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-१

वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-२
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-३
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-४


टिळकांचा शाहूंच्या अभिनंदनाचा लेख: करवीर क्षेत्री राजकिय कपिलाषष्ठीचा योग


सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...