Monday, February 20, 2017

कॉंग्रेसमुक्त भारतचा अर्थ


पंतप्रधान मोदी यांच्या कॉंग्रेसमुक्त भारत या अभियानाचा अर्थ काय असावा?

सर ऍलन ह्युम या ब्रिटीश अधिकाऱ्याला १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात बाईचा वेष करुन लपत छपत पळुन जाऊन जीव वाचवावा लागला होता. या सशस्त्र उद्रेकाचा त्याने चांगलाच धसका घेतला. भारतीयांनी परत असा उठाव केला तर ब्रिटीशांच साम्राज्य भारतावर रहाणार नाहीच आणि फार मोठी जिवितहानी पण होईल हे त्याच्या लक्षात आल.

भारतीयांचा उद्रेक जर साठत गेला तर एक दिवस स्फोट होऊन विनाश अटळ हे त्याने ओळखले व भारतीयांच्या असंतोषाला वाट मिळावी या उद्देशाने त्याने भारतीय र्कॉंग्रेसची स्थापना केली. तिचे वर्णन त्याने कुकरची वाफ जाण्यास जो सेफ्टी वॉल्व्ह असतो त्याप्रमाणे केले.

सुरुवातीला कॉंग्रेसचे स्वरुप सेफ्टी शिटी सारखेच होते. कॉंग्रेस मधला मवाळ वर्ग ब्रिटीशांचे राज्य म्हणजे ईश्वरी कृपा समजत असे. अर्थात याचा अर्थ हे मवाळ लोक ब्रिटीश राजनिष्ठ असले तरी त्यांचे देशावर व देशवासियंवर प्रेम नव्हते असे नाही आणि त्यांनी काहीच काम केले नाही असा मात्र नाही. न्यायमुर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सारख्या मवाळांनी भारताची बाजू चांगलीच लावुन धरली यात शंका नाही पण हे सारे मालक व नोकर किंवा कामगर यांच्यातल्या हक्कांच्या लढ्यासारखे होते. मीच मालक होणार असा मवाळांचा दावा नव्हता.

टिळकांचा जहाल पक्ष व सशस्त्र क्रांतीकारक यांना ब्रिटीश आपल्यावर राज्य करतात हेच नको होते.

टिळकांच्या पश्चात सन १९२० ला गांधींकडे देशाचे नेतृत्व चालुन आले. गांधी गोखले यांचेच शिष्य असल्याने मवाळ . पुर्वायुष्यात तर ते ब्रिटीश निष्ठ च होते.
गांधी कॉंग्रेसचेच सर्वैसर्वा झाल्यावर मवाळांचेच याचकाचे धोरण पुढे गेले आणि टिळक पक्षाचा कॉंग्रेसमधुन अस्त झाला.

गांधी आधीपासुन क्रांतीकारी पक्षाचे विरोधक होतेच. लंडनमधल्या इंडिया हाऊस व सावरकरांना भेटल्यावर त्यांनी लिहिले की मी तेथील ब्रिटीश विरोधी व्विषारी वातावरण पाहून दचकलो व तेथुन मागे परतलो. तिथेच त्यांनी मारो-काटो का पंथ या नावे एक पुस्तकही लिहिले होते.

गांधींची भारतीय स्वातंत्र्याची कल्पना साम्राज्यांतर्गत स्वराज्य एवढीच होती. ब्रिटीशांच्याच कृपाछत्राखाली राहून वसाहतीचे स्वराज्य म्हणजे पुर्ण स्वातंत्र्य अशी त्यांची कल्पना होती.

१९२९ ला गांधींनी लाहोर अधिवेशनात पुर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला त्यात हिच कल्पना होती. मात्र या ठरावाला सुभाषचंद्र बोस यांनी उपसूचना मांडली की स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटीश साम्राज्यातून फुटुन निघणे. मवाळ गांधी यावर संतप्त झाले आणि हि उपसुचना रद्द झाली.

नंतर ९ जाने १९३० च्या यंग इंडीयाच्या अंकात गांधींनी लेख लिहिला त्यात स्वातंत्र्य म्हणजे काय यावर स्पष्टीकरण केले. "Colonial self-Government was equivalent to complete Independence."

गांधीजींचेच एकेकाळचे सचिन इंदुलाल याज्ञिक यांनी आपल्या गांधीजींवर लिहिलेल्या पुस्तकात म्हणतात," स्वातंत्र्य या पवित्र शब्दाचा संबंध गांधींजींच्या लाहोरच्या ढोंगी कराराशी जोडणे हे महत्‌पाप आहे."

गांधींनी आपले अन्य एक सेक्रेटरी कृष्णदास यांना अशी आज्ञा दिली की त्यांनी बंगालमध्ये जाऊन ज्या ज्या कॉंग्रेसी शाखात क्रांतीकारी वृत्तीचे लोक कॉंग्रेसमध्ये असतील त्यांची नावे गांधींना कळवावीत. त्या प्रमाणे या नावांची यादी असलेली पत्रे ब्रिटीश सरकारच्या हाती पडत असत व त्यातून ब्रिटीश सरकारला सशस्त्र क्रांतीकारकांचा पत्ता लागत असे.

या गोष्टीचा गौप्यस्फोट १९३५-३६ सली मध्यवर्ती असेंब्लित त्यावेळेचे लॉ मेंबर श्री. एन.एस. सरकार यांनी संतप्त होऊन केला होता.याच सेफ्टी व्हॉल्व्ह धोरणाप्रमाणे १९३९ साली गांधींनी सुभाषचंद्र बोसांनाही कॉंग्रेसमधुन बेदखल केले.

कोंग्रेस ही ब्रिटीशांची या प्रमाणे लाडकी व सेटी वॉल्व्ह असल्याने व त्यांचा हेतुच ब्रिटीश शासन सेफ करणे हा होता. त्यामुळे अर्थातच जे जे लोक त्यांना अनुकुल ठरतील अशांच्या हाती सत्ता सोपवणे त्यांना हिताचे होते व तेच त्यांनी केले.

नेहरु हे माऊंटबॅटनचा खूप भरवसा करत हे तर स्पष्ट च होते व तेच भारताचे पहिले व्हॉईशराय राहिले. भारताची राज्यघटना कशी करायची याची
सल्लामसलत करण्यासाठी नेहरु एप्रिल १९४९ ला ब्रिटनला गेले. कॉमनवेल्थ म्हणजे ज्या राष्ट्रकुलाची किंवा ब्रिटीश कॉमनवेल्थ ची नेहरु पुर्वी थट्टा करित त्याच नेहरुंनी सत्ता हाती येताच कॉमनवेल्थ मध्ये भारताने सामिल होण्याचा निर्णय घेतल हे एक आश्चर्यच होते. ब्रिटीशांच्या राष्ट्र्कुलात रहाण्याने तांत्रिक दृष्ट्या लाक्षणिक अर्थाने का होईना ब्रिटीश साम्राज्याचे प्रभुत्व मान्य करुन ब्रिटीशांचा अहंकार सुखावण्यात आला. भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे डोमिनियन स्टेटस्‌ देणे हा साम्राजय्वादी ब्रिटीशांचा हेतु होता. तो अंतिमत: कॉंग्रेस व त्यातील काही लाडक्या पुढाऱ्यांच्या मदतीने तडीस गेला.

नेहरुंच्या या इंग्लंड भेटीनंतर साम्राज्यवादी ब्रिटिश माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी उद्गार काढले , ’ही योजना फारच नामी आहे आणि मला ती एकदम पसंत आहे. कारण या योजनेमुळे ब्रिटीश राजाची इभ्रत आणि प्रतिष्ठा जगात वाढलेली आहे.’

अद्याप भारत संरक्षण बाबत इंग्लंडच्याच अधिपत्याखाली आहे का काय अशी शंका येते. External affairs department ऐवजी Foreign Department असे नाव भारताने अद्याप का दिले नाही?

पंतप्रधान मोदींना भारत कॉंग्रेसमुक्त करायचा आहे याचा अर्थ भ्रष्टाचार मुक्ती असा आहेच पण जी काही साम्राज्यवादी पाळेमुळे अद्याप भारताच्या स्वातंत्र्याच्या आत छुपेपणे आहेत ती पण नष्ट करणे आवश्यक आहे. ब्रिटीशां सह सर्वच परकिय शक्तींचे व ब्रिटीश पुर्व आक्रमकांचे सेफ्टी व्हॉल्व्ह वा हस्तक म्हणून ज्या ज्या वृत्ती व शक्ती भारतात खूप खोलवर घुसल्या आहेत त्या सर्वांपासून भारत मुक्त करायला हवा आहे. तोच कॉंग्रेसमुक्त भारताचा खरा अर्थ आहे.


Sunday, February 19, 2017

----मराठा/ मराठी/महाराष्ट्रियन समाजाकडे ब्रिटीश कसे पहात होते?----

मायकेल ओडवायर हा पंजाबचा गव्हर्नर, याच्याच काळात जालियनवाला बाग घटना घडली, व त्या घटनेचा सूड उधमसिंग या क्रांतीकारकाने लंडनला जाऊन ओडवायचा वध करुन घेतल. या ओडवायरने हिंदुस्थानाविषयी आपल्या एका इतिहासवजा पुस्तकात काही निरिक्षण नोंदवली आहेत, त्यात तो म्हणतो,

"....या लोकांपैकी अत्यंत शक्तीमान असे मराठे लोक आहेत, त्यांनी मोगलांच्या साम्राज्याला नवव्या भागात सांगितल्याप्रमाणे चांगलाच हादरा देऊन ते साम्राज्य हस्तगत करण्याचा धाडसी प्रयत्न केला. हे मराठे लोक मुंबई इलाख्यात रहातात. त्या इलाख्यातील कोल्हापुर राज्यावर आजही त्या थोर शिवाजीचा वंशज कोल्हापुरचा महाराजा, राज्य करीत आहे. याशिवाय पश्चिम आणि मध्य भारतामध्ये शिंदीया, होळकर, गायकवाड या मराठी राजांचीही राज्ये आहेत, आणि ही ब्रिटीशांची मांडलिक आहेत. ह्या मराठ्यांच्या जातीची लोकसंख्या चाळिस ते पन्नास लाख आहे. पण हिंदुस्थानच्या अथांग जनसागरात ही जमात म्हणजे शिखांप्रमाणे एक अल्पसंख्य जमात ठरते. हे मराठे लोकही शिखांप्रमाणेच अत्यंत शूर आ्णि लढाऊ आहेत. जर कधीकाळी आमच्या सत्तेला (चळवळीमुळे) हादरा बसला आणि ती खिळखिळि झाली तर हे मराठे राजे त्याचा फायदा घेतल्याशिवाय रहाणार नाहीत. पण जसा एका शतकापूर्वी हा मराठा संघ (मराठा कॉन्फिडरसी) यशस्वी झाला तसा या काळी यशस्वी होणे सक्य नाही. कारण त्यांचे नेतृत्व करण्यास आता पुण्याचा ब्राह्मण पेशवा अस्तित्वात नाही."

मराठी ब्राह्मण आणि अन्य मराठी समाज यात फुट पाडण्याचा ब्रिटीशांचा मनसुबा होता. मराठी ब्राह्मण समाज ब्रिटीशांना सलत होता आणि तिला अनुसरुन ब्राह्मणेतर चळवळीला खतपाणी घालुन फोडा आणि झोडा नीतीने महाराष्ट्रातही ब्राह्मणांविषयी वातावरण कलुषित केले गेले यात शंका नाही.

हाच ओडवायर आपल्या याच पुस्तकात अन्यत्र म्हणतो,"....या चळवळीचा शेवट कसा होईल सांगणे अवघड आहे. हिंदु बुध्दीमान वर्गात फक्त मराठा ब्राह्मण हीच एक जात अशी आहे, की तिच्यामागे २०० वर्षांची स्वराज्याची अव्याहत परंपरा आहे. यामुळे याच वर्गाची त्याच्या या दीर्घ अनुभवामुळे स्वराज्याची मागणी शोभुन दिसते....महाराष्ट्र ब्राह्मण मग ते नरम दलाचे गोखले असोत किंवा गरम दलाचे टिळक असोत. ते आज अव्याहत ३० वर्षेपोवेतो अवघ्या हिंदुस्थानात राजकिय चळवळीचे नेतृत्व करत आहेत, याचे कारण त्यांची ही ऐतिहासिक परंपरा आहे...."

मराठी ब्राह्मणांची हि चळवळ मोदुन काढण्याचा आणि ब्राह्मणांविरुध्द इतर समाजाला चार खऱ्या खोट्या गोष्टी सांगून बाजूला करण्याचा ब्रिटीशांचा व त्यांच्या हस्तकांचा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हणण्यास बराच वाव आहे.

असे असले तरी ब्राह्मण वर्ग नेतृत्वासाटी अडुन बसला नाही. तो सातत्याने स्वातंत्र्याच्या चळवळीत कार्यरत राहिला. असे अनेक पुरावे आणि उदाहरणे आहेत. शनिवारच्या लोकसत्ता (१८ फेब्रुवारी २०१७) मध्ये श्री. प्रकाश बाळ यांचाही एका पुस्तकाच परिक्षण करणारा लेख आला आहे. त्यातील एका उताऱ्यात नरहरी गोविंद गणपुले व तळवळकर या दोन मराठी ब्राह्मणांचे जर्मनीतील कार्यासंदर्भात अल्पसा प्रकाश टाकला आहे. या दोघांनी सन १९२२ नंतरच्या काळात जर्मनीत हिंदुस्थान हाऊस ची स्थापना करुन स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे कार्य सुरु केले होते. हा मजकुर ब्राह्मण वर्ग स्वातंत्र्यासाठी कसा सतत संघर्ष मग्न होता त्याचे हे एक उदाहरण आहे.

ब्राह्मण वर्ग आज काहीसा स्वसंतुष्ट आणि आपण बरे आणि आपले काम बरे अशा प्रवृत्तीत गेला आहे किंवा जाणीवपुर्वक घालवला गेला आहे. सर्वच समाजाने या गोष्टीच गंभीरपणे विचार करायला हवा. कोणत्याही प्रकारे अकारण द्वेष एकमेकांत बाळगला नाही तर ते संपुर्ण समाजाच्या प्रगतीला हितकारक ठरेल.

© चंद्रशेखर साने

Image may contain: text

"....या लोकांपैकी अत्यंत शक्तीमान असे मराठे लोक आहेत, त्यांनी मोगलांच्या साम्राज्याला ननव्या भागात सांगितल्याप्रमाणे चांगलाच हादरा देऊन ते साम्राज्य हस्तगत करण्याचा धाडसी प्रयत्न केला. हे मराठे लोक मुंबई इलाख्यात रहातात. त्या इलाख्यातील कोल्हापुर राज्यावर आजही त्या थोर शिवाजीचा वंशज कोल्हापुरचा महाराजा, राज्य करीत आहे. याशिवाय पश्चिम आणि मध्य भारतामध्ये शिंदीया, होळकर, गायकवाड या मराठी रजांचीही राज्ये आहेत, आणि ही ब्रिटीशांची मांडलिक आहेत. ह्या मराठ्यांच्या जातीची लोकसंख्या चाळिस ते पन्नास लाख आहे. पण हिंदुस्थानच्या अथांग जनसागरात ही जमात म्हणजे शिखांप्रमाणे एक अल्पसंख्य जमात ठरते. हे मराठे लोकही शिखांप्रमाणेच अत्यंत शूर आ्णि लढाऊ आहेत. जर कधीकाळी आमच्या सत्तेला (चळवळीमुळे) हादरा बसला आणि ती खिळखिळि झाली तर हे मराठे राजे त्याचा फायदा घेतल्याशिवाय रहाणार नाहीत. पण जसा एका शतकापूर्वी हा मराठा संघ (मराठा कॉन्फिडरसी) यशस्वी झाला तसा या काळी यशस्वी होणे सक्य नाही. कारण त्यांचे नेतृत्व करण्यास आता पुण्याचा ब्राह्मण पेशवा अस्तित्वात नाही."



Image may contain: text


Thursday, February 16, 2017

राष्ट्रपिता नाही महात्मा


माझा गांधी विचार आणि गांधी वाद यांना तीव्र विरोध असला तरी त्यांना उद्देशुन महात्मा हा शब्द वापरायला माझ्या दृष्टीने हरकत नाही कारण तो ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे.

पण एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपिता म्हणताना शंभर नाही लाख वेळा विचार करावा. राष्ट्र हि भावना आणि आणि ती अमर्त्य बाब आहे. तिचा कोणी पिता असु शकत नाही. प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे, शब्द ढिलेपणाने कसाही वापरणे हे त्या शब्दाचे आणि आणि त्या शब्दामागे असलेल्या भावनेचे अवमुल्यन आहे. तेव्हा ऐर्यागैऱ्या कोणालाही राष्ट्रपिता असे संबोधन करु नये अस मला वाटत.

इतिहासाचे अभ्यासक , विश्लेषक गांधींना श्रीयुत गांधी किंवा राजमान्य राजेश्री गांधी किंवा गांधीजी असे म्हणु शकतात. गांधीभक्त महात्मा म्हणु शकतात. पण त्यांना वा अन्य कोणाही व्यक्तीला राष्ट्रपिता संबोधण्याला मात्र माझा तीव्र आक्षेप आहे.

गांधी राजकारणात येण्यापुर्वीच राष्ट्र अस्तित्वात होते हे सिध्द करण्यास फार लांबची साक्ष कशाला? गांधीजींचे राजकिय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांनीच गांधी राजकारणात येण्यापुर्वी पासूनच हे राष्ट्र अस्तित्वात होते , आहे हे नेमस्तांनी केलेल्या कार्याचे वर्णन करताना स्पष्ट केले होते. ते म्हणतात,

" आजपर्यंत नेमस्त रितीने केलेल्या राजकिय चळवळीमुळे, भारत हे एक राष्ट्र असून येथील जनता मुक्त होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करीत आहे, ही गोष्ट आता सर्वांना सुपरिचित झालेली आहे.राष्ट्रीय पातळीवर लोकमत तयार झाले आहे; वेगवेगळ्या प्रांतांमध्ये निकटचे भावबंध निर्माण झाले असून त्यांच्या मध्ये ऐक्य साधले आहे; आपल्या समान उद्दीष्टांच्या जातिधर्माचे आणि विचारांचे भेद कमी येऊ लागले आहेत; आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वाची व प्रतिष्ठेची जाणीव समाजाच्या सर्व थरात निर्माण झाली आहे......"

थोडक्यात देश पारतंत्र्यात असु शकतो पण राष्ट्र पारतंत्र्यात नसते फक्त राष्ट्रीय जाणिवा कमी-जास्त बळकट असतात. राष्ट्र बळकट झाले की देश - पदेश स्वतंत्र होतात. पण राष्ट्राचे अस्तित्व हे असतेच, कोणीही मर्त्य व्यक्ती तिचा पिता असु शकत नाही.

गोखल्यांनी जी स्थिती वर्णन केली आहे त्याचा विचार करता टिळकांनंतर कॉंग्रेसचे मुख्य नेतृत्व करणाऱ्या श्री. गांधींना हिंदु-मुस्लीम ऐक्य साधून एकराष्ट्रियत्व निर्माण करण्यात संपुर्ण अपयश आले. त्यांचे धोरण संपुर्ण चुकले व त्याची किंमत हिंदुंना अतिशय भीषण प्रमाणात मोजावी लागली हे स्वच्छ आहे. आपल्या मुळे इतका हिंसाचार आणि रक्तपात झाला याबदाल एखादी व्यक्ती सुखो वा दु:खोवा समान मानुन स्थितप्रज्ञतेचा आविष्कार दाखवुन महात्मा ठरु शकते, डायरेक्ट ऍक्शन करणाऱ्या शत्रु देशाला पंचावन्न कोटीं रुपये दान देऊन, शत्रूमित्राच्या कल्पनेत अद्वैत दाखवुन तटस्थ नीतीमुल्ये दर्शवुन महात्मेपदाला आणि संतपदाला पोचु शकते. पण अशी व्यक्ती राष्ट्रपिता कशी असु शकते? अंध भक्ती किती करावी याला सुध्दा एक मर्यादा आहे. एका स्खलनशील , हिमायलाएवढ्या चुका करणाऱ्या मर्त्य मानवास राष्ट्रपिता म्हणणे हा राष्ट्रभावनेवर अत्याचारच आहे. जेव्यढ्या लवकर हे संबोधन करणे बंद होईल तेवढा राष्ट्र भावनेचा सन्मान होईल.
© चंद्रशेखर साने

हिंदुंच्या शुध्दीकरणांचा इतिहास

शुध्दीबंदी बद्दल ब्राह्मण वर्गाला अथवा सवर्णांना दोष देत असतानाच परधर्मात बलाने बाटवलेल्या हिंदुंच्या शुध्दीकरणाच्या घटना सुध्दा खुप घडत असत हे पण लक्षात घेतले पाहिजे. शुध्दीबंदी मुळे हिंदुंनी स्वत:चे नुकसान करुन घेतल्याची बरिच उदाहरणे असली तरी अगदी विरुध्द उदाहरणे सुध्दा आहेत.
१.इस्लामच्या आणि ख्रिश्चनांच्या आक्रमणापुर्वी आलेले सर्व शककुशाणादी आक्रमकांनी हिंदु बौध्दादी भारतीय धर्मच स्विकारुन भारतीय संस्कृती स्वीकारुन मुख्य प्रवाहात सामिल होणेच पसंत केले. नंतर मात्र प्रश्न निर्माण झाले.
 सर्वप्रथम सिंधुच्या तीरावर देवल ॠषी नावाच्या एका ब्राह्मणाने मुस्लिम आक्रमकांनी बाटवलेल्या हिंदुंच्या शुध्कदीरणासाठी एक नविन स्मृती लिहिली ती देवलस्मृती म्हणून प्रसिध्द आहे. या आधारे बऱ्याच प्रमाणात हिंदुंना शुध्द करुन घेतले गेले.
२. सेंट झेवियर याने पोर्तुगीझ राजवटीत अनेक बरेवाईट प्रयत्न करुन हिंदुंचे ख्रिश्चनीकरण केले. पण त्याच्या प्रयत्नांना मुख्य अडथळा असे तो ब्राह्मणांचा होता. सेंट झेवियर ने पोर्तुगीझ राजाला हिंदुंच्या बाटववाबाटवीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी एक पत्र लिहिले ते असे,
"..... ख्रिश्चन धर्मप्रसारास मुख्य अडथळा येतो तो येथील ब्राह्मणां लोकांचा होय ! ते आमच्या धर्मप्रसारास पुढे जाऊ देत नाहीत.धी सामान्य हिंदु लोक आम्ही बाटवत जातो पण मागे वळुन पहातो तर हे ब्राह्मण लोक गुप्तपणे मांडवी नावाच्या नदीच्या तीरावर त्या सर्वांना नेऊन त्यांस सांगतात की या नदीत स्नान करुन आम्ही सांगतो श्लोक म्हणा म्हणजे तुम्ही ख्रिश्चन होण्यातले पाप धुवुन निघुन तुम्ही पुन्हा हिंदुंचे हिंदु व्हाल. अशा थापा मारुन हे ब्राह्मण लोक बाटलेल्या हिंदुंपैकी अनेकांना वरिल स्नानाप्रमाणेच इतर अनेक प्रकारे फसवुन शुध्द करुन घेतात. या ब्राह्मणांवर वचक निर्माण करायचा आम्ही प्रयत्न करतो, पण ते त्यास भीक घालत नाहीत."
३.फिरोजशहा तुघलकच्या काळात (सुमारे सन १३५०) दिल्लीतच एक वृध्द ब्राह्मण आपल्या घरात गुप्तपणे मुर्तीपुजा करत असे. त्याचे वागणे अतिशय पवित्र आणि उपदेश सात्विक होता. अनेक हिंदु व अगदी मुळचे मुसलमान सुध्दा त्याच्या भजनी लागले. फिरोजशहा च्या कानावर हे पडले तेव्हा त्याने त्यास अटक केली आणि सर्वांसमक्ष त्याच्या लाकडी मुर्तीसह त्यास चितेवर बसवुन जिवंत जाळले. हि हकिगत त्याच्या दरबारातीलच इतिहासकार झियाउद्दीन बरनी याने आपल्या तारीख ए फिरोजशाही मध्ये लिहुन ठेवली आहे.
४. अल्‌विलादुरी हा दहाव्या शतकातला इतिहासकार लिहितो, "आठव्या शतकातील सिंध मधील मुस्लिम सत्तेस ओहोटी लागली. बहुतेक सर्व हिंदु मुसलमान धर्माचा त्याग करुन पुन: मुर्तीपुजक बनले. मुसलमानांची संख्या घटली त्यामुळे परत बराच काळ इस्लामी सत्ता स्थापन होऊ शकली नाही.
११ व्या शतकानंतर मुसलमानांची सत्ता स्थिरस्थावर होऊ लागली काहींचे मत शुध्दीकरणाच्या प्रतिकुल बनले, पण शुध्दीकरण करणे अवघडही बनत गेले. शुध्द होऊन परत हिंदु बनणाऱ्याला प्राणदंडच असे, राजकिय विजय मिळाल्याशिवाय ब्राह्मण वर्गाला शुध्दीविधी करणे शक्यच नव्हते. त्यांचा कल शुध्दीच्या बाजूने असो वा नसो. शस्त्रसामर्थ्यावाचून व राजसत्तेच्या पाठिंब्याशिवाय एकटा ब्राह्मणा वर्ग हे काम करु शकणे अवघडच होते, व नंतर ब्राह्मणवर्ग पावित्र्य व बाटण्याच्या कल्पनांनी शुध्दीच्या विरुध्द होऊ लागला. पण तरीही लहान मोठी अशी शुध्दी ची उदाहरणे घडतच राहिली.
५. पंजाबात इस्लामच्या स्वाऱ्या सुरु झाल्यानंतर पंजाबी हिंदु ब्राह्मणांनी शुध्दीकरणे सुरु केले. त्याचे एक उदाहरण "उतबी" या मुस्लिम इतिहासकाराने दिली आहे.
६. १३२० साली खिलजींच्या वंशाचा नाश एका मूळच्या हिंदु ने केला. त्याचे हिंदु नाव इतिहाअसाला अज्ञात आहे. याने खिलजींच्या वंशाचा नायनाट करुन सुलतान नासिरुद्दीन या नावाने दिल्लीचे तख्त काबिज केले. हा मुळचा गुजरातह मधील एका लढवैया जातीचा असून, जबरदस्तीने बाटवला गेला होता. याची सर्व माहिती एकतर्फी असून समकालिन मुसलमान तवारिखकारांनी यास शिव्यांची लाखोली वाहीली आहे. याचे मुख्य कारण त्याने हिंदुत्वाचा पुरस्क्कार केला. निम्म्याहून जास्त सैन्य त्याची भरवाड जात व अन्य हिंदु समाज होता.
गोहत्या बंदी , मशिदींच्या पुन: मंदिरे करणे , जिझया रद्द करणे अशी कामे त्याने केले. त्याची शेवटची लढाई तुघलक वंशाची स्थापना करणाऱ्या ग्यासुद्दीन तुघलका बरोबर झाली. सुलतान नासिरुद्दीनची दहशत प्रचंड होती, सुमारे चार महिने त्याने दिल्लीत राज्य केले. गुजराथची राजकन्या देवलदेवी हिलाही त्याने शुध्द करुन घेतले. अमीर खुस्रोने सुलतान नासिरुद्दीन च्या सैन्याची रणगर्जना ही "जय नारायण" अशी होती असे दिले होते.हिंदु बनलेल्या सुलतान नासिरुद्दीन याच्या काही हिंदु नातेवाईक व साथीदारांची नावे जहारिया, ब्रह्म, रन्धोल, कर्कनाग अशी काही नावे तवारिखात नोंदली आहेत. या हिंदु - मुस्लिम लढ्यात प्रथम तुघलकाचा पाडाव झाला होता. केवळ नशिबानेच पारडे उलटुन ग्यासुद्दीन तुघलकाचा विजय झाला. नासिरुद्धीन मारला गेला, त्याची भारवाडी हिंदु नातेवाईक व सैन्य मारले गेले वा गुजराथ ला पळुन गेले.
७. १३३६ च्या आसपास ग्यसुद्दीन तुघलकाचा मुलगा महंमद तुघलक अथवा वेडा महंमत याने हरीहर आणि बुक्क या दोन तरुणांना बाटवले असता, हे दोघे निसटुन दक्षिणेत गेले. तिथे शंकराचार्य पदवरच्या स्वामी विद्यारण्य यांनी त्यांस परत हिंदु करुन घेतले.
हिंदु झाल्यानंतर याच हरीहर आणि बुक्क यांनी विजयानगरचे हिंदुसाम्राज्य स्थापन केले. विजयानगरचे साम्राज्य दक्षिणेत सुमारे अडीचशे वर्षे टिकले. त्यांच्या दक्षिणेतील पाच मुसलमानी पातशाह्यांशी सतत संघर्ष चालत असे.
विजयानगरचा व्यापार जगभर असे , काही परदेशी प्रवाशांनी विजयानगरच्या सम्राटांची माहिती लिहून ठेवली आहे. काही प्रसंगी विजयानगरात दुर्बल हिंदु राजे होऊन गेले. धर्मनिरपेक्षतेचे अवडंबर माजे. विजयानगरचे हिंदु साम्राज्य आटोपेना तेव्हा सर्व पाच पातशाह्यांनी (निजामसाही, आदीलशाही, कुतुबशाहि, बेदरशाही इ.) एकत्र येऊन विजयानगरचा पाडाव केला. या साम्राज्याची अतिशय लांडगेतोड झाली. नरसिंहाची अक्राळविक्राळ मुर्ती हे विजयाकगरचे दैवत आजही भग्न अवस्थेत पहावयास मिळते.

८. मेवाडचा बाप्पा रावळ याने सिंध प्रांत जिंकुन घेतलाच, पण तेथील मुसलमान राजकन्येशी, मुळ मुसलमान असलेल्या राजकन्येशी, विवाह करुन तिला आपल्या अंत:पुरात स्थान दिले. कोणतीही अडचण ब्राह्मणांनी याविषयी निर्माण केली नाही. इतकेच नव्हे तर या हिंदु करुन घेतलेलय मुसलमान राजकन्येला झालेली संतती शुध्द राजपुत सुर्यवंशाचीच मानली गेली.
९. जेसलमीरच्या रावतचेचकांनी सुलतान हैबतखानाच्या मुलीशी लग्न केले आणि हिंदुसमाजात पचवुन टाकले. कसल्याही बाटण्याच्या अपवित्रतेच्या भानगडी उपस्थित झाल्या नाहीत.
१०.मारवाडच्या राजा रायमलने मुस्लिमांछा पाडाव करुन सहाशे मुस्लिम स्त्रियांना सामुदायिक शुध्हिंदीकरण करुन दु करुन घेतले आणि त्यांचे विवाह आपल्या वेगवेगळ्या सरदारांशी लावुन दिले.
११. मारवाडचाच कुंवर जगमल याने माळव्याच्या सुलतानाचा पराभव करुन त्याच्या शहजादीला हिंदु करुन घेतली व तिच्याशी विवाह केला. झालेली संतती राजपुत रक्ताचीच म्हणूनच वाढली.
१२.मेवाडच्या राणा कुंभ याने मुसलमानांचा पडाअव करुन अनेक स्त्रियांना हिंदु करुन त्यांच्याशी हिंदुंशी लग्ने लावुन हिंदुत्वात यशस्वी पणे विलिन करुन टाकले.
१३.नेपाळचा राजा जयस्थिती याने बंगालच्या नबाबाने शम्सुद्दीन याने नेपाळवर १३६० च्या आसपास केलेल्या स्वारीचा आणि धार्मिक उत्पाताचा सूड म्हणून युध्दात मुसलमानांना चीत केले आणि सर्व बौध्द विहार आणि हिंदु मंदीरे परत बांधली, बाटवलेल्या सर्वच्या सर्व हिंदु बौध्दांना शुध्द करुन नेपाळ निर्मुस्लिम करुन टाकला.
१४.तवारिख इ सोना या तवारीखेत मुसलमान इतिहासकार लिहितो, महंमद गझ्नी च्या स्वाऱ्यांच्या वेळी सुध्दा अनहिल्वड्याच्या राजाने गझनीच्या सैन्यात मागे राहिलेल्या अनेक तुर्की, मोंगल व अफगाण स्त्रियांना पकडुन नेले, आणि नि:शंकपणे हिम्दुंनी त्यांच्याशी लग्ने लावुन त्यांना मुर्तीपुजक बनवुन टाकले. (हि तक्रार आहे अर्थातच)
१५. अजमेरच्या अरुणदेवराय याने मुसलमान आक्रमकंचा पराभव करुन हुसकावुन लावल्यावर एक मोठा यज्ञ केला. याच स्थळि एक मोठे मंदिर व अनासागर नावाचे सरोवर बांधले. आजूबाजूच्या भागातले सरसकट सर्व बाटलेल्यांना या सरोवरात स्नान घालुन शुध्द करुन परत हिंदु करुन घेण्यात आले.
१६. हरीहर आणि बुक्क यांना शुध्द करुन घेणऱ्या शंकराचार्य विद्यारण्य यांनी माधवतीर्थ नावाचे सरोवर बांधून तिथे हिंदुंचा शुध्दीकरण विधी चालु र्हावा अशी व्यवस्था लावुन दिली.
१७. श्रीरामानुजाचार्य त्यांचे शिष्य रामानंद व बंगालमधील श्री चैतन्य प्रभु यांनीशतावधी बाटलेल्या हिंदुंना वैष्णव धर्माची दीक्षा देऊन पुन: शुध्द करुन घेतले.
१८. सन १२०८ पासून चुकुक नावाच्या राजाची राजवट आसामवर चालु झाली. त्यांनी मोगलांना अत्यंत यशस्वी तोंड दिले. या टोळ्यांमधील अत्यंत लढाऊ जात म्हणजे अहोम. आसाममध्ये ज्या काही अहोम, शान इत्यादी टोळ्या होत्या त्यांनी हिंदुंच्या अत्यंत पडत्या काळात म्हणजे सन १५५४ मध्ये हिंदुधर्माचा स्वीकार केला. ज्या राजाने प्रथम हिंदु धर्म स्वीकाराला त्याने क्षत्रिय वर्णातील सिंह हि उपाधी लावुन जयध्वजसिंग हे नाव धारण केले. यांनी व अन्य आदीवासी टोळ्यांनी आसाममध्ये हिंदु धर्मासाठी खूप मोलाची कामगिरी केली आहे.
१९.शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर, निंबाळकर यांना शुध्द करुन घेतले हे तर प्रख्यात आहेच. त्याव्यतिरिक्त सक्तीने बाटवल्या गेलेल्या बाजीप्रभु देशपांडे यांच्या मुलालाही हिंदु करुन घेतले.
२०. शुद्धीकरणासाठी शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र यंत्रणाच उभी केली होती. गोव्यातील मिशनरी हिंदुंची सक्तीने बाटवाबाटवी करत त्यास महाराजांनी सज्जड दम दिला. ते ऐकेनात तेव्हा गोव्यावर स्वारी केली व चार पाद्री लोकांची मुंडकी धडावेगळी केली. भिवंडीतल्या काही मशिदी सुध्दा धान्याचे कोठार म्हणून वापर्ण्यास सुरुवात केली. दक्षिण दिग्विजयात हिंदुंच्य मंदिरांच्या मशिदीत रुपांतरण झाले होते त्यांची परत मंडिरे केली गेली.
२१. संभाजी महाराजांनी रंगनाथ कुळकर्णी नावाच्या एका गृहस्थाला शुध्द करुन घेतले होते.
२२. संभाजी महाराजांच्याच समकालिन , मराठ्यांवर चालुन येण्या आधी औरंगजेबाने राजपुतांचा समुळ नाश करण्यासाठी आक्रमण केले. जोधपुर संस्थानाचा वीर सेनापती दुर्गादास राठोड याने सर्व मशिदी पाडून त्या ठिकाणी परत मंदीरे उभारली. औरंगजेबाने नव्यानेच बाटवलेल्या हिंदुंनाच काय पण शक्य तितक्या मूळच्या मुसलमानांनाही दुर्गादस ने शुध्द करुन हिंदु करुन घेतले. मुस्लिम स्त्रियांना शुध्द करुन एकतर त्यांची लग्ने राजपुतांशी लावली किंवा मुसलमान जसे करत तसे गुलाम केल्या गेल्या. मुसलमान जसजसे देवळातुन गायी कापत जात त्या प्रत्युत्तर म्हणुन दुर्गादास मशिदीमशिदीतून डुकरे कापत जात असे. त्याचे ते रौद्र स्वरुप पाहुन मुसलमान समाज तर गर्भगळित झालाच, हिंदु समाजात पण जागृती होऊन रोटीबंदीचा विधिनिषेध कोणी बाळगु लागेनासा झाला. सहवासाने वा खाण्यापिण्याने आपला धर्म बुडतो हि मानसिकता दुर्गादासच्या काळात नष्ट होऊन गेली.सुमारे तीस ते चाळीस वर्षे दुर्गादास राठोडांचा कार्यकाळ होता. मात्र दुर्गादास च्या पश्चात हे सर्व धार्मिक क्रांती परत ओसरुन हिंदु समाज मुळ पदावर आला हे सांगणे नकोच.
२३. तंजावरच्या भोसल्यांनी राज्यकाअरभारात आणि प्रदेशात बराच गोंधळ माजु लागला तेव्हा एक वटहुकुम काढुन सर्व धर्मांतरीतांना परत हिंदु होण्यास फर्मावले.
२४. पेशव्यांच्या काळातही शुध्दी होत असे, मात्र अति चिकित्सा असे. पेसवाईच्याच काळात निर्मळ क्षेत्रातल्या ब्राह्मणांनी टवलेल्या अनेक लोकांस शुध्द करुन घेतले. शुध्दीकरणाच्या खर्चासाठी मराठ्यांनी एक करच बसवला होता असे वसईचे डॉ. कुन्हा म्हणतात.
२५. विष्णुबुवा ब्रह्मचारी(१८२५-१८७१):- ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या हिंदु धर्मावरील आक्रमणाला प्रारंभी पायबंद घालणारे हे स्वतंत्र विचाराचे हिंदु मिशनरी होत. पूर्ण नाव विष्णु भिकाजी गोखले मूळ्चे ठाणे येथील राजापुर तालुक्यातील शिखली गावाचे.काही काळ नोकरी व अन्य व्यवसाय केल्यानंतर उपरती होऊन ते सप्तशृंगीच्या डोंगरावर तप:श्चर्या करण्यास गेले असता त्यांना पाखंड मताचे खंडन करुन वैदिक धर्माचा प्रसार करण्याचा आदेश मिळाला. तेव्हापासून त्यांनी व्याख्यानांचा दौरा काढला व मुंबईस आले. मुंबस ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आक्षेपांना आपल्या व्याख्यानांतून सडेतोड उत्तरे देत असत.प्रथम बंदिस्त जागेत व्याख्याने देत पुढे लोकांची गर्दी वाढु लागली असता जागा अपुरी पडून समुद्रकिनार्‍यावर व्याख्याने होऊ लागली.१८५७ च्या स्वातंत्र्य समत्राच्या कालावधीत ब्रिटिश सरकारने यांना भाषणे देण्यास बंदी घातली असता त्यांनी "वेदोक्त धर्मप्रकाश" हा ग्रंथ लिहून आपले म्हणणे सर्वांपुढे मांडले.रोटीबंदीला ते मुळीच जुमानत नसत. १८५६ मधे "भावार्थसिंधु" हा ओवीबद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला. भगवद्‌गीतेवरील सेतुबंधनी टीकेचा अठरावा अध्याय लिहिणे चालू असताच ते मरण पावले.आपल्या मतचा प्रसारार्थ त्यांनी मद्रास, कलकत्ता या भागांतही प्रवास केला होता.
२६ . पाचलेगांवकर महाराज हे हैदराबाद च्या जुलमी निजामशाही विरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढलेले गुरू होत. यांचा जन्म ८/११/१९१२ या दिवशी पाचलेगावी ता. जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्यात झाला. श्री राजारामपंत कुळकर्णी आणि सौ. कृष्णाबाई उर्फ भागाबाई असे त्यांच्या पालकांचे नाव होते. त्यांचे नृसिंह असे नामकरण झाले. श्री नृसिंह स्वरस्वती हे त्यांचे गुरू होत. त्यांच्या कार्यास बोरी या मराठवाड्यातील गावी जाऊन गाडगेबाबा, दासगणू महाराज आणि जगतगुरु शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांनी पाठिंबा दिला होता. पाचलेगांवकर महाराज जातीभेदाच्या विरोधात प्रवचने देत. व्यायाम, शक्ती आणि एकजूट यावर त्यांचा भर असे. निजामाच्या विरुद्ध प्रचार केल्याने त्यांना इ.स.१९२८ मध्ये हद्दपार करण्यात आले.
कार्याची त्रिसूत्री
१.देशाच्या स्वातंत्र्यासाठी व उन्नतीसाठी अन्याय प्रतिकार नि न्याय रक्षक अशी कर्तृत्वशाली जनशक्ती जाग्रत करणे.
२.एका कार्यक्षम बलवान जनशक्तीला योग्य वळण देणे.
३.अराष्ट्रीय वृत्तीने भरलेल्या लोकांचे संख्याबळ शुद्धीच्या द्वारे घटवून संभाव्य संकटाच्या खाईतून देशाला वाचविणे.
कार्य विस्तार
हे कार्य करण्यासाठी त्यांनी मुक्तेश्वर दलाची स्थापना केली. हे दल पुढे बाबाराव सावरकर यांनी स्थापन केलेल्या तरुण हिंदुसभा या संस्थेबरोबर एकत्रित कार्य करु लागले. त्यांनी सावरकरांची व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर त्यांच्या कार्याने प्रेरित झालेली जनता पाहून ब्रिटिशांनीही त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले. महाराज भुमीगत झाले व त्यांनी भारत भ्रमण केले.
धर्मांतरास विरोध
महाराजांनी हिंदूंच्या ख्रिस्ती व मुस्लीम धर्मांतरास कडडून विरोध केला. मिरज येथे त्यासाठी जनजागृती केली. हिंदु महासभेच्या शाखा त्यासाठी स्थापन केल्या. मे १९४१ मध्ये ग्वाल्हेर येथे हिंदुराष्ट्र सेना स्थापन केली. जातीभेद विरहित सहभोजने, हिंदू संघटन आणि शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक यावर भर दिला जाई. ख्रिश्चनांनी अनेक प्रकारे धर्मांतर केलेल्या लोकांना परत हिंदू करून घेतले. खांडवा व जबलपूर जिल्ह्यात प्रचार करून १२०० गावातील हजारो लोकांत प्रचार करून ख्रिस्ती प्रसाराची लाट थोपवली. तेथेही अनेक लोकांना स्वधर्मात घेतले. विशेषतः याच काळात कडवा मिशनरी फॉनवेल हा महाराजांचे कार्य पाहून चकित झाला. हिंदू तत्वज्ञान त्याने समजून घेतले. व तो ही हिंदू होण्यास उत्सुक झाला. यास सहकुटुंब शुद्ध करून घेतले. एक शाळा स्थापन करून फॉनवेल यास शिक्षक म्हणून तेथे नियुक्त केले गेले. बऱ्हाणपूर येथे मुस्लीम पंथीयांनी बाटवलेल्यांना स्वधर्मात घेण्यासाठी २२ ते २४ मार्च १९४५ रोजी एक संगठन यज्ञ घेतला. यासाठी एक लाखाहून अधीक लोक उपस्थित होते. यावेळी १५० कुटुंबांना स्वधर्मात घेतले गेले. सावरकर, भाई परमानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जुगलकिशोर बिर्ला, अनेकांचे शुभेच्छा संदेश त्यासाठी आले होते. तत्कालिन शिक्षण मंत्री (मध्य प्रदेश) श्री बाबासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेत यज्ञाचा समारोप झाला होता.
क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या आग्रहावरुन व चर्चा विनंतीवरुन पाचलेगावकर महाराजांनी आपल मुक्तेश्वर दल राष्ट्रिय स्वयंसेवक संघात विलिन केल आणि संघ शक्ती वाढवण्यास मोलाचा हातभार लावला.

२७. मसुरकर महाराज
धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर हे धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींचे स्त्रोत होते. मसुरकर महाराजांनी 'मसुराश्रम' या आश्रमाची स्थापना १९२० साली गोरेगाव पूर्व, मुंबई येथे केली. त्यांनी समर्थ संप्रदायाचा प्रसार केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बलवान स्वातंत्र्य सैनिक तयार करण्यासाठी सूर्यनमस्काराची उपासना व दासबोधाचे वाचन ही मसूरकर महाराजांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली मोहीम होती. मसुरकर महाराज यांना भेटण्यासाठी सुभाषबाबू सन १९३१ साली कराड येथील मसुराश्रमाच्या शिबिरात आले होते. रत्नागिरी येथे १९३१ साली पतितपावन मंदिराची स्थापना झाली. त्या वेळी स्वामी मसुरकरमहाराजांची व संतश्रेष्ठ गाडगेमहाराजांची भेट झाली.
धर्मांतरास विरोध
मसुराश्रम येथे गुजरात व गोवा येथील ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे मोठे कार्य केले व करत आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार व बलोपासनेचाही त्यांनी पुरस्कार केला. शुध्दी चळवळीला एक दिशा देण्याचे काम केलेले मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथजी, वामनमूर्ती व इतर अनेकांनी केले. युखॅरिस्ट काँग्रेस, वादग्रस्त फादर फेरार प्रकरण, केरळमधील नन्सच्या विक्रीचे स्कँडल, भिवंडीची व जळगावची दंगल, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेले भारताचे विभाजन प्रयत्न, आंध्रच्या किनारपट्टीवर मिशनऱ्यांनी ‘ख्रिस्तस्थान’ तयार करण्याची केलेली रचना या विरोधात आश्रमाने कार्य केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस घेऊन येणारा गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी त्यांनी जनजागृती केली. स्वागतयात्रा, शोभायात्रा आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. या मध्ये पारंपरिक ध्वजपथक, लेझीम, मानवी मनोरे, तलवारबाजी, मंगळागौर असे देखावे उभारण्यात मसुराश्रम अग्रणी आहे. तसेच मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन (गोरेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही येथे केले गेले आहे. पांडुरंगवाडीत रसिकांसाठी "दीपावली स्वरप्रभात", "पहाटराग मैफल' आयोजित केली जाते. यात शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात. मंगला पाध्येंचे शास्त्रीय गायन यात झाले आहे. तसेच डॉ. भालचंद्र फडणवीस यांचे संतुरवादन सादर झाले आहे. येथे 'हिंदु युवा संघटन मेळावा' आयोजित केला जातो. संस्कार भारती-गोरेगाव आणि मसुराश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यानेही आयोजित केली जातात.
पुस्तके
होय आम्ही हिंदू झालो मनोरमा प्रकाशन



Wednesday, February 15, 2017

मी परंपरावादी सुधारक

मी परंपरावादी सुधारक आहे. परदेशी संस्कृती आयात करुन इथे जे निर्माण झालय ते नष्ट करण्यापेक्षा आहे तीच संस्कृती , प्रथा व परंपरा यात कालानुरुप सुधारणा करण्याच्या मताचा मी आहे.
भारतीय संस्कृतिच्या वटवृक्षाची पाळेमुळे या मातीत खोल अशी हजारो वर्षे रुजलेली आहेत. या महावृक्षाखाली अनेक पिढ्या उत्तम व सुखी आयुष्य जगत आल्या आहेत. अशा सांस्कृतिक वृक्षाच्या छायेत बांडगुळे , परजीवी तयार झाली असेल तर ती निपटुन काढण, तण माजले असेल ते साफ करणे , झाडाला किड लागलेली असेल तर योग्य ती औषध फवारणी करण हे जास्त मान्य आहे.
पण आहे ते सगळच वाईट, आमचा प्रत्येक सण वाईट , आमची प्रत्येक गोष्ट पर्यावरणाला हानीकारक मानून हवामानाला न मानवणाऱ्या परकिय रोपट्यांची हट्टाने लागवड करण, आमचे पूर्वज मुर्खच , त्यांना काहीच कळत नव्हत अस मानून आयात केलेल्या विचारांना समाजावर थोपवण आणि स्वकियांची निंदा आणि पुर्वजांची नालस्ती करण यात काही पुरुषार्थ आहे अस मला वाटत नाही. व्यक्तीगत आयुष्यात मी नास्तिक आहे, मी स्वत:ला पुरोगामी विचारांचाच मानतो. विवेकवाद व बुध्दीवादाचा मी चाहता आहे.
माझा हा विवेकवाद मला स्वत:च्या संस्कृतीचा विध्वंस करायला शिकवत नाही तर विधायक विचार करायला शिकवतो.
©चंद्रशेखर साने

लाला हरदयाळ व गदर पार्टी


लंडनमध्ये अभिनव भारताने काम केले तसे लाला हरदयाळ यांनी १९१५ च्या सुमारास स्थापन केलेल्या गदर पार्टीने भारतीय स्वातंत्र्य लढयात मोलाचा सहभाग घेतला.

लाला हरदयाळ हे गदर पर्टीचे संस्थापक. सावरकरांप्रमाणेच तेही शामजी कृष्ण वर्मांच्या सहवासात आले व कट्टर राष्ट्रवादी बनले पुढे अमेरिकेत जाऊन त्यांनी गदर पार्टीची स्थापना केली व अमेरिकेत सुध्दा इंडिया हाऊस निर्माण केले.
गदर पार्टीनेच सावरकर कोलु फिरवत आहेत असे काल्पनिक चित्र काढुन अमेरिकेत वाटले होते आणि आवाहन केले कि आपले देशबंधु अंदमानात पिसत असताना तुम्ही देशासाठी काय करणार आहात?

अभिनव भारत प्रमाणेच गदर पार्टीच्या नेयांनी सैंन्यात बंड घडवुन आणण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरुन सिंगापुर येथील ब्रिटीश सैंन्याच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. सुमारे सातशे सैनिकांनी या उठावात भाग घेतला. बारा ब्रिटीश अधिकारी यात ठार झाले. मात्र शेवटी बंडखोरांचा बिमोड झाला. सत्तेचाळीस भारतीय सैनिकांना फाशी देण्यात आले.

गदर पार्टी लाला हरदयाळ यांनी स्थापन केली होती. याचे स्वरुप अभिनव भारत प्रमाणेच संपुर्ण निधर्मी आणि हिंदी राष्ट्रवादी होते. यात सर्व धर्मिय अणि प्रांतीय एकजुटीने लढ्गत होते. विशेष अभिमानाची गोष्ट डॉ. खानखोजे व विष्णु गणेश पिंगळे हे दोन महाराष्ट्र्यियन नेते गदर पार्टीचे अत्यंत महत्वाचे नेते होते.
विष्णु पिंगळे यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या कडे अठरा बॉम्ब आणि अन्य स्फोटके होती, पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ब्रिटीश सैन्याची अर्धी रेजिमेंट नष्ट करण्या एवढी हि सामुग्री होती. पण दुर्दैवाने लाहोर मधला कट उघडकीस येऊन सर्व नेते पकडले गेले.राशबिहारी बोस निसटले व जपानला गेले.

पिंगळे व कर्तारसिंग यांच्यावर खटला चालुन १६ नोव्हेंबर १९१५ ला लहोर मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.

अभिनव भारत असो, वा गदर पार्टी सर्व जण एकमेकात जोडलेले होते, एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्यात स्पर्धा असे ती सत्तेसाठी नव्हती तर फक्त स्वातंत्र्यासाठी जास्तीत जास्त कोण त्याग करतो याची. यात वेगवेगळ्या विचारसरणी चे लोक होते. चाफेकर , सावरकर, मदनलाल धिंग्रा, भाई परमानंद, राशबेहारी बोस, आशुतोष लाहिरी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते व जे फाशी गेले नाहीत ते हिंदुमहासभेत गेले. साम्यवादी होते, समाजवादी होते व कॉंग्रेसी सुध्दा होते. सर्वांचा झेंडा एकच होता. देशासाठी बलिदान. आपल्याला पुढच्या पिढीतले स्वातंत्र्यलढ्यात थोडाबहुत भाग घेणाऱ्या पण बदल्यात सत्तेची पुरेपुर फळे चाखणाऱ्या घराण्याचे वारसदार आणि हुजरे, तुम्ही देशासाठी काय त्याग केला असा उध्दट प्रश्न विचारतील अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल.

संकलन- चंद्रशेखर साने

Monday, February 13, 2017

चार बोधकथा


१. वाघाचे कातडे पांघरलेले गाढव

एका धोब्याजवळ एक गाढव होते. गाढवाला खूप काम करावे लागे. धोब्याला फारसे पैसे मिळत नसत तर तो तरी गाढवाला किति खाऊ पिऊ घालणार? एके दिवशी धोब्याला वाघाचे कातडे मिळाले. त्याने आपल्या गाढवाच्या अंगावर पांघरले. लोक गाढवाला वाघ समजून घाबरतील आणि गाढवाला खाऊ पिऊ घालण्याचा खर्च वाचेल, परस्पर भागेल असे त्यास वाटले.
त्याचा अंदाज बरोबर ठरला. शेताच्या राखणदारांना वाटे खराच वाघ आला आहे. ते घाबरुन दुर पळत. गाढवाची मात्र खरोखरच चैन झाली. शेतात रात्री मनमुराद खावे व मस्त ताणून द्यावी, असा दिनक्रम खूप दिवस चालला. गाढव एव्हाना गलेलठ्ठ झाले. त्याला धडपणे पळता येईना. एके दिवशी दुरून त्याला गाढवीचा आवाज ऐकू आला. न राहवून त्यानंदेखील प्रतिसाद दिला. वाघाचे सोंग बाहेर आले. गाढवाच्या ओरडण्याने राखणदार जागा झाला आणि गाढवाला चांगलाच चोप मिळाला.

२. गाढवाचा गाढवपणा
एक गाढव होत. व्यापारी त्याच्यावर बराच माल लादुन नेत असे. एके दिवशी व्यापाऱ्याने मिठाच्या गोणी गाढवाच्या पाठीवर लादल्या. प्रवासात नदी पार करताना सारे मीठ नदीच्या पाण्यात विरघळुन गेले आणि गाढवाचा भार हलका झाला.
परत एकदा नदी ओलांडायची वेळ आली. गाढवाला वाटले चांगली संधी आहे. त्याने खोल पाण्यात डुबकी मारली पण त्याच्या पाठीवर होता स्पंज भरलेला. स्पंजाने पाणी शोषून घेतले आणि तो भार असह्य होऊन गाढव नदीत बुडुन मेले.

३. गर्वाने फुगलेले गाढव
एकदा एका व्यापाऱ्याने आपल्या गाढवाच्या पाठिवर देवाची मुर्ती ठेवली आणि दुसऱ्या शहरात विक्रीसाठी नेऊ लागला. जाता येता लोक आपल्या दैवताची मुर्ती पाहुन थांबुन थांबुन नमस्कार करु लागले. गाढवाला वाटले हे सगळा नमस्कार आपल्याला मिळत आहेत. त्याला गर्व चढला
काही वेळाने त्याने पुढे चालायचे साफ नाकारले आणि आपल्या सन्मानामुळे मद चढल्यासारखा आनंदाने जोरजोरात खिंकाळु लागले.
व्यापाऱ्याला काही कळेना आतापर्यंत शिस्तीत वागणार गाढव अस वारा प्यायल्यासारख का करतय? पण लवकरच त्याच्या ध्यानी सगळा प्रकार आला.

त्याने गाढवाच्या पाठीवर काठीचे दोन सणसणीत रट्टे दिले.
गाढवने जीभच बाहेर काढली, आणि निमुट चालु लागले.

व्यापारी म्हणाला अरे गाढवा, लोक तुझा सन्मान करीत नसून तुझ्या पाठीवर ज्या दैवताची मुर्ती ठेवली आहे तिचा सन्मान करत आहेत. गाढवाचा गाढवच राहिलास रे तू !

४. गाणार गाढव
एकदा एका गाढवाची आणि कोल्ह्याची मैत्री झाली. दोघांनी एकत्रित पणे पोटापाण्याची व्यवस्था करायचे ठरवले. त्याप्रमाणे ते एका काकडीच्या शेतात गेले. कोल्हा म्हणाला मी आधी काकड्या खाऊन घेतो तू राखण कर. गाधवाने ते मान्य केले. कोल्ह्याने पोटभर काकड्या खाल्या आणि गाढवाला म्हणाले आता तू खा.
गाढव म्हणाले किती अरसिक रे तू. एवधे सुंदर चांदने पदले आहे. थोड गण गाईन म्हणतो.
कोल्हा म्हणाला अरे बाबा आपण इथे गाण्याची मैफल करायला नाहि चोरी करायला आलो आहे आणी तसही तुला गाण्यातल काय कळत?
गाढवाला राग आला . त्याने कोल्ह्याला आपल्याला गाण्यातल खूप कलत अस सांगायला सुरुवात केली. कोल्हा म्हणाला ठिक आहे मी जरा दुर उभे राहून राखणदार येतो का ते पहातो, मी दुर गेलो की तु गाण सुरु कर..
कोल्हा लांब जाताच गाढवाने गायला सुरुवात केली. खिंकाळणेच ते, राखणदार आला व त्याने गाढवाला बेदम मारले.

पंचतंत्र व इसापनिती वर आधारीत

Saturday, February 11, 2017

रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?

१९६७ साली भारताने आपला विसावा स्वातंत्र्य सोहळा साजरा केला. त्या वेळेस तत्कालीन ब्रिटिश राजदूत ‘जौन फ्रिमन’ यांना विचारण्यात आले की, ब्रिटिशांसाठी असा कुठला निर्णायक क्षण होता की, भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही असे लक्षात आले. त्यावेळेस ब्रिटिश राजदूतांनी नि:संदिग्ध आणि अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले की, १९४६च्या नौसनिक उठावामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आले.

ब्रिटिश राजदूतांनी म्हटल्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, असे ब्रिटिशांना लक्षात आणून देणाऱ्या या घटनेची आठवण गेल्या ७० वर्षांत फारशी कधीच, कशी कुणालाच झाली नाही? किंवा भारतीय स्वातंत्र्ययुद्धांच्या इतिहासातील महत्त्वाची अशी ही घटना अनुल्लेखानेच का मारण्यात आली?

१८५७ चा उठाव, उमाजी नाईक, वा.ब.फडके , चाफेकर बंधु, सावरकरबंधु, गदर , १९४२ ची हिंसक चळवळ, पत्री सरकार, आझाद हिंद सेना आणि नाविक दलाचा उठाव अशी एकामागुन एक अशी तेजस्वी सशस्त्र क्रांती परंपरा देशाला आहे. स्वातंत्र्य लढ्यातला एक भाग नि:संशय पणे गांधी व राष्ट्रिय सभेकृत जनजागृती होती हे नाकारता येत नाही.

पण नाविक सामर्थ्य हे ब्रिटीशांचे सर्वात मोठे सामर्थ्य. दुसऱ्या महायुध्दात जिंकुनही कंबरडे मोडलेल्या ब्रिटीशांचा नाविक दलाने बंड केल्यावर तर धीर पुर्ण खचला. सुमारे ७३ warships नी यात भाग घेतला.

१८ फेब्रुवारी १९४६ ला नौसैनिकांनी उठाव केला. मुख्य पुढाकार बी.सी.दत्त यांचा
युद्धाच्या अखेरीस विजयी झालेल्या ब्रिटिश नौदलात, आपणास कसलेच स्थान नाही. भारतातील ब्रिटिश राजसत्ता टिकविण्यासाठीच केवळ एक प्यादे म्हणून आपला उपयोग करून घेण्यात आला, ह्यची दत्त यांना तीव्रतेने खंत वाटली. दत्त व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना वेळोवेळी सहन कराव्या लागणाऱ्या अपमानांमुळे ते सगळे जणच संतप्त झाले होते. त्या सर्वाना ब्रिटिशांनी केवळ बळीचे बकरे म्हणून युद्धात वापरले होते. हे लक्षात आल्यावर त्यांचा संताप शिगेला पोहोचला. या अन्यायाचा प्रतिकार करावा, असे त्यांना तीव्रतेने वाढू लागले.

दत्त यांना अटक झाली. मुंबई , कराची कलकत्ता इ. बंदरात सैनिकांनी बंड केले. मुंबईत सहा दिवस, कलकत्त्यात सात दिवस कराचीत दोन दिवस आणि मद्रास मध्ये एक दिवस हे सुरु होते.

मुंबईतील रस्त्यांवरुन हे सैनिक फिरत होते आणि सर्वसामान नागरीकांमध्ये देशप्रेमाची लहर दौडली. हजारो लोक मुंबईत समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले पाहुन ब्रिटीशांच्या पोटात अक्षरश: गोळा आला. सैनिक शक्ती व लोकशक्तीचा तो अपुर्व मिलाफ होता. जेव्हा बंडखोरांबर ब्रिटीश सैन्य रणगाडे व तोफा घेऊ आले तेव्हा मुंबईच्या नागईकांनी गल्लीबोळाचा सहकार्य घेऊन ब्रिटीश सैन्यावर दगड विटांचा मारा केला. या चर दिवसात मुंबईत २२८ जण मारले गेले तरी लोकांचा प्रतिकार चालु होता. ब्रिटीशांनी युध्द्नौकांची रसद तोडल्यावर लोक अन्नधान्याची पुडकी घेऊन नौकांवर पोचवत होती.

हा सर्व इतिहास मी शाळेत कधीच शिकलो नाही. चार वाक्यात या बंडाचा उल्लेख संपवला जातो. अतिशय रोमहर्षक असा हा सैनिक उठाव आम्हाला अहिंसेने स्वातंत्र्य मिलाले या घोषात दामटुन टाकला गेला आहे. एअरफोेर्स , भूदल यांनीही ब्रिटीश विरु् भारतीय असा लढा झाला तर स्पष्ट पणे आम्ही लोकांच्या बाजूने उभे रहाणार असा निर्णय घेतला होता. स्वातंत्र्य लढ्याचे श्रेय सशत्र लढ्याला आणि सैनिकी शक्तीला पण यथायोग्य मिळायलाच हव, फक्त गांधी किंवा नेहरु वा एका पक्षाने स्वातंत्र्य मिळवले हा खोटा इतिहास असुन, ब्रिटीशांच्याच शब्दात सांगायचे तर भारतात पाठवायला आमच्याकडे पुरेसे सैन्य नाही आणि भारतीय सैन्य स्वातंत्र्य लढ्याच्या बाजुने गेल्याने, आमच्या वर उलटल्याने आम्हाला भारताला स्वातंत्र्य देण भाग पडल हेच मान्य करावे लागते.

©चंद्रशेखर साने

अभिनव भारत व सावरकरांचे परदेशातील कार्य व योजना


ब्रिटीश अधिकाऱ्यांचे वध करुन शासन यंत्रणा खिळखिळी करणे एवढा एकच मार्ग सावरकरांच्या "अभिनव भारत" संघटनेचा उद्देश होता असा आपला सर्वसाधारण समज असतो. शालेय इतिहासत एक दोन वाक्यात हा इतिहास संपवला जात असल्याने अस होत. प्रत्यक्षात ब्रिटीश अधिकाऱ्यांना मारणे हा सशस्त्र क्रांतीचा फक्त एक लहानसा भाग होता. मुळ उद्दीष्टे पुढिल प्रमाणे होती.

१. स्वदेशीचा पुरस्कार, बहिष्कार तंत्र व रष्ट्रिय शिक्षण या द्वारे लोकजागृती करण
२.परदेशात शस्त्रे खरेदी करुन गुप्तपणे भारतात पाठवणे
३.जिथे शक्य असेल तिथे गनिमी काव्याने युध्द चालु ठेवणे
४. ब्रिटीशांच्या सैन्यातील भारतीय जवानांमध्ये स्वातंत्र्याच प्रचार व ब्रिटीशांविरुध्द असंतोष भडकवुन त्यांना ब्रिटीशांविरुध्द लढ्यात सामिल करुन घेणे
५. युरोपात युध्दे (/ महायुध्द) सुरु होण्याच्या संधी ची वाट पहाणे, हे सुरु झाले की भारतासाठी स्वातंत्र्याची दारे उघडी होतील आअ अभिनव भारताच्या सदस्यांना विश्वास होता.

अभिनव भारत चे प्रमुख व अध्यक्ष होते स्वातंत्र्य्वीर सावरकर आणि उपाध्यक्ष होते व्हि.व्हि.एस.अय्यर.

स्फुर्तीदायक व प्रेरक अशा ऐतिहासिक गोष्टी सांगणे, देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणे, मातृभूमि पारतंत्र्यात असताना वैयक्तिक सुखाला गौण मानणे इत्यादी गोष्टी सावरकरांच्या लेखनातुन व भाषणातुन प्रकट होत आणि शामजी कृष्ण वर्मा पॅरिस ला गेल्यानंतर सर्व चळवळीचे नेतृत्व सावरकरांकडे आले. अभिवव भारतची सदस्य संख्या वाढवण्यासाठी सावरकरांनी फ्री ईंडिया सोसायटीची स्थापना लंघ्डनमध्ये केली. त्यांच्या व्यक्तीमत्वाने परदेशात शिक्षणासाठी आलेले सर्व बुध्दीमान भारतीय तरुण भारुन गेले होते. जगविख्यात टाईम्स मासिकाने सावरकरांच्या घेतलेल्या मुलाखतीत ते हि सावरकरांच्या आदबशीर व्यक्तीमत्व विनोदबुध्दी यांनी चकित होऊन गेले.

१८५७ चे समर, मॅझिनीच्या आत्मवृताची प्रस्तावना इ. लेखन तसेच १८५७ चा पन्नासावा वर्धापन दिवस , गुरु गोविंद सिंग यांची जयंति अशा विविध कार्यक्रमांनी लंडन आणि युरोप दणाणुन सोडले होते.

सावरकरांनी लंडनहुन वीस पिस्तुले जाड पुस्तकांच्या पोकळीत लववुन भारतात धाडली. त्यातीलच एक पिस्तुलाने अनंत कान्हेरेंनी कलेक्टर जॅक्सन चा वध केला. तर खुद्द लंडनमध्येच मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा वध केला.
सावरकरांना अटक होऊन शिक्षा झल्यानंतर अभिनव भारत विखुरली तरी अभिनव भारत चा एक सदस्य वांची अय्यर याने कलेक्टर ऍशेला गोळी घालुन ठार मारले.

सावरकर प्रभावळीत अनेक हिंदु मुस्लीम युवक जमा झाले. कम्युनिस्ट लिडर मानवेंद्र नाथ रॉय, श्रीपाद डांगे पुढे कॉंग्रेसवासी झालेले राजगोपालाचारी हे सर्व सावरकरांच्याच विचारांनी प्रेरित झालेले.
बॅ. असफाली यांनी सावरकरांमध्ये शिवाजी व राणा प्रताप यांचे गुण आहेत असे प्रतिपादन केले. याच काळात सावरकरांचा आंतरराष्ट्रिय क्रांतीकारकांशी संबंध येत होता. लेनिन , स्टलिन यांचे सुध्दा इंडिया हाऊस मध्ये येणे होत असे , भेटी होत असत असे.

सावरकरांना मुख्यत: अपेक्षा होती ती युरोपात युध्द सुरु झाल्यास भारतातील ब्रिटीश साम्राज्य उलथुन टाकणे शक्य आहे. महायुध्द सुरु झाले तर एक संयुक्त आघाडि उघडुन भारतच नाही तर ब्रिटीश साम्राज्याच्या जगातील वेगवेगळ्या विभागात एकाच वेळी उठाव करणे.

तशी एक योजना सावरकरांनी संकल्पित करुन काहिशी कार्यान्वित सुध्दा केली होती.इजिप्त मधील राष्ट्रवादी चळवळीचे काही नेते लंडन व पॅरिस मध्ये होते त्यांनी अभिनव भारतच्या सावरकरदी नेत्यांना वचन दिले होते कि अभिनव भारत जेव्हा भारतात सशस्त्र उठाव करेल त्यावेळी इजिप्तिशियन क्रांतीकारक सुएज कालव्याची नाकेबंदी करतील. सुएज कलना इंग्लंड व आशियाला जोडतो. उठाव होताच ब्रिटनची भारतात पोचणारी रसद व कुमक त्याद्वारे तोडली जाईल.

अय्यरांनी तुर्कस्थानच्या तुर्कस्थानच्या केमाल पाशाची भेट घेऊन त्याचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. तर अन्य आचार्य, दत्त व खान या तीन सहकाऱ्यांना सावरकरांनी प्रत्यक्ष युध्दाचे प्रशिक्षण घेण्यास मोरोक्को येथे पाठवले. ती युध्द्कला शिकुन आले , अनुभव घेऊन आले, मात्र स्पनिश क्रांतीकारकांनि मात्र त्यांना कसलेच फारसे सहाय करण्याचे स्वीकारले नाही.

इंडीया हाउस च्या मागच्या भागात सावरकर बॉंब बनवण्याचे प्रयोग गुप्तपणे करत असत. एकदा मोठा बाका प्रसंग आला होता. उकळत असलेले द्रावण आलेले पातेले उचलण्यास चिमटा सापडेना तेव्हा मदनलाल धिंग्रा याने क्षणाचाही विचार न करता नुसत्या हातानेच ते पतेले हात पोळले तरी उचलले, अन्यथा स्फोट झाला असता.
नंतर अभिनव भारताच्या सेनापती बापटांनी रशियन क्रांतीकारकांकडुन बॉंब तयार करण्याची सोपी पध्दत मिळवुन तीन प्रति तयार करवुन घेतल्या. त्यांना भारतात पाठवण्यात आले.
अभिनव भारताने एक बॉम्ब बनवण्याचा गुप्त कारखाना सुध्दा सुरु केल्याची माहीटी अभिनव भारताचे सदस्य व सावरकरांचे मावस बंधु डॉ. वि.म. भट यांच्या पुस्तकात दिली आहे.

ब्रिटीशांच्या सैन्यातील भारतीय जवानांमध्ये अभिनव भारतातले काहि सदस्य उठावाची पत्रके पाठवत , त्यातले मीरत च्या छावणीतली काही पत्रके पकडली गेली.
१८५७ ला पहिला उठाव मीरत लाच झाल्यने एकच खळबळ उडाली होती.

जर सावरकरांच्या या सुवर्ण काळात पहिले महायुध्द सुरु होते तर परदेशी क्रांतीकारकांच्या मदतीने व भारतीय सैन्याच्या बंडामुळे भारतावर चालुन आलेले पहिले सैन्य कदाचित सावरकरांच्या नेतृत्वाखाली आलेले दिसणे अशक्य नव्हते. पण ते व्हायचे नव्हते.

सावरकरांच्या अटकेनंतर हा प्रयत्न लाला हरदया्ळ यांच्या गदर पार्टीने महायुध्दाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. गदर पार्टीचा इतिहास असाच रोमहर्षक असून डॉ. पांडुरंग खानखोजे आणि विष्णु गणेश पिंगळे या दोन तेजस्वी मराठी लोकांचा त्यात फार मोलाचा वाटा होता. तो इतिहास नंतर कधीतरी.

©चंद्रशेखर साने

अधिक वाचनासाठी
१. शत्रूच्या शिबिरात- स्वा. सावरकर http://www.savarkarsmarak.com/bookinpdfformat.php?id=78
3. सावरकर चरित्र- शि.ल.करंदीकर http://www.savarkar.org/…/pdfs/mr/savarkar_biography_mr_v00… )
4. १८५७ ते सुभाष - बाळशास्त्री हरदास
5. स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत- ग.प्र.प्रधान
6. Life of Br. Savarkar - Chitragupt ( RajgopalacharI )
http://www.savarkar.org/…/life_of_barrister_savarkar_by_chi…
8. अभिनव भारत - डॉ. वि.म.भट http://www.savarkar.org/…/pdfs/mr/abhinav_bharat_mr_v001.pdf

संघशाखेच्या दर्शनाने भारले महात्मा गांधी




गांधींनी डॉ. हेडगेवार हयात असताना एकदा वर्ध्याला संघशाखेला भेट दिली होती. संघाची शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव, साधेपणा यांनी ते अत्यंत प्रभावित झाले होते. संघकार्याविषयी गांधींना आस्था व आदर होता. असे गांधी साहित्यातच छापले गेले आहे. संघाच्या हिंदु धर्म व सांस्कृतिक कार्याविषयी गांधींना आस्था होती
Collected works of Mahatma Gandhi Vol 96 मध्ये पृ. ३८० वर हे छापले गेले आहे.
492. SPEECH AT R. S. S. RALLY1
NEW DELHI, September 16, 1947
Gandhiji said that he had visited the Rashtriya Swayamsevak Sangh camp years ago at Wardha, when the founder Shri Hedgewar was alive. The late Shri Jamnalal Bajaj had taken him to the camp and he (Gandhiji) had been very well impressed by their discipline, complete absence of untouchability and rigorous simplicity. Since then the Sangh had grown. Gandhiji was onvinced that any organization which was inspired by the ideal of service and self-sacrifice was bound to grow in strength. But in order to be truly useful, self-sacrifice had to be combined with purity of motive and true knowledge. Sacrifice without these two had been known to prove ruinous to society.
The prayer that was recited at the beginning was in praise of Mother India, Hindu culture and Hindu religion. He claimed to be a sanatani Hindu. He took the root meaning of the word sanatana. No one knew accurately the origin of the word Hindu.
Image may contain: text

Friday, February 10, 2017

फाळणीच्या प्रसंगी गांधींनी हिंदुंसाठी कार्य केले हिंदुमहासभेने वा हिंदुत्वनिष्ठांनी काय केले असा प्रश्न विचारला जातो. त्याचा भावार्थ असतो की हिंदुंसाठी खरे प्रयत्न गांधींनीच केले गांधी हत्यारे तमाशा पहात बसले होते. हे वास्तव नाही, गांधी हत्येच्या कटात शिक्षा झालेले श्री. करकरे व हिंदु सभा यांनी नौखाली व अन्यत्र हिंदुंना केलेले सहाय्य या संबंधी माझा एक लहानसा लेख व हिंदुमहसभेच्या प्रतिवृत्तची लिंक
**********************
नौखालीतील अत्याचारांच्या वार्ता अतिशय भीषण होत्या. बंगाल हिंदुसभेने या संबधात एक पुस्तिका (श्वेतपत्रिका) प्रसिद्ध केली. गांधीजींनीही नौखालीत लष्कराच्या संरक्षणात भेट दिली. हिंदुसभेचे अनेक कार्यकर्ते नौखाली , बंगाल मधे गेले व त्यांनी मदतकेंद्रे सुरु केली. हिंदुसभेचे कार्यवाह व सावरकरांबरोबर अंदमानात असलेले क्रांतीकारी आशुतोष लाहिरी व डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मदत कार्य सुरु केले व हिंदूंसाठी सहाय्य निधीची मागणी केली. नगर हून हिंदुसभेचे एक कार्यकर्ते श्री.विष्णु रामकृष्ण करकरे यांनी महाराष्ट्रातून निधी गोळा करुन सोबत चार कार्यकर्ते घेऊन पूर्व बंगाल मधे गेले.
गांधीजींना तेथील सर्वधर्मिय प्रार्थनेत रामनाम सुरु झाले की मुसलमान उठून निघून जात हे पाहून खूप दु:ख झाले. हिंदुंची सक्तीची धर्मांतरे खून .बलात्कार ,मंदिरे-राजवाडे यांची नासधूस याची दखल स्वत: गांधीजींनीच आपल्या भाषणात घेतली.(दि.१५-११-१९४६ अ.प्रे.हिंद या वार्ता संस्थेचे वृत्त.) गांधीजींना हिंदु-मुस्लीम एकता धोरणाचे धोरणाचे "हेचि काय फल मम तपाला" असे झाले असावे.
पुढे गांधीजींच्या हत्येत सहभागी असलेले श्री. विष्णु करकरे हे सुद्धा ५ नोव्हेंबर १९४६ ला बंगालकडे रवाना झाले होते. नागपुरला त्यांना हिंदुमहासभेचे कार्यकर्ते श्री..द.मा.देशमुख व श्री. चांदे येऊन मिळाले. मध्यप्रदेश चे त्यावेळचे गृहमंत्रींनी या हिंदुत्वनिष्ठांना नौखाली च्या हिंदूंसाठी मदत निधी दिला. करकरे रायपुर ला पोचताच चंद्राबाई नावाच्या तरुणीला शेरखां अब्दुल हुसेन नावाचा गुंड नेत असल्यचे लक्षात येताच त्यांनी तिची सुटका करवुन हिंदु पुढारी लाला गुरुदत्त मल्ल यांच्या कडे पोचवले तिची शुद्धी करवून ,तिच्या चरितार्थाची सोय करण्यात आली.
हिंदुसभेचे हे पथक कलकत्याला पोचले. हिंदुसभेने तेथे निर्वासित आश्रय केंद्र व हॉस्पिटल उघडले होते. करकरे यांनी पुढे वेगवेगळी मदत केंद्रे सुरु केली. कपडे व अन्न यांचे वाटप सुरु झाले. चांदपुर ला एक पत्रकार करकरे यांना भेटला तेथे त्याचे हिंदूंच्यावर झालेल्या अत्याचारांचे टिपण करकरेंना पहावयास मिळाले. चांदपुर हून करकरे व हिंदुसभेचे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या.
दौलतगंज,विपुला.सोनाइमुरी इ.हिंदु वस्ती च्या गावांना भेटी दिल्या असता एकही हिंदु तिथे शिल्लक राहिला नव्हता. तेथुन जवळच करकरे दलाल बाजार येथे रॉय या संपन्न कुटुंबाकडे गेले. त्यांची तिजोरी मुसलमानांना फोडता न आल्याने त्या गुंडांनी क्रेन आणून ती नेली व पेट्रोल ने वाडा जाळला होता. तेथून नंदिग्राम,हाजीगंज,श्रीपुर,बादलपुर अशा अनेक गावांना नथुराम गोडसे यांचे सहकारी करकरे यांनी भेटी दिल्या व मदत कार्य केले.
नौखाली चे हिंदुसभा अध्यक्ष त्यावेळी राजेंद्रलाल राय हे होते. हिंदुंना मुसलमानांपासून वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी लढता लढता प्राणार्पण केले. त्यांच्यावर एका मोठ्या जमावाने हल्ला केला होता, त्यांनी एकहाती लढत आपले प्राण दिले.
करकरेंनी या दौर्‍याचे वृत्त वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केले. या दौर्‍याचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. पुढे गांधी वधाच्या खटल्यात त्यांनाही शिक्षा झाली.
हिंदुमहासभा निवडणुकात पराभूत झाल्याने त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. त्यामुळे काही जणांना हिंदुत्ववादी पक्ष महात्मा गांधी व कॉंग्रेसविरुद्ध फक्त आरडाओरडा करत राहिले त्यांनी प्रत्यक्ष असे कार्य काहिच केले नाही असा समज करुन घेतात. पण ते यथाशक्ती सहाय्य करत होते, त्याग करत होते आणि बलिदान सुध्दा देत होते. शालेय इतिहासात तर हिंदुमहसभा-जनसंघ इ. नावेच नाहीत. इतिहास विजेत्यांचा पक्षपाती असला तरी त्यांना इतिहास सहजासहजी पुसता येत नाही. तो कुठे ना कुठे तरी अस्तित्वात असतोच.
पुढे नौखालीस हुतात्मा झालेले श्री. राजेंद्रलाल राय यांचे छायाचित्र दिले आहे. असे अनेक ज्ञात अज्ञात हिंदुत्वनिष्ठ हुतात्मा झाले आहेत, केवळ एक व्यक्ती वा एक घराणे नाही.

© चंद्रशेखर साने


Image may contain: 1 person


President: Noakhali District Hindu Mahasabha; President: Noakhali District Bar Association.
In 1947, he died a martyr’s death in his village home, fighting almost single-handedly against thousands of armed hooligans.


Image may contain: 1 person, text

Image may contain: one or more people


आंतरजालावर हिंदुमहासभेच्या कार्याविषयक रिपोर्ट - श्वेतपत्रिका उपलब्ध आहे , सत्यशोधक मंडळींसाठी त्याचे अनुसंधान (लिंक) याप्रमाणे,

Thursday, February 9, 2017

गांधीजी आणि रु. ५५ कोटी

फाळणीनंतर पाकिस्तानच्या वाट्याला जे ५५ कोटी रुपये देणे निघत होते ते लगेच देण्याचा हट्ट गांधींनी धरला हे गांधीहत्येचे तत्कालिन कारण झाले असे गांधीहत्येह्च्या कटात सहभागी असलेले व नथुराम गोडसे यांचे बंधु श्री.गोपाळ गोडसे यांचे प्रतिपादन होते.
हे देणे अशावेळी दिले गेले ज्यावेळी पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या वेषात आपले सैन्य काश्मिरात घुसवले होते. देणे द्यायचे होते ते पाकिस्तानने सैन्य माघारी घेतल्यावर दिले असते तर योग्य होते व तसाच योग्य निर्णय भारत सरकारने घेतलाही होता, पण गांधींनी हे देणे द्याच म्हणून उपोषण केले व त्यानंतर लगेचच सरकारने गांधींच्या दबावाला बळि पडुन आपला आधीचा निर्णय फिरवुन हे पैसे पाकिस्तानला द्यायचा निर्णय घेतला.
गांधीजी अशा प्रकारे भारताच्या आंतराष्ट्रिय धोरणांवर समांतर सत्ताकेंद्र होऊन भारताच्या हिताच्या विरोधी निर्णय घेण्यास स्वतंत्र भारत सरकारला भाग पाडत होते, वेठीस धरत होते व ते असेच जगत राहिले तर सातत्याने आपला प्रभाव भारत सरकारच्या धोरणांवर टाकण्याचे काम करत राहतील या भीतीने खुन्यांनी हे आततायी कृत्य केले असा नथुरामवाद्यांचा दावा होता व असतो.
गांधी हत्येचे एकुणात कारण केवळ ५५ कोटी हे एकमेव नव्हते तर एकुणच कॉंग्रेसने तिच्या स्थापनेपासून व पुढे टिळकांच्या काळात व नंतर मुख्य जे सर्वैसर्वा झाले ते गांधी यांनि मुसलमानांचे जे तुष्टीकरण केले त्याची चीड खुन्यांच्या मनात साठत गेली व त्यातून ही राजकिय हत्या झाली असे नथुराम गोडसे यांच्या कोर्टातल्या निवेदनावरुन दिसते.
"गांधीहत्या आणि मी" व "५५ कोटींचे बळी" याच दोन पुस्तकांचा मुख्य आधार व अन्य दुय्यम पुस्तके यांच्या आधारावर शरद पोंक्षे यांची नाटके सजली होती व आहेत.
फाळणी झाली ते योग्य का अयोग्य हे आता आपण वेगवेगळ्या चष्म्यातून पाहु शकतो, काही जण म्हणु शकतात की आज जर बांगला देश व पाकीस्तानची लोकसंख्या हिंदुस्थानात अधिक केली तर ते धोक्याचे ठरले असते. त्याची चर्चा वेगळी करता येईल. Historians are wiser after the Event. आपण काळाच्या उलट्या दुर्बिणीतून पाहुन जर तर च्या भाषेत समर्थपणे बोलु शकतो. पण त्या त्या वर्तमानात नेमके पुढे काय होईल हे ठरवणे अवघड असते.
तत्कालिन घटना हे तत्कालिन वातवरणातून घडतात.
पण सोकॉल्ड गांधीभक्तांकडुन मुख्य आक्षेप घेतला जातो तो असा की मुळात गांधीजींचे उपोषण हे ५५ कोटी देण्यासाठी नव्हतेच, ते हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी होते. आणि गोपाळ गोडसे यांनी हि थाप मारली आणि नथुरामच्या हेतु चे समर्थन करणाऱ्यांनी हिच थाप पुढे चालवली. हा थापाथापीचा आक्षेप खरा आहे का? हि गोपाळ गोडसे यांची निव्वळ थाप आहे का? इतिहासाचा हा विपर्यायास आहे का या पुरतेच आपण पाहु.

जर ही थाप असेल इतकी वर्षानुवर्षे हि तथाकथित थाप कशी चालु शकेल ? इतकी वर्षे गांधींचेच नाव घेणाऱ्यांचे सरकार चालु होते त्यांनी या थापेवर कधीच आक्षेप कसा घेतला नाही आणि आज अचानक यावर प्रकाश पडला आणि जणु काही एक षडयंत्र उघडकिस आणले असा तथाकथित गांधी वाद्यांचा जो आविर्भाव आहे तो मात्र चुकीचा आहे.

वस्तुत: हे उपोषण ५५ कोटी देण्यासाठी नव्हतेच , त्या कारणाने हत्या झाली हे गोपाळ गोडसे यांचे म्हणणे हा इतिहासाचा विपर्यास आहे असे म्हणून मुळात फार पुर्वीच म्हणजे "गांधी हत्या आणि मी" ची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हाच सरकारने या पुस्तकावर बंदी आणली आणि पुस्तके जप्त केली होती.
लेखक आणि प्रकाशक या बंदीविरुध्द न्यायालयात गेले. या पुस्तकावरची बंदी उठवताना माननीय न्यायलयाने स्पष्ट पणे निकाल दिला आहे की लेखक गोपाळ गोडसेंनी ५५ कोटी देण्यासाठी गांधींनी उपोषण केले असे म्हणणे ही इतिहासाची अजिबात मोडतोड नाही. गांधीजींचे उपोषण हे ५५ कोटी पाकिस्थानला देण्यासाठीच केले होते या संबंधीचे पुरेसे पुरावे लेखकाने समोर आणले आहेत आणि त्यानी इतिहासाचे विकृतीकरण केलेले नाही हे स्पष्ट आहे. इतके स्पष्ट झाल्यावर परत परत या हत्येमागचे कारण गांधींचा ५५ कोटी पाकिस्तानला देण्याचा नव्हताच व ती थाप आहे असे प्रतिपादन परत परत का केले जाते?

गांधीविचारांचा बचाव करण्यासाठी अशी खोटी कारणे देण्यापेक्षा काही ठोस वैचारीक लढाई सोकॉल्ड गांधीभक्तांनी का करु नये? न्यायालयाच्या निर्णयपत्रकाचा ५५ कोटी संबंधीचा भाग "गांधीहत्या आणि मी " या पुस्तकाच्या आवृत्तीत छापला आहे, तो पाहीला की ५५ कोटी चा गांधीहत्येशी असलेला संबंध आणि ते कारण हि गोडसेंची थापाथापी नसल्याचे सहज स्पष्ट होते.

त्या पृष्ठाच छायाचित्र पुढे देत आहे. त्यावरुन माननीय न्यायालयाने गांधीजींचे हे उपोषण ५५ कोटी देण्यासाठी होते हा लेखक व कटातले एक शिक्षा भोगलेले आरोपी लेखक गोपाळ गोडसे यांचे म्हणणे मान्य केले आहे आणि त्यात इतिहासाचा कोणताही विपर्यास नाही असे म्हणून सरकारचे म्हणणे फेटाळून लावले आहे.
हा खटला लेखक श्री. गोडसे व प्रकाशक यांनी जिंकला, पुस्तकावरची बंदी उठवण्यात आली व खर्चापोटी रु. २००० सरकारला गोडसे व प्रकाशक यांना द्यावे लागले. इतके झाल्यानंतर या पुस्तकांन व त्यावर आधारीत नाटकाला कायदेशीर बंदी येऊच शकत नाही हे उघड आहे

© चंद्रशेखर साने

No automatic alt text available.

मूळ पोस्ट मध्ये प्यारेलाल नायर यांच्या Mahatma Gandhi Last Phase चा उल्लेख केला आहे, ज्यात गांधी म्हनतात की पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा निर्णयामागचे कारण माझा उपास हेच होय. त्या पृष्ठाचे छायाचित्र. प्यारेलाल नायर हे सुशिला नायर यांचे भाऊ व गांधींचे स्वीय सचिव होते.

Image may contain: text

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...