Saturday, February 11, 2017

अभिनव भारत व सावरकरांचे परदेशातील कार्य व योजना


ब्रिटीश अधिकाऱ्यांचे वध करुन शासन यंत्रणा खिळखिळी करणे एवढा एकच मार्ग सावरकरांच्या "अभिनव भारत" संघटनेचा उद्देश होता असा आपला सर्वसाधारण समज असतो. शालेय इतिहासत एक दोन वाक्यात हा इतिहास संपवला जात असल्याने अस होत. प्रत्यक्षात ब्रिटीश अधिकाऱ्यांना मारणे हा सशस्त्र क्रांतीचा फक्त एक लहानसा भाग होता. मुळ उद्दीष्टे पुढिल प्रमाणे होती.

१. स्वदेशीचा पुरस्कार, बहिष्कार तंत्र व रष्ट्रिय शिक्षण या द्वारे लोकजागृती करण
२.परदेशात शस्त्रे खरेदी करुन गुप्तपणे भारतात पाठवणे
३.जिथे शक्य असेल तिथे गनिमी काव्याने युध्द चालु ठेवणे
४. ब्रिटीशांच्या सैन्यातील भारतीय जवानांमध्ये स्वातंत्र्याच प्रचार व ब्रिटीशांविरुध्द असंतोष भडकवुन त्यांना ब्रिटीशांविरुध्द लढ्यात सामिल करुन घेणे
५. युरोपात युध्दे (/ महायुध्द) सुरु होण्याच्या संधी ची वाट पहाणे, हे सुरु झाले की भारतासाठी स्वातंत्र्याची दारे उघडी होतील आअ अभिनव भारताच्या सदस्यांना विश्वास होता.

अभिनव भारत चे प्रमुख व अध्यक्ष होते स्वातंत्र्य्वीर सावरकर आणि उपाध्यक्ष होते व्हि.व्हि.एस.अय्यर.

स्फुर्तीदायक व प्रेरक अशा ऐतिहासिक गोष्टी सांगणे, देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणे, मातृभूमि पारतंत्र्यात असताना वैयक्तिक सुखाला गौण मानणे इत्यादी गोष्टी सावरकरांच्या लेखनातुन व भाषणातुन प्रकट होत आणि शामजी कृष्ण वर्मा पॅरिस ला गेल्यानंतर सर्व चळवळीचे नेतृत्व सावरकरांकडे आले. अभिवव भारतची सदस्य संख्या वाढवण्यासाठी सावरकरांनी फ्री ईंडिया सोसायटीची स्थापना लंघ्डनमध्ये केली. त्यांच्या व्यक्तीमत्वाने परदेशात शिक्षणासाठी आलेले सर्व बुध्दीमान भारतीय तरुण भारुन गेले होते. जगविख्यात टाईम्स मासिकाने सावरकरांच्या घेतलेल्या मुलाखतीत ते हि सावरकरांच्या आदबशीर व्यक्तीमत्व विनोदबुध्दी यांनी चकित होऊन गेले.

१८५७ चे समर, मॅझिनीच्या आत्मवृताची प्रस्तावना इ. लेखन तसेच १८५७ चा पन्नासावा वर्धापन दिवस , गुरु गोविंद सिंग यांची जयंति अशा विविध कार्यक्रमांनी लंडन आणि युरोप दणाणुन सोडले होते.

सावरकरांनी लंडनहुन वीस पिस्तुले जाड पुस्तकांच्या पोकळीत लववुन भारतात धाडली. त्यातीलच एक पिस्तुलाने अनंत कान्हेरेंनी कलेक्टर जॅक्सन चा वध केला. तर खुद्द लंडनमध्येच मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा वध केला.
सावरकरांना अटक होऊन शिक्षा झल्यानंतर अभिनव भारत विखुरली तरी अभिनव भारत चा एक सदस्य वांची अय्यर याने कलेक्टर ऍशेला गोळी घालुन ठार मारले.

सावरकर प्रभावळीत अनेक हिंदु मुस्लीम युवक जमा झाले. कम्युनिस्ट लिडर मानवेंद्र नाथ रॉय, श्रीपाद डांगे पुढे कॉंग्रेसवासी झालेले राजगोपालाचारी हे सर्व सावरकरांच्याच विचारांनी प्रेरित झालेले.
बॅ. असफाली यांनी सावरकरांमध्ये शिवाजी व राणा प्रताप यांचे गुण आहेत असे प्रतिपादन केले. याच काळात सावरकरांचा आंतरराष्ट्रिय क्रांतीकारकांशी संबंध येत होता. लेनिन , स्टलिन यांचे सुध्दा इंडिया हाऊस मध्ये येणे होत असे , भेटी होत असत असे.

सावरकरांना मुख्यत: अपेक्षा होती ती युरोपात युध्द सुरु झाल्यास भारतातील ब्रिटीश साम्राज्य उलथुन टाकणे शक्य आहे. महायुध्द सुरु झाले तर एक संयुक्त आघाडि उघडुन भारतच नाही तर ब्रिटीश साम्राज्याच्या जगातील वेगवेगळ्या विभागात एकाच वेळी उठाव करणे.

तशी एक योजना सावरकरांनी संकल्पित करुन काहिशी कार्यान्वित सुध्दा केली होती.इजिप्त मधील राष्ट्रवादी चळवळीचे काही नेते लंडन व पॅरिस मध्ये होते त्यांनी अभिनव भारतच्या सावरकरदी नेत्यांना वचन दिले होते कि अभिनव भारत जेव्हा भारतात सशस्त्र उठाव करेल त्यावेळी इजिप्तिशियन क्रांतीकारक सुएज कालव्याची नाकेबंदी करतील. सुएज कलना इंग्लंड व आशियाला जोडतो. उठाव होताच ब्रिटनची भारतात पोचणारी रसद व कुमक त्याद्वारे तोडली जाईल.

अय्यरांनी तुर्कस्थानच्या तुर्कस्थानच्या केमाल पाशाची भेट घेऊन त्याचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. तर अन्य आचार्य, दत्त व खान या तीन सहकाऱ्यांना सावरकरांनी प्रत्यक्ष युध्दाचे प्रशिक्षण घेण्यास मोरोक्को येथे पाठवले. ती युध्द्कला शिकुन आले , अनुभव घेऊन आले, मात्र स्पनिश क्रांतीकारकांनि मात्र त्यांना कसलेच फारसे सहाय करण्याचे स्वीकारले नाही.

इंडीया हाउस च्या मागच्या भागात सावरकर बॉंब बनवण्याचे प्रयोग गुप्तपणे करत असत. एकदा मोठा बाका प्रसंग आला होता. उकळत असलेले द्रावण आलेले पातेले उचलण्यास चिमटा सापडेना तेव्हा मदनलाल धिंग्रा याने क्षणाचाही विचार न करता नुसत्या हातानेच ते पतेले हात पोळले तरी उचलले, अन्यथा स्फोट झाला असता.
नंतर अभिनव भारताच्या सेनापती बापटांनी रशियन क्रांतीकारकांकडुन बॉंब तयार करण्याची सोपी पध्दत मिळवुन तीन प्रति तयार करवुन घेतल्या. त्यांना भारतात पाठवण्यात आले.
अभिनव भारताने एक बॉम्ब बनवण्याचा गुप्त कारखाना सुध्दा सुरु केल्याची माहीटी अभिनव भारताचे सदस्य व सावरकरांचे मावस बंधु डॉ. वि.म. भट यांच्या पुस्तकात दिली आहे.

ब्रिटीशांच्या सैन्यातील भारतीय जवानांमध्ये अभिनव भारतातले काहि सदस्य उठावाची पत्रके पाठवत , त्यातले मीरत च्या छावणीतली काही पत्रके पकडली गेली.
१८५७ ला पहिला उठाव मीरत लाच झाल्यने एकच खळबळ उडाली होती.

जर सावरकरांच्या या सुवर्ण काळात पहिले महायुध्द सुरु होते तर परदेशी क्रांतीकारकांच्या मदतीने व भारतीय सैन्याच्या बंडामुळे भारतावर चालुन आलेले पहिले सैन्य कदाचित सावरकरांच्या नेतृत्वाखाली आलेले दिसणे अशक्य नव्हते. पण ते व्हायचे नव्हते.

सावरकरांच्या अटकेनंतर हा प्रयत्न लाला हरदया्ळ यांच्या गदर पार्टीने महायुध्दाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. गदर पार्टीचा इतिहास असाच रोमहर्षक असून डॉ. पांडुरंग खानखोजे आणि विष्णु गणेश पिंगळे या दोन तेजस्वी मराठी लोकांचा त्यात फार मोलाचा वाटा होता. तो इतिहास नंतर कधीतरी.

©चंद्रशेखर साने

अधिक वाचनासाठी
१. शत्रूच्या शिबिरात- स्वा. सावरकर http://www.savarkarsmarak.com/bookinpdfformat.php?id=78
3. सावरकर चरित्र- शि.ल.करंदीकर http://www.savarkar.org/…/pdfs/mr/savarkar_biography_mr_v00… )
4. १८५७ ते सुभाष - बाळशास्त्री हरदास
5. स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत- ग.प्र.प्रधान
6. Life of Br. Savarkar - Chitragupt ( RajgopalacharI )
http://www.savarkar.org/…/life_of_barrister_savarkar_by_chi…
8. अभिनव भारत - डॉ. वि.म.भट http://www.savarkar.org/…/pdfs/mr/abhinav_bharat_mr_v001.pdf

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...