Saturday, February 11, 2017

रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?

१९६७ साली भारताने आपला विसावा स्वातंत्र्य सोहळा साजरा केला. त्या वेळेस तत्कालीन ब्रिटिश राजदूत ‘जौन फ्रिमन’ यांना विचारण्यात आले की, ब्रिटिशांसाठी असा कुठला निर्णायक क्षण होता की, भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही असे लक्षात आले. त्यावेळेस ब्रिटिश राजदूतांनी नि:संदिग्ध आणि अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले की, १९४६च्या नौसनिक उठावामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आले.

ब्रिटिश राजदूतांनी म्हटल्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, असे ब्रिटिशांना लक्षात आणून देणाऱ्या या घटनेची आठवण गेल्या ७० वर्षांत फारशी कधीच, कशी कुणालाच झाली नाही? किंवा भारतीय स्वातंत्र्ययुद्धांच्या इतिहासातील महत्त्वाची अशी ही घटना अनुल्लेखानेच का मारण्यात आली?

१८५७ चा उठाव, उमाजी नाईक, वा.ब.फडके , चाफेकर बंधु, सावरकरबंधु, गदर , १९४२ ची हिंसक चळवळ, पत्री सरकार, आझाद हिंद सेना आणि नाविक दलाचा उठाव अशी एकामागुन एक अशी तेजस्वी सशस्त्र क्रांती परंपरा देशाला आहे. स्वातंत्र्य लढ्यातला एक भाग नि:संशय पणे गांधी व राष्ट्रिय सभेकृत जनजागृती होती हे नाकारता येत नाही.

पण नाविक सामर्थ्य हे ब्रिटीशांचे सर्वात मोठे सामर्थ्य. दुसऱ्या महायुध्दात जिंकुनही कंबरडे मोडलेल्या ब्रिटीशांचा नाविक दलाने बंड केल्यावर तर धीर पुर्ण खचला. सुमारे ७३ warships नी यात भाग घेतला.

१८ फेब्रुवारी १९४६ ला नौसैनिकांनी उठाव केला. मुख्य पुढाकार बी.सी.दत्त यांचा
युद्धाच्या अखेरीस विजयी झालेल्या ब्रिटिश नौदलात, आपणास कसलेच स्थान नाही. भारतातील ब्रिटिश राजसत्ता टिकविण्यासाठीच केवळ एक प्यादे म्हणून आपला उपयोग करून घेण्यात आला, ह्यची दत्त यांना तीव्रतेने खंत वाटली. दत्त व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना वेळोवेळी सहन कराव्या लागणाऱ्या अपमानांमुळे ते सगळे जणच संतप्त झाले होते. त्या सर्वाना ब्रिटिशांनी केवळ बळीचे बकरे म्हणून युद्धात वापरले होते. हे लक्षात आल्यावर त्यांचा संताप शिगेला पोहोचला. या अन्यायाचा प्रतिकार करावा, असे त्यांना तीव्रतेने वाढू लागले.

दत्त यांना अटक झाली. मुंबई , कराची कलकत्ता इ. बंदरात सैनिकांनी बंड केले. मुंबईत सहा दिवस, कलकत्त्यात सात दिवस कराचीत दोन दिवस आणि मद्रास मध्ये एक दिवस हे सुरु होते.

मुंबईतील रस्त्यांवरुन हे सैनिक फिरत होते आणि सर्वसामान नागरीकांमध्ये देशप्रेमाची लहर दौडली. हजारो लोक मुंबईत समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले पाहुन ब्रिटीशांच्या पोटात अक्षरश: गोळा आला. सैनिक शक्ती व लोकशक्तीचा तो अपुर्व मिलाफ होता. जेव्हा बंडखोरांबर ब्रिटीश सैन्य रणगाडे व तोफा घेऊ आले तेव्हा मुंबईच्या नागईकांनी गल्लीबोळाचा सहकार्य घेऊन ब्रिटीश सैन्यावर दगड विटांचा मारा केला. या चर दिवसात मुंबईत २२८ जण मारले गेले तरी लोकांचा प्रतिकार चालु होता. ब्रिटीशांनी युध्द्नौकांची रसद तोडल्यावर लोक अन्नधान्याची पुडकी घेऊन नौकांवर पोचवत होती.

हा सर्व इतिहास मी शाळेत कधीच शिकलो नाही. चार वाक्यात या बंडाचा उल्लेख संपवला जातो. अतिशय रोमहर्षक असा हा सैनिक उठाव आम्हाला अहिंसेने स्वातंत्र्य मिलाले या घोषात दामटुन टाकला गेला आहे. एअरफोेर्स , भूदल यांनीही ब्रिटीश विरु् भारतीय असा लढा झाला तर स्पष्ट पणे आम्ही लोकांच्या बाजूने उभे रहाणार असा निर्णय घेतला होता. स्वातंत्र्य लढ्याचे श्रेय सशत्र लढ्याला आणि सैनिकी शक्तीला पण यथायोग्य मिळायलाच हव, फक्त गांधी किंवा नेहरु वा एका पक्षाने स्वातंत्र्य मिळवले हा खोटा इतिहास असुन, ब्रिटीशांच्याच शब्दात सांगायचे तर भारतात पाठवायला आमच्याकडे पुरेसे सैन्य नाही आणि भारतीय सैन्य स्वातंत्र्य लढ्याच्या बाजुने गेल्याने, आमच्या वर उलटल्याने आम्हाला भारताला स्वातंत्र्य देण भाग पडल हेच मान्य करावे लागते.

©चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...