१.१९२४ ला रत्नागिरीला स्थानबद्ध झाल्यावर स्वा.सावरकरांचे अस्पृश्यतानिवारणाचे कार्य सुरु. २.श्रद्धानंद मध्ये महाडला अस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरु देण्याला मान्यता द्यावी या साठी लेख. सावरकरांनी यात पूर्वास्पृश्यांना पाणी भरु देण्यास विरोध करु नका असे स्पृश्यांआ उद्देशुन लिहिले तर पूर्वास्पृश्यांना लिहिले, स्पृश्यांनी तुम्हाला पाणी भर्य दिले नाही तर तुम्ही हिंदुधर्म सोडून जाल ही धमकी देऊ नका.कारण हिंदुइधर्म हा काही एकट्या स्पृश्यांचा नाही.त्यावर तुमचाही तेवढाच हक्क आहे.हि तुमची सामाईक मत्ता आहे.त्यासाठी लढा द्या. हिंदुधर्मावरिल अस्पृश्यतेचा कलंक वेळ पडली तर आम्ही रक्ताने धुवुन काढू ही डॉ.आंबेडकरांची प्रतिज्ञा खर्या हिंदुस शोभणारी आहे.म्हणूनच त्यांचा सत्याग्रह आम्ही न्याय्य समजतो. ३.सावरकरंचे अनुयायी व हिंदुमहासभेचे कार्यकर्ते नवी मौज चे संपादक श्री.अनंत गद्रे यांनी डॉ.आंबेडकरांची भेट घेतली व त्यांना डॉ.मुंजे,डॉ.कुर्तकोटी व बॅ.सावरकर यांना भेटण्याचा आग्रह केला. गद्रे यांनी पुढे लिहिले की या भेटीमुळे आंबेडकरांविषयी चे बरेच गैरसमज दूर झाले. ४.समता ...