Skip to main content

Posts

Showing posts from August, 2011

"स्वा.सावरकर- डॉ.आंबेडकर सहकार्य व मतभेद" टिपणे

१.१९२४ ला रत्नागिरीला स्थानबद्ध झाल्यावर स्वा.सावरकरांचे अस्पृश्यतानिवारणाचे कार्य सुरु. २.श्रद्धानंद मध्ये महाडला अस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरु देण्याला मान्यता द्यावी या साठी लेख. सावरकरांनी यात पूर्वास्पृश्यांना पाणी भरु देण्यास विरोध करु नका असे स्पृश्यांआ उद्देशुन लिहिले तर पूर्वास्पृश्यांना लिहिले, स्पृश्यांनी तुम्हाला पाणी भर्य दिले नाही तर तुम्ही हिंदुधर्म सोडून जाल ही धमकी देऊ नका.कारण हिंदुइधर्म हा काही एकट्या स्पृश्यांचा नाही.त्यावर तुमचाही तेवढाच हक्क आहे.हि तुमची सामाईक मत्ता आहे.त्यासाठी लढा द्या. हिंदुधर्मावरिल अस्पृश्यतेचा कलंक वेळ पडली तर आम्ही रक्ताने धुवुन काढू ही डॉ.आंबेडकरांची प्रतिज्ञा खर्‍या हिंदुस शोभणारी आहे.म्हणूनच त्यांचा सत्याग्रह आम्ही न्याय्य समजतो. ३.सावरकरंचे अनुयायी व हिंदुमहासभेचे कार्यकर्ते नवी मौज चे संपादक श्री.अनंत गद्रे यांनी डॉ.आंबेडकरांची भेट घेतली व त्यांना डॉ.मुंजे,डॉ.कुर्तकोटी व बॅ.सावरकर यांना भेटण्याचा आग्रह केला. गद्रे यांनी पुढे लिहिले की या भेटीमुळे आंबेडकरांविषयी चे बरेच गैरसमज दूर झाले. ४.समता ...

Short Report of HINDU MAHASABHA RELIEF ACTIVITIES DURING "Calcutta killing" AND "Noakhali Carnage"

नौखालीतील अत्याचारांच्या वार्ता अतिशय भीषण होत्या. बंगाल हिंदुसभेने या संबधात एक पुस्तिका (श्वेतपत्रिका) प्रसिद्ध केली. गांधीजींनीही नौखालीत लश्कराच्या संरक्षणात भेट दिली. हिंदुसभेचे अनेक कार्यकर्ते नोखाली , बंगाल मधे गेले व त्यांनी मदतकेंद्रे सुरु केली. हिंदुसभेचे कार्यवाह व सावरकरांबरोबर अंदमानात असलेले क्रांतीकारी आशुतोष लाहिरी व डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मदत कार्य सुरु केले व हिंदूंसाठी सहाय्य निधीची मागणी केली. नगर हून हिंदुसभेचे एक कार्यकर्ते श्री.विष्णु रामकृष्ण करकरे यांनी महाराष्ट्रातून निधी गोळा करुन सोबत चार कार्यकर्ते घेऊन पूर्व बंगाल मधे गेले. गांधीजींना तेथील सर्वधर्मिय प्रार्थनेत रामनाम सुरु झाले की मुसलमान उठून निघून जात हे पाहून खूप दु:ख झाले. हिंदुंची सक्तीची धर्मांतरे खून .बलात्कार ,मंदिरे-राजवाडे यांची नासधूस याची दखल स्वत: गांधीजींनीच आपल्या भाषणात घेतली.(दि.१५-११-१९४६ अ.प्रे.हिंद या वार्ता संस्थेचे वृत्त.) गांधीजींना हिंदु-मुस्लीम एकता धोरणाचे धोरणाचे "हेचि काय फल मम तपाला" असे झाले असावे. गांधीजींच्या...

वाल्मिकी रामायणाचे आकलन

रामायण हा एक इतिहास आहे. तो काव्यात्मक इतिहास आहे. यात वेगवेगळी अनेक प्रकारची भर पडलेली असून ते इतिहास नसून केवळ त्याचे आपल्या राजकीय ,जातीय, मानसिक गुलामगिरी यांचे प्रदर्शन आहे. काहिच भाग हे नव्या वाटा शोधतात. आपल्या पूर्वजांनी हे जे इतिहास लिहिले त्याचे स्वरुप सांस्कृतिक इतिहासाचे असून घटनात्मक पद्धतीने लिहिलेले नाहित. सांस्कृतिक इतिहासाचे आधुनिक पद्धतीने परिक्षण करणे मूळातच चूक आहे. जीवशास्तरातले प्रश्न पदार्थविज्ञानाने सोडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे हे आहे.एखाद्या पुस्तकात अभावाचा मुद्दा आला की लगेच घटनात्मक चिकित्सा करणारे संशोधक ती गोष्ट त्याकाळि अस्तित्वातच नसल्याचा शोध लावतात.उदा. पाणीनीच्या व्याकरणात स्त्रियांच्या नाकातील दागिन्यांचा उल्लेख नसला तर त्याकाळी नाकात दागिने घालण्याची प्रथाच नव्हती असे विचित्र अनुमान हे लोक काढतात. त्यांची बुद्धी भारतीय संस्कृती हिन ठरवण्यासाठी इतकी व्याकुळ असते की मुळात पाणीनी चा हा ग्रंथ दागिने किंवा अलंकार या विषयावर नसून व्याकरणावर आहे याचाही त्यांना विसर पडतो.रुपक कथा उलगडताना त्याचे तारतम्य ठेवावे लागते.परंप...

भारतातील तुर्की सत्तांतर :- खिलजी ते तुघलक मार्गे(व्हाया) फसलेली भारतीय राज्यक्रांती

इ.स.१३२० मध्ये दिल्लीचे खिलजी घराणे जाऊन तुघलक घराणे आले. या सत्तांतराच्या दरम्यान भारतीयांच्या एका गटाने परकिय आक्रमक राष्ट्राविरुद्ध केलेल्या फसलेल्या क्रांतीची घटना समाविष्ट असून फार थोडया लोकांना या इतिहासाची माहिती असते. तुगलक घराण्याचा वेडा महंमद बहुतेकांना माहिती असतो. गिरिश कर्नाड यांचे "तुघलक" हे एक प्रख्यात नाटकही आहे. "अल्लाउद्दीन खिलजी व महाराणी पद्मिनी " यातून उभ्या राहिलेल्या संघर्षाची कथा,नाटक,सिनेमा रुपी कलात्मक माहिती येऊन गेली आहे. मराठीत याच काळावर अल्लाउद्दीन खिलजी च्या दरबारातील अमीर खुस्रो व दक्षिणी गायक कलाकार गोपाळ नायक यांच्यातील गायन जुगलबंदीची मध्यवर्ति कथा कल्पून "देवगिरी बिलावल " या नावे एक कादंबरीही २०-२५ वर्षांपूर्वी वाचलेली आठवते.गोपाळ नायक या महान भारतीय गायकाने अमीर खुस्रो याला यशस्वी टक्कर दिली. अमीर खुस्रो ने गोपाळ नायकांना हरवण्याचा प्रयत्न केला पण श्रुती, ग्राम,मुर्धना ,जाति मुर्धना इ. शास्त्रीय संगीताची वैषिष्ट्ये कशाशी खातात हे त्याला शेवटपर्यंत कळले नाही.तरिही अमीत्र खुस्रोच्या नंतरच्या इराणी...

इतिहास लेखन, वाचन व संशोधन

बखरी,तवारिखा या खोटया असतात असे कोणताच शहाणा इतिहासकार म्हणत नाही. हि साधने दुय्यम असतात एवढेच त्यांचे म्हणणे असते. वि.का.राजवाडे हे सुद्धा बखरींना दुय्यम मानतात. एखाद्या अस्सल कागदपत्राच्या चिटोर्‍याचा पुरावा बखरीला खोटे पाडू शकतो असे ते म्हणतात. पण त्यासाठी आधी अस्सल कागदपत्राचा चिटोरा मिळावा लागतो व नंतरच बखरीतील काही भाग चुकीचा ठरु शकतो.पण त्या टाकाऊ असतात असा त्याचा अजिबात अर्थ नाही. बखरी ,तवारिखा दुय्यम असतात याची वेगवेगळी कारणे आहेत. तो दरबारी खुषमस्कर्‍या असू शकतो, वैयक्तिक रागलोभ, विचारधारा इ.त्याच्यात असू शकतात, त्याला त्याच्या वर्तमानातील एखादा पक्ष असू शकतो, काही वेळा तो आठवणींवर लिहित असतो व त्याची स्न्मरणशक्ती त्याला दगा दिलेली असू शकते. पण याचा अर्थ असा समजता कामा नाही कि त्याचे मोलच नाही किंवा त्यातली प्रत्येक गोष्ट हेतुत: किंवा मुद्दाम खोटी लिहिलेली असते. अन्यथा सर्व इतिहास ज्यावर सजलेला असतो त्याचा आधारच नष्ट होईल. इतिहास, इतिहास म्हणून फार काही शिल्लकच रहाणार नाही. कारण अस्सल क्कागदपत्रे मिळण्याचे प्रमाण दुय्यमच असणार हे उघड आहे. आज केवळ ३...