Wednesday, December 28, 2016

सावरकरांनी काय केले? गोव्याच्या कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे, त्यास अल्प शब्द मर्यादेत उत्तर देणारे माझे संकलन दि. २८-१२-२०१६ ला दैनिक गोमन्तक मध्ये मुद्रित झाले.

Image may contain: 1 person



Saturday, December 24, 2016

अस्मितेच "भांडवल" मराठी माणसाला व्यावसायिक बनवंयास अपुरे !

***** अस्मितेच "भांडवल" व्यापारी व व्यावसायिक होण्यासाठी पुरत नाही ****
१९४७ ते १९७१ पर्यंत हिंदुमहासभा शिल्लक होती व क्रमाक्रमाने कमकुवत होत गेली. या काळात सावरकर जवळपास निवृत्त झाले होते. आपण हिंदुहिताचे राजकारण करतो ,आपल्या नावात हिंदु शब्द आहे तरी हिंदुमहासभेला यश का मिळत नाही, हिंदु माणस आपल्याला मते का देत नाहीत याची उमज हिंदुमहाभेला पडत नव्हती. आपल्याला संपवत आहेत म्हणून वैचारीक दृ्ट्या सर्वात जवळ आलेल्या संघ परिवार, जनसंघ, गोळवलकर गुरुजी यांच्या नावे बोटे मोडणे, तळतळाट करणे या शिवाय अन्य उद्योग हिंदुमहासभेला राहिले नाहीत. मूळ वैचारीक शत्रू बाजूलाच राहिले.आज हिंदुमहासभा या पक्षातला आधीचा "अखिल भारतीय" हा शब्द अक्षरश: केविलवाणा वाटतो. हा पक्ष अधुनमधुन दिसतो ते मूठभर कार्यकर्ते आणि अन्य कोणाही पक्षाकडे नाही एवढ्या मोठया "अ.भा.हिंदुमहासभा भवन" या दिल्लीतल्या वास्तुच्या आधारावर.
महाराष्ट्रात दोन पक्ष मराठी माणसाच नाव घेतात. तामिळनाडु प्रमाणे महाराष्ट्रात पण दोनच स्थानिक पक्षांना स्थान रहावे आणि आलटुन पालटुन आपल्याच घराण्याचीच सत्ता महारष्ट्रात असावी अशी स्वप्ने त्यांना पडत असतात. स्वप्न पहायलाच हवित. पण थोड वस्तुस्थितीच भान सुध्दा त्यांनी ठेवाव. तामिळनाडु सारखी भाषिक अस्मिता महाराष्ट्रात नाही. इतर कोणाही प्रांतापेक्षा मराठी माणूस हा जास्त राष्ट्रिय वृत्तीचा आहे. महाराष्ट्रापेक्षा भारत त्यांना मोठा वाटतो. वडापाव विकुन मराठी माणसाच हित कस होणार हे त्यास कळत नाही. कोणत्याही भांडवली व्यवसायात निव्वळ अस्मितेच भांडवल करुन मराठी माणूस कसा उंची गाठणार हे त्याला कळत नाही. हिंदुसभेने हिंदुंसाठी राजकारण केल म्हणजे नक्की काय हित साधल हे जस त्याला कळत नाही तसच मराठीचा मुद्दा घेऊन मराठीच राजकारण करणाऱ्यांनी, गेल्या ५० वर्षात, मराठी माणसाच अस नेमक कोणत व किती हित साधल हे त्यास कळत नाही. खळ्ळ-फटाक्‌ करुन नवनिर्माण झाल्याचीही कुठली नवि दृष्ये अद्याप त्यास दिसली नाहीत.
शेवटी शेवटी ज्या हिंदुंना हिंदुसभा साद घालत होती त्याच हिंदुंना स्वत:च हित कळत नाही, आम्हाला टाळ्या देता पण मते देत नाही, हिंदुंच्याच सर्वात मोठया संघटनेने पाठीत खंजिर खुपसला, म्हणून बोल लावु लागली. पण शेवटपर्यंत आपण हिंदुंची महासभा असून पण हिंदु आपल्याला मत का देत नाहीत, आपणच तर कुठे चुकत नाही ना, या गोष्टींच आत्मपरिक्षण त्यांनी केल नाही. अजुनही संघ , जनसंघ आणि आता भाजपा कसे वाईट आहेत यावरच विविध जहरी भाष्य करण्यातच त्यांचा वेळ जात असतो.
याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असे वाटत असेल तर , मराठी लोक आपणाला मराठीच्या मुद्द्यावर मत का देत नाहीत यावर मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करायची वेळ आली आहे, एखाद्या घराण्याची अस्मिता म्हणजे मराठी अस्मिता नाही. हिंदुत्व आणि मराठीत्व यांचे एकत्रीकरण हाच मराठी माणसाचा स्थायीभाव आहे.
जो विचारप्रवाह विकासाच्या साथीने या दोन्ही अस्मितांचे एकत्रिकरण, त्यातल्या त्यात जास्त करेल (हे नेहमी तुलनात्मक असते, दगडापेक्षा वीट मऊ हा मोजण्याचा काटा) व बेरजेचे राजकारण करुन वाटचाल करेल तोच महाराष्ट्रात यश मिळवेल.
-चंद्रशेखर साने

Wednesday, December 21, 2016

मराठे शाहिची १२८ वर्षे

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अधिकृत काळ म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकापासून ( १६७४) ते पेशवाईच्या अंतापर्यंत म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह करुन ब्रिटीशांची तैनाती फौज स्वीकारली तोपर्यंत १८०२ पर्यंत. १८१८ ची लढाई हि केवळ एक दिवा विझतानाची फडफड होती,सेनापती बापु गोखले यांचा आदरच आहे पण... खरा शेवट १८०२ ला दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटीशांचे मांडलिकत्व स्वीकारले तेव्हाच झाला.
या १२८ वर्षात अनेक चढ उतार व संकटे आली. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या संकटात, महाराष्ट्र धर्माला जागून मराठी हिंदुंनी २७ वर्षे कडवी झुंज देऊन औरंग्याला गाडला.
बाजीरावांनी भारतभर मुलुखगिरी केली तर नानासाहेब पेशव्यांच्या काळात, रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी हिंदुंनी पार अटकेपर्यंत झेंडे रोवले.
पुढे पानीपतचे संकट आले. मराठी हिंदुंची अपार हानी झाली, पण तो जेत्यांना जिंकणारा पराभव होता. त्यानंतर काही काळातच थोरल्या माधवराव पेशव्यांनी हा पानीपतचा पराभव धुवुन काढला.
सवाई माधधवरावांच्या काळात खर्डयाला निजामाला धुळ चारली तो मराठी हिंदुंच्या ताकदीचा सर्वोच्च बिंदु समजला जातो. नंतर मात्र उतरती कळा लागली.
पेशवाई हि राजकिय दृष्ट्या प्रगत असली तरी सामाजिक दृष्ट्या मात्र अप्रगत होती. याचा अर्थ असा नाही की सर्व काळ ती पोथी निष्ठ व अप्रगत होती, एकुण समाजात जेवढी परंपरागत सामाजिक गुलामी होती तितकीच पेशवाईत होती. पेशव्यांनी ती कमी केली नाही तशी वाढवली पण नाही.
चिमाजी अप्पा व थोरले माधवराव हे वैयक्तिक पातळीवर नैतिक सामर्थ्य असणारे व शूर पेशवे पण अल्पायु. थोरले माधवराव क्षयाने गेले नसते तर त्यांनी कदाचित काही सुधारणावादी योजना आखण्याला वाव दिला असता. पण त्या जरतर च्या गोष्टी.
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशव्यांचे व एकुण सर्वच समाजाचे लाजिरवाणे अध:पतन झाले होते. हे अध:पतन थांबवणारी संत परंपराही खंडीत झाली होती. हे अध:पतन चारित्र्याच्या दृष्टीनेच केवळ नाही तर राष्ट्रिय दृष्टीकोनातून होते. परिणामी ब्रिटीशांचे फावले. ब्रिटीशांच्या राष्ट्रिय नैतिक सामर्थ्यापुढे भारतीय समाजाचे राष्ट्र म्हणून ढासळलेले नैतिक अधिष्ठान फार मोठे कारण आहे, केवळ लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे नाहीत, हे कारण नव्हते.
शिवाजी महाराजांच्या काळात हे नैतिक अधिष्ठान अत्युच्च पातळीवर होते म्हणून ते राष्ट्रनिर्माते होते.
अशा प्रकारे मराठा साम्राज्य त्यातील गुणदोषांसहित १२८ वर्षे टिकले.यावेळी राष्ट्रवादाची रितसर मांडणी हिंदुस्थानात नसली तरी या साम्राज्यात राष्ट्रीय दृष्टीकोन व भारतीय सीमांविषयी जाणीव पुरेपुर होती. पण ब्रिटीश राष्ट्राच्या शक्तीसमोर ते निर्बल ठरले.
आजही हिंदु एकता व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हे दोनच गुणच सध्याचे हिंदवी स्वातंत्र्य बळकट करतील. जातीविद्वेष हा सध्या प्रस्थापित असलेल्या हिंदवी राष्ट्राचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रत्येक हिंदुने याविरुध्द लढणे हे कर्तव्य आहे.
-चंद्रशेखर साने

निरंजन पाल

खुर्चीवर बसलेल्या सावरकरांच्या शेजारी उभे असलेले गृहस्थ श्री. निरंजन पाल-
त्यांची थोडक्यात ओळख
पहिल्या पिढीतल्या लाल-बाल-पाल या त्रि-नेत्यांमधील श्री. बिपिनचंद्र पाल यांचे ते सुपुत्र-सावरकरांचे अनुयायी-अभिनव भारत चे सदस्य- ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ते सावरकरांसमवेत उपस्थित होते व "सागरा प्राण तळमळला" या काव्याचे प्रथम उमटलेले शब्द सावरकरांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकुन कागदावर लिहुन घेणारे.
अभिनव भारतच्या पतनानंतर चित्रपट क्षेत्रात प्रवेश, लंडनमध्ये चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी- भारतात आल्यावर चित्रपट उद्योगातच प्रवेश केला.
निरंजन पालांनी "अछुत कन्या" या गाजलेल्या हिंदी सिनेमाचे पटकथा लेखन केले ( श्री. गांधी (महात्मा) ) यांनी पाहिलेला एकमेव हिंदी सिनेमा "अछुत कन्या" हाच होता बहुतेक -
१९५२ ला निरंजन पालांनी सावरकर भवनात येऊन सावरकरांच्या १८५७ चे समर या जगद्‌विख्यात ग्रंथावर चित्रपट काढण्यासंबंधी सावरकरांशी चर्चा केली, मात्र तो चित्रपट माहीत नसलेल्या कारणांनी प्रत्यक्षात आला नाही.
Image may contain: 2 people, people standing and suit

Tuesday, December 20, 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोयी सोयीचे

कला, अभिव्यक्ती यांवर पुरोगामी दहशत आणि मुस्लिम तुष्टीकरणात्मक धोरण ठेवणे याचा आधुनिक भारताचा इतिहास खूप मोठा व खेदजनक आहे. मी वाचलेली दोन उदाहरणे ,
कै.श्री.विश्राम बेडेकर यांचा शेजारी हा चित्रपट खुप गाजला. ग्राऊंड लेव्हलला हिंदु-मुस्लीम कसे एकत्र रहातात वगैरे सांगणारा आणि फाळणीच्या असपासच्या काळातला हा प्रबोधनपर चित्रपट. मला पण आवडला. धर्माच्या पलिकडे जाऊन मानवता जपावी, परस्परांत सौदार्ह जपावे आणि ते दुतर्फा असावे याचा मी पुरस्कर्ता आहे.
पण यात एक मेख अशी आहे, की या दोन हिंदु व मुस्लिम शेजाऱ्यात भांडण होऊन दुहीचे बीज पेरले जाते त्यात चुक दाखवली गेली ती हिंदु शेजाऱ्याची. यावर लेखक कै.विश्राम बेडेकर यांची त्यांच्याच एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्रात आलेली टिपण्णी अशी की, हिंदु शेजाऱ्याची चुक दाखवणे योग्य होते कारण हिंदु हे सहनशील असल्याने ते त्यांना कमीपणा दर्शवणारी पटकथा सहन करु शकतात पण मुसलमान समाजाला ते रुचले नसते. म्हणुन त्यांनी पटकथेत हिंदु व्यक्तीचीच चूक दाखवणे आवश्यक व चित्रपटाच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे ठरवले व तसेच लेखन केले.
दुसर उदाहरण कै. सुधीर फडके यांच. फार पुर्वी त्यांना सावरकरांच्या "काळे पाणी " या कादंबरीवर एक चित्रपट काढायचा होता, व त्याची जुळवाजुळवही त्यांनी सुरु केली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने अट घातली की सावरकरांनी या कादंबरीतले रफीउद्दीन हे खलपात्र बदलुन ( सावरकरांनी रंगवलेले रफीउद्दीन हे पात्र ७००-७५ % माधव काझी उर्फ लखोबा लोखंडे प्रमाणे वागणारे आहे, हा योगायोग की सावरकरांचा भविष्यवेध , सत्यघटेनेचा व कादंबरीचा नेमका काळ तपासावा
लागेल) हिंदु नामक करावे, अन्यथा त्याच्याच सारखे दुसरे एक हिंदु खल पात्र पटकथेत सामिल करावे. लेखकाने काय लिहावे याचे दिग्दर्शन , निर्देशन व अटी सावरकर मान्य करणे शक्यच नव्हते व हा चित्रपटच बारगळला.( माझा व कै. सुधीर फडके यांच्यात सावरकर चित्रपटासंबंधात काही वाद १९८९ साली उद्‌भवला होता, आधी माझा लेख व त्यावर प्रतिवाद करणारा कै.श्री. फडके यांचा लेख "साप्ताहिक सोबत" मध्ये प्रसिध्द झाला, त्यात कै. फडके यांनी वरील दोन्ही हकीकतींना दुजोरा दिला होता.)
-चंद्रशेखर साने
संदर्भ:-
एक झाड दोन पक्षी- विश्राम बेडेकर
काळे पाणी आवृत्ती १९८४ - प्रस्तावना

Sunday, December 18, 2016

अख्खा हत्ती खाण्याची युक्ती

एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन हिंडत असताना त्यास एक मेलेला हत्ती दिसला. तो बेहद्द खुष झाला. मेलेल्या हत्तीचे मांस आता त्याला खूप दिवस पुरणार होते. त्यास जिवंत ठेवणार होते.
पण तेवढ्यात त्यास सिंहाची डरकाळी ऐकु आली. कोल्हा चतुर होता. सिंहाला पाहताच तो नम्रपणे म्हणाला, या या महाराज आपलीच वाट पहात होतो, आपल्या साठीच मी या हत्तीची राखण करत थांबलो होतो. आपण जंगलाचे राजे, आपलाच या मांसावर हक्क !
वनराज खुष झाले, म्हणाले, तू माझा खरा नागरीक. पण आत्ता माझे पोट भरले आहे व तशीही मी दुसऱ्याने केलेली शिकार खात नसतो, तेव्हा तुझ्या एकनिष्ठेचे बक्षिस म्हणून हि शिकार मी तुला देऊन टाकतो.
कोल्हाने वाकुन नमस्कार केला आणि सिंह तेथून निघुन गेला.
कोल्ह्याने हत्तीचे निरिक्षण सुरु केले. हत्तीच कातड जाड आणि काळ केसाळ होत. कोल्ह्याच्याने ते एकट्याच्याने फाडणे अशक्य प्राय होते.
तेवढयात तिथे एक वाघ आला आणि त्याने डरकाळी फोडली.
कोल्हा हुशार होता, अजिबात न घाबरता तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अरे वाघोबा, हि शिकार वनराज सिंहांनी केली आहे आणि मला ते राखण करण्यास सांगुन नदीवर स्नानास गेले आहेत, त्यांनी मला जो कोणी या शिकारीस तोंड लावेल त्याचे नाव सांगण्यास सांगितले आहे, विशेष करुन ते मला म्हणाले होते की त्यांना वाघाची फार चीड आहे, तु दिसलास तर मला लगेच सांगायला ये. तेव्हा तुला जर प्राणाची काळजी असेल तर त्वरित निघुन जा. ते ऐकताच वाघ सिंहाच्या भीतीने घाबरुन पळुन गेला.
आता हत्तीला कसे फाडावे याचा कोल्हा विचार करत असतानाच एक चित्ता तेथे आला. कोल्ह्याने विचार केला की श्रेष्ठास नैवेद्य दाखवुन, शूर पण दुष्ट वाघास श्रेष्ठाची भीती दाखवुन आपण काम साधले. आता आपल्यास वरचढ पण अन्य दोघांच्या तुलनेने शक्तीत कनिष्ठ अशा या चित्त्यास थोडी लालुच दाखवावी, हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे काम याच्याकडून करुन घ्यावे, कारण याचे दात व नखे फार अणकुचीदार आहेत.
असा विचार करुन तो चित्त्यास म्हणाला अरे भावा, हि शिकार सिंह महाराजांनी केली आहे व मला राखण करण्यास बसवले आहे.
चित्ता म्हणाला असे असेल तर येथुन पळुन जाणेच बरे.
कोल्हा म्हणाला, तू असा घायकुतीला येऊ नकोस, तू माझा भाऊ आहेस, तू फार भुकेलेला दिसतोस. मी असे करतो , एका बाजूला जाऊन मी सिंह येत नाही ना पहातो तोपर्यंत तू पोटभर खाऊन घे.
चित्ता भुकेला होताच, त्याने कोल्ह्याचे हे म्हणणे मान्य करुन हत्ती ला फाडण्यास सुरुवात केली. हत्तीचे जाड कातडे फाडण्याचे आपले पुरेसे काम होताच कोल्हा ओरडला, अरे मुर्खा पळ पळ, महाराज येत आहेत. चित्ता घाबरुन पळुन गेला.
आता कोल्हा निवांत पणे चित्त्याने फाडलेल्या भागाचे मांस खाऊ लागला. तेवढयात दुसरा एक भुकेलेला आणि संतापलेला कोल्हा हत्तीचे मांस खाण्यासाठी धावुन आला.
कोल्ह्याने विचार केला श्रेष्ठास सामाने, दुष्टास भेदाने , कनिष्ठ चित्त्यास दामाने म्हणजे लालच दाखवुन त्यांच्यावर आपण मात केली.
पण हा कोल्हा आपल्याला तुल्यबळ आहे, नीतीशास्त्राप्रमाणे आपण याच्याशी संघर्ष आणि लढाई करणेच शौर्याचे लक्षण आहे. असा विचार करुन त्यानेही त्या कोल्ह्यावर उलट चढाई करुन त्यास पळवुन लावले.
अशा प्रकारे चतुर कोल्ह्याने राजनीतीशास्त्राने सांगितलेल्या साम, दाम, भेद व दंड अशा चारही युक्त्यांचा वापर करुन आपले अन्न स्वकष्टाने प्राप्त केले व बराच काळ आपला चरितार्थ सुखाने चालवला.
-चंद्रशेखर साने
पंचतंत्र कथा

Saturday, December 17, 2016

थोडा वेळ लागेल पण नोटाबंदीला यश १००%

********** थोडा वेळ लागेल पण यश १००% ************
मी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचा समर्थक आहे हे माझ्या कपाळावर लिहिले आहे का काय कळत नाही, पण मला आतापर्यंत एकाही बॅंकेत पैसे काढायला त्रास झाला नाही. सर्वत्र सुटे पैसे मिळत राहीले, cash counter असो वा ATM अर्ध्या तासा पेक्षा अधिक काळ कोठेही थांबावे लागले नाही.
जनता सहकारी बॅंकेत १०००, ३०००, ५००० अशा पधतीने रक्कम काढता येते आहे. त्यात नेहेमी एक हजार रुपये १०० च्या नोटात व बाकीचे दोन हजाराची नोट मिळाली. हे दोन हजार सुध्दा अगदी सहजी सुटे होत गेले. काही छोटे वा मध्यम व्यापारी लोक जेव्हा क्रेडीट/डेबिट कार्ड घ्या म्हटल्यावर नाही म्हणाले, तेव्हा त्यांच्यापुढे मी २००० ची नोट पुढे करत होतो, ते निमुट पणे मला सुटे देत होते. Pay tm* चे खात आहे व त्याच्या wallet मध्ये पण पैसे भरुन ठेवले आहेत , पण त्याचाही वापर करायची अद्याप एकदाही वेळ आली नाही.
रोकड सुलभता कायम राहिली आहे. अगदी घरकाम करणारे, भाजीवाले, फळवाले रिक्षा इ. बरोबर लहान लहान व्यवहार करताना कसलीही अडचण आली नाही adjust करावे लागले नाही. ATM वरच्या रांगा दिसल्या ते रांगेत का उभे रहातात हे पण कळले नाही, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थीच ८०% जास्त प्रमाणात रांगेत का दिसतात हे कोडे पण उलगडलेले नाही.
L.I.C., M.S.E.B. , Internet, Share Market, Telephone इ. बाबबत डीजिटल होऊन मला किमान पाच पासुन ते पंधरा वर्षे होऊन गेली. तीही अडचण नाही. ग्राहक पेठ गेली काही वर्षे कसलाही अधिक सरचार्ज न घेता क्रेडीट कार्ड accept करते आहे, त्यामुळे महिन्याच्या किराणा मालाचा प्रश्न नाही.
काही तथाकथित विद्वान, सुत्रसंचालकांसह, बकवास चर्चा करणाऱ्या न्युज चॅनेलवर १ दिनांकेपासुन परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी आक्षेपार्ह विधाने सर्रास करत आहेत, हि त्यांची चिंता नसून दंगली व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे, का मोदी आल्यापासून व नोटाबंदंच्या निर्णयानंतर पाण्याविना मासोळी सारख्या तडफडणाऱ्या अस्वस्थ लोकांच्या वतीने चर्चात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातुन दिल्या जाणाऱ्या या धमक्या आहेत यावर प्रशासन व पोलिस खात्याने विचार करायला हवा. कारण असे बडबडणाऱ्यांत मनात विष-भरलेले अराजकतावादी व नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक सुध्दा आहेत. मोदी आले तर देश सोडुन जाऊ म्हणणारे, पुरस्कार वापसी करणारे, भारत के तुकडे होंगे हजार म्हणणारे अस्वस्थ आहेत. मोदी आल्यावर दंगली होऊन अमुक एक हजार लोक मरतील वगैरे वाचाळपणा करणारे सुध्दा हतबल झालेत. आपल्या थयथयाटाने भूकंप होईल अशी आशा बाळगुन आहेत. पण मोदींची प्रशासनावर उत्तम पकड आहे याची खात्री आहे. त्यामुळे या धमक्या प्रत्यक्षात उतरावयाला गेले तर त्यांचे काळे चेहरे जगापुढे उघडे पडतील.

नोटाबंदीचा निर्णय हा दीर्घकालिन निर्णय आहे वार्षिक ताळेबंद मांडुन त्याचा परीणाम कळणार नाही.

पुर्वी पण रु. १००० च्या नोटा रद्द केल्या होत्या , आता वेगळा काय फरक पडेल अस वाटणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की आता मानसिकतेत फरक पडणार आहे.
पुर्वी खाल्लेला पैसा सुरक्षित असण्याचा फील असायचा करप्ट लोकांना !
आता कोणत्याही क्षणी वाममार्गाने मिळवलेला पैसा मातीमोल करण्याची ताकद सरकारी यंत्रणेत असल्याची खूणगाठ बांधली आहे भ्रष्टाचारी लोकांनी मनाशी.
सरकारने- शासनाने आपल कणखर अस्तित्व दाखवुन, आमच कोण काय वाकड करु शकणार आहे या भ्रष्टाचारी मानसिकतेवर केलेला आघात पण इतर फायद्यांप्रमाणेच कमी महत्वाचा नाही. निगरगट्ट कातडी असलेल्या लोकांच्या मनात सुध्दा या निर्णयाने धडकी भरवली आहे.
पुर्वीचे १००० रु कोणाला सहसा दिसायचे पण नाहीत. आता पाचशे नोटेचे पण अवमूल्यन झाले आहे. अगदी तळागाळाच्या व्यवहारात सुध्दा भ्रष्ट्राचार होतो त्यालाही हा दणका आहे. मोठे भ्रष्टाचार धोक्याचेच पण ते सर्वसामान्यांना प्रत्यक्ष भिडत नसतात, रोजच्या आयुष्यावर परिणाम दिसायला दिर्घकाल जात असल्याने जाणवत नाहीत. पण चतुर्थ श्रेणीतल्या भ्रष्टाचाराला सर्वसामान्य मनुष्याला प्रत्यक्ष भिडावे लागते व तो एकाच वेळी त्याचा शोषक आणि शोषित अशा दोन्ही भूमिका निभावतो, हि तर एक विलक्षण स्थिती आहे. मला भ्रष्टाचार्यांना पैसा द्यावा लागतो म्हणून मी पण दुसरी कडून पैसे खाणार असे हे दुष्ट चक्र भारतात तयार झाले आहे.
सरकारच्या या आणि येऊ घातलेल्या पुढील कडक पावलांनी हे दुष्टचक्राचा लवकरात लवकत भेद व्हावा, हि लढाई आपल्या सगळ्यांची आहे. तात्पुरत्या फायद्या तोट्यांकडे पाहुन रुसुन बसण्याची नाही.
अर्थक्रांतीमधले नोटाबंदी हे केवळ पहिल पाऊल आहे. मागचा काळा पैसा खणुन निघेल तेवढा निघेल पण यापुढे काळा पैसा निर्माणच होऊ नये या व्यवस्थेची बिजे या निर्णयात रोवली आहेत. दहशतवादाला आळा हा एक साईड इफेक्ट आहे. आत्मघातकी लोकांना केवळ नोटाबंदीने रोखता येत नाही हे लहान पोरांनाही कळते.
जर पुढची टर्म मोदींनाच मिळली तर हि लढाई अधिक प्रभावशाली होईल. दुसरे कोणी आले तर परत मंदावेल, पण अगदीच उलटे निर्णय घेतले नाही गेले तर थांबणार नाही आता. रोकडमुक्त व्यवहार ही २१ व्या शतकाची पाऊलवाट ठरेल.
पुढची टर्म पण मोदींना मिळाली (ती मिळेल याचीच जास्तीत जास्त शक्यता आणि अपेक्षा आहे) तर निवडुन आल्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे २०२२-२३ मध्ये रु. २०००/- ची नोट सुध्दा क्रमाक्रमाने रद्द केली जाईल यात शंका नाही. २०१९ ला सुध्दा मोदींकडेच नेतृत्व येणे देशाच्या व राष्ट्राच्या हिताचे असेल.

© चंद्रशेखर साने

Friday, December 16, 2016

तुका म्हणे ऐशा नरां

तुका म्हणे ऐशा नरां मोजुनी माराव्या पैजारा ***
प्रत्येक कैद्याला तुरुंगातील कामाचा भत्ता मिळतो. तुरुंगातून सुटल्यानंतर समाजात त्याचे पुनर्स्थापन करायचे कोणत्याही शासनयंत्रणेचे धोरण आणि कर्तव्य असते. मग ती परकिय असो वा स्वकीय.
इतर अनेक राजबंद्यांना जशी* राजक्षमा मिळाली तशी सावरकरांना त्यांच्या कोणत्याही सुटकेच्या अर्जांसाठी ब्रिटीशांनी कोणतीही क्षमा केली नाही. व अंदमानातुन सोडले सुध्दा नाही. तर त्यांना अंदमानातून केवळ रत्नागिरीच्या तुरुंगात हलवले. त्यामुळे सावरकरांना मुळात अर्जांवर आधारीत क्षमा दिलीच गेली नाही. कारण ब्रिटीश त्यांचे सुटकेचे अर्ज म्हणजे केवळ सुटका करुन घेण्याची चाल असल्याचे ओळखुन होते. त्यांना सोडुन देण्यास ब्रिटीशांसारखा धुर्त शत्रू मुर्ख नव्हता.
नंतर दोन अटी म्हणजे रत्नागिरीत स्थानबध्द राहीन व राजकारणात भाग घेणार नाही या आणि केवळ याच दोन अटींवर सावरकरांना तुरुंगातून सोडून रत्नागिरीत स्थानबध्द केले गेले. जुन्या गोष्टी काढायच्या नाहीत आणि कोणाही सहकाऱ्याची नावे , कटासंबंधी माहिती विचारायची नाही या सावरकरांच्या मुख्य प्रतिअटी होत्या त्या ब्रिटीशांनी मान्य केल्या. स्थानबध्दतेच्या काळात म्हणजे १९२४ ते १९३७ अशा १३ वर्षांच्या काळात त्यांच्या वर पोलिसांची नजर असे. गुप्त पोलिस पाळतीवर असत. त्यांची वकिलिची पदवि रद्द केली होती व सनद दिलिच गेली नाही त्यामुळे वकिली करणे अशक्य होते , इतकेच नव्हे तर BA ची पदवी पण काढुन घेतली होती, तसेच त्यांच्यावरच्या राजद्रोहाच्या गुन्ह्यामुळे त्यांना नोकरी मिळणे अशक्य होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या सासऱ्यांची पण सर्व मालमत्ता जप्त केल्याने ( त्यांचा चष्मा व अंगावरचे कपडे सुध्दा जप्त केले गेले होते व तुरुंगात ते वापरत असलेला चष्मा आणि कपडे ही सुध्दा सरकारी मालमत्ता होती. तुरुंगातून पुढे १९२४ ला सुटल्यावर सुध्दा त्यांना एका स्नेह्याने दिलेले कपडे घालावे लागले होते) त्यांना उपजिविका करणे अशक्य होते. व स्थानबध्दता म्हणजे पण एक प्रकारे तुरुंगवासच असल्याने त्यांना भत्ता मिळणे योग्यच होते, त्यास पेन्शन वा निवृत्तीवेतन नाही तर तुरुंग भत्ता म्हणतात. तुरुंगात जेवणखाणाची सोय हि सुध्दा एखादा कृतघ्न माणूस सावरकर तुरुंगात ब्रिटीशांचे अन्न खात बसले होते असे म्हणु शकेल. हा भत्ता सुध्दा त्यांना १९२९ पासुन मिळु लागला आधीची पाच वर्षे नाही. १९३७ पर्यंत हा तुरुंग भत्ता सावरकरांना मिळत असावा, उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नव्हते. ६०/- ही त्या काळात अत्यंत तुटपुंजी रक्कम होती (जो इतर बंगाली राजबंद्यांना रु. १००/- मिळत असे) व त्यांच्या त्या हलाखीच्या परिस्थितीचे वर्णन गांधीवादी विचारवंत व सावरकरवादी नसणारे संशोधक कै.श्री. य.दी.फडके यांनीच करुन ठेवले आहे. ते सर्वांना मान्य व्हायला हरकत नाही. या काळात सावरकर जे लेखन करत त्याचे तुटपुंजे मानधन व धाकट्या भावाची थोडीशी आर्थिक मदत एवढच त्यांना मिळत होते.
जे कोण लोक या उपजिविकेची सर्व साधने काढुन घेतल्याने, ब्रिटीश सावरकरांना चरितार्थ चालवण्यासाठी देत असलेल्या ६० रु भत्त्यावर (जी त्या काळात सुध्दा अत्यंत तुटपुंजी रक्कम होती) बोट दाखवत असतील ते सर्व एक नंबरचे हलकट वृत्तीचे आणि माणुसकीला काळीमा असलेले नीच मनुष्यच असू शकतात. "तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा" , पण यांना पैजारांनी म्हणजे जोड्यांनी बडवले तर जोड्याचाच अपमान होईल.
-चंद्रशेखर साने

Friday, December 2, 2016

Name of Story - हा देश एक मुर्खांचा बाजार


एका पर्वतावरील वृक्षावर 'सिंधुक' नावाचा एक पक्षी राहात होता. त्याच्या विष्ठेतून सोन्याचा रवा पडे. एकदा त्या वृक्षाजवळून एक पारधी चालला असता, तो सिंधुक त्याच्या समक्ष शिटला. त्याच्या विष्ठेत चमकत असलेले सोने पाहून त्या पारध्याने त्याला जाळ्यात पकडले.
मग त्याला घेऊन घरी जाताना तो पारधी मनात म्हणाला, विष्ठेतून सोने देणारा पक्षी मजपाशी आहे हे वृत्त जर राजाला कळले, तर तो या पक्ष्याला तर घेऊन जाईलच, पण त्याशिवाय तो मलाही शिक्षा ठोठवील. त्यापेक्षा हा पक्षी राजाला नेऊन दिलेला बरा. मनात असे ठरवून त्याने त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य राजाला सांगून, त्याला त्याच्या हवाली केले आणि राजाने त्या सिंधुकाला एक सेवेकाकरवी पिंजर्‍यात अडकविले.
तेवढ्यात त्या राजाचा प्रधान तिथे येताच, जेव्हा राजाने त्याला त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य सांगितले, तेव्हा तो म्हणाला, 'महाराज, पक्ष्याच्या विष्ठेतून सोने निघणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही त्या पक्ष्याला पिंजर्‍यातून मुक्त करा.' राजाने त्याप्रमाणे करताच तो पक्षी एका उंच जागी जाऊन शिटला. त्या विष्ठेतून चमचमणारे सुवर्णकण पाहून राजा म्हणाला, 'अरेरे ! विष्ठेतून सोने देणार्‍या या पक्ष्याला सोडून देणारा मी मूर्ख आहे !'
यावर सिंधुक पक्षी म्हणाला, 'हे राजा, या जगात तू एकटाच काही मूर्ख नाहीस. पारध्याच्या समोर सुवर्णभरित विष्ठा शिटलो तर तो आपल्याला पकडील ही गोष्ट कळत असूनही, मी त्याच्या समक्ष शिटलो व स्वतःहून त्याच्या जाळ्यात सापडलो. तेव्हा तुझ्याप्रमाणे मीही एक मूर्खच आहे. आणि तो पारधी ? विष्ठेतून सुवर्ण देणार्‍या मला पाळून स्वतः श्रीमंत होण्याऐवजी त्याने मला तुझ्या स्वाधीन केले ! तेव्हा तुझ्या-माझ्याप्रमाणे तो पारधीही मूर्खच ! थोडक्यात सांगायचे तर या जगात शहाणे थोडे. सगळीकडे मूर्खांचाच बाजार ! हा देशच एक मुर्खांचा बाजार आहे
एवढे बोलला आणि तो पक्षी उडून गेला.
Source पंचतंत्र
महत्वाची तळटिप :- सोन्यासंबंधात अर्धवट बातम्या आणि अफवा वाचुन आपापल्या प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या फेसबुकी बुध्दीमंतांचा या कथेशी काहीही संबंध नाही. मला असच जुनपान वाचलेल काहिबाही आठवत आत अधुनमधुन

No automatic alt text available.No automatic alt text available.No automatic alt text available.

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...