Wednesday, December 21, 2016

निरंजन पाल

खुर्चीवर बसलेल्या सावरकरांच्या शेजारी उभे असलेले गृहस्थ श्री. निरंजन पाल-
त्यांची थोडक्यात ओळख
पहिल्या पिढीतल्या लाल-बाल-पाल या त्रि-नेत्यांमधील श्री. बिपिनचंद्र पाल यांचे ते सुपुत्र-सावरकरांचे अनुयायी-अभिनव भारत चे सदस्य- ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ते सावरकरांसमवेत उपस्थित होते व "सागरा प्राण तळमळला" या काव्याचे प्रथम उमटलेले शब्द सावरकरांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकुन कागदावर लिहुन घेणारे.
अभिनव भारतच्या पतनानंतर चित्रपट क्षेत्रात प्रवेश, लंडनमध्ये चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी- भारतात आल्यावर चित्रपट उद्योगातच प्रवेश केला.
निरंजन पालांनी "अछुत कन्या" या गाजलेल्या हिंदी सिनेमाचे पटकथा लेखन केले ( श्री. गांधी (महात्मा) ) यांनी पाहिलेला एकमेव हिंदी सिनेमा "अछुत कन्या" हाच होता बहुतेक -
१९५२ ला निरंजन पालांनी सावरकर भवनात येऊन सावरकरांच्या १८५७ चे समर या जगद्‌विख्यात ग्रंथावर चित्रपट काढण्यासंबंधी सावरकरांशी चर्चा केली, मात्र तो चित्रपट माहीत नसलेल्या कारणांनी प्रत्यक्षात आला नाही.
Image may contain: 2 people, people standing and suit

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...