Wednesday, May 18, 2011

अध्यात्मिक दृष्ट्या रोग म्हणजे काय?

एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राणी निर्माण होत गेले ते जास्तीत जास्त सुख मिळवण्यासाठी व त्यात वाढ करण्याच्या "हेतुने" ! निसर्गनियमाप्रमाणे आज सुख संवेदना घेतली की त्याचे मूल्य म्हणून दु:ख संवेदना येणारच आहे. ती जीवाला टाळता येत नाही पण मनुष्याला जास्तीत जास्त लांबवता मात्र येऊ लागली. त्यामुळे कर्म आणि त्याचे फळ यात वेळेचे अंतर निर्माण होऊ लागले. कर्माचे फळ जेवढे जास्त वेळ लांबवले तेवेढे चक्रवाढ व्याजाने अधिक मिळू लागले त्यातून माणसाला आपले कर्म व त्याचे फळ यातील कार्यकारणभाव समजेनासा झाला. म्हणून आपल्यावर होणार्या प्रत्येक परिणामाचे कारण आपल्या आतच आहे हे त्याला कळेनासे झाले आहे. कर्माचा परिणाम शरीरात साठून राहतो.

उदा. दारुचा परिणाम शरीरात साठून राहतो. कालांतराने त्याचे दुष्परीणाम होतात. जेव्हा माणूस संतापी असतो त्याचे परिणाम साठून राहतात ते रक्तदाब ,ह्रुदयविकाराच्या रुपाने कालांतराने दिसतात. खूप चालून आल्यावर पाय लगेच न दुखता दुसर्या दिवशी दुखु लागतात.आपल्या प्रत्येक भावभावनांचे ,विकारांचे परिणाम सूक्ष्मपणे साठत राहतात.

हि साठवण्याची क्रिया शरीरबाहेर इतरांवरही आपण घडवून ठेवतो.उदा. आपल्या चुकीच्या वागण्याने जेव्हा इतरांना दुखावतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या मनात किंवा मेंदुच्या पेशीत साठतो कालांतराने तो व्यक्त होतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की हा माणूस माझ्याशी असा का वागला मी किती चांगला आणि मला असे फळ का मिळाले?

आपले शरीर म्हणजे अनेक पेशींनी बनलेले असून त्या पेशींना स्वतंत्र अस्तित्वहि असू शकते प्रत्येक पेशीला मनही असते. स्वार्थासाठीच त्या एकत्र आलेल्या असतात. मनुष्य जेव्हा अहंकाराने सुखाच्या लालसेने अतिरेक करतात ,स्वत:च्या शरीराच्या विविध अवयवातही असमान दृष्टिने वागतात (जिभेसाठी पोटावर अन्याय) तेव्हा या पेशी दुखावल्या जातात व बंड करतात. शरीरात राहून किंवा शरीराबाहेर जाउन त्या व्यक्तीचा सूड घेतात. व्यक्ती स्वत:च्या सुखासाठी गरजेचा विचार न करता अन्न घेते तेव्हा या पेशींवर त्याचा ताण येतो मर्यादेबाहेर गेले की त्या बंड करतात संप करतात. मेडीकल सायन्स म्हणज्ते की लाखो पेशी दर सेकंदाला शरीराच्या आत येतात व बाहेर जातात. दुखावल्या गेलेल्या पेशी सूड घेतात त्या अर्थातच स्वरुप बदलून मनुष्याला हानीकारक रुप धारण करतात (जेनेटिक संरचना बदलून) व रोग जंतु म्हणून व्यक्तीच्या शरीरात रोग उत्पन्न करतात.

मंत्र म्हणजे मनाला त्राण देणारे. आपल्या चुका समजावून घेऊन त्यात बदल करण्याचे आश्वासन मनाने शरीराला देणे यात अपेक्षित आहे. आपल्या आचरणात ज्ञानपूर्ण बदल असायला हवा. औषधांचा उपयोग या शत्रू पेशींना दडपण्यासाठी नसून त्यांच्यातली आपल्याविषयी सूडाची भावना काढून टाकण्यस मदत म्हणून असायला हवी. या पेशींना औषधे म्हणजे कारवाईसाठी आलेले पोलिस किंवा शत्रु सैंन्य वाटता कामा नये. मंत्र हे मनाला त्राण देऊन संयम शिकवणारे असावेत. स्वयंसूचनेत खूप मोठी ताकद असते तीच मंत्रावरील श्रद्धेने जागृत होईल पण त्याबरोबर आचरणात बदलहि अपेक्षित असतात, नुसते मंत्र म्हणून काय होणार? व्यायाम करावा हे कळून ,नुसते ज्ञान होऊन शरीर बळकट होत नाही तर त्या ज्ञानाचे रुपांतर कर्मात म्हणजे प्रत्यक्ष व्यायाम करण्यानेच शरीर बळकट होते.

वार्धक्‍य म्हणजे जनुकांचे बंड

http://72.78.249.125/esakal/20100210/5565832334145012434.htm

The Selfish Gene

http://docs.google.com/fileview?id=0Bx8R3NkOLSmBZTQ5OWU0MGMtMTNiYy00YTNlLTlhNmMtM2I0ZmRlMmE4NWU0&hl=en

पूर्वकर्मदोष हा रोग.संकटे,अपघात यांचे एक कारण आहे. हि पूर्वकर्मे म्हणजे चालु जन्म किंवा पूर्व जन्म यातली असणार हि शक्यता तर्काने सिद्ध होते.पण केवळ पूर्वकर्म जर मानले तर माणसाच्या प्रयत्नांना खीळ बसेल. मनुष्याला इच्छास्वातंत्र्य आहे. माणसाच्या आयुष्यातील सुख-दु:खांचे अचूक मापन Quantum Mechanics प्रमाणेच अशक्य आहे कारण मन - आत्मा हे सूक्ष्म आहेत , मापनीय नाहीत. मात्र सरासरीने मापनीय होतात. कारण-परिणाम साखळी चे सूत्र मनशक्तीच्या तत्वज्ञांनी पुढील प्रमाणे मांडले आहे.

कारण ---> पूर्वकर्म + मूळ स्वभाव + इच्छा + कृती ---> परिणाम

उदा.एखाद्याची रक्त शर्करा (Blood Sugar ) हे कारण झाले व परीणामी तातडीची डॉक्टरी ट्रिटमेंट घ्यावी लागली हा परिणाम झाला तर ते वरील सूत्राने सोडवता येईल.

रक्तशर्करावाढ(कारण)----> मधुमेह(पूर्वकर्म) + ताण घेण्याचा स्वभाव (मूळ स्वभाव)+ गोड खाण्याची इच्छा + मनाला न जुमानता खाणे (कृती)-----> डॉक्टरी उपाय (परिणाम)

वरील कार्यकारण साखळीत पूर्वकर्म याचा परिणाम सध्या विचारात न घेता अन्य ३ कड्या पूर्ण पणे किंवा काही अंशी तरी दुरुस्त करता येतील. मूळ स्वभाव बदलायला थोडा कठीण असले तरी प्रयत्नांच्या कक्षेत आणता येईल. मनाला इच्छा होणे हे टाळता येणार नाही कारण भोग-उपभेगासाठीच मनाने जन्म घेतलेला असतो. पण साखरेने त्रास होतो हे ज्ञान झाल्यावर गोड न खाणे हि कृती करण्याचा अधिकार माणसाला आहे.ताण व्यवस्थापनाने (Stress Management) साखर वाढण्याला प्रतिबंध करता येइल.

आता मधुमेह हा जर जन्मत:चा नसेल तर तो याच जन्मातील पूर्व कर्माशी संबंधित असू शकेल. मूळातच इंन्शुलीन निर्मिती होत नसेल तर (A Type) तर तो बहुतांशी पूर्वजन्माशी निगडीत ठरणार.जोपर्यंत विज्ञानाने तो पूर्ण बरा करता येण्याचा शोध लागत नाही तोपर्यंत त्या परिणामाला दैवाच्या हवालीच ठेवावे लागेल.

अनेकदा "वातावरण परिणामाने सवयसहजता" (Conditional Reflex) या मुळे मनस्ताप टाळायला अवघड जाते. या क्षणी क्रोध आवरला पाहिजे, भय वाटत असेल तर निर्भयता आणली पाहिजे, हे समजत असूनही एखाद्या व्यक्ती वा घटनाविषयक Conditioning मुळे कळते पण वळत नाही अशी स्थिती होते. म्हणून अशा प्रसंगातून जाण्यापूर्वीच जी सदोष विचारसरणी निर्माण होऊन रोग-संकटे-अपघात यांना कारणीभूत झाली आहे ती सदोषता तत्वचिंतन , स्वयंसूचना इ. द्वारे बदलता येते. पूर्वीच्या कर्मातून झालेले परिणाम टाळता येत नाहीत व त्या परिणामांमुळे पुन्हा पुन्हा नविन कर्मदोष कारण-परिणामा यांची दुष्टचक्रे आहेत ती बदलण्याचे कर्मस्वातंत्र्य माणसाच्या आधिन आहे.

कारण ---> पूर्वकर्म + मूळ स्वभाव + इच्छा + कृती ---> परिणाम (Ref: मनशक्तीi-दिवाळी अंक)

वर वर पाहता सुखाला कारण मी आणि दु:खाला कारण मात्र इतर जण अशी धारणा करण्याची मनाची प्रवृत्ती असते, पण आत्मचिंतन करताना अत्यंत तटस्थ राहून ते केल्यास त्या त्या घटनांमधे आपले वागणे -बोलणे - वर्तन लक्षात घेतले. आपण जे वर्तन केले त्याऐवजी वेगळे वागलो असतो तर नकोशा असलेल्या घटना टाळू शकलो असतो हे ही ल्क्षात आले. तसे वर्तन घडले याचे कारण आपला स्वार्थ -लायकीपेक्षा जास्त मिळवण्याचा स्वार्थ- हेच असल्याचे लक्षात आले. एखादा रोग झाला तर रोगजंतु हे शरीरांतर्गत कारण आणि अपघात झाला तर बाह्य कारण , पहिली घटना हि नैसर्गिक व दुसरी हा योगायोग - अपघात - अन्याय असे मानतो. वस्तुत: रोग-संकट-अपघात यांना शरीरांतर्गत वा बाह्य घटक केवळ निमित्त मात्र असतात खरे कारण आपल्या मनातच वसलेले असते हे दिसून येते.खरे तर अपघाताची जी लक्षणे डॉ.मेनिंजर यांनी सांगीतली ती रोगालाही लागू पडतात. तरिही एखाद्याचा मृत्यु रोगाने झाला तर तो नैसर्गिक आणि मोटारीच्या टकरीने झाला तर तो अपघात-योगायोग असे म्हटले जाते.

Law of compensation

http://www.crcsite.org/karma.htm

डॉ.xxx हे अ‍ॅनॉटॉमी चे तत्ज्ञ आहेत त्यांनी माझ्या दोन प्रश्नांना पुढील उत्तरे दिली ती येथे नोंदवून ठेवत आहे.

Q.1 एखाद्या पेशीसमूहाची वारेमाप वाढ होण्याची कारणे काय असू शकतात?

"पेशीकेंद्रा मध्ये जे DNA असतं त्यामध्ये काही बदल घडून येणं" असं एका वाक्यात उत्तर देता येईल. (अर्थात हे उत्तर सुद्धा सर्वंकष किंवा समर्पक नाही, पण प्राथमिक उत्तर म्हणून चालेल).पण मग प्रश्न उद्भवतो, असं बदल घडण्याची कारणं काय? ह्या प्रश्नाचा उत्तर अतिशय व्यापक आहे. आणि असं असण्याचं कारण हे, की निरनिराळ्या कॅन्सर मागची कारणं वेगवेगळी असू शकतात. इथे केवळ काही उदाहरणं देता येतील!१. काही कॅन्सर मागे आनुवंशिक पार्श्वभूमी असू शकते. पण ह्याचा अर्थ असा नाही, की असे कॅन्सर आनुवंशिक असतात! अशी पार्श्वभूमी असल्यामुळे पेशींमध्ये घातक बदल होण्याची शक्यता जास्त एवढंच म्हणता येईल.२. काही पेशींमध्ये असे बदल पर्यावरणीय कारणांमुळे होऊ शकतात. उदाहरणार्थ, asbestos शी प्रदीर्घ संपर्क आल्यास फुफ्फुसाच्या आवरणामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते. सूर्यकिरणामधल्या अल्ट्राव्हायोलेट मुळे त्वचेच्या पेशींमध्ये असे बदल होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते.३. काही कॅन्सरच्या मागे व्हायरस असण्याची शक्यता असते.४. बऱ्याच वेळा असे बदल अचानक होणाऱ्या अपघातांमुळे (ज्याला अनुवंश शास्त्रामध्ये - genetics - mutation असं म्हणतात) घडू शकतात.

शेवटी, एक सच्चा डॉक्टर आणि शास्त्राचा (सायन्स) विद्यार्थी म्हणून मला हे मान्य करावाच लागेल, की अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मानवाला अजून समजलेली नाहीत! पुढेमागे मिळतील ह्यात शंका नाही, पण आपल्या हयातीत मिळतील की नाही हे सांगणं कठीण आहे!

Q 2.पेशींना स्वतंत्र अस्तित्व किंवा मन असू शकत् का?

Ans. from Dr. Avinash xxx to me.

पेशींना स्वतंत्र अस्तित्व ... हो आणि नाही!हो अशा अर्थाने, की प्रत्येक पेशी हे एक स्वतंत्र विश्व आहे - तिच्या केंद्राकामध्ये तिला आवश्यक ती सर्व माहिती आहे, प्रत्येल पेशी, आपली नित्याचे व्यवहार (भक्षण, उत्सर्ग, पुनरुत्पादन) स्वतंत्रपणे करते.नाही अशा अर्थाने, की बहुतेक पेशी एकमेकांशी जैविक अणूंच्या (molecules ) सहाय्याने संपर्क ठेवून असतात. शिवाय, काही बाबतीत पेशींना एकमेकांशी संपर्क ठेवणं आवश्यक असतं. बहुपेशीय प्राण्यामध्ये, ह्याची नितांत गरज असते. बहुतेक पेशींच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवावं लागतं. "The whole is more than te sum of its parts" हे बहुपेशीय जीवांबद्दल तंतोतंत खरं आहे.२अ . पेशींना 'मन' असतं की नाही हा खरं तर तात्विक प्रश्न आहे! (Philosophical ). 'मन' शब्दाच्या व्याख्येवर हे अवलंबून आहे. वर म्हटल्याप्रमाणे, पेशी एकमेकांशी संवाद साधू शकतात - एवढंच, की हा संवाद biological molecules च्या माध्यमातून होत असतो. सभोवतालच्या परिस्थितीमध्ये बदल होतात तेव्हा पेशी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात! पण ह्या प्रतिक्रिया विद्युतभाराच्या रूपाने दिसून येतात (पेशींच्या आवरणामध्ये अतिशय सूक्ष्म प्रमाणात वीज खेळत असते! - ती संवेदनशील यंत्रांच्या सहाय्याने मोजता पण येते.) तर कधी इतर मार्गाने.असं असून सुद्धा, आपल्या शरीरातल्या पेशी जर शरीराबाहेर काढल्या तर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड तंत्रज्ञानाची आवश्यकता असते! आणि एवढं करून सुद्धा, त्यांना जिवंत ठेवण्यावर मर्यादा आहेत.

...........................

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...