Skip to main content

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन दिला.
लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे.
पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले.
आपल्या घरात एका पुर्वास्पृश्य मुलीला स्वातंत्र्यवीरांनी स्वत:च्या मुलीप्रमाणे संगोपन करुन तिचे पालन पोषण केले. रत्नागिरीतल्या शाळांत अचानक पणे जाऊन सर्व स्पृष्यास्पृश्य मुलांना सरमिसळ बसवले का नही ते पहात. व त्यात कुचराई करणाऱ्या सवर्ण शिक्षकांविरुध्द तक्रार करुन त्यांच्यावर कारवाई करवुन आणत. लहानपणापासुन असे सरमिसळ बसवले नाही तर नव्या पिढ्यांच्या मनातली अस्पृश्यतेची भावना कदापि जाणार नाही असे सांगुन त्यांनी हे घडते का नाही यावर खूप कटाक्ष ठेवला. पुर्वास्पृश्यांना स्तोत्रे शिकवणे, जानवी देणे हे तर या कार्यक्रमाचा भाग होतेच. रत्नागिरीत मंदिरे सर्व हिंदुंना उघडुन देण्यात त्यांचा भर होताच. या शिवाय सर्व हिंदुंना अगदी गाभाऱ्यापर्यंत प्रवेश असेल असे पतितपावन मंदिरही त्यांनी बांधवले.
अस्पृश्य वस्तीत जाऊन चहा फराळ चे कार्यक्रम, हळदिकुंकुवाला पुर्वास्पृष्य वस्तीतील स्त्रियांना घरी बोलावुन आपल्या पत्नीच्या हस्ते सौभाग्यवाण देण हि कार्ये सावरकर करत, समस्त सनातनी मंडळी अगदी संतापुन गेली होती, अनेक खेकटी ते उभी करुन शासनाकडे तक्रारी करत. पण स्वातंत्र्यवीर डगमगणाऱ्यातले नव्हते. त्यांच्या स्थानबध्दतेच्या काळात रत्नागिरीत जी क्रांतीकारी समाजसुधारणा झाली त्याने अनेक पुढारी विस्मय चकित झाले. थक्क होऊन गेले. त्यांच्या कार्याचे महत्व जाणणाऱ्यात महर्षी वि.रा.शिंदे, कोल्हापुरचे क्षात्र जगत गुरु , शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच जण होते.
हे सर्व वचुन जितक्या पटकन संपते त्याच्या कित्येक पट जिकिरीचे आणि कटकटीचे काम होते. प्रचंड विरोध सोसत , नेटाने हे काम सावरकर करत असत. सावरकरांचे समाजकार्य म्हणजे वातानुकुल खोलित बसून केलेले लिखाण नसून गोरगरिब पुर्वास्पृश्य बांधवात प्रत्यक्ष मिसळुन त्यांच्या पाठिवर मायेचा हात फिरवत केलेल काम होते. यास म्हणतात कर्ते सुधारक, आधी केले मग सांगितले.
या आणि अशा अजुन अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आणि आदर्श ठेवण्यासारख्या व कालानुरुप आचरणात आणण्यासारख्या आहेत. समाजसुधारणेचे हे व्रत अखंड तेरा वर्षे रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात सुरु होते.
Image may contain: 3 people
Kirtan by person from
पतितपावन मंदिर ,ex-untouchable community, a milestone in social
reform, Patitpavan Mandir, Ratnagiri, 1932
 — at Patitpavan Mandir, Ratnagiri, 1932.

Image may contain: 8 people
मालवणची पूर्वास्पृश्य परिषद इ.स.१९२९ अध्यक्ष स्वा.वीर सावरकर :- पूर्वास्पृश्यांना यज्ञोपवित धारण विधी, मागे सावरकरांच्या कल्पनेतून साकारलेला कुंडलिनी कृपाणांकित हिंदूध्वज


Comments

Dinesh shinde said…
खूप छान लेख सर with reference.sawarkaranchya संताजी कार्याविषयी अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तके उपयुक्त ठरतील ??????

Popular posts from this blog

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...