Friday, December 16, 2016

तुका म्हणे ऐशा नरां

तुका म्हणे ऐशा नरां मोजुनी माराव्या पैजारा ***
प्रत्येक कैद्याला तुरुंगातील कामाचा भत्ता मिळतो. तुरुंगातून सुटल्यानंतर समाजात त्याचे पुनर्स्थापन करायचे कोणत्याही शासनयंत्रणेचे धोरण आणि कर्तव्य असते. मग ती परकिय असो वा स्वकीय.
इतर अनेक राजबंद्यांना जशी* राजक्षमा मिळाली तशी सावरकरांना त्यांच्या कोणत्याही सुटकेच्या अर्जांसाठी ब्रिटीशांनी कोणतीही क्षमा केली नाही. व अंदमानातुन सोडले सुध्दा नाही. तर त्यांना अंदमानातून केवळ रत्नागिरीच्या तुरुंगात हलवले. त्यामुळे सावरकरांना मुळात अर्जांवर आधारीत क्षमा दिलीच गेली नाही. कारण ब्रिटीश त्यांचे सुटकेचे अर्ज म्हणजे केवळ सुटका करुन घेण्याची चाल असल्याचे ओळखुन होते. त्यांना सोडुन देण्यास ब्रिटीशांसारखा धुर्त शत्रू मुर्ख नव्हता.
नंतर दोन अटी म्हणजे रत्नागिरीत स्थानबध्द राहीन व राजकारणात भाग घेणार नाही या आणि केवळ याच दोन अटींवर सावरकरांना तुरुंगातून सोडून रत्नागिरीत स्थानबध्द केले गेले. जुन्या गोष्टी काढायच्या नाहीत आणि कोणाही सहकाऱ्याची नावे , कटासंबंधी माहिती विचारायची नाही या सावरकरांच्या मुख्य प्रतिअटी होत्या त्या ब्रिटीशांनी मान्य केल्या. स्थानबध्दतेच्या काळात म्हणजे १९२४ ते १९३७ अशा १३ वर्षांच्या काळात त्यांच्या वर पोलिसांची नजर असे. गुप्त पोलिस पाळतीवर असत. त्यांची वकिलिची पदवि रद्द केली होती व सनद दिलिच गेली नाही त्यामुळे वकिली करणे अशक्य होते , इतकेच नव्हे तर BA ची पदवी पण काढुन घेतली होती, तसेच त्यांच्यावरच्या राजद्रोहाच्या गुन्ह्यामुळे त्यांना नोकरी मिळणे अशक्य होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या सासऱ्यांची पण सर्व मालमत्ता जप्त केल्याने ( त्यांचा चष्मा व अंगावरचे कपडे सुध्दा जप्त केले गेले होते व तुरुंगात ते वापरत असलेला चष्मा आणि कपडे ही सुध्दा सरकारी मालमत्ता होती. तुरुंगातून पुढे १९२४ ला सुटल्यावर सुध्दा त्यांना एका स्नेह्याने दिलेले कपडे घालावे लागले होते) त्यांना उपजिविका करणे अशक्य होते. व स्थानबध्दता म्हणजे पण एक प्रकारे तुरुंगवासच असल्याने त्यांना भत्ता मिळणे योग्यच होते, त्यास पेन्शन वा निवृत्तीवेतन नाही तर तुरुंग भत्ता म्हणतात. तुरुंगात जेवणखाणाची सोय हि सुध्दा एखादा कृतघ्न माणूस सावरकर तुरुंगात ब्रिटीशांचे अन्न खात बसले होते असे म्हणु शकेल. हा भत्ता सुध्दा त्यांना १९२९ पासुन मिळु लागला आधीची पाच वर्षे नाही. १९३७ पर्यंत हा तुरुंग भत्ता सावरकरांना मिळत असावा, उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नव्हते. ६०/- ही त्या काळात अत्यंत तुटपुंजी रक्कम होती (जो इतर बंगाली राजबंद्यांना रु. १००/- मिळत असे) व त्यांच्या त्या हलाखीच्या परिस्थितीचे वर्णन गांधीवादी विचारवंत व सावरकरवादी नसणारे संशोधक कै.श्री. य.दी.फडके यांनीच करुन ठेवले आहे. ते सर्वांना मान्य व्हायला हरकत नाही. या काळात सावरकर जे लेखन करत त्याचे तुटपुंजे मानधन व धाकट्या भावाची थोडीशी आर्थिक मदत एवढच त्यांना मिळत होते.
जे कोण लोक या उपजिविकेची सर्व साधने काढुन घेतल्याने, ब्रिटीश सावरकरांना चरितार्थ चालवण्यासाठी देत असलेल्या ६० रु भत्त्यावर (जी त्या काळात सुध्दा अत्यंत तुटपुंजी रक्कम होती) बोट दाखवत असतील ते सर्व एक नंबरचे हलकट वृत्तीचे आणि माणुसकीला काळीमा असलेले नीच मनुष्यच असू शकतात. "तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा" , पण यांना पैजारांनी म्हणजे जोड्यांनी बडवले तर जोड्याचाच अपमान होईल.
-चंद्रशेखर साने

Friday, December 2, 2016

Name of Story - हा देश एक मुर्खांचा बाजार


एका पर्वतावरील वृक्षावर 'सिंधुक' नावाचा एक पक्षी राहात होता. त्याच्या विष्ठेतून सोन्याचा रवा पडे. एकदा त्या वृक्षाजवळून एक पारधी चालला असता, तो सिंधुक त्याच्या समक्ष शिटला. त्याच्या विष्ठेत चमकत असलेले सोने पाहून त्या पारध्याने त्याला जाळ्यात पकडले.
मग त्याला घेऊन घरी जाताना तो पारधी मनात म्हणाला, विष्ठेतून सोने देणारा पक्षी मजपाशी आहे हे वृत्त जर राजाला कळले, तर तो या पक्ष्याला तर घेऊन जाईलच, पण त्याशिवाय तो मलाही शिक्षा ठोठवील. त्यापेक्षा हा पक्षी राजाला नेऊन दिलेला बरा. मनात असे ठरवून त्याने त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य राजाला सांगून, त्याला त्याच्या हवाली केले आणि राजाने त्या सिंधुकाला एक सेवेकाकरवी पिंजर्‍यात अडकविले.
तेवढ्यात त्या राजाचा प्रधान तिथे येताच, जेव्हा राजाने त्याला त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य सांगितले, तेव्हा तो म्हणाला, 'महाराज, पक्ष्याच्या विष्ठेतून सोने निघणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही त्या पक्ष्याला पिंजर्‍यातून मुक्त करा.' राजाने त्याप्रमाणे करताच तो पक्षी एका उंच जागी जाऊन शिटला. त्या विष्ठेतून चमचमणारे सुवर्णकण पाहून राजा म्हणाला, 'अरेरे ! विष्ठेतून सोने देणार्‍या या पक्ष्याला सोडून देणारा मी मूर्ख आहे !'
यावर सिंधुक पक्षी म्हणाला, 'हे राजा, या जगात तू एकटाच काही मूर्ख नाहीस. पारध्याच्या समोर सुवर्णभरित विष्ठा शिटलो तर तो आपल्याला पकडील ही गोष्ट कळत असूनही, मी त्याच्या समक्ष शिटलो व स्वतःहून त्याच्या जाळ्यात सापडलो. तेव्हा तुझ्याप्रमाणे मीही एक मूर्खच आहे. आणि तो पारधी ? विष्ठेतून सुवर्ण देणार्‍या मला पाळून स्वतः श्रीमंत होण्याऐवजी त्याने मला तुझ्या स्वाधीन केले ! तेव्हा तुझ्या-माझ्याप्रमाणे तो पारधीही मूर्खच ! थोडक्यात सांगायचे तर या जगात शहाणे थोडे. सगळीकडे मूर्खांचाच बाजार ! हा देशच एक मुर्खांचा बाजार आहे
एवढे बोलला आणि तो पक्षी उडून गेला.
Source पंचतंत्र
महत्वाची तळटिप :- सोन्यासंबंधात अर्धवट बातम्या आणि अफवा वाचुन आपापल्या प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या फेसबुकी बुध्दीमंतांचा या कथेशी काहीही संबंध नाही. मला असच जुनपान वाचलेल काहिबाही आठवत आत अधुनमधुन

No automatic alt text available.No automatic alt text available.No automatic alt text available.

Wednesday, November 30, 2016

आंबेडकरांचे नेतृत्व दलितात सर्वमान्य होते का?

आंबेडकरांची राजकिय चळवळ नंतरच्या काळात केवळ विशिष्ट समाजाच्या हक्कांपुरती मर्यादीत झाली , तर सावरकर समस्त हिंदु समाजाच्या हिताचा विचार करत होते, दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने ते एकमेकांचे राजकिय विरोधक होते त्यामुळे आंबेडकरांनी जे लिहिले तेच प्रमाण मानायची गरज नाही. आंबेडकरांना सावरकरांच्या राजकारणावर टिका करणे गरजेचे होते कारण ते त्यांचे समाजकारणात पण प्रतिस्पर्धी होते, मूलत: आंबेडकरांची जात सोडता अन्य अस्पृश्य समाजात सावरकरांना मान होता तो आंबेडकरांना डाचत असे त्यामुळे त्यांनी सावरकरांविषयी काही वेळा पक्षपाती लिहिले आहे.
विशेषत: मालवण ला १९२९ ला जी फार मोठी पुर्वास्पृश्य परिषद झाली, त्यात अध्यक्षपदासाठी आंबेडकर व सावरकर अशी दोन नावे पुढे आली. परंतु अन्य पुर्वास्पृश्य, विशेषत: चर्मकार समाजाचा आंबेडकरांच्या नावाला प्रखर विरोध होता , सावरकरांचे नाव मात्र सर्वच दलित मंडळींना पसंत होते, व शेवटी सावरकरांचीच अध्यक्ष म्हणुन निवड झाली.
सावरकरांचे समाजकार्य पाहुन बहुजन मंडळी प्रभावित झाली होती. शाहु महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्र गुरु शंकराचार्य यांनी सावरकरांची थोरवी या समारंभात व रत्नागिरीत पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून मान्य केली. महर्षी वि.रा. शिंदे यांच्यासारख्या समाजसुधारकाने तर ईश्वराने आपलेही आयुष्य सावरकरांना द्यावे एवढे त्यांचे समाजकार्य महान आहे असे म्हटले.
मानवी स्वभाव लक्षात घेता या घटनांनंतर आंबेडकरांना व आंबेडकरी समाजाला सावरकर हे शत्रु वाटु लागले असण्याची शक्यता आहे. खरतर सावरकरांनी रत्नागिरीला आंबेडकरांना आमंत्रण देऊन आपण केलेल्या सुधारण व कार्य प्रत्यक्ष पहाण्यास व अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत करण्यासंबंधी पत्रही लिहिले. पण आंबेडकरांनी बहुदा हे आमंत्रण हेतुत: चुकवले व केवळ ऐकिव माहितीवर सावरकरांवर समता पत्रातुन टिका करणे चालु ठेवले. सावरकरांसोबत असलेले दलित नेते परोपरीने आंबेडकरांना सावरकरांशी युती करण्यासंबंधी सुचवत राहिले पण आंबेडकरांनी राजकीय नफ्या-तोट्याचा विचार करुन त्यांची उपेक्षा केली कारण त्यांन राजकारणात आत्मप्रस्थानाची गरज होती. (गांधीजी मात्र सावरकरांना भेटुन गेले कारण त्यांची राजकीय प्रस्थापना आधीच झाली होती.) तसच सावरकरांना भेटण म्हणजे त्यांच्या तेजस्वी व्यक्तीमत्वा समोर झाकोळून जाणे.( आपल्या जातीसंस्थेचे वास्तव शेवटी असे आहे की ज्याच्यासाठी लढले गेले ती जात दुसऱ्या जातीचा नेता असला तरी संशयानेच पहाते त्यात सावरकर तर ब्राह्मण, त्यामुळे आंबेडकर व त्यांची विशिष्ट जात यांनी सावरकरांकडे एक राजकीय स्पर्धक असेच पाहिले, याउलट इतर वंचित जातींना आंबेडकरांच्या तोडीचा नेता न मिळाल्याने म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा, सावरकरांचा तितकासा द्वेष वाटत नाही व ते सावरकरांचा पण कृतज्ञता बुद्धीने आदर करतात, निदान गलिच्छ पध्दतीने लिहित तरी नाहीत.) आंबेडकरी समाज मात्र काही सन्माननीय लेखकांच अपवाद वगळता सावरकरांनी दलितांसाठी इतके मोठे समाजकार्य करत असूनही सावरकरांचा तिटकारा करताना दिसतो, याचे मुख्य कारण इतर समाज सतत हिंदुत्वाच्या प्रवाहातच राहिले. आंबेडकरांनी मात्र सावरकरी व्याख्या नाकारत हिंदु म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा करत मुळातच भारतात जवळपास तृणवत जालेला बौध्द धम्म हिंदुत्वाच्या कक्षेतुन बाहेर काढला.
पुढे राजकीय अपरिहार्यता म्हणून कॉंग्रेस विरुद्ध काही काही निवडणुकांत आंबेडकरांनी सावरकरांशी हात मिळवणी केली.
जर अवतार आणि दैवत या कल्पना सोडून अभ्यास केला तर सर्व थोर थोर व्यक्तींचे मानवी पातळीवर मुल्यमापन करणे शक्य आहे. अन्यथा नुसत्याच आरत्या ओवाळत रहाणे सहज शक्य आहे, ज्यला तसे करायचे त्याने तसे खुशाल करावे, माझा तो मार्ग नाही. मी कोणत्याच महापुरुषाला नुसते "अवतार" मानत नाही. ते खूप मोठे असले तरी त्यांचा अभ्यास करताना आपण तटस्थ असावे अशी माझी भूमिका आहे.

Saturday, April 2, 2016

सावरकर: अंदमानपुर्वीचे व अंदमाननंतर


सावरकरांना अंदमानातच जिहादाचे खरे रुप समजून आले. अंदमानात त्यांना मुस्लीम अधिकाऱ्यांच्या जिहादि वृत्तीचा अर्थ कळला. अंदमानतच सावरकरांनी कुराणाचा अभ्यास केला. केवळ इंग्लिश भाषांतरावर विसंबुन न राहता , इतरही पुस्तके अभ्यासली. तसेच एका मुस्लीम कैद्याकडून सश्रद्ध मनाने गेय स्वरुपातले, आवाजातील चढ उतार असलेले मूळ अरबी कुराणही ऐकले. अभिनव भारतात मुस्लीम सदस्य होतेच त्यांच्यातील काहिंशी सावरकरांची खूप मैत्री जमली होती असे सेनापती बापट यांनी नमूद केले आहे. मदनलाल धिंग्रा मात्र "इन लोगोंपर ज्यादा भरोसा मत करो" असे सावरकरांना म्हणत असत. सावरकरांची इस्लाम विषयी सर्व मते नंतर बदलली. हिंदुमहासभेत मुस्लीमांना घेऊ नये यावर ते ठाम होते. हिंदुमहासभा फुटुन जनसंघाची स्थापना याचे मुख्य कारण श्यामाप्रसाद मुखर्जी व संघाला सत्तेत यायचे असेल तर मुसलमानांची मते मिळाल्याशिवाय ते शक्य नाही असे वाटत होते, सावरकरांना सत्तेच्या राजकारणासाठी जनसंघ स्थापन झाला तेव्हा तो हिंदुहित पहाणारा पक्ष न उरता त्याची दुसरी कॉंग्रेसच होईल अशी भीती वाटत होती. सत्ताकारण करणाऱ्याला या ना त्या स्वरुपात मुस्लीम लोकानुनय करावा लागतो. सावरकरांना निर्भेळ हिंदुहित जपणारा पक्ष अस्तित्वात हवा होता, ज्याचे आज अस्तित्व उरलेले नाही.

१८५७ चे समर हे हिंदुंसाठी स्वातंत्र्य युद्ध तर मुसलमानांसाठी जिहादच होता. या संघर्षाचे हे दोन पैलु आहेत.

या ग्रंथाने सावरकरांना फार मोठी प्रसिद्धी व स्वातंत्र्याची प्रेरक शक्ती म्हणून स्थान मिळाले. या पुस्तकाचे योगदान फार मोठे आहे. आम्हाला १९३७ चे सावरकर नकोत १९०८ चे हवेत असे म्हणणाऱ्यांना सावरकरांची १८५७ संबंधातली मुसलमानांसंबंधी घेतलेलि भूमिका परत घ्यावी असे वाटत होते, पण सावरकरांना स्वत:ची चूकिची भूमिका समजली होती. त्यांनी यानंतर एका भाषणात गोंधळ घालणाऱ्या समाजवादी/साम्यवादी तरुणांना उद्देशून १९०८ चे सावरकर पटायला ३० वर्षे लागली तसे १९३८ चे हिंदुत्ववादी सावरकर समजायला अजून ५० वर्षे असे उद्‌गार काढले. तथापि ज्यांना आज १९०८ चे सावरकर पटत आहेत त्यांनी तसे कार्य करण्यासाठी हात वर करावेत असे आवाहन केल्यावर मात्र सर्व अतिउत्साही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची दातखीळ बसली व आमची कोणाचीही हात वर करायची हिंमत झाली नाही, असे तेथे उपस्थित असलेल्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

Monday, March 14, 2016

महाकाव्यातल्या नीतीकल्पना



रावणाला धर्म समजवणाऱ्या बिभिषणाला रावण संतापुन म्हणाला "राक्षसाणां परोधर्मा परदारा विघर्षण्म्‌ " धर्म - अधर्म कसला सांगतोस, परस्त्रियांना पळवणे हाच राक्षसांचा परमधर्म. झाडाच्या आड दडुन बाण सोडणाऱ्या रामाला वाली म्हणतो, मी पशु आहे, भावाला युद्धात पराभूत करुन त्याच्या पत्नीवर हक्क प्रस्थापित करणे हाच आमचा धर्म. मात्र त्यावर रामाने तु पशु आहेस म्हणून झाडामागून लपुन बाण मारुन मी मृगया केली हा युक्तीवाद त्याला मान्य नाही , त्यावेळी त्यास मानवी नीतीनियम स्वत:ला लागु करायचे आहेत. राम-वाली संवादात रामाने केलेल्या नीतीवादाच्या युक्तीवादात वाली निरुत्तर झाला आणि डोळ्यात अश्रु आणुन त्याने प्राण सोडले.  रामाने स्वत: राज्य घेतले नाही सुग्रीवाला राज्य परत दिले आणि वालीच्या पुत्राला अंगदाला युवराज्याभिषेक करवला. सोन्याच्या लंकेचा मोह धरला नाही, "प्रासाद इथे भव्य परि भारी आईची झोपडी प्यारी" असे म्हणत अयोध्येस परतला. हनुमंताला भक्तीशिवाय काहीच दिले नाही, सीतेने अर्पण केलेला रत्नहार एक एक रत्न फोडून राम आहे का शोधत मारुतीने फेकुन दिला. लक्ष्मण व सितेने रामासोबत वनवास पत्करला. आयुष्यभर साथ देणाऱ्या सीतेचा (स्त्री-पत्नी)लोकांच्या शब्दासाठी आणि कालपुरुषाला दिलेल्या शब्दासाठी लक्ष्मणाचा (पुरुष-बंधु) रामाने त्याग केला आणि स्वत: व्रतस्थ जीवन जगुन शरयुत आत्मसमर्पण केले.


दुर्योधन म्हणतो धर्म काय आणि अधर्म काय हे मला चांगल कळत पण मला धर्म धरवत नाही आणि अधर्म सोडवत नाही.

शरण आलेल्या शत्रूला मारायचे नाही, धर्मयुद्ध, हातात सापडलेल्या शत्रुला बावळट कल्पनांच्या आहारी जाऊन सोडून द्यायचे इ . नीतीकल्पनांनी भारतीय इतिहासात पराभवांचे इतिहास गेले. श्रीकृष्ण हा उपयुक्ततावादाचा पहिला आचार्य. वेळ पडली तर कालयवनासमोरुन भरधाव पळ काढून झोपलेल्या मुचुकुंदाच्या गुहेत लपणारा, जरासंधाच्या द्वारकेवरच्या स्वाऱ्यांपासून पळुन जाऊन रणछोड हि उपाधी पत्करणारा, भीष्माला त्याच्याच कडे जाऊन त्यास मारण्याचा उपाय विचारण्याचा सल्ला देणारा, शंभर अपराध सहन करुन शेवटी यज्ञभूमिवर शिशुपाला चा वध करणारा, युद्धाचा बोल पांडवांवर येऊ नये म्हणून केवळ पाच गावे द्या म्हणून चलाख शिष्टाई करणारा, कंसमामाचा वध करुन भावंडांच्या हत्येचा सूड घेणारा, न धरि शस्त्र करी ची प्रतिज्ञा मोडून रथाचे निखळलेले चाक हातात घेऊन अनावर झालेल्या भीष्मावर चालुन जाणारा श्रीकृष्ण, गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाची मांडी फोडवणारा भगवान श्रीकृष्ण हिच आपली राजनीती असली पाहिजे. पण अहिंसा आणि सद्‌गुण विकृतीला बळी पडून आपण आपले स्वातंत्र्य गमावले आणि ८०० वर्षे पारतंत्र्यात गेलो.

रामायण महाभारतात अनेक नीती कल्पनांची उकल आहे. वरवरची घटना पाहुन , एक एक घटना स्वतंत्र करुन महाकाव्याची संगती लावता येत नाही, संपुर्ण काळाच्या परिघात प्रदक्षिणा घालून त्यांची संगती लावावी लागते.
 अन्याय करणारे स्वत:च्या सोयीचे तत्वज्ञान निर्माण करुन स्वत:च्या अन्यायांचे समर्थन करत असतात. आणि अशा तत्वज्ञानाला कोत्या बुद्धीने विचार करणारे बळी पडत असतात आणि रावण-वाली--शूर्पणखा-दुर्योधन-कर्ण-कैकेयी- महिषासूर हे सर्व त्यांच्या दृष्टीने शोषित ठरतात व हेतुत: लोकांचा बुद्धीभेद करत६ असतात. न बुद्धीभेदं जनयेद !




Sunday, March 13, 2016

आझादीचे स्त्रोत आणि स्तोत्रकार

मोक्ष मुक्ती हि तुझीच रुपे तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती ।।

स्वातंत्र्याच , मुक्तीच आणि उर्दुतल्या "आजादी" शब्दाच स्तोत्र लिहिणारे आणि गाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आज मरु घातलेली कॉंग्रेस आणि मेलेल्या लाल बावटयांचे मुख्य शत्रु झाले आहेत. सर्व पातळी सोडुन ते सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, वर्तमानकाळात सावरकर हे त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे शत्रु ठरलेत हि मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्या सावरकर द्वेषाला वैचारिक प्रत्युत्तर देण्यास महाराष्ट्रातले व बाहेरचे अभ्यासक समर्थ आहेत, कारण हे सर्व आरोप मुख्यत: वस्तुस्थितीपेक्षा द्वेषावर आधारित आहेत. असे आरोप खोडणे फार सोपे असते. मग हे विरोधक असे का करत आहेत? त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडॆ हिंदुत्ववादी अथवा भाजपा अथवा मोदी सरकार विरुद्ध फारसे विरोध करण्यास हातात काही उरलेले नाही. काही घटना वा कमी वकुबाच्या व्यक्तींचा वापर करुन अकांडतांडव करुन मोदी व भाजपा यांची लोकप्रियता घटल्याचे भ्रामक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करुन स्वत:च निर्माण केलेल्या आनंदवनभुवनी गुंगीत रहाणे हेच त्यांना सध्या शक्य आहे व तेच ते करत आहेत. मुख्य विषयांकडचे लक्ष भलतीकडे वळवणे हे खरतर सत्ताधारी पक्षाच्या फायद्याचे असते त्या ऐवजी हे काम विरोधक करत आहेत हि आश्चर्याचीच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या कही अंशी असलेल्या यशाची पावती आहे.

सावरकरांची प्रतिमा मलिन करुन त्यांना काहीही हातात लागणार नाही, सावरकरांवर आचरट आरोप करुन मोदी वा भाजपा चिडेल, हिंदुत्ववाद्यांना चिडवुन त्यांच्या कडून काही आततायी कृत्य घडेल असे त्यांना वाटत असेल तो शुद्ध राजकिय़ मुर्खपणा आहे. कारण कॉंग्रेसने जसे ५०-६० वर्षे गांधीजींचे नाव वापरुन त्यांच्या महात्मेपणाचा सत्ता मिळवण्यासाठी दुरुपयोग केला तसा सावरकरांच्या नावावर अथवा विचारांवर मोदी वा भाजपा सत्तेवर आलेलीच नाही. त्यांना सावरकर हे गांधीजीं इतपतच आदरणीय आहेत, अनुसरणीय आहेतच असे नाही. त्यामुळे सावरकरांची प्रतिमा मलिन करुन उद्रेक वगैरे काही होण्याची शक्यता नाही. मागच्या वेळी कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने अंदमानात सावरकरांचे स्मृतिचिन्हाबाबत तालिबानी वृत्तीचे प्रदर्शन घडवले होते तेव्हा अगदी पुण्यात कै.श्रीमती हिमानी सावरकर लोकसभा निवडणुक लढवली होती, त्यांनाही साधारण दोन वेगवेगळ्या आकड्यांनुसार १००० किंवा ५००० इतकीच मते मिळली होती. त्यावेळी कै.प्रमोद महाजनांनी स्पष्टपणे सांगितले होते की सावरकरांचे नाव वापरुन मते मिळत नाहीत त्यामुळे त्यांच्या नावावर मते मागण्याचा प्रश्नच येत नाही किंवा सावरकर कुटुंबातल्या व्यक्तीला ही पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही.
तरिही हा सावरकर द्वेष का होत आहे? तर याचे एकमेव कारण कॉंग्रेस व साम्यवादी सटपटले आहेत हे एकमेव कारण आहे. सावरकरांवर पातळी सोडून आणि खोटी व वाह्यात टिका करणे हे त्यांचे नैराश्य आणि दिवाळखोरी या व्यतिरिक्त काही नाही. महाराष्ट्रात तर या यामुळे यांना मतांसाठी फायदा न होता उलट लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा जास्त मलिन होत आहे. कारण गांधीजींवर हिन पातळीवर टिका करुन नथुरामवाद्यांचे जे नुकसान झाले तेच सावरकरांवर हिन पातळीवर टिका करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
सावरकरांना भारतरत्न देणे न देणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. शिवसेनेची मागणी या व्यतिरिक्त तसा कोणताही प्रकारे या गोष्टीचा मागमुसही प्रत्यक्षात दिसत नाही. अंदमानातले सावरकरांचे माजी उद्धट पेट्रोलियम मंत्र्याने उखडलेले स्मरणपट्टीका दोन वर्षे झाली तरी निर्माणाचे काम आरामात चालु आहे. भारतात स्वच्छता अभियान ते अमेरिकेत ओबामांना गांधीगीता देण्यापर्यंत मोदी सर्वत्र गांधीनामच जपत आहेत. अशावेळी सावरकरांविषयी द्वेष या तथाकथित पुरोगामी व धर्मनिरपेक्षतेचे नाव घेणाऱ्यांच्या मनात उफाळुन येणे हे अतिशय केविलवाणे चित्र आहे. ज्या पातळीचे पोरकट आणि उडाणटप्पु नेतृत्व त्यांना लाभले आहे त्याचा हा दृष्य परीणाम आहे.

सावरकरांची केली जाणारी बदनामी आणि आक्षेप यांना वेळोवेळी अभ्यासु व तथ्यांवर आधारीत उत्तरे सावरकरांच्या चाहत्यांनी वेळोवेळी दिली आहेत व पुढेही देत रहातील. शत्रू याबाबत अत्यंत कमकुवत असल्याने हे फारच सोपे काम आहे. प्रश्न फक्त प्रचारतंत्राचा आहे. त्यात मोदी वाकबगार आहेत. असल्या घटनांचे संधीत रुपांतर कसे करायचे ते त्यांना चांगले माहित आहे. गांधी, पटेलांच्या प्रतिमेचे त्यांनी कॉंग्रेसकडून स्वत:कडे हस्तांतरण करुन घेतलेच आहे, पण ज्या सावरकरांच्या नावावर मत मिळत नाहीत त्यांच्या बदनामीचा एक अदृष्य फायदाच त्यांना मिळणार आहे. सावरकर हे भारतीय राजकारणात रसायनशास्त्रातल्या उत्प्रेरकासारखे (Catalyst) आहेत. उत्प्रेरकाचा रासायनिक प्रक्रियेत सहभाग नसतो तसाच रासायनिक घडामोडींचा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही, पण प्रक्रीया घडवुन आणण्यात मात्र तो सहाय्यकारी होतो. उत्प्रेरक एकतर रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवतो अथवा कमी करतो पण स्वत: मात्र निर्लेप रहातो. सावरकरांचे विचार हे प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होताना दिसत नाहीत, त्यांचे नावही देशात सरसकट माहित नाही , १०० हून जास्त वर्षे त्यांच्या नावाचा व विचारसरणीचा विरोध , द्वेष आणि गैरसमज करुन देणे चालु आहे पण तरिही सावरकरांचे नाव मिटवणे विरोधकांना शक्य झाले नाही. उत्प्रेरक (Catalyst) म्हणून भारतीय राजकारणात सावरकरांचे असलेले अस्तित्व अढळ आहे.

- लेखक चंद्रशेखर साने
.......................xxx..........................

माझी वाचनयात्रा

वयाच्या साधारण ८ व्या वर्षापसून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग.शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण तो फारसा टिकला नाही. दहावीच्घ्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच.समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. केतकर आल्यावर मटा चा सोटा म्हनजे सोनिया टाईम्स झाला होता. मग आपोआप मटा सुटला.
मराठिची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी दहा पुस्तके :
.
१. कर्मयोग - स्वामी विवेकानंद
२. सावरकरांचा बुद्धीवाद एक चिकित्सक अभ्यास- शेषराव मोरे
३. समग्र सावरकर
४. भ्रम आणि निरास- डॉ. नरेंद्र दाभोळकर
५. सावरकरांचे समाजकारण- सत्य आणि विपर्यास- शेषराव मोरे
६. शोध भानामतीचा- शाम मानव
७. स्वामी विज्ञानानंद यांची साहित्यसंपदा
८. वीरधवल- नाथमाधव
९. उष:काल- ह.ना.आपटे
१०. योगवासिष्ठ (३ खंड )
-चंद्रशेखर साने

लोकशाही, पक्षिय राजकारण आणि सावरकर

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्‌घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949

Wednesday, March 2, 2016

टाळ्या दिल्यात मत नाही दिलित

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग,
"......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे. जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध (कायदा) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा घरात शत्रू घुसलेला असतो आणि सरकार हात जोडुन स्वस्थ बसलेले असते तेव्हा प्रतिकार करु नका म्हणणे या सारखे दुसरे महापाप नाही. आपल्या भाबड्या राजनीतीचा दोष जनतेच्या माथी मारुन वर लोकांवरच बिहारमध्ये गोळ्या घालणाऱ्यांनी मुर्खपणाचा विक्रम केला. (सभेत धिककार च्या घोषणा) (याबाबत बिहारी हिंदुंवर बॉंब वर्षाव करण्याच्या नेहरुंच्या धमकीला उद्देशुन काढलेले सावरकरांचे एक पत्राकही आहे Historical statements मध्ये ते प्रसिद्ध केले गेले आहे)
....परंतु तरिही सरकार आपले आहे व आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे हे विसरु नका. मी या व्यासपीठाव्रुन उद्‌घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्धनेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कॉंग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, कॉंग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उपथा पालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदूसभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका. “
- स्वातंत्र्यवीर सावरकर Akhil Bharat Hindu Mahasabha session, 22 December, 1949

गांधी हत्येनंतरही हिंदुमहासभेचे चार खासदार लोकसभेत गेले होते. जानेवारी १९५२ मध्ये झालेल्या या निवडणुकितले हिंदुमहासभेचे खासदार होते प्रा. विघ देशपांडे (गुणा व ग्वाल्हेर दोन्ही तून विजयी झाल्याने यातल्या ग्वाल्हेरच्या जागेचे त्यागपत्र दिल्यावर तेथुन परत हिंदुमहासभेचेच डॉ. ना.भा.खरे निवडुन गेले. तिसरे खासदार निर्मलचंद्र चट्टोपाध्याय. ( कम्युनिस्ट लिडर सोमनाथ चटर्जी यांचे वडील.) उत्तरप्रदेशातून राखीव मतदारसंघात हिंदुमहासभेचे कॅ. राम गरिबा व पाचव्या सौ. शकुंतला नय्यर अशी यांची नावे.
ग्वाल्हेर मधुन नंतर लेखादेवी उर्फ राजमाता विजयाराजे शिंदे यांना नंतर कॉंग्रेसने फोडुन मध्यप्रांतात हिंदुमहासभेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. पुढे त्या जनसंघात आल्या.
हिंदुमहासभेला नथुरामाच्या कृत्यामुळे काही अंशी नुकसान झाले तरी त्यापेक्षा इतर काही जास्त कारणे होती. जर संघ आणि जनसंघियांनी सुचवल्याप्रमाणे जनसंघ, रामराज्यपरिषद व हिंदुमहासभा हे तीन पक्ष एकाच नव्या पक्षात विलीन झाले असते तर जास्त फ़ायदा लवकर झाला असता.
नविन पक्षातल्या नावात हिंदू शब्द असू नये व इतर धर्मियांनाही नव्या पक्षात स्थान असावे या प्रस्तावास सावरकर अनुकूल नव्हते.
पुढे पुढे जनसंघाने राजकारण करावे आणि हिंदुमहासभेने धार्मिक व सामाजिक कार्य पहावे हा गोळवलकरांचा प्रस्तावही हिंदुसभेला मान्य झाला नाही.
नेहरू पटेलांनी या राजकीय वादाचा फ़ायदा घेतला याविषयी त्यांना दोष देता येत नाही . विरोधी पक्ष रक्तपात न करता नष्ट करता यावा म्हणुन त्यात फाटाफुट घडवणे वा तिला प्रोत्साहन देणे हा लोकशाही मार्ग होता, राजकीय चातुर्य होते, आर्थिक बळही होते.
संघाचा विस्तार गुरुजींच्या काळात कित्येक पटींनी वाढला. ताकद वाढलेल्या गुरुजींनी हिंदुमहासभेचा नाद सोडून १९७१ साली धार्मिक कार्यासाठी विश्व हिन्दू परिषदेची स्थापना केली. भारतिय मजदुर संग , वनवासी कल्याण आश्रम , सामाजिक समरसता मंच अशा कितीतरी प्रकारे संघ विस्तारत गेला.

तात्पर्य :- सावरकर लोकशाही वादी होते यात शंका नाही पण त्यांना लोकशाहीतले राजकारण, जनमताची मानसिकता व निवडणुका जिंकन्याचे तंत्र अजिबात कळत नव्हते. किंवा कसही करून निवडणुका जिकणे हे त्यांचे ध्येय नव्हते, प्रकृति व वयही नव्हते.

Saturday, February 27, 2016

माझी वाचनयात्रा

माझी वाचनयात्रा
वयाच्या साधारण ८ व्या वर्षापासून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग. पारायण करुन मनमुराद हसत असे. शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली.
माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्या फलकावर लागु लागल्या. पण कविता करण्याचा नाद फारसा टिकला नाही. मात्र दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत स्वत:च केलेल्या कविता मात्रावृत्ते व अक्षरगण वृत्ते उदाहरणे म्हणून देऊ शकलो होतो. धार्मिक ग्रंथांचेही वाचन होतेच. समग्र सावरकर बरोबर सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर यांच्या पोलिस कथा, डिटेक्टिव्ह कथा, गूढरम्य जी.ए., पु.ल, वपु, पु.भा.भावे, अत्रे, रणजित देसाई, नारायण धारप, ना.सं.इनामदार अगदी जुन्या काळातले दत्तु बांदेकर, रा.ग.गडकरी , बाबासाहेब पुरंदरे, विश्वकोष, स्मृतिचित्रे आणि कुसुम अभ्यंकर, कुमिदिनी रांगणेकर, मंगला गोडबोले, शांता शेळके अशा अनेक स्त्री लेखिका सुद्धा. वाचनाचा वेग अफाट वाढल्याने बहुदा मिनिटाला ८०-९० शब्द इतका झाला होता त्यामुळे कोणत्याही लेखकाला वाचन यादी तून वगळायची वेळ आली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी आजवर तीन ते साडे तीन सहस्त्र मराठी पुस्तके वाचली असतील, कदाचित जास्तच पण कमी नाही. हि वाचनयात्रा अव्याहतपणे चालु होती, नंतर कॉलेजमध्ये असताना वैचारीक वाचन सुरु झाले,. य.दी.फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, पळशीकर.....
मिशा आणि मते एकदम फुटतात, तेव्हा तरुण भारत, मार्मिक, सा.सोबत व सा. विवेक मधुन थोडे थॊडे लेखन प्रसिद्ध झाले. काही पारितोषिके मिळाली. एक ऐतिहासिक कादंबरी सुद्धा लिहिली होती, ती कुठेतरी हरवुन गेली नंतर. क्वचित प्रसंगी मटा, लोकसत्ता, वगैरे त वाचकांचा पत्रव्यवहारात एकादे पत्र छापुन आले की अंगावर मूठभर मास चढत असेच. श्री. गोविंद तळवलकर मटा चे संपादक असेपर्यंत संपादकिय न चुकता वाचून काढत असे. कुमार केतकर आल्यावर त्यांनी मटा चा सोटा म्हणजे सोनिया टाईम्स केला होता. मग आपोआप म.टा. हातातून सुटला.
मराठीची सेवा, मराठी भाषा संवर्धन यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा मला त्याचा अर्थच कळत नाही. हा प्रश्न मुख्यत: वाचनसंस्कृती नसल्याने निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाअतून शिकणारी मराठी मुले सुद्धा वाचनाची गोडी असेल तर मराठी पण वाचु लागतात असा माझ्या आजुबाजुला पाहताना चा अनुभव आहे. वाचनाने भाषा आपोआप समृद्ध होत जाते. उत्तम वाचक झाल्याशिवाय उत्तम लेखक होता येत नाही.
मराठी भाषा संवर्धन व्हायचे असेल तर भरपुर पुस्तके, कमीतकमि किंमती आणि पालक व शिक्षकांचा वाचनाला पाठिंबा खूप आवश्यक आहे. मुंबई पासून महाराष्ट्रातल्या गावागावात मराठी बोलणे आणि मराठी वाचणे या दोन गोष्टींची शपथ घेऊ मग आपल्या भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण उरणार नाही.
-चंद्रशेखर साने

Monday, September 14, 2015

कपुर आयोग आणि सावरकर

कायदेशीर दृष्ट्या कपुर आयोग उच्च न्यायालयात टिकणार नाही याची कल्पना आल्याने स्युडो सेक्युलरांनी, त्यांच्यातल्या काही मुखवट्यांना आता एकदम पलटी मारुन सावरकर कायदेशीर दृष्ट्या गांधीहत्येला जबाबदार नसले तरी नैतिक दृष्ट्या मात्र गांधीहत्येला जबाबदार आहेत असा स्वत:चाच मुद्दा खोडणारे मत मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रथम नैतिक दृष्ट्या सावरकर गांधीहत्येला जबाबदार होते या आरोपाला मी प्रथम उत्तर देतो.


नैतिक दृष्ट्या गुन्हेगार हे कायद्याच्या कक्षेत येत नाहित. ज्या लोकांची ठाम समजूत असते की अमुक-तमुक व्यक्ती एका विशिष्ट घटनेला जबाबदार आहे पण न्यायालयात निर्दोष सुटला आहे वा प्रबळ पुराव्या अभावी सुटला आहे त्याच्या बाबत ते अशी संज्ञा वापरतात. हिच संज्ञा नथुरामला गांधीजींबाबत वापरायची होती. सुमारे दोन लक्ष लोकांचे फाळणीमुळे प्राण गेले, हजारो स्त्रियांची अब्रु गेली , कित्येक सक्तीने धर्मांतरीत झाले , आणि सुमारे २ कोटी लोक निर्वासित झाले, वर ५५ कोटी रु. गांधीजींच्या हट्टामुळे पाकिस्तानला देण्यास भारत सरकारकारला भाग पडले, या सर्वाला नथुरामने नैतिकदृष्ट्या गांधीजींना जबाबदार धरले आणि हत्यार उचलले. सावरकरांनी केवळ आपल्या लेखनातून गांधीनीतीचे आणि गांधीकृतीचे टिकात्मक वाभाडे काढले ते सर्व गांधी गोंधळ मध्ये मुख्यत: समाविष्ट आहेत. अशी टिका करणे हा विरोधी पक्ष म्हणून राजकिय हक्क आहे, या टिकेमुळे ते नैतिकदृष्ट्या जबाबदार ठरु शकत नाहीत, अन्यथा कोणावरही राजकिय वा अन्य प्रकारची टिका करायायचीच सोय लोकशाहीत रहाणार नाही.

आता गांधीजींच्याच बाबतीतले दोन प्रसंग पाहु. असहकार आंदोलनात त्यांच्या अनुयायांनी चौरीचौरा येथे पोलिस चौकी जाळली व २२ पोलिस जळून मेले. त्यामुळे गाधीजींनी भरात आलेले आंदोलन मागे घेतले. पण तरिही ब्रिटीशांनी याचा खटला चालवला आणि सुमारे १६२ लोकांना फाशी सुनावली. यात गांधीजींना नैतिक दृष्ट्या जबाबदार धरुन फाशी दिले नाही. १९४२ च्या आंदोलनात गांधीजींचे नाव घेत प्रचंड हिंसा झाली ब्रिटिश सरकारने यात गांधीजींना नैतिक दृष्ट्या जबाबदार धरले नाही आणि शिक्षाही सुनावली नाही. तेव्हा नैतिक काय आणि अनैतिक काय या पायावर सावरकरांना गांधीहत्येत दोषी धरणे केवळ राजकीय आकस, जातीय मनोवृत्ती आहे, त्यास कसलाही अर्थ नाही. इस कोर्टसे उपर और एक भगवान का कोर्ट है । असा फिल्मी डायलॉग असण्याशिवाय या आरोपास अन्य किंमत नाही.

आता कायदेशीर मुद्द्याकडे वळु. कपुर आयोगाच्या उताऱ्याचा मुख्य रोख आहे की कासार आणि दामले यांच्या साक्षी कोर्टापुढे आल्या असत्या तर बडगे या माफीच्या साक्षीदाराला पाठबळ मिळून निकाल वेगळा लागला. याबाबत महत्वाची वस्तुस्थिती व तथ्ये पुढिलप्रमाणे १. श्री. अप्पाजी कासार व दामले यांच्या कथित साक्षी या पोलिसांपुढे दिलेल्या जबान्या होत्या, आयोगापुढच्या नाहीत. कपुर आयोगाला त्या फक्त त्या वाचण्यास मिळाल्या. २. कपुर आयोगाचा प्रश्न: पोलिसांनी त्या न्यायालयापुढे का ठेवल्या नाहीत? उत्तर अ. पोलिसांपुढे दिलेल्य साक्षी या तोंडी असतात, ब. त्या साक्षीदारांच्या हस्ताक्षरात नसतात तर पोलिस कर्मचारी त्या लिहून घेतात. क. त्यावर साक्षिदारांच्या स्वाक्षऱ्या पण नसतात. ड. अशा साक्षी कोर्टात टिकत नाहीत कारण साक्षीदार तशीच साक्ष कोर्टात देईल याची खात्री सरकारी पक्षाला नसते. याचे प्रमुख कारण म्हणजे या साक्षी पोलिसांनी छळ करुन व दबाव आणुन घेतल्या असा पवित्रा साक्षीदार कोर्टात घेऊ शकतात. सावरकरांच्या बाबत शासनाने सर्व शक्ती पणाला लावली होती व कासारांचा अनन्वित छळ केला होता. इ. या सर्व कारणांनी पोलिसांनी कासार व दामले यांच्या साक्षी कोर्टापुढे नेल्याच नाहीत हे स्पष्ट व उघड उत्तर आहे. अशा पोलिसांपुढे दिलेल्या साक्षी कपुर आयोगाने वाचून सावरकरांच्या बाबत वेगळा निरिक्षण नोंदवणे हा त्यांच्या राजकिय अजेंड्याचा विषय तर होताच पण त्यांना नेमुन दिलेल्या ३ प्रकारच्या चौकशीच्या अधिकाराचे उल्लंघन होते. ४. बडगेने जी मूळ साक्ष दिली ती पण निरर्थक आहे. दोन व्यक्तींच्या संभाषणातले तिसऱ्याच व्यक्तीचे नाव न्यायालयात पुरावा होत नाही.

आता शेवटचा मुद्दा स्युडो-पुरोगामी इतके अस्वस्थ का झालेत? शेषराव मोरे यांनी केवळ उच्च न्यायालयात जाऊन अपिल करुन कपुर आयोगाने अधिकार क्षेत्राबाहेर जाउन आगाऊ पणे सावरकरांना गोवणारा परिच्छेदाला आव्हान दिले पाहिजे व त्यांचा एक वकिल या नात्याने कायद्याचा अभ्यास असल्याने हा खटला सावरकर पक्षाला सहज जिंकता येईल असे वाटते. अजून कोणी कोर्टातही न जाता पण स्युडो-पुरोगामी काव काव करत आहेत. जर त्यांचा कपुर आयोगावर एवढा विश्वास असेल तर त्यांनी हे आव्हान स्वीकारुन , चला जाऊ उच्च न्यायालयात , पाहु काय होते ते असे म्हणायला हवे होते. पण त्यांचा स्वत:चाच कपुर आयोगावर विश्वास नसल्याने उच्च न्यायालयात अपिल झाल्यावर सावरकरांवरचा कलंक धुतला जाणार याने या बौद्धीक दहशतवाद्यांच्या पोटात गोळा उठला आहे.

कपुर आयोगाचा अहवाल समोर धरुन सावरकरांची प्रथम बदनामी करणारे नुराणी हे एक पाकिस्तानवादी होते. भारत - पाक युद्धाच्या वेळी ते भारत सरकारच्या नजरकैदेत होते. मुस्लीम आणि सच्चे पुरोगामी हमीद दलवाई यांनी या नुराणींना धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घातलेला कट्टर धर्मांध जातीयवादी असे विशेषण लावले आहे. सावरकरांची बदनामी करणारे पुरोगामी अशा माणसाचे लेखन व डावपेच वापरुन सावरकरांसारख्या एका सच्च्या देशभक्ताची बदनामि करत आहेत तेव्हा त्यांना पुरोगाम्यांचा दहशतवाद किंवा स्युडो सेक्युलर म्हणण्यात काय चूक आहे?

विशिष्ट अजेंडा घेऊन उभा असलेला फेसबुकी स्युडो-पुरोगामी वर्ग व त्यांचा कंपु यांच्या कडून हे सर्व लिहूनही कसलेहि मतपरिवर्तन होणार नाहि याची मला जाणीव आहे. पण फेसबुकवर काही विचारी लोक सुद्धा असतात त्यांना डोळ्यापुढे ठेऊन मी हे सर्व लिहिण्याचा उपक्रम केला आहे.

- चंद्रशेखर साने


सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...