Skip to main content

सावरकर आणि खादी

स्वदेशी , खादी यांचा आणि हिंदुत्ववाद्यांचा फार जुना संबंध आहे. परकिय कपडयांची पहिली होळी सावरकरांनी पुण्यात केली , गांधीजींनी त्याचा धिक्कार केला, पण पुढे स्वत:च अशी होळी केली, Better late than never.

 लंडनमध्ये असताना आपल्या बातमीपत्रातून (१९०५-१९१०) सावरकरांनी स्वदेशीचे महत्व शिकवणारे व स्वदेशीच्या प्रचाराचा ब्रिटीशांच्या व्यापारावर होत असलेल्या प्रतिकुल परिणामांची आकडेवारी देणारे २-३ लेख लिहिले आहेत.

एका प्रसंगी सावरकरांचे धाकटे बंधु डॉ. नारायणराव सावरकर संपुर्ण खादीच्या वेषात अन्य दोन सावरकर बंधुंना भेटायला तुरुंगात आले असता तुरुंगधिकाऱ्यांनी त्या वेषावरुन अटकाव केला. डॉ.सावरकरांनी न्यायालयात जाऊन संघर्ष करुन, खादीच्या वेषातच तुरुंगात भेटीसाठी जाण्याची परवानगी मिळवली.

स्वा. सावरकर रत्नागिरीत स्वदेशी मालाची विक्री करत. स्वत: गाडीत स्वदेशी माल भरुन तिची विक्री करत. स्वदेशी माल व कापड यावर त्यांनी काही कविता रचल्या व प्रचारल्या.

पुढील फोटो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोकणातील राजापुरच्या खादी भांडाराचे उद्‌घाटन करतानाचा आहे. राष्ट्रप्रेम, देशहित आणि स्वदेशी यावर कोणाचा एकाधिकार असतो का काय? मोदींच्या चरखा छायाचित्रावरुन जो गदारोळ माजवत आहेत त्यावरुन फुरोगामी दिवसेंदिवस संकुचितपणाचा कळस गाठत आहेत ते स्पष्ट होतय.

सावरकर आणि गांधी यांच्यात अनेक मतभेद होते , दोन धृवांवरचे महापुरुष. पण सावरकरांचा स्वदेशीला विरोध नव्हता. आधुनिकता व यंत्रयुग यांचा स्वीकार केला तरी स्वदेशीचे महत्व होतेच. खादी गांधीजींची म्हणून विरोध अशा वैयक्तिक रागलोभाला त्यांच्या आयुष्यात नव्हते. जे जे देशाच्या हिताचे ते ते त्यांनी स्वीकारले. लंडनमध्ये असताना त्यांनी स्वदेशी चळवळीचा ब्रिटीशांच्या व्यापारावर कितपत व कसा परिणाम झाला आहे यावर एक बातमीपत्र आकडेवारी सहित लिहिले होते.परदेशी कपड्यांची होळी तर त्यांनी गांधीजी राजकिय जीवनात येण्याच्या कितीतरी आधी केली होती. ते खादीचाही प्रसार करत असत. स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी एका खादी भांडाराचे उद्‌घाटन सुद्धा केले यात सावरकर खादी पेहेरावात आणि गांधी टोपि घातलेले दिसतात, जे जे हिताचे ते ते त्यांनी अंगिकारले, राष्ट्रहित पहिले वैयक्तिक अहंकार नंतरचा. नुसत्या मजकुराने काम होते त्याच्या दहापट काम एका छायाचित्राने होते म्हणून फोटो शेअर करतोय या मजकुरासोबत. मिळालेले छायाचित्र खूप जुने आणि आकाराने छोटे आहे, त्यास उपाय नाही.

No automatic alt text available.

Comments

Popular posts from this blog

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...