Thursday, January 19, 2017

अभिनव भारत मंदिर

सशस्त्र क्रांती च्या उद्देशाने सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संघटनेचे काम पुर्ण झाले असे जाणून त्यांनी हि संघटना विसर्जित केली व अभिनव भारत संघटनेचा १९५२ साली समारोप केला.(याचे अध्यक्षपद स्वत: न भुषवता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र अध्यक्षांच्या खुर्चीवर ठेऊन त्यांनी बोसांविषयी आदर व्यक्त केला )

पुढे १९५३ साली या निमित्ताने ते नासिक जिल्हा व त्यांच्या मुळ जन्मगावी भगुर येथे गेले. त्या प्रसंगी नाशिक जिल्ह्यात स्मारक म्हणून अभिनव भारत मंदिर उभारले गेले.

सावरकरांना स्वत:ला कोणतेही वैयक्तिक स्मारक नको होते त्यामुळे त्यांनी तेव्हा ब्रिटिश सरकारने जप्त केलेले स्वत:चे जन्मघर त्यावेळेच्या बाजारमूल्यानुसार सुमारे रु. ५०००/- किमतीत घेणे शक्य असुनही तसे न करता, अभिनव भारत मंदिराला रु. १५०००/- ची देणगी दिली.

त्यांनी स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्याचा मोह टाळला. पण आपणास मात्र कृतज्ञता बुध्दी नसल्याने अजूनही या घराचे स्मारक होऊ शकलेले नाही , ते घर हे राष्ट्रिय स्मारकाचा विषय आहे.


No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...