Skip to main content

सावरकर "पायोनियर ऑफ हिंदुत्व"


रा.स्व.संघ आणि सावरकर यांच्यातले संबंध आणि धोरणात्मक मतभेद काहिही असोत. पण डॉ.हेडगेवार सावरकरांचे हिंदुत्व मानणारे होते व त्यांच्याबरोबरच्या दोऱ्यात दुय्यम भूमिका घेऊन त्यांच्यासमवेत रहात. तर गोळवलकर गुरुजी सावरकरांची भेट वेळ ठरवुन घेत आणि भेटले की त्यांच्या पायाला स्पर्श करुन वंदन करत असत. व्यक्तीश: सरसंघचालकांपासून ते संघ स्वयंसेवकापर्यंत सर्वांना सावरकरांविषयी संपुर्ण आदर असतो.

बाळासाहेब ठाकरे आणि काही प्रमाणात शिवसेना यांचे सावरकर प्रेमही सर्वश्रुत आहेच.

"पायोनियर ऑफ हिंदुत्व" जर का कोणी असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरच !

त्यामुळेच सर्व विरोधी राजकिय पक्ष, समाजवादी/साम्यवादी विचारसरणी या सर्वांचे द्वेषाचे स्थान कोण असेल तर ते सावरकर. त्यांना विचारांनी जिंकता येणे शक्य झाले नाही, इतकेच नाही तर सावरकर विचार येथे रुजलाय आणि वाढतच चाललाय.

त्यामुळेच सावरकरांना जाऊन आज पन्नास वर्षे होऊन गेली , हिंदुत्वाचा विचार मांडुन १०० वर्षे होत आली म्हणून मिळेल त्या मार्गाने सावरकरांना बदनाम करणे त्यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक करणे व निंदानलस्ती करणे याचे एकमेव कारण हे त्यांनी रुजवलेले हिंदुत्व हे आहे. कुठुनही सावरकरांचे विचार व महत्व नव्या पिढीपर्यंत पोचु नये हे त्यांचे प्रयत्न तर अपयशी ठरले. मग त्यांची बदनामीच का न करा? कोण खोलात शिरुन खरे सावरकर पहाणार आहेत? असा विचार करुन ५० वर्षांनंनतही सावरकारांना ट्रोल करणारे आज स्वत:वर ट्रोल होतय म्हणून चिडचिड करत आहेत.

अन्यथा देशभक्तीच्या कारणाने वर्षानुवर्षे कष्टपुर्ण असा कारावास भोगलेला, साहित्यकार,बुध्दीवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक, नाटककार, इतिहास विश्लेषक, विद्वान,महाकवि, तत्वचिंतक असा शतपैलु सद्‌गृहस्थ कोणत्याही स्वतंत्र व स्वाभिमानी राष्ट्रात असा उपेक्षित राहिला असता काय? आपण स्वतंत्र आणि स्वाभिमानी आहोत का नक्की ?

Comments

Popular posts from this blog

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...