Saturday, January 28, 2017

डकरी आणि भन्साळीअप्रस्तुत तुलना

गडकरी पुतळा प्रकरण आणि संजय लीला भन्साळी यांना पडलेले फटके यात समानता शोधायचा अव्यापारेषु व्यापार करु नका.
दोन्ही गोष्टीत आकाशपाताळाच अंतर आहे.
गडकरी प्रकरणात, गडकऱ्यांनी उपलब्ध इतिहास साधने व समजुती यावर लिखाण केले, त्यामागचा हेतु ऐतिहासिक पुरुषाची बदनामी करण्याचा वा घटनांची मुद्दाम मोडतोड करण्याचा नव्हता. पुतळा बसवला त्याला साठ वर्ष्रे झाली आहेत आणि अल्लाउद्दीन खिलजी व त्याच्या वाईट नजरेने जोहार करावा लागणारि पद्मिनी यांच्या कथेला प्रेमकहाणी साफ़र करणारा भन्साळी नावाचा विकृत वर्तमानकालात आहे.
भन्साळी हा इसम हेतुत: समाजमनावर ओरखडे काढतो आहे. अल्लाउद्दीन खिलजी हा एक ऐतिहासिक पात्र आहे आणि त्याची क्रुरता अत्याचार सर्वांना माहीत आहे. त्याने केलेले अत्याचार आणि कत्तलींचा इतिहास आहे. त्याचबरोबर अल्लाउद्दीन खिलजी आणि महाराणी पद्मिनी यांच्यातले नाते शिकारी आणि सावज, भक्श्य आणि भक्षक, शोषक आणि शोषित असे असल्याचे इतिहासात विख्यात आहे, या दुर्दैवी राणीला वासनांध खिलजी मुळे जोहार करावा लागला या इतिहासाशी सर्वसामान्य विद्यार्थी पण परिचित असतो.
गडकरीचे लिखाण त्यावेळी उपलब्ध असलेल्या इतिहासावर आधारीत होते आज चुकीच वाटत असेल तर त्यात इतिहासाच्या असलेल्या अपुऱ्या साधनांचा दोष होता, लेखकाचा नाही. पण भन्साळींचे तथाकथित कलाकृती हेतुत: इतिहासाची मोडतोड करणारे आहे. गल्लाभरु मनोवृत्तीतून , समाजाला मुद्दाम डिवचुन धंदा करण्याचा हेतु आहे. याच्यावर वेळीच खटले भरले गेले पाहिजेत. कायदा हातात घेऊन या गेंडयांच्या कातडीवर जरा सुध्दा ओरखडा येणार नाही. त्याला कायद्याच्याच भाषेत परखड उत्तर दिले पाहिजे .
महाराणी पद्मिनीचे पात्र इतिहासात अस्तित्वातच नाही असे म्हणून त्या मागे दडण्याचा प्रयत्न भन्साळी व पुरोगामी वर्गाकडून केला जाईल. पण पात्र असो नसो जनमानसात हि कथा रुजलेली आहे ति राणी पद्मिनी व तानेक हिंदू स्त्रियांच्या बलिदानाची म्हणूनच. त्याला अशा प्रकारे विकृत धक्का लावण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर तो नक्कीच समाजघातकी गुन्हा आहे. त्या शिवाय अशाच स्वरुपाच्या व्यक्ती व प्रसंग त्याच काळात सत्य स्वरुपात घडलेले आहेतच .
अल्लाउद्दीन खिलजीने गुजराथचा राजा कारण घेला याचा पराभव करून राणी कमलदेवी आणि तिची मुलगी देवलदेवी यांचे अपहरण करुन जनानखान्यात आणुन ठेवली. महाराश्त्रातल्या रामदेवराव यादव याची मुलगी जेठई हिला जबरदस्तीने उचलून नेले होते.
त्याव्यतिरिक्त अल्लाउद्दीन खिलजी हा बळजबरीने समलैंगिक संबंध ठेवणारा विकृत सुलतान होता. गुजरात च्या स्वारीत देखणे असे हिंदु युवक गुलाम करुन त्याने दिल्लीत आणले व त्यंच्याशी संबंध ठेऊन होता. त्याचां खुन सुध्दा त्यानेच समलीन्गीयासक्त होऊन बाळगलेल्या मलिक कापूर या मुल हिंदू असलेल्या गुलामाकडून झाला होता. अशा विकृत सुलतानाची खोटी प्रेमकहाणी तीही बळी गेलेल्या एका विवाहित हिंदु स्त्री बरोबर दाखवुन भन्साळी काय करु पाहतो आहे ते उघड आहे. याला फक्त राजस्थानात नाही तर देशभर आणि महाराष्ट्रात प्रखर विरोध झाला पाहिजे . अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावखाली अशा प्रकारच्या कलाकृतीला मान्यत देण म्हणजे इतिहासाचा खून, आक्रमक विकृतांच्या अत्याचारांचा गौरव आणि बळी गेलेल्यांची क्रुर चेष्टा आहे.
नुसती निदर्साने करून व मिळवून केवळ प्रसिध्दीच मिळते आणि आपला मुर्दाड ब~ओलीवूड वेडा समाज निगरगटट पणे असे सिनेमे तिकीट काढून जाण्यात शरम वाटू देत नाही पण म्हणून भांसालीला मोकाट सुटू न देता रोखायला हवाय .
ज्याला सिनेमा पहायचे तो पाहिलं , नसेल पाहायचा त्यांनी पाहू नका असा विचार या विषयात चुकीचा आहे कारण इथे उघड उघड एका अत्याचाराचे उदात्तीकरण होते आहे. उद्या विषारी गोळ्या विकायला उपलब्ध करून देऊन ज्याला हवे तो त्या खाईल तुम्हाला नको असतील तर नका खाऊ म्हणण्यासारख होईल ते .
© चंद्रशेखर साने

No comments:

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी...