Tuesday, January 31, 2017

शरद पोक्षेंचा नथुराम

मी आधी भूमिका मांडली होती की शरद पोंक्षेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल तरी त्यांनी हा विषय काढण्याने काहिही साध्य होणार नाही. जुने उकरुन नुसत समाजात वाद माजतील.
मात्र साम टिव्ही वर काल ज्या प्रकारे शरद पोंक्षेंना ट्रोल करुन सहा जणांनी मिळुन आवाज बंद केला त्यात परत चार ते पाच वेळा नथुरामला सावरकरांचा पोपट आणि सावरकर नथुरामला लिहुन देत होते आणि त्याप्रमाणे तो बोलत होता असे कोणतेही पुरावे न देता बोलले जात होते, सावरकरांची निष्कलंक सुटका होऊन सुध्दा परत त्यांना आरोपिच्या पिंजऱ्यात उभे केले जात होते ते पाहता नथुराम विरोधी मंडळींचा लोकशाही वरचा विश्वास , इतिहासाचे प्रेम आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोटा दंभ स्पष्ट दिसुन आला. हा नुसता एका नाटकाचा वाद नाही तर दोन विचारधारांची अविरत लढाई आहे, हे नाटक हा अगदीच क्षुल्लक निमित्त आहे आणि हा वाद म्हणजे दोन्ही विचारधारांची पुर्ण व खरी ओळख नाही. हा संघर्ष सतत चालु रहाणार आहे. नथुरामवरचे नाटक बंद केले तरी सावरकरांवर हल्ले होण आणि त्यांची बदनामी करण चालुच रहाणार आहे. मग नाटकाचे प्रयोग का बंद करायचे?
नथुराम हा इतिहास आहे आणि शरद पोंक्षेंना ते वाटक करण्याचा अधिकार तर आहेच आणि त्यांनी त्याचे हजारो प्रयोग करावे असे माझे आता मत झाले आहे.
मी अद्याप हे वा आधीचे नाटक पाहिले नव्हते, जर प्रयोग झाला तर मी आता नक्कीच प्रयोगाला जाऊन हे नाटक पहाणार आहे आणि आवडले तर प्रचार पण करणार आहे.
असिम सरोदे कोणाची वकिल पत्रे घेऊन फिरतात ते चांगले माहीत असल्याने त्यांची पोपट व मैना कोण कोण असु शकते ते सहज समजु शकते. सावरकरांनी स्टेटमेंट लिहुन दिली ती नथुराम वाचत होता या आक्षेप अतिशय गंभीर आहे, असिम सरोदे स्वत:च खोटारडे आहेत. वकिली व्यवसयामुळे खरे काय खोटे काय हे समजुन घेण्यासाठी त्यांनी गांधी विचार परत वर्ध्याला २ वर्षे राहुन समजून घ्यावेत आणि मग परत कोर्टात उभे रहावे अशी एक सुचना.
समाजात असिम सरोदे, महाजन वगैरे सारखे लोक जो पर्यंत आहेत तोपर्यंत हे नाटक व अशा प्रकारची चर्चा वारंवार घडत रहावीच.
ओझा यांनी सावरकरांची प्रेरणा राष्ट्रवादी आणि गांधींची मानवतावादी हा मुद्दा मान्य आहे. सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी असल्याने भारतीय राष्ट्रवादाचे पितृत्व जाऊ शकते , गांधींचा मानवतावाद हा जागतिक असल्याने ते महात्मा होऊ शकतात भारताचे राष्ट्रपिता नाही कारण त्यांना राष्ट्रवादच मान्य नव्हता असे गांधीवादी ओझाच म्हणत आहेत. महात्मा पद मिळवण्यासाठी आपली जात, धर्म राष्ट्र , भाषा संस्कृती यांचा बळी देऊन वाहवा मिळवता येते. मानवतावादी नेत्याने राष्ट्रीयव स्विकारु नये आणि महात्म्याला राष्ट्राने स्विकारले तर त्या राष्ट्राचा घात होतो. कारण राष्ट्राराष्ट्रांमधला आपपर भाव जे राष्ट्र वास्तव म्हणून स्विकारत नाही त्या राष्ट्राचा विनाश अटळ असतो.
साम टीव्ही चा सूत्रसंचालक आणि ट्रोल करणारे ढोंगी लोक यांचा निेषेध हा सूत्रसंचालक पक्षपाती आणि ७ वि. २ याप्रकारे चर्चा घडवुन आणतो. आणि पुरेसा वेळ पण देत नाही. अतिशय भिकार दर्जाअची वाहिनी आहे. चर्चेत बहुतेक वक्ते बऱ्याच खोट्या गोष्टी दडपुन देत होते.
नथुरामचे प्रयोग अवश्य व्हावेत. सिनेमा पण निघावा.
© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...