माझी बेहेरेंबरोबर दोनदा भेट झाली. माझे काही लेख / पत्रे त्यांनी
छापलीही होते. सोबत मधुनच माझा सावरकर सिनेमाच्या संदर्भात श्री. सुधीर
फडक्यांशी थोडासा वादविवादही झाला होता. मी बेहेऱ्यांची एकदा त्यांच्याच
कार्यालयात भेट घेतली होती. मी ज्यांच्या ओळखीने आणि ज्या संदर्भात त्यांना
प्रथम भेटलो होतो, त्यांच्याशी बेहेऱ्यांचा विसंवाद होता. ते मला त्यावेळी
माहीत नव्हते. त्यामुळे आमची भेट फारशी सुखावह झाली नाही. मला लेखनाला
फारसे प्रोत्साहनही त्यांनी दिले नाही. पण माझा बेहेऱ्यांविषयी आदर कायमच
होता. पण त्यावेळी मी दिलेला लेख काही सोबत मध्ये छापुन आला नाही, पण
नंतरचे छापुन आले.
दुसऱ्यांदा भेट झाली ती सातारच्या सावरकर साहित्य संमेलनात. ती भेट ५-१० लोकांच्या गराड्यातली होती. साताऱ्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबरोबर एकाच व्यासपीठावर भाषणे केली होती. संमेलनात आणि नंतर सार्वजविक सभेत. सातारचे दैनिक "ऐक्य" बहुदा त्याच दिवशी सुरु झाले होते. महाराष्ट्रातले वातावरण हिंदुत्वाने भारले जाऊ लागले होते.
त्यांची भाषणं लेखणीप्रमाणेच प्रभावी वाटलीे. संमेलनात जेव्हा थोडी बेशिस्त माजली तेव्हा त्यांनी माईक हातात घेतला आणि एकाच मार्मिक वाक्याने सुव्यवस्था केली होती. सगळे लोक विस्कळीत कसेही बसले होते. वारंवार आवाहन करुनही लोक अधल्या मधल्या जागा, खुर्च्या मोकळ्या सोडुन बसले होते. बेहेरे माईक हातात घेऊन , "एकंदर हिंदु समाजप्रमाणे विस्कळीत होऊन बसु नका" अशा स्वरुपाचे कोणतेतरी वाक्य बोलले. इतका वेळ न ऐकणारे कार्यकर्ते व श्रोते ताबडतोब उठुन शिस्तीने बसले होते.
सोबत हे केवळ साप्ताहिक नव्हते तर वैचारीक व्यासपीठ होते जिथे सगळ्या विचारांना मुक्त संचार होता. अनेक वेगवेगळ्या विचारांचे लेख वाचण आणि मनसोक्त वादविवाद होण हे त्या व्यासपीठावर होत. अर्थात स्वत: बेहेरे हिंदुत्ववादी असल्याने साप्ताहिकावर छाप हिंदुत्वाचीच होती, पण इतरांचा आवाज कधीच दाबला गेला नाही. विरोधी टिका सर्रास पणे सोबत मध्ये छापुन यायची. शुध्दलेखनातल्या चुका सोडल्या तर श्री. बेहेरे यांनी कोणाचे विचार संपादीत केले असतील याची शक्याताच नाही. साप्ताहीक ९० % वाचक/वर्गणीदारांवर चालायचे. एखादीच जाहीरात मिळायची.
हिंदुत्व , बाळासाहेब आणि शिवसेना यांच्याशी जवळीक त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी चांगलीच भोवली. महात्मा फुले यांच्यावर दोन लेख चुकीच्या पध्दतीने छापले गेल्याने पवारांना संधीच मिळाली. हे असे लेख छापल्याबदाल मी गांगल - बेहेऱ्यांचे आभारच मानतो असे छद्मी उद्गार काढुन पवारांनी बेहेरे-गांगलांवर विधानसभेत हक्कभंग ठराव आणला व त्यांना माफी मागायला लावली होती. त्यावेळी बेहेरे हॉस्पिटल मध्ये आजारीच होते. प्रकरणावर माफीने पडदा पडला व पुढे लवकरच बेहेरे गेले.
ते गेल्याची बातमी सकाळ ने सविस्तर दिली होती. पण महाराष्ट्र टाईम्स ने अक्षरश: दोन ते तीन ओळीत कुठेतरी आतल्या पानावर छापून आल्या मनाचा हिमटेपणा दखवुन दिला होता.
साप्ताहीक सोबत हि एक विचारांची सोबत होती. अंक हातात पडल्यावर प्रथम बेहेरे यांचे संपादकिय वाचायचे. एका बैठकित संपुर्ण अंक कधीच वाचून व्हायचा नाही. किमान तीन ते चार दिवस तरी लागायचे. कारण सगळेच लेख वैचारीक आणि वाचनीय. कम्युनिस्ट, सोशॅलिस्ट सगळ्याच प्रकारचे लेखन त्यात येई.
विचारांचे बळ, सर्व विचारांना व्यासपीठ देणारे, उजव्या विचारसरणीचा द्वेष करणाऱ्या तथाकथित विचारवंतांनी अनुल्लेखाने मारले तरी सातत्याने लिहिणारे, विना जाहीराती, केवळ वर्गणीदारांच्या बळावर, एकहाती साप्ताहिक चालवणारे पत्रकार आता होणे शक्य नाही.
© चंद्रशेखर साने
दुसऱ्यांदा भेट झाली ती सातारच्या सावरकर साहित्य संमेलनात. ती भेट ५-१० लोकांच्या गराड्यातली होती. साताऱ्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबरोबर एकाच व्यासपीठावर भाषणे केली होती. संमेलनात आणि नंतर सार्वजविक सभेत. सातारचे दैनिक "ऐक्य" बहुदा त्याच दिवशी सुरु झाले होते. महाराष्ट्रातले वातावरण हिंदुत्वाने भारले जाऊ लागले होते.
त्यांची भाषणं लेखणीप्रमाणेच प्रभावी वाटलीे. संमेलनात जेव्हा थोडी बेशिस्त माजली तेव्हा त्यांनी माईक हातात घेतला आणि एकाच मार्मिक वाक्याने सुव्यवस्था केली होती. सगळे लोक विस्कळीत कसेही बसले होते. वारंवार आवाहन करुनही लोक अधल्या मधल्या जागा, खुर्च्या मोकळ्या सोडुन बसले होते. बेहेरे माईक हातात घेऊन , "एकंदर हिंदु समाजप्रमाणे विस्कळीत होऊन बसु नका" अशा स्वरुपाचे कोणतेतरी वाक्य बोलले. इतका वेळ न ऐकणारे कार्यकर्ते व श्रोते ताबडतोब उठुन शिस्तीने बसले होते.
सोबत हे केवळ साप्ताहिक नव्हते तर वैचारीक व्यासपीठ होते जिथे सगळ्या विचारांना मुक्त संचार होता. अनेक वेगवेगळ्या विचारांचे लेख वाचण आणि मनसोक्त वादविवाद होण हे त्या व्यासपीठावर होत. अर्थात स्वत: बेहेरे हिंदुत्ववादी असल्याने साप्ताहिकावर छाप हिंदुत्वाचीच होती, पण इतरांचा आवाज कधीच दाबला गेला नाही. विरोधी टिका सर्रास पणे सोबत मध्ये छापुन यायची. शुध्दलेखनातल्या चुका सोडल्या तर श्री. बेहेरे यांनी कोणाचे विचार संपादीत केले असतील याची शक्याताच नाही. साप्ताहीक ९० % वाचक/वर्गणीदारांवर चालायचे. एखादीच जाहीरात मिळायची.
हिंदुत्व , बाळासाहेब आणि शिवसेना यांच्याशी जवळीक त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी चांगलीच भोवली. महात्मा फुले यांच्यावर दोन लेख चुकीच्या पध्दतीने छापले गेल्याने पवारांना संधीच मिळाली. हे असे लेख छापल्याबदाल मी गांगल - बेहेऱ्यांचे आभारच मानतो असे छद्मी उद्गार काढुन पवारांनी बेहेरे-गांगलांवर विधानसभेत हक्कभंग ठराव आणला व त्यांना माफी मागायला लावली होती. त्यावेळी बेहेरे हॉस्पिटल मध्ये आजारीच होते. प्रकरणावर माफीने पडदा पडला व पुढे लवकरच बेहेरे गेले.
ते गेल्याची बातमी सकाळ ने सविस्तर दिली होती. पण महाराष्ट्र टाईम्स ने अक्षरश: दोन ते तीन ओळीत कुठेतरी आतल्या पानावर छापून आल्या मनाचा हिमटेपणा दखवुन दिला होता.
साप्ताहीक सोबत हि एक विचारांची सोबत होती. अंक हातात पडल्यावर प्रथम बेहेरे यांचे संपादकिय वाचायचे. एका बैठकित संपुर्ण अंक कधीच वाचून व्हायचा नाही. किमान तीन ते चार दिवस तरी लागायचे. कारण सगळेच लेख वैचारीक आणि वाचनीय. कम्युनिस्ट, सोशॅलिस्ट सगळ्याच प्रकारचे लेखन त्यात येई.
विचारांचे बळ, सर्व विचारांना व्यासपीठ देणारे, उजव्या विचारसरणीचा द्वेष करणाऱ्या तथाकथित विचारवंतांनी अनुल्लेखाने मारले तरी सातत्याने लिहिणारे, विना जाहीराती, केवळ वर्गणीदारांच्या बळावर, एकहाती साप्ताहिक चालवणारे पत्रकार आता होणे शक्य नाही.
© चंद्रशेखर साने
No comments:
Post a Comment