Sunday, March 12, 2017

मोदी लोकप्रिय का ?

नेहरु प्रचंड लोकप्रिय होते असे म्हणतात. इंदिरा गांधी पण १९७१ ला लोकप्रियतेच्या चरमसीमेवर होत्या. राजीव गांधींवरचा लोकांचा विश्वास १९८४ ला वादातीत होता.

पण स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान नसताना, राजबिंडे व्यक्तीत्व नसताना, स्वातंत्रलढ्याची पार्श्वभूमि नसताना, घराणे पाठीशी नसताना, बांगला देश निर्मिती सारखी फार मोठी घटना घडलेली नसताना अथवा सहानुभूतीची लाट नसताना सुध्दा मोदींनी लोकांना मंत्रमुग्ध केले आहे हा चमत्कार आहे. अटलबिहारींना सुध्दा इतकी लोकप्रियता मिळाली असेल असे वाटत नाही. मोदींनी कॉंग्रेसी व कॉंग्रेसेतर सर्वच पंतप्रधानांना लोकप्रियतेत मागे टाकले असावे असा माझा अंदाज आहे.

भले भले जाणकार फक्त मोदींवर टिका करण्यात ते कसे हुकुमशहा होतील हे ठरवण्यात मग्न असताना जनता मोदींवर भरभरुन प्रेम करते आहे.

याचे कारण माझ्यामते असे आहे की मोदींची धोरणे व निर्णय यशस्वी ठरतील का नाही हे भविष्यात कळेल, पण मोदी हे एक नि:स्वार्थी आहेत आणि खरच आपल्यासाठी काही करु इच्छीत आहेत हे लोकांना पटले आहे. मोदींवर आगपाखड करणारे तोंडाळ नेते-प्रवक्ते-सूत्रसंचालक लोकांना फारसे आवडत नाहीत.

एकदा लोकांना नेत्याची कळकळ आणि नि:स्वार्थ बुध्दी पटली की विश्लेषकांना महत्वाच्या वाटणाऱ्या बाकीच्या सर्व गोष्टी निरर्थक ठरतात हे राजकीय पंडीतांना अजुनही कळत नाहीये. त्यांची मती गुंग झाली आहे.

© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...