Monday, March 27, 2017

जीना हाऊस: द्विराष्ट्रवादाचे स्मारक

खरतर कोणतीही ऐतिहासिक वास्तु ची नासधुस करण, तिच्यावर राग काढण मला योग्य वाटत नाही. त्यामुळे जीना हाऊस ला धक्का पोचवु नये अस तात्विक मत आहे.

पण ज्या प्रकारे भारतात ढिलाई चालते ती पहाता हा कळीचा मुद्दा नक्कीच बनतो. शिवाजी महाराजांनी मरणान्तानी वैराणी या हिंदु धर्मनीतीस अनुसरुन, रावणाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या आदर्श श्रीरामाच्या पावलावर पाऊल टाकून अफजलखानाचे त्याच्या त्याच्या धार्मिक कल्पने प्रमाणे योग्य ते विधी करवुन घेतले. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे थडगे बांधले का नाही हा मुद्दा तर ऐतिहासिक दृष्ट्या वादग्रस्तच आहे. तसा समकालिन पुरावा उपलब्ध नाही.

१९३५ पर्यंत ती एक साधी कबरच होती असे उपलब्ध छायाचित्रावरुन दिसते. पण आता त्याचे फार मोठेे अवडंबर झाले आहे. एका किरकोळ झोपडिवजा थडग्याचे प्रचंड मोठ्या दर्ग्यात रुपांतर झाले आहे. कोर्टाने आदेश देऊनही हे अधिक झालेले बांधकाम अद्यापही पाडले गेलेले नाही.
मरणान्तानी वैराणि इ. आदर्श कल्पना न बाळगता ब्रिटीशांनी शनिवारवाडा अथवा गडकिल्ले यांना भारतीयांना प्रेरणा ठरतील अशी स्मारके बनवु दिले नाही. उलट अशा स्मारकात पण जातीवाद आणणारे घटक पेरुन ठेवले जेणे करुन हिंदु एकत्र येऊन आपल्या सत्तेस आव्हान देऊ नयेत. अर्थात सजग झालेल्या भारतीयांनी त्याची स्मारके बनवण्याचे कार्य सुरु ठेवले.

नथुराम गोडसे यांच्या अस्थी सिंधु नदीत विसर्जनासाठी राखून ठेवाव्यात अशी त्याची अंतिम इच्छा होती. पण हि इच्छा म्हणजे मोस्ट फेव्हर्ड नेसन शी द्रोह. त्यामुळे नथुरामच्या बाबतीत मरणांतानी वैराणि वगैरे न मानता भारत सरकारने अस्थी काही नातेवाईकांना दिल्या नाहीत. ( काही जणांनी बुड्या मारुन त्या काढल्या व त्या कलाशात ठेवुन त्यांचे स्मरण केले जाते व त्या अस्थि कलशाचे पुजन केले जाते असे म्हटले जाते) त्या विरुध्द अधुन मधुन गदारोळ उठतो.

सर्वात गमतीच भाग म्हणजे नथुरामच्या इच्छे मागचे कारण पाकीस्तानने गांधीजींच्या अस्थि सिंधु नदीत विसर्जित करु देण्यास दिलेला नकार हे आहे. गांधींच्या , एका काफीराच्या अस्थि आपल्या पाक झालेल्या "दारुल इस्लाम" च्या भूमित सामावुन घेणे हि कल्पनाच पाकड्यांना घ्रूणास्पद वाटली असावी. गांधींच्या अपमानाचे जे दु:ख त्यांच्या मारेकऱ्याला झाले त्याच्या शतांशने ही दु:ख, त्यांच्या नावाची शिदोरी पुरवुन खाणाऱ्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारला झाले नाही. त्यांनी निमुट अन्यत्र अस्थि विसर्जित केल्या.
ओस्मा बिन लादेन ला अमेरिकेने ठार मारल्यावर त्याच्या शवाचा कसलाच माग न राहील याची व्यवस्था केली. म्हणजे पुढे मागे तो प्रश्नच उद्भवु नये हा बोध आजवर्रच्या इतिहासातून अमेरिकेने घेतला.
एकुण सर्व प्रकार पाहता जीना हाऊस चे रुपांतर एखाद्या सरकारी कचेरीत करावे हे व्यावहारीक दृष्ट्या योग्य ठरेल. जीनाने डायरेक्ट ऍक्शन चे निर्देश देऊन हिंदुंच्या कत्तली घडवुन आणल्या होत्या, तेव्हा त्याची स्मृती भारतात जपणे यात इतिहास प्रेम असले तरी ते राष्ट्रप्रेमाला आड येणारे आहे. हिंदुच्या सहनशील संस्कृतीची ओळख म्हणून हे ठिक असले तरी हिंदुत्वाला पोषक नाही.

जीनांच्या क्रुरतेच्या, फाळणीच्या जखमा , सिंध, पंजाब व बंगाल मधील हिदुंचा आक्रोश याचे जनकत्व जाणाऱ्या जीना हाऊस चे स्वतंत्र भारतातून नाव मिटवुन टाकले पाहिजे हे भाजपा नेत्याची कल्पना अवाजवी म्हणता येत नाही. प्रत्यक्ष इमारत न पाडता सुध्दा हे काम कसे केले जाईल याची चाचपणी केली जावी.
वरवर पाहता हि एक ऐतिहासिक वास्तु असली तरी भावनिक दृष्ट्या जीना हाऊस हे द्वीराष्ट्रवादाचे व पाकिस्तान निर्मितीचे धोकादायक स्मारक भारतात उभे आहे, ती केवळ एक वास्तु नसून द्वीराष्ट्रवादाचे प्रतिक आहे. त्याचे प्रतिकात्मक नष्टीकरण करण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे.

© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...