Saturday, March 25, 2017

"राष्ट्रीय वर्गहितांचा समन्वय" अर्थात कल्याणकारी अर्थव्यवस्था

लोकांच्या जीवनशैलीवर प्रभाव टाकुन नको असलेल्या गरजा निर्माण करुन जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या वस्तुंची निर्मिती, अव्वाच्या सव्वा नफा मिळवण्याची दारुण इच्छा, त्यापायी तयार केली जाणारी भ्रष्टाचारी यंत्रणा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अफाट गौरव करुन चंगळवादी जीवनशैली निर्माण करण हि सर्व भांडवलशाही ची काळी बाजू.

या उलट भांडवलदार हा उद्योगधंद्यांना चालना देतो, लोकांना रोजगार मिळववून देण्यास सहाय्यभूत होतो. आपली पुंजी मागणी/पुरवठा च्या दोलायामान स्थितीची जोखिम पत्करुन गुंतवत असतो, त्याला त्यासाठी अचुक अंदाज व बुध्दीचा वापर करावा लागतो. भांडवली विचारात गुणवत्तेचा अधिक विकास होतो. सततच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना निवडीचे जास्त जास्त पर्याय सतत निर्माण होत रहातात. इ. चांगली बाजू.

साम्यवाद आणि भांडवलशाही दोन्हीतला सुवर्णमध्य साधणारी आणि समाजवादाला प्राधान्य देणारी कल्याणकारी शासन ही आपली आर्थिक नीती जास्त चांगली आहे. सावरकरांनी हिच नीती हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरुन "राष्ट्रीय वर्गहितांचा समन्वय" या नावे मांडली होती .

जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आपली अर्थव्यवस्था भांडवलशाही कडे अधिक झुकत चालली आहे व त्यातून शेतकरी वर्गाचे प्रश्न व समस्या वाढत आहेत. मुख्य म्हणजे आपली शेती हि व्यावसायिक - प्रोफेशनल पातळीवर नसते, पाणी नियोजनात मार खाते, नैसर्गिक बेभरवशाचे हवामान, पावसावर अतिरिक्त अवलंबुन रहावे लागणे, बाजाराचा अंदाज घेण्यात शेतकरी वर्ग कमी पडणे , त्यास आवश्यक प्रशिक्षण न मिळणे, दलालांना व आडत्यांना आलेले सर्वात जास्त महत्वाचे स्थान हि सध्याची स्थितीआहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुवर्णमध्य गाठणे गरजेचे आहे. मुळ धोरणांचा फेरविचार व्हायला हवा, कर्जमाफी वगैरे ठीक आहे कारण मलमपट्ट्या सुद्धा महत्वाचा असतात, पण नुसत्याच मलमपट्ट्या म्हणजे रोगाचा समूळ नाश नाही. सरकार व विरोधक यांनी यावर पक्षिय राजकारण न करता एक होऊन दिर्घकालिन उपाययोजना करावी अशी एक भाबडी इच्छा !

© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...