Sunday, March 26, 2017

आपली धर्मनिरपेक्षता : मौलाना चालतात , योगी नाही

मौलाना आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबेअर १८८८ या दिवशी मक्का, सौदी अरेबिया येथे झाला. संपुर्ण मूळ नाव सय्यद अबुल कलाम घुलाम मुहियुद्दून अहमेद संक्षेपाने मौलाना आझाद म्हणून ओळखले जाऊ लागले.

आझादांचे वडील हे बंगाली मौलाना सय्यद मुहम्मद खैरुद्दीन अहमेद अल्‌ हुसैनी. आझादंनी हनाफी मझहिब, मलिकी. शफी आणि हनबाली फिक्‌ह, शरियत, गणित, तत्वज्ञान, जगाचा इतिहास आणि विज्ञान आदी विषयात त्यांच्या साठी खास नेमलेल्या शिक्षकांकडे शिकुन  प्राविण्य मिळवले होते.
वयाच्या तेराव्या वर्षी. झुलेखा बेगम नामक मुस्लिम मुलीशी त्यांचा विवाह झाला. कुराण ब हदीस चा अन्वयार्थ लावणारे विपुल लेखन मौलानांनी केले आहे.

भारतात ज्यांचा जन्मही झाला नाही असे, जन्माने निसर्गत: मिळणाऱ्या नागरीकत्वाचा विचार करता अरबस्थानचे (मक्केचे) नागरीक असलेले, मुस्लिम धर्माचे मौलवी भारताचे पहिले केंद्रिय शिक्षण मंत्री होते.

योगी आदित्यनाथ हे गणिताचे पदवीधर आणि हिंदु तत्वज्ञानाचे अभ्यासक असुन नाथपंथी आहे. उत्तर भारतातलेे रहिवासी आहेत. तन मनाने हिंदुस्थानी आहेत.

मौलाना आझाद फाळणी संबंधात व हिंदु - मुस्लिम प्रश्नात किती कुटील होते त्यावर प्रा. शेषराव मोरे यांचा एक समग्र लेख आहे, म्हणजे मौलानांची तीही बाजू लंगडी आणि वादग्रस्तच आहे.

अशा मौलाना आझादांना नेहरु भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री करु शकतात तरी ते सेक्युलर आणि मोदींनी भारतातच जन्मलेल्या गणित व हिंदु धर्माचे अभ्यासक असलेल्या सलग ४-५ वेळा खासदार म्हणुन निवडुन आलेल्या हिंदु संन्यासाला मुख्यमंत्री केले तर ते मात्र भगवीकरण?

मग नेहरु धर्मनिरपेक्ष कसे अणि मोदी का नाहीत?

© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...