Skip to main content

हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा

हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा असा मुद्दाम हिंदु शब्दाचा उल्लेख करावा का न करावा? जर आपण १ जानेवारीला ख्रिश्चन नव-वर्षाच्या शुभेच्छा असा उल्लेख करत नसु तर मुद्दाम हिंदु नववर्ष असा उल्लेख का करायचा? नुसताच नववर्षाच्या शुभेच्छा एवढच का म्हणु नये, असा काहिंचा प्रश्न आहे . गुढी पाडवा हे नुसत मराठी नववर्ष म्हणण तर त्याहून जास्त चुक आहे. मराठी असण्या नसण्याशी याचा संबंध नाही. १ मे हा महाराष्ट्र दिन (किंवा जागतिक कामगार दिन) तस गुढी पाडवा फक्त महाराष्ट्राशी संबंधित नाही.

पण व्यवहारात जोपर्यंत १ जानेवारी हा नविन वर्षाचा प्रारंभ मानला जातो तोपर्यंत आणि त्यामुळे हा हिंदु नववर्षाचा म्हणावे लागेल. वस्तुत: निसर्गचक्राप्रमाणे सुर्याचा मेषेतला प्रवेश, वसंत संपात हेच वास्तविक नववर्ष मोजण्यास प्रारंभ करायचा दिवस. त्यामुळ गुढी पाडवा हा अगदी शास्त्रशुध्द नैसर्गिक दिवस.

अगदी जगभर हिच नैसर्गिक पध्दत नववर्षारंभासाठी होती. कारण पुर्वी म्हणजे १६ व्या किंवा १७ व्या शतकापर्यंत चैत्र गुढीपाडव्याच्याच सुमारास येणारा १ एप्रिल हाच नविन वर्षारंभ युरोपचाही होता. नंतर एका राजाने तो बदलुन १ जाने वारी केला.पण या बदलानंतर सुध्दा जुन्या पध्दतीने १ एप्रिल हा नववर्षदीन म्हणून साजरा करणाऱ्या युरोपिअन लोकांना व त्यानिमित्ताने एकमेकांना भेटवस्तु देणाऱ्या लोकांना "एप्रिल फुल" म्हणजे १ एप्रिल ला नववर्ष साजरा करणारे मुर्ख म्हणवले जाऊ लागेल.

आजही एकमेकांना १ एप्रिल ला मुर्ख बनवण्याचा उपक्रम गमतीचा भाग म्हणून साजरा होतो. मात्र १ एप्रिल अजून तरी नविन आर्थिक वर्ष म्हणून आहेच.

हा तिथी , दिनांक , वेगवेगळी पंचांगे, वेगवेगळ्या कालगणना यांचा घोळ कधीही संपेल असे वाटत नाही. टिळक पंचांगवाले गुढी पाडवा कधी साजरा करत आहेत हा अजुन एक घोळ. बहुतेक येत्या १५ दिवसात कधीतरी त्यांचा गुढी पाडवा साजरा होईल. कारण टिळक अयनांश आणि चित्रापक्षाचे अयनांश यात चार अंशांचा फरक आहे.

व्यवहारातले १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हे कालमापन आता बदलले जाईल असे वाटत नाही. तस बदल, तशीच काही मोठी, विश्वव्यापी घटना घडली तरच संभवतो.

© चंद्रशेखर साने
Like
C

Comments

Popular posts from this blog

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...