Sunday, March 12, 2017

भाजपा पंजाबात का नाही?

पंजाबात शीखांची मनोभूमिका गुंतागुंतीची आहे. शीख आणि आर्य समाज यात फार मोठा विसंवाद होता. पंजाबची भाषा ठरवताना संघियांनी हिंदीला प्राधान्य दिले म्हणून शीख समाज संघपरिवारावर नाराज होता.

शीखांमध्ये काही फुटीर प्रव्रूत्ती फाळणीच्या काळात पण होत्या. शीख हे हिंदु नाहीत या समजाला आधी ब्रिटीशांनी व नंतर फुरोगाम्यांनी मनसोक्त खतपाणी घातले. वस्तुत: शीख पंथाची स्थापनाच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झाली मात्र हा वादग्रस्त मुद्दा आहे. काही शीख ही गोष्ट अमान्य करतात. माझ्या समजुतीप्रमाणे सहजधारी शीख हे स्वत:ला हिंदुत्वाचा भाग मानतात , केशधारी स्वत:ला स्वतंत्र धर्म मानतात. नेमकी माहिती नाही, माझा समज आहे. तात्विक दृष्ट्या विचाअर केला तर शीख तत्वज्ञान हे रामानुजांचे विशिष्टाद्वैती तत्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारे आहे. पुनर्जन्म, ८४ लक्ष योनी मधुन मोक्ष इ. कल्पना शीख पंथात आहेतच. गुरुग्रंथात संत नामदेवांसहित पंधरा हिंदु संत तर एका सुफी संताची वचने समाविष्ट आहेत. एक पोथी व दहा गुरु अशी शीखांची बांधणी आहे. इस्लामची शीखांकडे पहाण्याची दृष्टी एकच किताब, एकच ईश्वर पण प्रेषित दहा अशी काहीशी आहे. १८५० ला रणजितसिंगाचे राज्य इंग्रजांनी जिंकले असताही शीख समाजाचा आपपर भाव इंग्रजांविषयी झपाट्याने कसा काय मावळला हे एक आश्चर्यच होते कारण त्यानंतर केवळ सातच वर्षात म्हणजे १८५७ ला झालेल्य ब्रिटीश विरोधी उठावात शीख प्रामुख्याने ब्रिटीशांच्या बाजूनेच राहिला. १८५७ मध्ये मोंगल वंशाचा भर रस्सोत्यात झालेला वंश विच्छेद शीख मनाला सुखावुन गेला ज्या गुरुंच्या मुलांची हत्या चांदणी चौकात झाली तिथेच मोंगल वंशाच्या एकोणीस शहजाद्यांना ब्रिटीशांनी निर्दयपणे ठार केले होते. शीखांना तो अर्थातच काळाने उगवलेला सुड व स्तव:ला मिळालेला न्याय वाटला होता. असो.

तथापि तत्कालिन शीख नेते मास्टर तारासिंग यांचा कल हिंदुत्वाकडे होता. स्वा. सावरकरांना ते मानत असत. अन्य कोणाही नेत्याचा सत्कार झाला नसेल इतका भव्य सत्कार सावरकरांचा अमृतसरच्या सुवर्णमंदिरात केला गेला, त्यांस कृपाण भेट देण्यात आले होते. मास्टर तारासिंग विश्व हिंदु परिषदेचेही सदस्य होते.

१९९० च्या दशकात खलिस्तान चळवळीने प्रचंड मूळ धरले. त्यात इंदीरा गांधींची हत्या झाली. नंतर रिबेरोंनी वेचुन वेचुन दहशतवादी ठार मारले.

संघ परिवार शीख संगत सारख्या संकल्पना राबवत आहे, पण त्यास म्हणावे तितके यश मिळत नाही. अद्यापही अकाली दला बरोबरच जाण भाजपाला भाग पडते आहे. १९८४ च्या शीख विरोधी कत्तलींसाठी कॉंग्रेसला क्षमा मिळाल्याचे चित्र पंजाबात उभे राहीले आहे.

भाजपला पंजाबात फार मोठे काम करावे लागणार आहे. वैचारीक दृष्ट्या पंजाबच्या भूमिी परिवाराला फारशी अनुकूल नाही. खूप मोठी मशागत व नांगरणी करावी लागेल असे दिसते. तामिळनाडु एवढाच पंजाबही भाजपाला अवघड आहे.
© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...