Friday, March 31, 2017

मानससरोवर यात्रा

हज यात्रेला मिळत असलेली सबसिडी बंद करण्याचा निर्णय परस्पर घेणे योगी आदीत्यनाथांच्या हाती नसला तरी मानस सरोवरासाठी सबसिडी देण्याची त्यांनी घोषणा केली आहे, हि एक चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकारने काही वर्षांनी योग्य वेळ येताच वाटल्यास सर्वच बंद करावे. पण आता मानस सरोवर यात्रेला जास्तीत जास्त हिंदुंनी जावे.
अर्थात हि यात्रा काही सोपी नाही. हि यात्रा करण्यास फिटनेस अर्थातच महत्वाचा असतोे, त्या वाचून यात्रेकरु होण्यास परवानगीच मिळत नाही. मानस सरोवराचे सौंदर्य अप्रतिम आहे. आपला एक सांस्कृतिक , धार्मिक आणि राष्ट्रिय सीमावर्ती विभागातला ठेवा, स्वातंत्र्यानंतर आपणास लाभलेल्या व आपण निवडलेल्या ढिसाळ नेतृत्वामुळे आपल्या हातातुन गेल्याचे दु:ख होते.
या यात्रेचा आणि सबसिडिचा काही हिस्सा चीनला जात असला तर ते पाप जुन्या राज्यकर्त्यांचे आहे. ज्यांना हा हिस्सा चीनला जातो आहे म्हणून दु:ख होते त्यांनि चीनी मालावर बहिष्कार घाला म्हणुन प्रचार करणे , व स्वत:ही तो अमलात आणणे हे जास्त व्यावहारीक आहे. चीनला यात्रेतुन जाऊ शकणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा चीनी मालामुळे जातो आणि देशी उद्योगांवर मंदीची सावट येते ते वेगळेच. यात्रेविरुध्द बोलणाऱ्या बुध्दीवाद्यांनी जरा तिकडे लक्ष द्यावे ! काही खर्च हे आवश्यक असतात. यात्रेवर खर्च होणारा पैसा हा वाटल्यास संरक्षणासाठी असलेल्या बजेट मधला एक भाग समजावा.
मुळात मानस सरोवर हा केवळ धार्मिक उपचार नाही. धर्मा बरोबर संस्कृती व राष्ट्रिय विचार सुध्दा त्यामागे आहे. केवळ हज यात्रेला counter attack एवढ्याच परिप्रेक्षात त्या कडे पाहु नये. हाज ला जाऊन आला की हाजी हि उपाधी मिळते तस काही मानस सरोवर यात्रेला धार्मिक महत्व नाही. हि यात्रा मुख्यत: सांस्कृतिक आहे हे लक्षात ठेवावे. तसेच ते आपल्या मुळ व प्राचीन सीमांची स्मृती जपणे पण आहे. अशा महत्वाच्या जुन्या सांस्क्रुतिक ठेव्यांना हिंदु समुहाने भेटी दिल्याने हिंदुंची तिथे वहिवाट रहाण्यास सहाय्य होते. किंबहुना अशा प्रकारे सीमांवर हेतुत: यात्रा व देवस्थाने बांधली जातात, याने तो भाग दुर्लक्षित होत नाही. बहुदा आपल्या जुन्या कौटील्यादी राजनीतीचा हा एक भाग आहे, जास्त शोध घ्यावा लागेल.
सीमेवरची देवस्थाने आणि यात्रा या आपल्या सीमांवर नागरीक व शासन दोघांचे लक्ष व टेहेळणी करण्यास उपयोगी पडतात. तीर्थयात्रांच्या निमित्ताने होणारे दळणवळण शत्रूच्या हालचालींवर दृष्टी ठेवते. कारगीलच्या वेळी ये जा करणाऱ्या मेंढपाळांमुळेच पाकिस्तानच्या हालचाली कळल्या. तीर्थयात्रा या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व राष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा असतात.नुसतच बुध्दीवादाची टिमकी वाजवून इहवादी राष्ट्रवाद सिध्द होत नाही. इहवादाचा अतिरेक हा एकांगी विचार आहे हे सावरकरांना चांगलेच माहीत होते.
सावरकरांनी मानससरोवर यात्रेला नेहरुंनी जो काही अटकाव केला होता, व एकुणच सीमाभागाकडे जे दुर्लक्ष केले होते त्यावर आपल्या स्वत:च्या शेवटच्या जाहीर भाषणात टिका केली होती. आज सावरकर हयात असते तर त्यांना योगींच्या निर्णयाचा एक पहिल सकारात्मक पाऊल म्हणुन आनंदच वाटला असता.
समग्र सावरकर साहित्य खंड ८ प्रकाशन वर्ष १९९३ स्फुट लेख पृ. ६२ ची ही छायाप्रत

 © चंद्रशेखर साने

"...नेहरुंनी चीनला सांगितल की, त्या टोकापर्यंत तुम्हाला काही त्रास देणार नाही. म्हणून चीनने आज मानस सरोवर घेतल. या मानससरोवरावर कालिदासान कविता लिहील्या, ज्यात आमच्या देवांगना न्हाल्या त्या मानससरोवराची यात्रा करु नका म्हणतो. कारण नेहरु सांगतो, तिकडे दंगल आहे आणि हजची यात्रा सोपी जावी म्हणून त्याचे पैसे आमच्या राज्यातून दिले जातात. तुमच्या आमच्या करातून त्यांच्या हज्जच्या यात्रा होतात आणि मानस सरोवराची यात्रा करु नये कारण तिकडे दंगल आहे. अरे ! दंगल आहे तर इथुन सैन्य पाठवून दे. काय करताहेत या ठेवलेल्या सेना? पण तुम्हाला सांगतो, सेनेला दोष देऊ नका ! अगदी योग्य आहे आजची सेना...."

- स्वातंत्र्यवीर सावरकर पुणे येथील भाषण मे १९६१
समग्र सावरकर खंड ८, स्फुट लेख पृ . ६२

 

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...