Wednesday, March 29, 2017

सरसंघचालक का राष्ट्रपती?


सामनाचे पत्रकार व कार्यकारी संपादक राऊतांनी भागवतांचे नाव राष्ट्रपती पदा साठी सुचवणे किंवा परवा माझ्या फेसबुक वॉल वर येऊन ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश अकोलकर यांनी येऊन असंबध्द पध्दतीने मूळ विषयाचे विषयांतर करुन "मग करा ना भागवतांना राष्ट्रपती" हे पालुपद वारंवार आळवणे या सगळयाची मजा वाटते.

ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि त्यांच्या कार्यपध्दतीचे कणभरही ज्ञान आहे, त्यास, भागवतांना संघाने राष्ट्रपतीपदासाठी निवडणे अथवा भागवतांनी ते स्वीकारणे अथवा या सुचनेमुळे सर्वसामान्य संघस्वयंसेवक सुखावला असेल अस वाटण हे सगळच असंभव होते.

संघस्वयंसेवकाला भागवत राष्ट्रपती होणे अथवा न होणे यावर विशेष काही स्वारस्य असेल अस कुठेही जाणवल नाही. त्यांनी तशा काही भावना प्रकट करण हा त्यांचा स्वभावही नाही.

ज्यांच सगळ राजकारण आणि आयुष्यच पदांभोवती फिरत असत , त्यांची विचारांची झेपच मुळात तितकी तोकडी आहे , ज्यांना संघाचा राजकारणात सहभाग नाही हेच मान्य नाही ते असे तारे तोडत असतात. त्यात राऊत काय अकोलकर काय पत्रकारच, तेव्हा सध्याच्या पत्रकारांची पत्रकारीता पहाता जिथे ते जनमताचा अंदाज घेण्यात ते वारंवर असफल रहात आहेत तिथे त्यांना संघ स्वयंसेवकांच्या मनाचा अंदाज यशस्वीपणे बांधण्याचा प्रश्नच येत नाही.

हे असे पत्रकार वगळता, भागवत राष्ट्रपती होणार का वगैरे चर्चा सोशल माध्यमांवर पण अजिबात रंगली नाही.
संघाची सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणारी माणस घडवण्याची शाळा आणि सेवाकार्य हे अखंड चालत राहील. तो समाजाचा गोड्या पाण्याच्या तळ्याचा किंवा मनुष्यवस्तीतून प्रवाहित होणाऱ्य महानदीचा एक शुध्द पाण्याचा नैसर्गिक झरा बनावा अशी त्याची स्थापना करणाऱ्यांची इच्छा होती. संघटना कशासाठी याचे उत्तर संघटनेसाठी संघटना असे रुढ झाले. क्रांतीकारक अथवा क्रांतीकारी संस्था नष्ट होऊ शकतात. उत्क्रांतीकारी शिकवण आणि संस्था किंवा व्यक्ती काम करत रहातात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही समाजमनाला धक्का लावणारे क्रांतीकारी कार्य करणार नाही. संघटना कशासाठी? माणस घडवण्यासाठी. माणस घडवताना ज्या समाजातुन माणस येतात, मिळवायची असतात, संघकार्याशी जोडुन घ्यायची असतात, त्या समाजाला क्रांतीकारी धक्के द्यायचे नसतात हे अगदी साध गणित आहे. धक्का देताना आपली ताकद किती याच अचुक अंदाज घ्यावा लागतो. नाहितर क्रांतीच्या त्या नुसत्याच वल्गना ठरतात. व्यक्तीची वल्गना व्यक्तीची प्रतिमा उध्वस्त करते तर संस्थेच्या वल्गनांनी समाजात संस्थेची पत खालावते.

संघ कधीही राजकारणात येईल अशी शक्यता नाही. संघ ही एक अखंड चालणारी माणसे घडवणारी प्रक्रिया आहे. यात माणसे घडतील , वेगवेगळ्या क्षेत्रात जातील, क्वचित बंगारु लक्ष्मणांसारखे काही नापासही होतील तर काही वाजपेयी मोदींसारखे काही खूप मोठया भराऱ्या घेतील आणि संघाचा ठसा समाजावर ठाशिव पणे उमटवत जातील.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघ कधीही स्वत:च्या अंगाला राजकारणाचा चिखल लावुन घेणार नाही असा माझा विश्वास आहे.

 आज श्री. भागवतांनीच स्पष्टपणे या अनावश्यक व कोणी फारशी दखल न घेतलेल्या चर्चेवर पूर्ण पडदा टाकला हे बरे झाले.

© चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...