Skip to main content

राशबेहारी बोस यांचे महत्व

राशबेहारी बोस यांचे आझाद हिंद सेनेतले महत्व वादातीत आहे. तथापी त्यांनी सावरकरांचे हिंदुत्व मान्य केल्याने आणि जपान हिंदुमहासभेचे ते अध्यक्ष असल्याने, गांधी कॉंग्रेस चे कट्टर विरोधी असल्याने व सावरकरांशी त्यांच्या असलेल्या जवळीकी मुळे एकुणच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांना गौणत्व आले आहे. आझाद हिंद सेनेचे संस्थापकच मुळात हिंदुमहासभेचे अध्यक्ष राशबेहारी बोस असून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेया ४५००० ते ५०००० सैन्याचे नेतृत्व सुभाषचंद्रांकडे, त्यांचे तरुण वय आणि तडफ यामुळे चालुन आले.

राशबेहारींचे महत्व वादातीत आहे, लॉर्ड हार्डींग्ज वर बॉम्ब टाकून पळून जाणारे राशबेहारी वृध्द झाल्याने नियतीने हे काम सुभाषचंद्रांवर सोपवले व राशबेहारी हे आझाद हिंद चे प्रमुख आजीवन सल्लागार झाले.
सुभाषचंद्रांचे कर्तुत्वाचा अभिमान बाळगत असतानाच जपान हिंदु महासभेचे अध्यक्ष राशबेहारींनी त्यांच्या
साठी ५०००० सैन्याची बेगमी आधीपासूनच करुन दिली होती ही नाकारायचे कहीच कारण नाही.

राशबेहारी हे कट्टर हिंदुत्ववादी होते , सावरकरांशी झालेल्या पत्रव्यवहारमुळे त्यांच्या हिंदुत्वाविषयी कल्पना अधिक स्पष्ट झाल्या. श्री. देशपांडे नामक तरुण मराठी सहकारी युवकामुळे त्यांचा सावरकरंच्या विचारांशी परिचय होते होता. हे देशपांडे सावरकरांचे लेखन व भाषणातील विचार राशबेहारींना भाषांतरीत करुन सांगत. राशबेहारींना सावरकर ही हिंदुस्थाना अंतर्गत असलेली महत्वाचा दुरदृष्टीचा व आंतरराष्ट्रिय राजकारणाचे सखोल ज्ञान असलेला मुत्सद्दी नेता वाटत होता.

वृत्तपत्रातून त्यांनी सावरकरांवर जपानी भाषेत लेखही लिहिला. त्याचा मथळा सावरकर- रायजिंग लिडर इन इंडीया असा होता. उठसुट हिंदुत्ववाद्यांनी काय केले असे विचारणाऱ्या बिनचड्डीवाल्यांना राशबेहारी हे नाव पुरेसे आहे. आणि हिंदुत्ववादी परिवारासाठी पण हे अभिमानास्पद नाव आहे.

ज्येष्ठ मित्रवर्य लेखक व वक्ते श्री. सच्चिदानंद शेवडे यांनी अंदमान द्वीपसमुहातील दोन बेटांना १८५७ ला भारतीयांशी कठोरपणे वागलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांची नावे आहेत ती बदलावीत अशी एक चळवळ / प्रचार सुरु केलाय. या बेटांपकी एका बेटाला राशबेहारींचे नाव द्यायची मागणी करावी असे मी सुचवतो आहे. तसच अंदमान- निकोबार या बेटांना नेताजींनी शहिद , स्वराज्य असे नाव दिले होते. ते बदलावे का नाही यावर माझे काहीच मत नाही.

 © चंद्रशेखर साने

Comments

Popular posts from this blog

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...