Sunday, March 26, 2017

राशबेहारी बोस यांचे महत्व

राशबेहारी बोस यांचे आझाद हिंद सेनेतले महत्व वादातीत आहे. तथापी त्यांनी सावरकरांचे हिंदुत्व मान्य केल्याने आणि जपान हिंदुमहासभेचे ते अध्यक्ष असल्याने, गांधी कॉंग्रेस चे कट्टर विरोधी असल्याने व सावरकरांशी त्यांच्या असलेल्या जवळीकी मुळे एकुणच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांना गौणत्व आले आहे. आझाद हिंद सेनेचे संस्थापकच मुळात हिंदुमहासभेचे अध्यक्ष राशबेहारी बोस असून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेया ४५००० ते ५०००० सैन्याचे नेतृत्व सुभाषचंद्रांकडे, त्यांचे तरुण वय आणि तडफ यामुळे चालुन आले.

राशबेहारींचे महत्व वादातीत आहे, लॉर्ड हार्डींग्ज वर बॉम्ब टाकून पळून जाणारे राशबेहारी वृध्द झाल्याने नियतीने हे काम सुभाषचंद्रांवर सोपवले व राशबेहारी हे आझाद हिंद चे प्रमुख आजीवन सल्लागार झाले.
सुभाषचंद्रांचे कर्तुत्वाचा अभिमान बाळगत असतानाच जपान हिंदु महासभेचे अध्यक्ष राशबेहारींनी त्यांच्या
साठी ५०००० सैन्याची बेगमी आधीपासूनच करुन दिली होती ही नाकारायचे कहीच कारण नाही.

राशबेहारी हे कट्टर हिंदुत्ववादी होते , सावरकरांशी झालेल्या पत्रव्यवहारमुळे त्यांच्या हिंदुत्वाविषयी कल्पना अधिक स्पष्ट झाल्या. श्री. देशपांडे नामक तरुण मराठी सहकारी युवकामुळे त्यांचा सावरकरंच्या विचारांशी परिचय होते होता. हे देशपांडे सावरकरांचे लेखन व भाषणातील विचार राशबेहारींना भाषांतरीत करुन सांगत. राशबेहारींना सावरकर ही हिंदुस्थाना अंतर्गत असलेली महत्वाचा दुरदृष्टीचा व आंतरराष्ट्रिय राजकारणाचे सखोल ज्ञान असलेला मुत्सद्दी नेता वाटत होता.

वृत्तपत्रातून त्यांनी सावरकरांवर जपानी भाषेत लेखही लिहिला. त्याचा मथळा सावरकर- रायजिंग लिडर इन इंडीया असा होता. उठसुट हिंदुत्ववाद्यांनी काय केले असे विचारणाऱ्या बिनचड्डीवाल्यांना राशबेहारी हे नाव पुरेसे आहे. आणि हिंदुत्ववादी परिवारासाठी पण हे अभिमानास्पद नाव आहे.

ज्येष्ठ मित्रवर्य लेखक व वक्ते श्री. सच्चिदानंद शेवडे यांनी अंदमान द्वीपसमुहातील दोन बेटांना १८५७ ला भारतीयांशी कठोरपणे वागलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांची नावे आहेत ती बदलावीत अशी एक चळवळ / प्रचार सुरु केलाय. या बेटांपकी एका बेटाला राशबेहारींचे नाव द्यायची मागणी करावी असे मी सुचवतो आहे. तसच अंदमान- निकोबार या बेटांना नेताजींनी शहिद , स्वराज्य असे नाव दिले होते. ते बदलावे का नाही यावर माझे काहीच मत नाही.

 © चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...