Saturday, March 25, 2017

महाराष्ट्र कोणाचा? शिवाजी महाराज, आगरकर आणि सावरकरांचा !

महाराष्ट्र हा शाहु,फुले, आंबेडकरांचा असे वाक्य सुमारे १९९५ ते २०१४ पर्यंत वारंवार ऐकु यायचे. या मागचा नेमका विचार काय? मी यावर एक सविस्तर लेखन करणार आहे, पण त्यापुर्वी थोडी चर्चा करता येईल का?
माझ्या डोक्यातले मुद्दे साधारण असे होते व काल रात्री मनात सविस्तर लेखही तयार होता.
(रात गयी बात गयी म्हणून सध्या त्याचे ठळक मुद्दे मांडतो. काही स्मृतीतून निसटुन गेलेत. चर्चेच्या ओघात मांडतो, सध्या हा कच्चा लेख समजावा. तसच शाफुआ म्हणजे शत्रू नव्हेत पण त्यांच्या त्यांच्या जागी व काळाच्या गरजेप्रमाणे ते ठिक असतील काही प्रमाणात, पण महाराष्ट्राची आताची गरज शि.आ.सा.)

१. या तीनही नावात शिवाजी महाराजांचे नाव समाविष्ट का नाही?
२. या तिन्ही नावांचा भारतीय राजकिय स्वातंत्र्य लढ्याशी का संबंध नाही?
३. हे तिनही जण साधारणत: परकिय व परधर्मिय ब्रिटीश सत्तेशी चांगले संबंध राखून होते.
४. शाहुंचा अपवाद वगळता (ते हिंदु धर्मचे व वेदांचे अभिमानी) फुले यांचे हिंदु धर्माीविषयीचे लेखन आक्षेपार्ह आहे , ती आगरकर वा सावरकरांच्या हिंदुंचे हित साधणाऱ्या टिकेसारखी नाही तर त्यात ख्रिश्चॅनिटी वा इस्लामचा जास्त गौरव व प्रचार आहे.

आंबेडकरांनी हिंदु धर्माचा धि:कार करत बौध्द स्वीकारला. नुसत जात पात तोडण नाही तर हिंदुधर्माचे विध्वंसन व विनाश हा त्यांचा खरा हेतु होता. पुर्वायुष्यात आंबेडकर हे हिंदुसंघटनाच्या बाजूचे होते हे मी नाकारत नाही पण त्यांच्या त्या भूमिकेत पुढे सातत्य राहिले नाही. हिंदुंचा तेजोभंग होईल असे वर्तन व विचार त्यांच्या उत्तर आयुष्याचा महत्वाचा भाग बनला.

५. शिवाजी महाराज, आगरकर व सावरकर यांची पंगत शाफुआ पेक्षा शिआसांचा महाराष्ट्र अशा नावे अधिक उपयुक्त आहे का?

कारण,

५ अ. शिवाजी महाराज हिंदु धर्माचे अभिमानी तरीही प्रागतिक विचारांचे, ब्राह्मणांसहित सर्व जातीजमाती व गटांना घेऊन सर्वजनहिताय अशी भूमिका घेणारे. हिंदुंना राजकिय व सामाजिक असे दोन्ही स्वातंत्र्याचा त्यांच्या त्यांच्या काळाच्या चौकटीत अधिकार देणारे. हिंदु धर्म राखणारे , हिंदु संस्कृतीचा, महाकाव्ये यांचा प्रभाव असणारे. मंदीरांचे पुनर्निर्माण करणारे थोर राष्ट्रनिर्माते. रयतेच्या हितासाठी झटणारे महापुरुष. शुध्दीकरणे करणारे, घरवापसी पासुन भाषाशुध्दीपर्यंत बारीकसारीक विचार करणारे.

५ ब. आगरकर सुधारक तरिही सर्वसमावेशक. सनातनी समजल्या गेलेल्या टिळकांना विरोध करणारे तरिही त्यांच्या लेखनातून प्रगतीशील हिंदुत्वाचा अभिमान डोकावत रहातो.

५ क. सावरकरांचे व्यक्तीमत्व तर अष्टपैलु. राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक स्वातंत्र्य दोन्हीचे प्रत्यक्ष कान करणारे व तत्व ज्ञानही देणारे. बेरजेचे गणित मांडण्यऱा सर्वसमावेशक हिंदुत्वाचे उद्गाते. शिवाजी महाराजांची धर्मशुध्दी (घरवापसी) भषाशुध्दी, सोसाळु नीती नाही तर ठोसाळु नीती आत्मसात करणारे.
देशाची परदास्यातून मुक्ती साठी लढणारे स्वातंत्र्यवीर आणि त्याचबरोबर सामाजिक स्वातंत्र्याचा लढा देणारे समता वीर अशा दोन्ही गौरवास प्राप्त.

५ ड. माझ मत बहुजनांची वेगळी पंगत मांडणाऱ्या शा.फु.आं. पेक्षा सर्वजनांची पंगत मांडणाऱ्या शि.आ.सां. चा महाराष्ट्र घडणे अधिक महत्वाचे आहे. कोणत्याही जातीला न वगळता सबका साथ सबका विकास.

विरोध कोणत्याच महापुरुषांना नाही, पण समाजात फुट पाडण्यासाठी कोणाचीही नावे वापरली जात असतील तर सर्वसमावेशक नावांचा विचार अधिक व्ह्यायला हवा.

विषय संवेदनशील आहे. अचुक व मोजक्या शब्दात सामाजिक परिस्थितीचे भान राखून प्रतिक्रिया याव्यात.


No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...